पर्जन्य चक्र
Category:
अवर्गिकृतउन्हाने काहिली होत असताना नचिकेत प्रकाशन चे “पर्जन्य चक्र” हाती आले. प्रा. उमा पालकर या विद्वान प्राध्यापिकेने लिहिलेले हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे. अभ्यासपूर्ण आहे परंतु कुठेही किचकट, रटाळ झालेले नाही. पर्जन्य, हवामान, मेघ, वादळे यांची शास्त्रोक्त माहिती अतिशय रोचक भाषेत दिली आहे. सामान्यांना या सगळ्या विषयांची माहिती होते आणि अभ्यासू लोकांना देखील हे पुस्तक आपले वाटते, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
“पर्जन्य चक्र” (मेघ, वीज , वादळवारा आणि पाऊस.)
पाने : 166, किंमत : 170 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन
पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, आणि विद्यमान नाशिक अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील “पंचवटी” येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे.
कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावर मनमाड-काचीगुडा लोहमार्गावर वसलेले जालना हे एक प्राचीन शहर आहे. अनेक श्रध्दास्थाने असणार्या मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील राजूरचा गणपती हेही असंख्य भक्तांचे श्रध्दास्थान आहे.प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले ‘भोकरदन’ हे स्थळ तसेच देवीचे ‘अंबड’ व समर्थ रामदासांचे जन्मगाव ‘जांब’ ही याच जिल्ह्यात आहे.