लेखसंग्रह

जहाँ चार यार मिल जाए

Category:

 

मित्र म्हणजे ज्यांच्यासमोर रोजचे मुखवटे काही क्षण काढून ठेवता येतात अशी जमात ! हरिभाईच्या चार भिंतींमधील संस्कृतीने ज्यांना आजही बांधून ठेवले आहे असे हे सारेजण !

लेखसंग्रह

बेळगांव निवासी प. पू. आई श्री कलावतीदेवी यांच्या सहवसातील अनुभव

Category:

 

प. पू. आईंचा अनुग्रह घेतल्यापासून माझ्या आईचे मन त्यांनी घालून दिलेल्या भजनाच्या नेमामध्ये स्थिर झाले आणि तिचा आणि तिच्यामुळे माझा (माझी शाळा सांभाळून) भजनाचा नेम चालू झाला. देवाच्या कृपेने माझ्या आईचा व माझा आवाज चांगला असल्यामुळे आम्ही भजनात उंच पट्टीत भजन म्हणायचो. भजनात सतत आमचा आवाज येत असल्याने आमच्या समोर आई भजनाच्या वेळेत येऊन बसायच्या त्यावेळी मध्येच डोळे उघडून न्याहाळणी करायच्या. त्यावेळी आईंनी आमच्यावर टाकलेल्या कृपाकटाक्षाने आम्हाला भजन म्हणण्यात अधिक स्फूर्ती मिळावयाची.

कथा

एक परीस स्पर्श (भाग – ४०)

Category:

 

सध्या ! विजय काय विचार करतोय ? हे त्याच्याच शब्दात … काही दिवसांपासून मी टी. व्ही. वर पिंकीचा विजय असो ! ही नवीन मालिका पाहतोय ! त्यातील नायिका म्हणजे पिंकी कोणताही विषय तिच्या लग्नापर्यत नेण्यात तरबेज असते…तसेच काहीसे माझ्या घरातील लोकही तरबेज झालेत, कोणताही विषय ते माझ्या लग्नापर्यत अगदी सहज नेतात …आज सकाळी – सकाळी बाबांचा प्रश्न…गावची तिकीट काढायला सांगू ना ? त्यावर नेहमी प्रमाणे मी नाही म्हणालो,” का ?

अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – ४३ – राजकुमारी अमृत कौर

Category:

 

पंजाब मधील जलीयनवाला बाग हत्या कांडाने त्यांचे मन उद्विग्न झाले, भारतावरील ब्रिटिश राजवटीचे काळे रंग सगळ्या देशाने अनुभवले. राजकुमारी अमृत कौर आतून हलल्या. त्यांच्यावर गांधी विचारधारेचा पगडा होताच. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. गावा-गावातून फिरून लोकांमध्ये स्वातंत्र्य चळवळी बद्दल जागरूकता निर्माण केली. त्यावेळची परिस्थिती म्हणजे कितीतरी लोकांना आपण पारतंत्र्यात आहोत म्हणजे काय ह्याचेसुद्धा आकलन नव्हते. त्याचबरोबरीने समाजात बरीच सुधारणा आवश्यक आहे जे त्यांना जाणवलं. बाल विवाह बंदी, परदा प्रथा किव्हा देवदासी ह्या सगळ्यांविषयी त्या बोलल्या. लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. दांडी यात्रा, चले जाव आंदोलन ह्या सगळ्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. प्रत्येकवेळी त्यांना कारावास सश्रम भोगावा लागला.

लेखसंग्रह

एक नाणे, दोन बाजू: पर्यटन आणि पर्यावरण

Category:

 

आपल्या भारतातील पयर्टन क्षेत्राचा आढावा घ्यायचा झाला तर जुन्या काळात आपल्याकडे जी तीर्थाटनाला जायची पद्धत होती तो भारतातील पर्यटनाचा उगम. पुढे ब्रिटिशांच्या काळात गोया साहेबाने इथला उन्हाळा सोसेना म्हणून अगदी माथेरानपासून मसुरीपर्यंत भारतभरातली हिलस्टेशन्स शोधून काढली आणि उन्हाळ्यात तिकडे जाण्याची पद्धत पडली.