शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुके व प्रमुख गावे जोडण्यात आली आहेत. मनमाड-काचीगुडा व पूर्णा-आदिलाबाद हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. औरंगाबाद, पुणे हे जिल्ह्याला नजिकचा विमानतळ आहेत.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

नांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे. जिल्ह्यात नांदेड, देगलूर, कंधार, हदगाव, भोकर व मुखेड येथे औद्योगिक वसाहती आहेत.शिवाय जिल्ह्यात ६ साखर कारखाने आहेत.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

नऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते. नंद घराण्याच्या राजवटीमुळे नांदेडला ‘नंदतट’ असेही म्हणत.या दोन्ही शब्दांचा अपभ्रश होऊन पुढे या ठिकाणाला नांदेड म्हणून ओळखले जाऊ लागले.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

नंदुरबार जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारा लोहमार्ग नंदुरबार जिल्ह्यातून जातो. नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा रनाळे ही जिल्ह्यातील महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

नंदुरबार जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक वसाहत तळोदे येथे आहे. जिनिंग व प्रेसिंगचे कारखाने नंदूरबार व शहादे येथे आहेत. तळोदे येथील सागाच्या लाकडाची बाजारपेठ जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

नंदुरबार जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन 1998 मध्‍ये झाली. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खानदेश असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी अभीर (किंवा अहीर) राजे खानदेशावर सत्ता गाजवत होते.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

ठाणे जिल्हा

Category:

 

ठाणे जिल्हा अनेकविध वैशिष्ट्यांनी समृध्द असा जिल्हा आहे. ठाण्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र असल्याने या जिल्ह्याला सुंदर किनारा लाभला आहे. पूर्वेला सह्याद्रिची रांग असल्याने हा जिल्हा जंगल, डोंगर-कपारींनी समृध्द आहे. बहुविध वैशिष्ठ्ये लाभलेला कोकण सुध्दा ठाणे जिल्ह्याच्या जवळ आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

ठाणे जिल्ह्यात डोंगराळ प्रदेश, खाड्यांचा प्रदेश व वाढते नागरीकरण यांमुळे शेतजमिनीचे (कृषी क्षेत्राचे) प्रमाण कमी आहे. भात हे येथील प्रमुख पीक आहे. एकूण लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी ५०% हून अधिक क्षेत्र भाताच्या लागवडीखाली आहे. पालघर, भिवंडी, मुरबाड इ. तालुक्यांत भाताचे अधिक उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात नाचणी व वरीचेही पीक घेतले जाते. वसई तालुक्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

ज्येष्ठ साहित्यिक. यांचा जन्म ठाणे येथे झाला. ”सत्यकथा’ या मासिकाचे ते काही काळ संपादक होते. तसेच त्यांनी १९४१ साली नाट्यनिकेतन ही संस्था स्थापन केली. कन्यादान, भटाला दिली ओसरी ही त्यांची काही प्रसिद्ध नाटके होत.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

येथे वारली ही प्रमुख आदिवासी जमात राहते. २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १५% लोक आदिवासी आहेत.वारल्यांची खेडी विखुरलेल्या झोपड्यांच्या गटागटांनी वसलेली असतात. या वस्तीच्या गटाला पाडा म्हणतात. दहा-बारा पाड्यांचे एक खेडे बनते. यांच्या झोपड्यांच्या भिंती कुडाच्या, शेणा-मातीने लिंपलेल्या असतात. यांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेती, शेतमजुरी, पशुपालन, लाकूडतोड या व्यवसायांवर होतो.

  June 26, 2015