क्रांतिवीरांची अमृतगाथा’- भाग ७
व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा’- भाग ७

Category:

 

अनंत लक्ष्मण कान्हेरे आणि वांची अय्यर कर्झन वायलीच्या वधाचे सूत्रधार होते स्वातंत्र्यवीर सावरकर! सावरकरांमागे रीतसर सरकारी ससेमिरा चालू झाला. सावरकरांच्या मोठ्या बंधूना क्षुल्लक कारणास्तव काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आल्यानं क्रांतिकारक चिडीला आले. त्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांचा काटा काढण्याचं ठरवलं. कामगिरी पत्करली एका कोवळ्या मुलानं- अनंत लक्ष्मण कान्हेरे यानं.

क्रांतिवीरांची अमृतगाथा’- भाग ८
व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा’- भाग ८

Category:

 

स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, वान्ची अय्यर यासह महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाबात अमरत्वाचे कुंभ घेऊन उडणार्‍या गरूडांच्या पंखात प्रेरणेचं आकाश भरणारे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे विसाव्या शतकातल्या क्रांतीचे प्रणेते.

क्रांतिवीराची अमृतगाथा-भाग ४
व्हिडिओज

क्रांतिवीराची अमृतगाथा-भाग ४

Category:

 

महाराष्ट्राची क्रांतिज्योत बंगालन हाती धरली. राजा राममोहनांपासून बंगालात जनजागृतीचे वारे वाहत होते. त्या वार्‍याला अचूक दिशा दिली स्वामी विवेकानंदांनी. स्वामी विवेकानंदाची विदेशी शिष्या भगिनी निवेदिताच्या प्रेरणेनं बंगालात क्रांतिदलाची सुरूवात झाली. आणि ‘तरुण बंगाल’ बलिदानासाठी सिद्ध झाला, तेव्हा त्याचं नेतृत्व करायला पुढे आले अरविंद घोष. त्यांच्यासह खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी अशा बंगाली क्रांतिकारकांची कहाणी पाहूया या भागात.

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग ९
व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग ९

Category:

 

१९१० पर्यंत भारताच्या स्वातंत्र्य चळवळीन उग्र रूप धारण केलं होत, मृत्यूचं भय भेदून झुंज घेणार्‍या वंग युवकांमुळेच सरकारला कलकत्त्यातला बाडबिस्तरा गुंडाळावा लागला. सरकारनं राजधानी कलकत्याहून दिल्लीला आणायचं ठरविलं. पण राशबिहारी बोस सरकारच्या पाठोपाठ दिल्लीत येऊन दाखल झाले.

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग ३
व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग ३

Category:

 

भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीयज्ञात स्वप्राणाची आहुती देण्यात महाराष्ट्र अग्रेसर होता. लोकमान्यांचे अग्रलेख सरकार विरुद्ध आग ओकत होते. सार्वजनिक उत्सवातून असंतोषचा वणवा भडकत होता. त्यातूनच प्रेरणा घेऊन चाफेकर बंधुनी रॅन्डचा वध करून मृत्यूला कवटाळलं.

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग २०
व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग २०

Category:

 

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. स्त्रियांसाठी रानी ऑफ झांसी रेजिमेंट उभारलं. दि. 24 ऑक्टोबर 1943 दुपारी सव्वाबारा वाजता अस्थायी आझाद हिंद सरकारच्या स्थापनेची घोषणा प्रथम राष्ट्रपती सुभाषबाबूंनी केली. दोन महिन्यात 30 डिसेंबरला अंदमान ताब्यात घेतलं! त्यानंतर अंदमान-निकोबार ते मणिपूर, इम्फालपर्यंत आझाद हिंद फौज विजयाचे ध्वज रोवीत सरसावली.

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १८ – सूर्यसेन
व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १८ – सूर्यसेन

Category:

 

क्रांतिकारकांचे तुकडे केल्याने क्रांती नष्ट होत नाही, याचा दाखला दिला बंगाली शेरांनी. क्रांतीचं तिसरं पर्वही बंगालातच तेव्हा सुरू झालं, जेव्हा संपूर्ण चटग्राम शहर क्रांतिकारकांनी जिंकून अस्थायी भारत सरकारची स्थापना केली. सुभाषचंद्रांनी जे स्वयंसेवकांचे जंगी पथक उभारले होते, त्यातूनच‘’बंगाल व्हॉलेंटियर्स’ या क्रांतिदलाचा उदय झाला.

विनयचंद्र बोस यांन बंगालचं सचिवालायच ताब्यात घेण्यासाठी आक्रमण केलं त्या कहाणीसह महिला क्रांतिकारकांची माहिती या भागात घेऊया. सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मिडिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’

सादरकर्ते : नरेंद्र बेडेकर.
मूळ संहिता : स्व.वसंत पोतदार.

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १९- सूर्यसेन आणि सुभाषबाबू
व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १९- सूर्यसेन आणि सुभाषबाबू

Category:

 

भारतीय स्वातंत्र्यलढयातल्या क्रांतीच्या तिसऱ्या पर्वाचे बिनीचे शिलेदार होते सूर्यसेन….या पर्वात सर्वात दुर्घर्ष रणधुमाळी माजली 18 एप्रिल 1930 रोजी! सूर्यसेन यांनी चटगाव चक्क स्वतंत्र करून सोडलं! दुसरं महायुद्ध पेटलं! गुलाम भारताला स्वतंत्र होण्याची दुसरी संधी आली.

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १२- अल्लुरी सीताराम राजू
व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १२- अल्लुरी सीताराम राजू

Category:

 

न्याय आणि माणुसकीला काळिमा फासणार्‍या जलियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकमान्य टिळकांचं देहावसान झालं. क्रांतिकारकांचा महान मंत्रगुरू मरण पावला.

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १५ – चंद्रशेखर आझाद.
व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १५ – चंद्रशेखर आझाद.

Category:

 

अंदमानातून परतलेल्या शचिन्दनाथ सान्यालांनी उत्तर प्रदेशात हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी नावाची क्रांतिफौज खडी केली. रामप्रसाद बिस्मिलच्या नेतृत्वात फक्त दहा क्रांतिकारकांनी काकोरी स्थानकापाशी एक रेल्वेगाडी रोखून 17 हजारांचा सरकारी ऐवज लुटला. काकोरी कटात झाडून सारे धरले गेले.