ऋणानुबंध
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाठाऊक नव्हते कालपावतो
नांव तुझे आणि गांवही
क्षणांत जुळले अचानक परि
नाते आपुले जीवनप्रवाही
August 17, 2011
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाठाऊक नव्हते कालपावतो
नांव तुझे आणि गांवही
क्षणांत जुळले अचानक परि
नाते आपुले जीवनप्रवाही
August 17, 2011
Category:
लेखसंग्रहअलिबागमधील प्रथम ट्रस्टने अशाच काही अभ्यासात मागे पडलेल्या मुलांना केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रथम आणण्याचा जणु विडाच उचलला आहे. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांमधील अनेक पैलु हेरुन, त्यांच्यामधील जिद्दीला व आत्मविश्वासाला नवसंजीवनी देण्याचे महान कार्य ‘प्रथम’ अनेक वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये करत आहे.
August 17, 2011
Category:
लेखसंग्रहश्री. कलाम म्हणतात, त्या दिवशी त्यांनी आपल्या आयुष्यातील एक मोठा धडा घेतला. ज्यावेळेस अपयश आले त्यावेळेस संस्थेचा अध्यक्ष म्हणून अध्यक्षांनी ते आपल्या शिरावर घेतले. परंतु ज्यावेळेस, यश पदरात पडले त्यावेळेस ते त्यांनी ते न घेता आपल्या संपूर्ण गटाला दिले. यावरून हे दिसून येते की, व्यवस्थापनाचे धडे हे पुस्तकात वाचून मिळत नसतात, तर ते अनुभवातून येत असतात.
August 16, 2011
Category:
साहित्य - ललितदरबारात कुत्रे नुसते भुंकायचे नाही तर कधी कधी साखळी तोडून मंत्री आणि सरदाराना चावायला कमी करायचे नाही. पण यात कुत्र्यांची काहीच चुकी नव्हती. कुत्रे म्हणजे एकनिष्ठ आणि आज्ञाकारी. आपल्या दिव्यचक्षुंनी घोटाळेबाज मंत्री आणि सरदाराना ओळखून राजाला सावध करण्यासाठी ते मंत्र्यांवर भुंकायचे. पण त्यांस काय माहित, अधिकांश घोटाळ्यामागे राजाचे आणि राणीचे नातलग असल्यामुळे, राजाला माहित असूनही राजा दुर्लक्ष करायचा. पण कुत्र्यांच्या ह्या भुंकण्यामुळे, मंत्री आणि सरदार घाबरायचे त्या मुळे राजसभेचे कामकाज नेहमीच अर्धवट राहायचे. आणि एक दिवस तर कहरच झाला, कुत्रे शयनग्रहात चक्क ‘राणी’ वर भुंकले……
August 14, 2011
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनभारतात न्यायव्यवस्था आहे, या व्यवस्थेत प्रत्येक आरोपीला आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची पूर्ण संधी दिली जाते; परंतु ती सुविधा केवळ भारतीय नागरिकांसाठी आहे, हे या दहशतवाद्यांना सांगायचे असेल तर पकडलेल्या दोन-चार दहशतवाद्यांना गोळ्या घालणे गरजेचे आहे. इथे देशद्रोह्याला चिरडलेच जाते, हा देश स्वाभिमान आणि सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करायला तयार नाही, असा संदेश जोपर्यंत दहशतवाद्यांपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत इथल्या दहशतवादी कारवायांना लगाम बसणार नाही आणि तोपर्यंत आमच्या स्वातंत्र्यालाही पूर्णत्व येणार नाही. भीत-भीत जगायला लावणारे हे स्वातंत्र्य काय कामाचे?
August 14, 2011
Category:
साहित्य - ललितअनेक गंभीर व असाध्य आजार असलेल्या रोग्यांना मृत्युशयेवर असताना त्यांच्या शारीरिक व्याधी तपासण्याचा योग येत असे. तशीच त्यांची त्याक्षणाची मानसिकता समजण्याचे बरेच प्रसंग आले. एक वैद्यकीय अभ्यासक म्हणून स्वानुभवाने त्यांच्याकडे लक्ष्य केंद्रीत करीत होतो. व्यक्ती मृत्युची चाहूल लागताना, कोणते विचार करीते.? कसे वागते ? हे गंभीरपणे बघू लागलो. त्यावर लिखाण केले. अनेक रोग्यांकडे त्या दृष्टीकोणातून अभ्यास करीत गेलो. मृत्यु अचानक येतो. मृत्यु घाला घालतो. मृत्यु अनिश्चीत असतो, परंतु निश्चीत येतो. मृत्यु कोणतीही सुचना न देता येतो. अनेक अनेक ही वाक्ये ऐकतो. ती वाचलेली होती, ऐकलेली होती. कांही व्यक्तींचे मृत्यु जवळून बघण्याचे प्रसंग आले व हाताळले गेले. मृत्यु हे जीवनाचे अंतीम सत्य आहे. त्याला माणसे त्याक्षणी कशी सामोरी जातात, ह्याचे मी सतर्कतेने अवलोकन करुं लागलो. कांही टिपणी केल्या. मात्र काय खरे असेल, ह्यावर वैचारीक साराशं काढणे कठीण गेले.
August 13, 2011
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनएवढी प्रचंड स्त्रीची ओळख असतांनाही अजूनही स्त्री जन्मा हीच तूझी कहानी ह्वदयी अमृत नयनी पाणी या विचाराप्रमाणे जिवन जगत आहे. प्रत्येक स्त्री ही राणी लक्ष्मीबाई आहे. परंतु आजचे दुष्य बघीतले तर तीची दषा लग्नापुर्वी ’राणी‘ लग्नानंतर ’लक्ष्मी‘ आणि मुल झाली की ’बाई‘ अशी झाली आहे. भारतीय स्त्रीचे जीवन यमुनेच्या प्रवाहाप्रमाणे संथ वाहत आहे.
August 13, 2011
Category:
लेखसंग्रहमीरा (एमआयआरए) हा लॅटिन शब्द असून, त्याचा अर्थ आश्चर्यकारक वस्तू असा होतो. अमेरिकेला तिचे महासत्तापद टिकवायचे असेल तर एखादा मोठा शोध लागणे गरजेचे आहे. त्यासाठी अध्यक्ष बराक ओबामा लोकांच्या कानीकपाळी ओरडून भारत व चीनमध्ये महत्त्वाचे शोध लागायला नकोत असे सांगत आहेत
August 12, 2011
Category:
लेखसंग्रहआपल्या प्रत्येकाला काहीना काही सवयी व लकबी असतात. बोलण्याच्या ओघात, काहींना आपले मुद्दे मांडतांना व पटवून देताना हातवारे करून सांगण्याची सवय असते तर काहींना दातांने हाताच्या बोटांची नखे कुडतरत बोलण्याची व ऐकण्याची सवय असते. तर काही व्यक्तींना डोळे मिचकावत बोलण्याची सवय असते. असो.
August 9, 2011
Category:
साहित्य - ललितसदर कथेमधे माणसाने मनात अढी धरून ठेवली की किती नुकसान होत ते धयानात येते. कथा नायकाच जीवन
घडवणयात आईचा मोठा वाटा आहे हे वाचकाना कळेलच. कथा वाचून र्पातिर्किया दयावी ही विनँती.
August 6, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti