व्यक्ती-परिचय

राष्ट्रपती पदक विजेते वगसम्राट दादू इंदूरीकर

Category:

 

त्यांनी ‘गाढवाचं लग्न’ हे वगनाट्य मराठी रंगभूमीवर आणले. या वगनाट्याला राष्ट्रपती पारितोषिक, संगीत नाट्य अकादमीचे पारितोषिक मिळाले होते.

व्यक्ती-परिचय

पं. बापू पटवर्धन

Category:

 

बापू पटवर्धन यांनी गेले ९-१० वर्षे ब्लड कॅन्सरने आजारी होते. त्यांनी १५-२० केमो घेतल्या होत्या. त्यांनी कॅन्सरलाही मात दिली होती, असे त्यांचे शिष्यगण सांगतात. ३० किमो झाल्यानंतर त्यांनी कोलकात्याला जाऊन कार्यक्रम सादर केला.

व्यक्ती-परिचय

मराठी अभिनेत्री व संस्कृत पंडिता सुहासिनी मुळगावकर

Category:

 

सुहासिनी मुळगावकर यांनी आपले संगीताचे शिक्षण किशोरी आमोणकर यांच्या कडून घेतले. सुहासिनी मुळगावकर यांनी सौभद्र व मानापमान या जुन्या लोकप्रिय संगीत नाटकांतील भिन्न पात्रांचे संवाद एकटीनेच म्हणून दाखविण्याची नवीनच प्रथा सुरू केली व याचे त्यांनी ५०० हून अधिक प्रयोग केले होते.

साहित्य - ललित

साठवणीतील एक आठवण

Category:

 

आषाढी एकादशीच्या दिवशी शाळेतील लहान मुले. मुली आणि पालखी सोहळा केला गेला होता. दरवर्षीच करते ती. छोटेसेच विठ्ठल रखुमाई. आणि वारकरी होते. त्यांनी वारकऱ्यांचा पोषाख केला होता. मुलींनी डोक्यावर तुळशीचे वृंदावन आणि मुलांनी हातात पताके व गळ्यात टाळ घालून ठेक्यात वाजवत नाचत अगदी तल्लीन होऊन परिसरात मोकळे पणाने जात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला माणसं उभी होती. लहान पालखीला व वारकऱ्यांच्या पाया पडत होते. त्यांना पाहून मला वाटले होते की या छोट्यांना ना प्रपंचाची चिंता ना देवाजवळ काही मागणे. खरी तर हीच वारी व हीच खरी भावभक्ती.

लेखसंग्रह

जवळचं कृष्णविवर

Category:

 

ताऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या गाभ्यातली ऊर्जानिर्मिती थांबते व ताऱ्याचा गाभा कोणत्याही अडथळ्याविना, स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणामुळे आकुंचन पावू लागतो. अतिवजनदार ताऱ्याच्या बाबतीत तर तो इतका आकुंचन पावतो की, त्याची घनता अनंत होते. या अनंत घनतेमुळे या वस्तूचं गुरुत्वाकर्षण इतकं प्रचंड असतं की, अशा वस्तूकडून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, ताऱ्याच्या गाभ्याचं रूपांतर कृष्णविवरात होतं.

साहित्य - ललित

रम्य ते बालपण : चंद्रशेखर ओक

Category:

 

लहानपण देगा देवा, मुंगीसाखरेचा रवा’ संत तुकाराम महाराजांनी किती यथार्थपणे म्हटले आहे. खरंच बालपण किती रम्य असतं याची जाणीव आपणास काळाच्या ओघात जात असताना पदोपदी होत असते.

लेखसंग्रह

पतझडीच्या नोंदी !

Category:

 

मुक्ताईनगरच्या प्रवासाची अपूर्वाई माझी भगिनी आणि बंधू यांना जास्त होती कारण १९७५ च्या जडण-घडणीच्या वयापासून ते आता पोक्तपणाच्या (२०२२) वयापर्यंतीच्या वाटचालीत ते या परिसरापासून दूर होते. साहजिकच त्यांची (आणि नेहेमीप्रमाणे उगाचच माझीही) अवस्था- “छोड आए हम वो गलियाँ ” अशी झाली होती. परतल्यावर मला सहज चाळताना चक्क २२/०४/२०१३ ची खालील नोंद आढळली.