स्वच्छता
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
Category:
साहित्य - ललितसंत कसे बोलतात, कसे चालतात, निरनिराळ्या परिस्थितीत कसे वागतात, कसे निर्भय असतात, कसे निःस्पृह असतात, किती निरिच्छ, किती मृदू, परंतु किती निश्चयी, कसे निरहंकारी, कसे सेवासागर, किती निरलस, किती क्षमी, कसे त्यांचे वैराग्य, कशी निर्मळ दृष्टी, कसा विवेक, कसा अनासक्त व्यवहार, – हे सारे त्यांच्या सहवासात नित्य राहिल्यानेच समजत असते.
Category:
लेखसंग्रहभारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र व दुसरा द्वारकेचा राणा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले, पण या दोन राजांचे स्थान अटळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणताही सत्ताधीश बसू शकणार नाही. भारतीय संस्कृती म्हणजे राम-कृष्ण.
Category:
लेखसंग्रहविश्वाचे नियंत्रण करणाऱ्या सर्वसत्ताधीश परमात्म्याविषयी अंतःकरणात प्रेम निर्माण होणे याचे नाव भक्ती. ही सारी सृष्टी त्या ईश्वराचीच विविध रूपे आहेत असे वाटू लागणे, त्याअनुरूप आपला व्यवहार होणे ही भक्तीची परिसीमा
Category:
लेखसंग्रहआपले आयुष्य उभे करणे हे कष्टाचे काम असते हे खरेच, पण कृतार्थ आणि कीर्तिमान जीवन उभे करणे हे तर आणखीनच कष्टाचे काम आहे. त्यासाठी एखाद्या मोठ्या ध्येयाचा ध्यास घ्यावा लागतो. एखादे स्वप्न पाहून, ते पूर्ण करण्यासाठी अविश्रांत श्रम करावे लागतात. असे कितीतरी थोर लोक आपल्या आजूबाजूला असतात.
Category:
लेखसंग्रहभारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गायिला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दंभाचा पसारा सर्वत्र वाढल्यामुळे, दिखाऊपणाचे स्तोम जिकडेतिकडे माजल्यामुळे थोर गुरुभक्तीचे महान तत्त्व आज धुळीत पडले आहे.
Category:
लेखसंग्रहअपरिहार्य कामांकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, यावर बरंच काही अवलंबून असतं. आपण नेहमीच ओझं मानून ती कामं करतो, आणि त्यातून मिळणारा आनंद गमावून बसतो.
Category:
लेखसंग्रहप्रचंड कष्ट घेऊन एखादा उद्योजक यशस्वी होतो. त्याच्या जबाबदाऱ्या वाढत जातात. संपन्नता येते खरी, पण तणावाची छुपी पावले त्रास देऊ लागतात. सुरुवातीचे ध्येय असते उत्कृष्ट उत्पादन करण्याचे.
Category:
लेखसंग्रहगीतेच्या अठराव्या अध्यायाच्या उपसंहाराकडे वळताना ६३ व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आता माझे सर्व counselling अर्थात समुपदेशन पूर्ण झालेले आहे.
Category:
साहित्य - ललितगीतेने मरण म्हणजे वस्त्र फेकणे असे म्हटले आहे. भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे विचार गोड आणि भव्य आहेत. मृत्यूची भीषणता आपल्या संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ. मृत्यू हे ईश्वराचेच एक स्वरूप. जीवन आणि मरण हे दोन्ही वस्तुतः एकरूपच आहेत. मरण नसते तर जग भेसूर दिसले असते.
Copyright © 2025 | Marathisrushti