लेखसंग्रह

गुडखाद्य

Category:

 

उसाच्या रसापासून साखर तयार करतात तसा गूळ आणि काकवीही तयार केली जाते. गूळ उघड्यावर उकळलेला रस गाळण्यांमधून गाळून तयार केला जातो. उघड्यावर असल्यामुळं त्या रसावरचा हवेचा दाब जास्ती असतो.

  April 21, 2011


लेखसंग्रह

गोडीचं मोजमाप

Category:

 

साखर म्हणजे गोड एवढंच आपल्याला माहिती असतं. पण ही गोडी मोजण्याचाही मानदंड आहे. कोणत्याही गोड पदार्थाची गोडी सहसा मोजली जाते ती सुक्रोजच्या गोडीच्या प्रमाणातच. सुक्रोजची गोडी एक असं मानलं जातं.

  April 21, 2011


लेखसंग्रह

दुधात साखर !

Category:

 

ज्यांना मधुमेहाच्या व्याधिनं ग्रासलेलं आहे अशा मंडळींच्या रक्तातल्या ग्लुकोजच्या प्रमाणाचं व्यवस्थित नियंत्रण होऊ शकत नाही. रक्तात ग्लुकोज साठत जातो. त्यामुळं त्यांच्या शरीरस्वास्थ्याला बाधा येते. त्यांच्या खाण्याला गोडाची चव तर द्यायची पण त्यांना ग्लुकोजच्या अतिरिक्त सेवनापासून वाचवायचं म्हणून मग काही कृत्रिम साखरी तयार केल्या गेल्या आहेत.

  April 21, 2011


लेखसंग्रह

निगोड साखर ?

Category:

 

नावडतीचं मीठ अळणी असं म्हणतात. तसंच मग आणखी कुणाचीशी साखरही निगोड का असू नये? वरवर हा थट्टेचा प्रकार वाटेल. पण खरं पाहता साखरेची गोडी सगळीकडे सारखीच असते असं नाही. अशी ती का बदलते हे समजून घ्यायचं असेल तर आधी साखर म्हणजे काय हेही समजावून घ्यायला हवं.

  April 21, 2011


लेखसंग्रह

फांद्या कुठवर छाटणार?

Category:

 

आपल्याला लोकपाल, लोकायुक्त का हवे आहेत, कारण राजकारणी भ्रष्ट आहेत आणि राजकारणी का भ्रष्ट आहेत, कारण लोकांचा त्यांच्यावर अंकुश नाही. हा अंकुश मतपेटीच्या माध्यमातून ठेवता येत असेल तर आधी त्याचाच विचार व्हायला हवा.

  April 20, 2011


लेखसंग्रह

शेतकरी नवरा-नको रे बाबा !

Category:

 

आपला भारत कृषिप्रधान देश म्हणून सर्वत्र ओळखला जातो. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या प्रश्न अनुत्तरीतच आहे व त्यावर अजून तरी काही ठोस पाऊले उचल्याची बातमी नाही. नुसते अनुदान देऊन प्रश्न सुटेल असे वाटत नाही.

  April 18, 2011


लेखसंग्रह

जुने ते सोनेच होते!

Category:

 

’झिरो बजेट’ शेती किंवा नैसर्गिक शेती हाच शेतकर्‍यांच्या समस्यांवरचा एकमात्र तोडगा आहे. जुने तेच सोने होते, हे आता सिद्ध झाले आहे. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ही केवळ गोष्टींच्या पुस्तकात आहे, हे शेतकर्‍यांनी लक्षात घ्यायला हवे. निसर्गाला आव्हान देऊन आपण उभे राहू शकत नाही. एवढ्या शक्तीशाली जपानचे अवघ्या दोन दिवसात मातेरे झाले. आधुनिक तंत्रज्ञान जोपर्यंत निसर्गाशी इमानदार आहे तोपर्यंत ते ठीक आहे, त्याच्या पुढची पायरी गाठण्याचा प्रयत्न हे तंत्रज्ञान करीत असेल तर शेवटी सगळ्याची माती होणार हे निश्चित!

  April 16, 2011


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गोजिर्‍या बाळासाठी साजिर्‍या नावाची निवड.

Category:

 

बाळाचं नाव, सुटसुटीत, अुच्चारायला, लिहायला सोपं, प्रचलीत काळाशी सुसंगत असावं आणि त्याचा अुच्चार कानाला नादमधूर वाटला पाहिजे. म्हणूनच स्वर आणि मृदू व्यंजनं असलेली दोन किंवा तीन अक्षरी, जोडाक्षर विरहित आणि मानवी मनाला आणि भावनांना हव्याहव्याशा वाटणार्‍या निसर्गातील घटकांशी आणि वस्तूंशी निगडीत असलेली नावं सर्वांना आवडतात. बाळाचं नाव, बाळाप्रमाणेच सर्वांना हवंहवंसं वाटणारंच असाव्यास हवं, नाही का?

  April 13, 2011


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

तू

Category:

 

तू

जीवनाच्या प्रवासात तासन – तास उभ राहून

एखाद्या स्त्रिची वाट पाहण्याची सवय तू मला लावलीस

आणि स्वत : मात्र नामानिराळी राहिलीस ……

  April 12, 2011


लेखसंग्रह

इमान पगारासोबत, की देशासोबत?

Category:

 

सज्जनांची निष्क्रियता दुर्जनांच्या दुष्टपणापेक्षा अधिक घातक आहे. सरकारी कर्मचार्‍यांनी हे लक्षात घ्यायला हवे, की त्यांची बांधीलकी त्यांच्या नोकरीपेक्षा अधिक या समाजाशी, या देशाशी आहे. या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या घामातून जो पैसा उभा होतो, त्यातूनच त्यांना पगार, भत्ते वगैरे मिळत असतात. अशा परिस्थितीत जिथे सामान्य लोकांच्या हक्कावर गदा आणणारे, सामान्यांचे शोषण करणारे भ्रष्टाचार होतात तिथे त्यांनी मौन बाळगणे म्हणजे बेइमानी ठरते.

  April 11, 2011