अवर्गिकृत

विज्ञान आणि अध्यात्म : कार्य, घटना, परिणाम वगैरे

Category:

 

या विश्वात कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही किंवा कोणताही परिणाम कारणाशिवाय दिसत नाही. कार्य घडल्याशिवाय किंवा कोणतीतरी उर्जा खर्ची पडल्याशिवाय कार्यवाही होऊ शकत नाही. हे कारण किंवा सहभागी झालेली उर्जा कळली नाही तर घडणारी घटना किंवा दिसणारा परिणाम, चमत्कार वाटतो पण ते खरे नाही. या संबंधीच या लेखात चर्चा केली आहे.

अवर्गिकृत

विज्ञान आणि अध्यात्म

Category:

 

साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी या पृथ्वीवर जीव निर्माण झाला असावा असे शास्त्रज्ञ सांगतात. सुरुवातीला हे जीव अगदी प्रथमावस्थेत, जीवाणू, बुरशी, आणि एकपेशीय प्राणी यांच्या स्वरुपात निर्माण झाले. पृथ्वीवर सजीव कसे निर्माण झालेत याबद्दलची माहिती अनेक पुस्तकांतून आणि माहिती जालावर मिळते. या नंतर कोट्यवधी पृथ्वीवर्षांचा काळ लोटला. आनुवंशिक तत्वात उत्क्रांती होऊन प्राणी आणि वनस्पतींच्या लाखो प्रजाती निर्माण झाल्या. सरतेशेवटी सुमारे ७० लाख पृथ्वीवर्षांपूर्वी, कपिंच्या काही प्रजातीत उत्क्रांती होऊन मानव निर्माण झाला.

मानवी मेंदूची अध्यात्मिक सुरुवात सुमारे १० हजार वर्षांपूर्वी झाली. त्या काळापासून आजपर्यंत, मानवी शरीररचनेत आणि पृथ्वीच्या पर्यावरणात फारसा फरक पडला नाही. त्यामुळे त्या काळी विचारवंतांनी केलेली निरीक्षणे आणि घेतलेले अनुभव आपण आजही घेऊ शकतो. त्याकाळी असलेली बुद्धिवान माणसे आजही जन्म पावू शकतात. त्याकाळी केलेल्या निरीक्षणांचे आणि अनुभवांचे स्पष्टीकरणे, त्यांच्या मेंदूच्या कुवतीनुसार आणि त्या काळी उपलब्ध असलेल्या ज्ञानानुसार त्यांनी दिले. ते गेली शेकडो वर्षे उपयोगी पडले, मार्गदर्शक ठरले.

अवर्गिकृत

मर्ढेकरांची कविता – हाडांचे सापळे हासती

Category:

 

मर्ढेकरांच्या हाडांचे सापळे हासती ह्या कवितेवर अश्लीलतेच्या कारणावरून त्या काळात खटला भरण्यात आला होता. ह्या कवितेचा अर्थ वेगळ्या संदर्भात ऊलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

अवर्गिकृत

मराठी माणूस आणि योगविद्या

Category:

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर १४ नोव्हेंबर, १९५४ साली हैद्राबादयेथील ’मराठवाडा साहित्यपरिषदेत‘ भाषण करताना म्हणाले होते की, ”भारतातील सर्वभाषिक प्रांतात अत्यंत दुर्दैवी प्रांत कुठला असेल, तर तो ’महाराष्ट्र‘ होय! इतर परप्रंातीयांकडून संपूर्णपणे नागवला गेलेला, हा भोळाभाबडया माणसांचा प्रदेश आहे. भारतीय नागरिक सर्व एक, हे जरी खरे असले, तरी व्यवहारात ही भावना निरर्थक आहे. राजकारणात हे औदार्य अंगलट येते व भोळयाभाबडयांचा घात होतो!“ आधुनिककाळाच्या रेटयात या ’नागवल्या गेलेल्या व म्हणूनच मागे पडलेल्या‘ भोळयाभाबडया मराठीजनांना, पुन्हा एकवार ’अटकेपार झेंडा‘ लावण्यासाठी व शिवछत्रपतींप्रमाणेच जाज्वल्य राष्ट्रधर्म निर्मिण्यासाठी गरज आहे, ती एका तेजस्वी व निरोगी-निर्व्यसनी तरूणपिढीची… आणि ही अशी ’पिढी‘, फक्त अविरत योगाभ्यासाच्या मजबूत ’शिडी‘वरच चढून गगनाला गवसणी घालू शकेल!!!“

अवर्गिकृत

दिपस्तंभ विवेकानंद

Category:

 

स्वामीजी म्हणाले होते, “अजून पन्नास वर्ष आपण एकही मंदिर बांधलं नाही तरी चालेल, अजून पन्नास वर्ष आपण शंकराला बिल्वपत्र वाहिलं नाही तरी चालेल. आता पन्नास भारत हेच तुमचे मंदिर होऊ द्दा, आता पन्नास वर्ष भारतातील गोर-गरीब जनता हाच तुमचा परमेश्वर होऊ द्दा.” काय सुंदर आणि सात्विक विचार आहेत. शेवटि माऊलीच ती. विवेकानंदांच्या शैलीत सांगायचे झाले तर, आपण स्वामी विवेकानंदांची जयंति साजरी नाही केली तरी चालेल, याचा अर्थ असा नाही की साजरी करु नये. एकवेळ साजरी नाही केली तरी चालेल. पण विवेकानंदांच्या संकल्पनेतील हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हीच खर्‍या अर्थाने विवेकानंदांना श्रद्धांजली आहे, आदरांजली आहे. जर असे झाले नाही तर सगळे व्यर्थ आहे. पण आपण सकारात्मक विचार करु, उद्दाचा उगवणारा सुर्य अखंड हिंदुस्थानात असेल, हेच लक्ष्य ठेवून, हेच ध्येय घेऊन आपण जगू आणि स्वामी विवेकानंदांच्या संकल्पनेतील हिंदु राष्ट्र स्थापन करू.

अवर्गिकृत

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवतगीता : अध्याय २ : श्लोक १६.

Category:

 

गीता लिहून ५ हजार वर्षे झाली आहेत. या काळात हजारो विचारवंतांनी, गीतेतील श्लोकांचा, त्यांच्या बुध्दीला भावेल असा अर्थ लावला आहे. आणि तो अधिकारवाणीने जनतेला सांगितला आहे याची कृपया नोंद घ्यावी. यातला नेमका कोणता आशय, महर्षि व्यासांना अभिप्रेत होता हे समजणे कठीण आहे. आता, गीतेत विज्ञान शोधण्याचा मी प्रयत्न करतो आहे. बरेच शास्त्रज्ञ असाच प्रयत्न करीत आहेत. तरीपण त्यांच्या दृष्टीकोनात फरक असणारच.

अवर्गिकृत

भारत-पाक अणु युद्धामुळे जागतिक दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होईल ?…..एक पाहणी निष्कर्ष .

Category:

 

भारत आणि पाकिस्तान ह्या दोन देशामध्ये युद्ध पेटले व त्यांत अणु बॉंम्ब वापरले गेले तर त्याचे परिणाम फक्त ह्या दोन देशांच्या अवती भवतालच्या प्रदेशा पुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगात त्याचे परिणाम दिसतील. ही लढाई ( युद्ध ) जरी आशिया खंडात होत असेल तरी पण जगात याचा परिणाम दिसेल व त्या मुळे जागतिक दुष्काळाची भीती उद्दभवते व हें युद्ध त्यासं कारणीभूत ठरेल.

अवर्गिकृत

मर्ढेकरांची कविता – आला आषाढ श्रावण

Category:

 

मर्ढेकरांची “आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी ;” ही कविता पहिल्यांदा वाचल्यावर निसर्गवर्णनपर कविता वाटते. परंतु कवितेतील हा पाउस वेगळाच आहे. ह्या कवितेला दुसऱ्या महायुध्दात अमेरीकेने जपानवर टाकलेल्या अणुबाँबचा संदर्भ आहे. अमेरीकेने जपानमधील हीरोशिमा व नागासकी याशहरांवर अणुबॉंब टाकल्यावर पडलेला किरणोत्सर्गी असा हा पाऊस आहे.