दोन ‘जटिल’ प्रश्न!
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiलाखाच्या गोष्टीच्या’ शूटिंगच्या वेळी, गदिमा जमावावर धावून का गेले? राजा परांजप्यांचा दात कुणी पाडला?
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiलाखाच्या गोष्टीच्या’ शूटिंगच्या वेळी, गदिमा जमावावर धावून का गेले? राजा परांजप्यांचा दात कुणी पाडला?
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiते मला फार लागट बोलले. म्हणाले “तुझी झोपडपट्टीसमोर बसूनबिडी प्यायची सुद्धा लायकी नाही”. मग मी ठरवलं इथून पुढे यांच्याकडून एक पैसासुद्धा घ्यायचा नाही
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiमाझ्या विवाहाच्या निमित्ताने पंचवटीच्या प्रांगणात अवतरले, “मंतरलेले चैत्रबन”! सुगंधी वातावरण, दीपांच्या ओळींनी ऊजळलेली रात्र, माझ्या स्वरानंदी मित्रांचे उमलणारे स्वर! आठवणीत हरवलेले रसिक, आणि साक्षीला आकाशातला चंद्र!!
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteदिलीप वेंगसरकर यांच्या कारकीर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे लॉर्ड्सवर साकारलेले सलग तीन शतके. सहा फूट उंचीचा वेंगसरकर एकाग्रतेने स्टान्स घेऊन उभा राहिले की हिमालयातल्या शिळेवर डोळे मिटून तपश्चर्येला बसलेल्या ऋषीसारखाच वाटे. डिफेन्स करण्याची त्याची पद्धत वेगळी होती. डिफेन्स करताना तो फार वाकत नसे. बॉलला बॅटवर लेट येऊ देऊन उभ्या उभ्या संरक्षण करण्याचे त्याचे तंत्र होते. काही वेळेस उभ्या उभ्या खेळण्याने त्याचा घात व्हायचा. पण फलंदाजीच्या बायबलमधले सगळे फटके तो बाळगून होता. मिडअॉन आणि मिडविकेटमधून मारलेला रायफल शॉट त्याचा ट्रेडमार्क होता. त्या दर्जाचा शॉट नंतर द्रविडकडे पाहायला मिळाला.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसुमारे ४०० वर्षांपूर्वी गोव्यातील सक्तीने ख्रिश्चन केलेल्या हजारो गावकऱ्यांचे शुद्धीकरण केले. या शुद्धीकरण आंदोलनात मामांचा सिंहाचा सहभाग होता. या घटनेचे सांगोपांग विवेचन करणारा ‘गोमंतक शुद्धीचा इतिहास’ हा ४०० पानांचा स्वतंत्र विस्तृत ग्रंथ मामांनी लिहिला. विशेष म्हणजे या ग्रंथाला, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सुंदर प्रस्तावना लाभली.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपंडितांच्या बहुतेक कविता मुक्तच्छंदात्मक आहेत. गावड्यांच्या कोकणीत लिहिलेल्या त्यांच्या काही कवितांत जोष-जोम आहे. गरीबदुबळ्यांवर होणाऱ्या अन्यायाला ते आपल्या काव्यातून वाचा फोडतात, गोमंतकाचे सृष्टिसौंदर्य मोठ्या कौशल्याने वर्णितात, तर कधीकधी हळुवारपणे आपल्या प्रेमकाव्यातून विरहाची व्यथाही व्यक्त करतात. संपन्न शब्दभांडार, सहजसुंदर व परिणामकारक शैली, प्रतिमांचा मनोहर विलास, विचारांची घार व भावनेची उत्कटता यांमुळे त्यांच्या काव्याला एक आगळेच वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे.
Category:
साहित्य - ललितइसाक यांनी ‘जी’ व ‘माधुरी’ या पाक्षिकांसाठी लेखन सुरु ठेवले. पन्नास वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दी दरम्यान, त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. भगवान यांच्यावरचं ‘अलबेला’, ‘आई, माॅं, मदर’, दादा कोंडके यांच्यावरचं ‘एका सोंगाड्याची बतावणी’, ‘गुरुदत्त-एक अशांत कलावंत’, ‘चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ’, ‘चित्रपट सृष्टीतील काही एकतर्फी प्रेमकहाण्या’, सुलोचना दीदींवरील ‘चित्रमाऊली’, ‘तीन पिढ्यांचा आवाज-लता’, ‘पेज थ्री’, नूरजहाँ ते लता’, ‘दादासाहेब फाळके’, ‘मराठी चित्रपटांचा इतिहास’, ‘मराठी चित्रपटांचा १०० वर्षांचा आढावा’, ‘मीनाकुमारी’ इत्यादी अनेक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत..
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानस्थापनेपासूनच जनसंघाचे कार्य महाराष्ट्रात सुरु झाले. अर्थात विविध राजकीय विचारधारा, विशेषतः काँग्रेसची विचारधारा, महाराष्ट्रात प्रचलित असल्याने हे काम तेवढेसे सोपे नव्हते. येथील वाटचालीत जनसंघासमोरील आव्हाने जेवढी मोठी होती, तेवढीच मोठी आव्हाने दुसऱ्या स्वातंत्र्यानंतर १९८० मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टी (भाजपा) समोरही होती. पुर्वी जनसंघ असतांना जनसंघाचा दिवा घरोघरी लावा. असे कार्यकर्ते म्हणायचे. कारण पूर्वीच्या जनसंघाची निशाणी दिवा (पणती) होती. त्यावेळी विरोधक (कॉँग्रेस) जनसंघ व दिव्याची खिल्ली उडवायचे. त्यावेळी विजय दूरच परंतु उमेदवार मिळणे कठीण जायचे. आता निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्याना जसा आनंद होतो तसाच आनंद तेव्हा जनसंघाला उमेदवार मिळाल्यानंतर व्हायचा. महाराष्ट्रात त्यावेळी स्व. उत्तमराव पाटील, स्व. रामभाउ म्हाळगी , स्व. रामभाउ गोडबोले, स्व. मोतीराम लाहने यांनी खूप कष्ट करून जनसंघ वाढवला. कॉँग्रेसला योग्य पर्याय म्हणूनही भाजपाचे नाव त्या वेळी होऊ लागले. याचबरोबर भाजपा एका-एका राज्यात सत्तेत येऊ लागला व अन्य पक्षांचे लोक भाजपात येऊ लागले.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteआशा पोतदार यांना आत्माराम भेंडे यांच्यामुळे ‘नरो वा कुंजरो वा’ या व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचा उपयोग त्यांना अनेकानेक नाटके मिळण्यासाठी झाला. पुढे त्यांनी ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या व्यावसायिक नाटकांतही कामे केली. नंतर १९७१ साली रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘विसर्जन’ या नाटकाचा अनुवाद असलेल्या ‘माते तुला काय हवंय’ या नाटकात त्यांनी काम केले. या नाटकात नानासाहेब फाटक यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. हे नाटक लोकप्रिय झाले आणि या नाटकातील त्यांची भूमिका पाहूनच दिग्दर्शक ना.बा. कामत यांनी ‘प्रेम आंधळं असतं’ (१९६२) या चित्रपटाची नायिका म्हणून त्यांची निवड केली.
Copyright © 2025 | Marathisrushti