1962 भारत चीन युद्ध लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांची वीरगाथा,आणि चीनी भारताविरुद्ध मल्टी डोमेन युद्ध
Category:
व्हिडिओज1962 भारत चीन युद्ध लेफ्टनंट विष्णू आटले यांची वीरगाथा,आणि चीनी भारताविरुद्ध मल्टी डोमेन युद्ध “शूरा मी वंदिले” या सतीश अंभईकर लिखित आणि सौ माधवी श्रीनिवास नाटेकर ( कॅप्टन विष्णू आठवले यांच्या भगिनी) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुस्तकाचे, सांगलीत विमोचन झाले. माझे मित्र, मार्गदर्शक, गुरू , डॉक्टर श्रीनिवास नाटेकर सरांच्या, सख्ख्या मेव्हण्यानी अर्थात अकोल्याच्या कॅप्टन विष्णू आठल्ये यांनी 1962 च्या भारत चीन युद्धात नेफा बॉर्डरवर, बलॉंग क्षेत्रातील भीषण रणसंग्रामात हौतात्म्य पत्करले या बद्दलची माहिती या पुस्तकात आहे. या दरम्यान प्रख्यात लेखक, संरक्षण तज्ञ, ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे, “भारत चीन संबंध” यावर व्याख्यानही झाले. व्याख्यानामध्ये आपण 1962 चे चीन सोबतचे युद्ध हरलो आणि 2014 नंतर चीन सोबतचे युद्ध आपण हरणारच नाही, याचे दोन्हीचे कारण हे त्या त्या काळचे राजकीय नेतृत्वच आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध केले.