व्यक्ती-परिचय

पां. वा. सुखात्मे

Category:

 

मूळ संख्याशास्त्राचे विद्यार्थी असलेल्या सुखात्मे यांनी कृषीउत्पादनाच्या तसेच पोषण आणि आरोग्य या क्षेत्रात लक्षणीय भर घातली. कृषिसंशोधनासाठी, तसेच पिकासंबंधींच्या प्राथमिक माहितीचे अचूक विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या अनेक संख्याशास्त्रीय पध्दतींचा विकास त्यांनी केला. भारतीय कृषिसंशोधन परिषदेचे संख्याशास्त्रीय सल्लागार म्हणून कृषिसंशोधनाचा पाया भक्कम करण्यात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. पिकांच्या संकरित जातींचा विकास करण्यासाठी लागणार्‍या संशोधनासाठी त्यांनी संख्याशास्त्राचा परिपुर्ण पायाच तयार केला. पुढे जागतिक अन्न आणि कृषिसंस्थेच्या संख्याशास्त्र विभागाचे संचालक म्हणुन काम करत असताना जगातील अन्न धान्य समस्येचा सखोल आभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यातूनच जगातील दोन तृतियांश जनता उपासमारीची आणि कुपोषणाची बळी असल्याचा प्रगत, श्रीमंतदेशांचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी दाखवून दिले. पोषक आहार आणि रोगराई या दोन घटकांवर आरोग्य अवलंबून असले तरी ग्रामीण भागात आहारापेक्षाही रोगनिर्मूलनाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सप्रमाण सिध्द केले. उत्तर आयुष्यात सुखात्मे यांनी आपले सर्व लक्ष पोषणाचा, विशेषतः भारतातल्या ग्रामीण भागातल्या पोषणाचा आभ्यास करण्यावर केंद्रित केले. आयुष्याच्या अखेरपर्यंत अध्ययन करणारे सुखात्मे यांनी देशातील संख्याशास्त्राच्या शिक्षणाला आणि अध्ययनाला चालना देण्यात महत्वाचा वाटा उचलला आहे.

व्यक्ती-परिचय

नीलेश चव्हाण

Category:

 

नाशिकच्या राजकीय क्षितीजावर ज्या झपाट्याने नीलेश चव्हाण हे नाव उदयास आले तितक्यात वेगाने हा उमदा तरुण जीवनपटावरून अस्तंगत होईल, याची कुणी कल्पनाही केली नसावी.

व्यक्ती-परिचय

निपुण धर्माधिकारी

Category:

 

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये, दर्जेदार व उद्योन्मुख तरूण दिग्दर्शकांच्या लांबलचक यादीमध्ये निपुण धर्माधिकारीचा क्रमांक नेहमी अव्वल असायचा.

व्यक्ती-परिचय

निलेश दत्ताराम बामणे

Category:

 

निलेश दत्ताराम बामणे हे ठाण्यामधील प्रतिभावंत व हौशी लेखक व कवी असून नुकतेच त्यांच्या ‘कवितेचा कवी’ व ‘प्रतिभा’ या दोन कवीतासंग्रहांनी, अगदी थाटात मराठी कविताविश्वामध्ये आगमन केले. ठाण्याच्या सिध्दी फ्रेन्डस पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालेले हे कवितासंग्रह अनुक्रमे 2009 व 2010 मध्ये प्रकाशित झाले व त्यांना मराठी रसिकांकडुन उदंड प्रतिसाद लाभला.

व्यक्ती-परिचय

नीरजा

Category:

 

ज्यांच्या समीक्षेचा दरारा संपूर्ण साहित्य विश्वाला वाटतो, त्या म. सु. पाटील यांची मुलगी असूनही नीरजा यांनी मात्र कवितेची निवडली. या वाटेवर त्यांनी केलेला प्रवास किती दमदार होता आणि आहे, हेच त्यांना नुकत्याच जाहीर झालेल्या केशवराव कोठावळे पुरस्काराने सिध्द झालं आहे.

नितीन अंबाळे
व्यक्ती-परिचय

नितीन अंबाळे

Category:

 

नितीन अंबाळे हा 28 वर्षीय तरूण, मराठी रंगभुमिवरील विवीध प्रकारांना स्पर्श करून आलेला अष्टपैलु कलाकार आहे. दिग्दर्शन, स्क्रीन प्ले, अभिनय, कथालेखन, संहितालेखन अशा सर्व प्रकारामध्ये त्याने असामान्य कौशल्य व अनुभव प्राप्त केला आहे.

निशीकांत कामत
व्यक्ती-परिचय

निशीकांत कामत

Category:

 

निशीकांत कामत हा आजच्या तरूण पिढीचा दबलेला आवाज चित्रपटांद्वारे सगळ्यांपुढे मांडणारा एक नव्या व ताज्या दमाचा दिग्दर्शक. नव्या पिढीच्या आकांक्षाचं, स्वप्नांचं, व अपेक्षांचं प्रतिनिधीत्व करणारे असे त्याचे चित्रपट आजच्या दिग्दर्शकांच्या विशिष्ठ साच्यापेक्षा खुप वेगळे व आशयपुर्ण असतात. प्रेक्षकांच तीन तास निव्वळ मनोरंजन करण्यापेक्षा त्यांना विचार करायला लावतील व समाजात वावरणार्‍या अपप्रवृत्तींविरोधात आवाज उठवायला लावतील असे चित्रपट बनवण्याकडे त्याचा कल असतो व त्याची ही वेगळी तर्‍हा व शैली प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे.

नितीन जयराम गडकरी
व्यक्ती-परिचय

नितीन जयराम गडकरी

Category:

 

नितीन गडकरी हे उद्योजक, राजकीय नेते आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

व्यक्ती-परिचय

निखिल वागळे

Category:

 

निखील वागळे हे आय. बी. एन. लोकमत या मराठीमधल्या सर्वात जास्त चालणार्‍या वृत्तवाहिनीचे तेजस्वी व बाणेदार पत्रकार असून राजकारणी लोकांच्या ते फारसे पचनी पडलेले नसले तरी सामान्य जनतेच्या मनात मानाचे स्थान त्यांनी केव्हाच पटकावलेले आहे. आपल्या स्प्ष्टवक्तेपणामुळे ते वादांच्या भोवर्‍यांमध्ये अनेकदा अडकले असले, तरी त्यांची परखड मते सुज्ञ लोकांना स्पर्शुन जाणारी असल्यामुळे, महाराष्ट्रातील लोकप्रिय व सर्वपरिचीत पत्रकारांमध्ये त्यांची गणती केली जाते.