लेखसंग्रह

घरगुती समारंभ साजरे करताना याचा विचार व्हावा…!

Category:

 

महागाई कमी व्हावी म्हणून रिझर्वबँकेने नामी युक्ती शोधून काढली. बँकांच्या सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजांचे दर एक-दोन वेळा नाही तर चक्क १३ वेळा वाढविले तरीही महागाई काही अजून आटोक्यात येत नाही उलट त्याने विकासाची गती मात्र मंदावली. दैनंदिन जीवनात सातत्याने भेडसावणाऱ्या अडीअडचणींचे विशेषता महागाईचे गणित सोडवायचे असेल तर त्यासाठी चिंतन, शोध व अभ्यास करणे गरजेचे आहे.

लेखसंग्रह

चंचु प्रवेश !

Category:

 

काही महिन्यांत सण व उत्सवांना सुर्वात होईल आणि सर्व वातावरण आनंदी उत्साही व सुगंधाने भरून जाईल पण या आनंदी व उत्साही वातावरणात आपल्या सर्वांवर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आहे हे विसरून चालणार नाही. सध्या पर्यावरण रक्षणासाठी सर्वत्र इकोफ्रेन्डलीचा प्रचार आणि प्रसार होत आहे व त्याला प्रतिसादही उत्तम मिळतो आहे.

लेखसंग्रह

प्रवास वृत्तपत्रांचा

Category:

 

प्रत्येक माणसाची सकाळ कुठल्याना कुठल्या वृत्तपत्राने होत असते. भले मग कितीही बातम्या टीव्ही समोर बसून बघीतल्या असतील तरी सकाळ झाल्यावर वर्तमानपत्र वाचल्या शिवाय कुणाही माणसाचा दिवसच सूरू होत नाही. देशात व परदेशात घडणार्‍या सर्व घडामोडींची बित्तम बातमी वृत्तपत्रातून येते.

लेखसंग्रह

परमपूज्य देवास पत्र

Category:

 

आम्हांला कर्मस्वातंत्र्या बरोबर मन व बुद्धी दिल्यामुळे आंम्ही खुपच प्रगती केली आहे. परंतू आज पृथ्वीवर मानव सुखी व सामाघानी का नाही? का तो एकमेकांचे पाय खेचत असतो? मर्यादांचे पालन करताना दिसत नाही! मोहात पदोपदी अडकत असतो व इतरांना अडकवतो. आम्हांला वाटते की त्याला तू मन व बुद्धीचे रसायन दिलेस व त्यात भर म्हणून की काय कर्म स्वातंत्र्य दिलेस. अमर्याद कर्म स्वातंत्र्याचा आपल्या स्वार्थ व भोगावादासाठी असा काही उपयोग करून घेत आहे की तो आज स्व:लाच विसरला आहे की तो प्रथम एक माणूस आहे. आम्हांला दिलेल्या कर्मस्वातंत्र्याचे आता अपचन होत आहे. जास्त खाल्ले की अपचन होऊन तब्बेत बिघडते व शरीरात जास्त वात होऊन त्याचा मन व बुद्धीवर परिणाम होतो. देवा खरंच सांगतो मानवाच्या मेंदूतील कर्म स्वातंत्र्य नावाचे व आपण देवाच्या वर नाही, श्रेष्ठ नाही याचे भान ठेवणारे स्मरणशक्तीचे PCB (Printed Circuit Brain (Board) बदलण्याची वेळ आली आहे.

लेखसंग्रह

पद्मभूषण उस्ताद अहमदजान थिरकवा खाँसाहेब

Category:

 

बालगंधर्वांच्या गाण्यातील लयची गंमत म्हणजे थिरकवा तर; थिरकवांच्या वाजवण्यातील लालित्य म्हणजे बालगंधर्व ! असे हे थिरकवा बालगंधर्वांनी महाराष्ट्राल दिले तर बालगंधर्वांच्या गुरूनी भास्करबुवा बखल्यांनी ते बालगंधर्वांना दिले.

लेखसंग्रह

निवृत्ती नंतरच्या व्यथा !

Category:

 

सगळयाच निवृत्तीधारकांसं निवृत्ती नंतर काही दिवस व महिने बरे वाटते कारण रोजच्या धकाधकीच्या घाईगर्दी व लोटालोटीचा ट्रेनचा प्रवास सरलेला असतो. मुख्य म्हणजे मस्टर नसते त्यात पुरूषांना सकाळी आरामात ऊठता येते त्यामुळे वेळ बरा जातो. काही जणांची नोकरी व्यवसायात मिळणारी चिरीमीरी बंद झाल्याने आर्थिक तंगी असते. कुटुंबाची आर्थिक ओढाताण व्यसनं व नसत्या गरजा पैशा विना कशा पुर्‍या करायच्या हे प्रश्न मनात सतावत असतात. तसेच मानाची खुर्ची व पद नसल्याने सगळी कामे स्वतःहून करणे क्रमप्राप्त असते आणि हेच कुठेतरी खटकतं म्हणून निवृत्ती नको असते. निवृत्तीपासूनच निवृत्त असा पृथ्वीतलावर एकच अपवाद असेल तो म्हणजे राजकारणी !

लेखसंग्रह

ट्रेड युनियन्स् आणि संप

Category:

 

जागतिक आर्थिक मंदिमुळे देशात औद्योगिक व इतर क्षेत्रात मरगळ आली आहे. काही कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत तर बर्‍याच ठिकाणी कामगार कपात चालू आहे. आपला हट्ट पुरा करून हवे ते हवे तेव्हां पदरात पाडून घेण्यासाठी लहान मुले ज्या मानसशास्त्राचा वापर करतात त्याच प्रकारे आज सर्वच क्षेत्रातील ट्रेड युनियन्स् आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी संपाचे तंत्र वापरताना दिसतात. प्रथम भारतात ट्रेड युनियन कशी आली ते बघू.

लेखसंग्रह

स्व.पं.पन्नालाल घोष बासरी वादक

Category:

 

स्व.पं.पन्नालाल घोष यांचा जन्म बंगाल मधील बारिसाल गावात ३१ जुलै १९११ साली झाला. त्यांचे व वडिलउत्तम सितार वादक होते. स्व.पं.पन्नालाल घोषजींनी त्यांच्या वडिलांकडून सतार वादनाचे शिक्षण घेतले.