महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९८६- ८७ च्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज, पाणी व रस्ता आदी लोकांच्या मूलभूत समस्यांसाठी डॉ. महाजन यांनी संपूर्ण इंदापूर तालुक्यात पायी पदयात्रा काढून जनजागृती केली. या काळात अनेक समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण झाली होती. महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, किसन ताटे व सहकारी यांनी या फळीचे नेतृत्व केले. सेवा दलाच्या चळवळीतून ताटे यांनी तालुकाभर मोठा पुरोगामी विचारांचा समूह निर्माण केला होता.