No Picture
लेखसंग्रह

सर्वात मोठ कृष्णविवर !

Category:

 

S5 0014+81 हे मानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर आहे. हे मानवाला २०२१ ला सापडले . याचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या वस्तुमानाच्या ४० अब्जपट असून (वर्षाला ४००० सूर्यांच्या वस्तुमानाइतका पदार्थ गिळतं हे कृष्ण विवर) हे कृष्णविवर सातत्याने पदार्थ गिळंकृत करत असल्याने या कृष्णविवराभोवती अत्यंत तेजःपुंज अशी तबकडी तयार झाली आहे ,असे संशोधनाद्वारे दिसून येते . हे तेज आपल्या सूर्याच्या तेजाच्या ३०० पद्मपट (१ पद्म = १००० अब्ज) अधिक आहे किंवा सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या आकाशगंगेतील सर्व ताऱ्यांचं तेज एकत्रित पकडलं, तर त्या तेजाच्या २५००० पट अधिक तेजःपुंज आहे या कृष्णविवराची तबकडी.

No Picture
लेखसंग्रह

हृषीकेश मुखर्जी – एक दर्जेदार दिग्दर्शक

Category:

 

आजच्या  जमान्यात कमर्शिअल आणि समांतर सिनेमे असे सरळ सरळ दोन भाग सिनेपत्रकार पाडतात पूर्वी असे नव्हते.एक तर चांगला सिनेमा किंवा वाईट असे दोनच प्रकार असत. तरीही कमर्शियल व समांतर सिनेमाचा समन्वय साधला तो बिमल रॉय व त्यांचा चेला ऋषिकेश मुखर्जी यांनी. 

No Picture
लेखसंग्रह

रेल्वे प्लॅटफॉर्मवरील निराधार मुलं

Category:

 

भारतातील बऱ्याच मुख्य स्टेशनांच्या अगदी एका टोकाला एखादा प्लॅटफॉर्म किंवा यार्डाची एखादी दुर्लक्षित बाजू अशी असते, जिथे रेल्वे डब्यांचा फारसा वावर नसतो; परंतु अशा जागी एखादा जुना मोडकळीस आलेला डबा कायमचा रुळांवर असतो. ५ ते २० वर्षे वयोगटातील अनेक मुलं-मुली या डब्यालाच आपलं घर मानून तिथे मुक्काम ठोकतात. यांतील बऱ्याच मुलांना घरातून हाकलून दिलेलं असतं. काही वेळा घरच्या जाचाला कंटाळून नाइलाजानं काही जण रेल्वे प्लॅटफॉर्मचा आश्रय घेतात.

No Picture
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गाणी बनतानाचे किस्से

Category:

 

प्रत्येक गाणे नशीब घेऊन जन्माला येते. काही गाणी गाजतात तर काही विस्मृतीत जातात.तर काही किस्से बनून जन्माला येतात.एकाच  गाण्याच्या किस्याबद्दल काही लोकांच्या वेगवेगळ्या आठवणी असतात.  त्यातलीच काही गाण्याचे किस्से

No Picture
लेखसंग्रह

दत्ता दिगंबरा

Category:

 

दत्तप्रभूंची विविध रूपे अवतार पाहायला मिळतात. आजही कुठल्या ना कुठल्या रूपात ते आपल्याला भेटतात .आपल्या मनीषा पूर्ण करतात. योग्य मार्ग दाखवतात पण हे रूप ओळखण्यासाठी आणि ते जाणून घेण्यासाठी साधनेची, निष्ठेची, भक्तीची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नितांत श्रद्धेची व सबुरीची गरज आहे.

No Picture
साहित्य - ललित

दूर न पोहोचलेले सूर (आठवणींची मिसळ – भाग ८)

Category:

 

आईच्या आठवणीही त्याच्या गांठी नव्हत्या.मग त्या तिन्ही लहान मुलांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून त्यांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला.निदान त्यांनी तसे सांगितले.इतरांनी त्यांची स्वतःची गरज न सांगताच ओळखली.ती वयाने त्यांच्यापेक्षा बरीच लहान होती.मग त्यांचा नवा संसार सुरू झाला.

No Picture
अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – ४४ – अम्मू स्वामीनाथन

Category:

 

गांधींच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर फार दिसून आला. कमलादेवी चटोपाध्याय, ऍनी बेसेंट, ह्या सगळ्यांबरोबर त्या मद्रास मध्ये विविध उपक्रम राबवित होत्या. ह्या सगळ्यांच्या प्रयत्नाने Women’s India Association, मद्रास येथे आकारास आली ज्या अंतर्गत भारतीय महिलांच्या समस्यांवर खूप मोठे काम सुरू झाले, जसे की बाल विवाह रोकणे, स्त्री शिक्षण, देवदासी प्रथा, परदा प्रथा मोडून काढणे इत्यादी. स्वातंत्रता संग्रामात सुद्धा त्यांची कारकीर्द उल्लेखनीय होती. भारत छोडो आंदोलना नंतर त्यांनी १ वर्ष सश्रम कारावास देखील भोगला.