किशोरीताई सांगीतिक संवाद – भाग ४
व्हिडिओज

किशोरीताई सांगीतिक संवाद – भाग ४

Category:

 

शास्त्रीय संगीत हे भावसंगीतच आहे’, असं आग्रही प्रतिपादन किशोरीताई नेहमी करीत आणि त्यांच्या मैफिलीतून रसिकांना त्याची प्रचितीही येत असे. स्वरभाषा, राग, रागाचं वातावरण, रागभाव या संकल्पना स्पष्ट करत किशोरीताईंनी, त्यांचे ‘तेच’ राग दरवेळी वेगवेगळा अनुभव का देत असतील, याची मीमांसा केली. सोबतच आजच्या भागात, नाना पाटेकर ताईंच्या गाण्याकडे कसं बघतात तेही पाहू.

किशोरीताई सांगीतिक संवाद – भाग ५
व्हिडिओज

किशोरीताई सांगीतिक संवाद – भाग ५

Category:

 

किशोरीताईंच्या गाण्याला एक अध्यात्मिक बैठक होती. रागाच्या साधनेत मिळालेली स्वरानुभूती आपल्या गाण्यातून रसिकांनाही मिळावी, यासाठी त्या आटोकाट प्रयत्न करीत. अनेकांना त्यांचं गायन पारलौकिक वाटे. पण त्याचबरोबर लौकिक विश्वात काही गैरसमजही होते. यासंदर्भात जाणून घेताना शशी व्यास, अश्विनी भिडे, परवीन सुलताना यांच्या प्रतिक्रिया आजच्या भागात पाहूया.

किशोरीताई सांगीतिक संवाद –  भाग १
व्हिडिओज

किशोरीताई सांगीतिक संवाद – भाग १

Category:

 

दि. ३ एप्रिल, हा गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा स्मृतिदिन. महाराष्ट्र शासनाने पहिला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार किशोरीताईंनाच प्रदान केला होता. त्या सोहळ्यात किशोरीताईंची एक मुलाखतही झाली होती. अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून किशोरीताईंच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्याच पण अनेकांनी दृकश्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

किशोरी ताई सांगीतिक संवाद – भाग २
व्हिडिओज

किशोरी ताई सांगीतिक संवाद – भाग २

Category:

 

किशोरीताईंनी संगीताच्या सर्व प्रकारावर प्रभुत्व मिळवले होते. शास्त्रीय गायन आणि सुगम गायन यातला नेमका फरक स्पष्ट करत पार्श्वगायनाकडे त्यांनी का पाठ फिरवली, हे ही त्यांनी सांगितलं. किशोरीताईंच्या अंगी असलेल्या नाना कलांचा वेध तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी घेतला आहे…

किशोरताई सांगीतिक संवाद – भाग ६
व्हिडिओज

किशोरताई सांगीतिक संवाद – भाग ६

Category:

 

शास्त्रीय संगीत शिकवणारी महाविद्यालये किंवा संगीत शिक्षण संस्था यापेक्षा गुरुपरंपरा का महत्त्वाची?, गुरु म्हणजे काय?, शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या शिष्यांनी कसलं भान ठेवलं पाहिजे? याविषयी ताईंनी व्यक्त केलेले विचार आजच्या भागात ऐकू या.

किशोरताई सांगीतिक संवाद – भाग ३
व्हिडिओज

किशोरताई सांगीतिक संवाद – भाग ३

Category:

 

किशोरीताईंची सांगीतिक जडणघडण कशी झाली, विशेषतः गळ्यावर सुरांचे संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी काय केले, विविध वाद्यातून येणारे सूर कंठस्थ करण्यासह राग आणि वाद्य यांच्या संबंधाबाबत त्यांची मतं आज ऐकुया…..

एक पारंपरिक गण…पठ्ठे बापूराव
व्हिडिओज

एक पारंपरिक गण…पठ्ठे बापूराव

Category:

 

लावणी महामहोत्सवात वाद्य जुगलबंदीनंतर आज पाहूया एक पारंपरिक गण…पठ्ठे बापूरावांच्या या गणावर… त्या शब्द, सुरांवर आता म्हणे कुणाचे स्वामित्व हक्क आहेत. म्हणून काही अंशच प्रसारित होत आहेत. रसिकांसाठी या गणाचे मूळ शब्द देत आहोत…

कर्मयोगी नामदेवराव व्हटकर
व्हिडिओज

कर्मयोगी नामदेवराव व्हटकर

Category:

 

दिनांक 6 डिसेंबर ….
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन… महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण यात्रेचं जे एकमात्र चित्रीकरण आज जगात उपलब्ध आहे, ते करण्यासाठी एका अवलियाने आपले घर, छापखाना गहाण टाकून हा अमूल्य साठा जतन केला, हे कोणाला माहीत आहे? त्या अवलियाचे नाव आहे…नामदेव व्हटकर.

 

आधुनिक ठाण्याचे शिल्पकार सतीश प्रधान
व्हिडिओज

आधुनिक ठाण्याचे शिल्पकार सतीश प्रधान

Category:

 

आधुनिक ठाण्याचे शिल्पकार सतीश प्रधान अनंतात विलीन झाले. ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ हे नाते निर्माण करण्यामध्ये ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष, पहिले महापौर आणि राज्यसभा सदस्य सतीश प्रधान यांचे मोलाचे योगदान आहे. ठाणे महानगरात त्यांनी उभारलेल्या विविध वास्तू त्यांच्या कार्याची साक्षीदार आहेतच, पण देशातले अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू क्रीडा क्षेत्रातल्या त्यांच्या कार्याचे साक्षीदार आहेत. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफीत पाहून त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करूया

शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मुघल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले.