व्यक्ती-परिचय

अफाट कर्तृत्वाच्या वडिलांची तेवढीच अफाट कन्या.. !

Category:

 

“अफाट कर्तृत्वाच्या वडिलांची ही तेवढीच अफाट कन्या.. ! संयुक्त महाराष्ट्राचा लढा, आचार्य अत्रे, ‘नवयुग’ आणि ‘मराठा’ व ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै..! ‘हायकू’ हा जपानी काव्यप्रकार मराठीत रुढ करणा-या ज्येष्ठ कवयित्री म्हणजे शिरीष पै. असंख्य कविता, कथा शिरीषताईनी लिहिल्या. मराठी दैनिकाच्या पहिल्या महिला संपादक म्हणून त्यांना बहुमान मिळाला. शिरीष पै यांच्या लेखनाची सुरुवात त्यांच्या पप्पांमुळे म्हणजे आचार्य अत्रे यांच्यामुळे झाली. त्यांच्याच लेखणीचा वारसा त्यांनी घेतला. त्यांच्या सहवासातच त्यांना लिखाणाची गोडी लागली. कथा, कविता, नाटक आणि प्रासंगिक लेखन असे चौफेर लिखाण त्यांनी केले.

लेखसंग्रह

⁠⁠⁠एक कडवट सत्य- “VIP” झाला आहे बाप्पा माझा…!

Category:

 

लालबागमधील गणपती म्हणजे मुंबईची शान. एक काळ असा होता की हा गणेशोत्सव सर्वसामान्यांचा होता. हळुहळू त्याचे VIPकरण कसे झाले त्याबद्दल लिहिलंय एका माजी लालबागकराने.

आरोग्य

सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग चार

Category:

 

बाहेर जाताना पायात चप्पल, हातात काठी, आणि छत्री घेऊन बाहेर पडावे. जमिनीवरील दगड माती, काटे, चिखल, पायांना लागू नये, आपल्या आरोग्याची आम्हाला काळजी आहे, म्हणून हे सर्व पहावे, असे ग्रंथकारांना सांगायचे आहे. वरवर पहाता ” एवढे काय सांगायचे त्यात, एवढे बुद्धु नाही आम्ही” असं वाटणं चुक नाही. पण अश्या अनेक जागा आपल्या सहजपणे लक्षात येत नाहीत, जिथून आपल्याला धोका संभवू शकतो.