No Picture
लेखसंग्रह

“धड भारतीय; मस्तक विदेशी!”

Category:

 

भारतातील गरिबी दूर झाली, हा देश बलाढ्य झाला, इथे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाले, काम करणार्‍या हातांची संख्या वाढली, तर आपली दुकानदारी बंद होईल, ही भीती ज्यांना वाटते त्या परकीय शक्तींचा पगडा इथल्या सरकारवर आहे. हे सरकार भारतातील नव्हे, तर विदेशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे डोके चालवित आहे आणि त्यातूनच देशविघातक धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. अन्यथा “गरिबी हटाओ” या नार्‍याऐवजी “अमीर बनो” असा नारा काँगे्रसने दिला असता.

No Picture
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

शोध

Category:

 

लपून सावली आड पृथ्वीच्या पाहतो चंद्र आमावस्येच्या दिवशी जसा चांदणीकडे पाहतो तसा मी लपून रात्रीच्या काळोखा आड प्रकाशातील तुझ्याकडे आहेस तू उत्तर ध्रुव आणि मी दक्षिण ! आपल्या दोघांच्या मध्ये उभी आहे समाजाने आखलेली भिंत विषुववृत्त नावाची

No Picture
लेखसंग्रह

दोष कोणाचा? पालकांचा का मुलांचा !

Category:

 

देशातील तरुणाईला आणि विद्यार्थ्यांना चांगल्या आदर्शांची वानवा असावी आणि संस्कारात पालक, शिक्षक आणि समाज कुठेतरी कमी पडतो आहे की काय अश्या संशयाच्या सावटाखाली एकामागोमाग एक भयंकर आणि हृदय हेलावून टाकणाऱ्या घटना घडताना दिसतात आणि मन विषण्ण होते.

No Picture
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

श्री हनुमान जन्मकथा

Category:

 

श्री हनुमान जन्मकथा वंदन तुज मारुतीराया तुझा आशीर्वाद मिळाया न कळे कुणास तुझी माया भक्ताविना १ रुद्राचे तू रुप असता शक्तीची तू देवता अचाट कामे क्षणांत ह्या पृथ्वीवरी २ शक्ती बुद्धी नि सेवा ह्याचा तूं मुर्तीमंत ठेवा भक्तीभाव मनीं यावा हीच माझी इच्छा ३ शक्तीचे तूं दैवत बुद्धीदाता तूं होत शक्ती नि बुद्धी एकांत मिळे तुझ्या आशिर्वादे ४ हनुमंताची जन्मकथा आनंद होई सांगता चितीं समाधान देता तुमच्या ठायीं ५ अंजनी एक वानरी भक्ती तिची शिवावरी रात्रंदिनी भजन करी सदाशिवाचे ६ प्रभू भक्तीचा भूकेला पावन होई भक्ताला लक्ष देई शंकेला भक्तांच्या ७ भक्तीचा महिमा थोर सर्वांसी उघडे द्वार असेल नर अथवा वानर कुणासही पावत असे ८ अंजनीची पाहून भक्ति शिव प्रसन्न होती आशिर्वाद तिजला देती विश्वनाथे ९ अंजनी होती वानरी इच्छा ती करी तुम्ही यावे उदरीं लाभावा प्रभू सहवास १०

No Picture
लेखसंग्रह

शेतकर्‍यांवर संकटांची मालिका !

Category:

 

शेतकर्‍यांची परिस्थिती उत्तरोत्तर बिकटच होत असेल, तर कुठेतरी मुळातच चूक होत असावी, हे सरकारच्या कसे लक्षात येत नाही? आजपर्यंत केवळ कुचकामी ठरलेले उपायच सरकार पुन्हा पुन्हा का योजत असते? जगातला कुठलाही उत्पादक आपले उत्पादन त्या उत्पादनासाठी आलेल्या खर्चापेक्षा कमी भावात विकत नाही. व्यापाराचे, धंद्याचे हे मूलभूत तत्त्व आहे, तशीच परिस्थिती आली तर तो आपला धंदा बंद करेल; परंतु भारतातील आणि त्यातही महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतकरी वर्षोनुवर्षे हा घाट्याचा सौदा करीत आलेला आहे, त्याला तसे करणे भाग पडत आहे, कारण सरकारची धोरणेच तशी आहेत.