लेखसंग्रह

वनवासींचे राम

Category:

 

आपला 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले, तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. वनवासाला गेलेला राजा राम परत आला तो प्रभू रामचंद्र म्हणून. यामागे तपश्चर्या होती. त्याग होता. समर्पण होते. सर्वांना हृदयात सामावून घेण्याचे लोकोत्तर गुण होते.

लेखसंग्रह

श्रीराम कथा सदा विजयते

Category:

 

अशी ख्याती प्राप्त झालेली राम कथा म्हणजे वाल्मिकींच्या अलौकिक प्रतिभेचा अनुपम आविष्कार! वाल्मीकिंनी रचलेले रामायण हे महाकाव्य म्हणजे संपूर्ण विश्वाच्या साहित्यातील पहिले महाकाव्य होय. म्हणून त्यांना आदिकाव्य आणि महर्षी वाल्मिकींना आदि कवी संबोधिले जाते. या ग्रंथात कवीने 24000 संस्कृत श्लोक 7 कांडामध्ये विभागून संपूर्ण श्री रामचरित्र अत्यंत कौशल्याने गुंफले आहे.

लेखसंग्रह

महर्षी  वाल्मिकी

Category:

 

महाकवी महर्षी वाल्मिकी; ज्यांनी  हिंदू संस्कृतीचा प्राण असलेल्या अजरामर रामायण या महाकाव्याची रचना केलेली आहे. त्यांच्या जन्माच्या तारखेची नोंद कुठेही आढळत नाही.प्राचीन भारतात त्रेता युगातील काळात त्यांचा जन्म व निर्वाण केव्हा झाला, या संबंधी निश्चित माहिती आढळत नाही.

लेखसंग्रह

कौपिनेश्वर मंदिर, ठाणे

Category:

 

श्री कौपीनेश्वर मंदिर हे एक ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर ठाणे शहराचे एक भूषण आहे. मासुंदा तलावाच्या पूर्वेला हे मंदिर उभे आहे. मुंबई गॅझेटिअर (ठाणे) पान क्र. ३५४ वर या मंदिराविषयी माहिती मिळते. त्यातील वर्णनाप्रमाणे हे ठाण्यातील सुप्रसिद्ध मंदिर सर्वात मोठ्या म्हणजे चौतिस एकर भूभाग व्यापणाऱ्या ठाण्यातील प्रसिद्ध मासुंदा तलावाच्या पूर्वेच्या काठी उभे होते.

लेखसंग्रह

श्रीमाणिकप्रभु महाराज, हुमणाबाद

Category:

 

श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती यांच्यानंतर दत्तात्रेयाचे तृतीय पुर्णावतार म्हणून श्रीमाणिकप्रभूंचेच नाव घ्यावे लागेल. लिंगायत धर्माचे संस्थापक बसवेश्वर यांनी श्रीमाणिकप्रभूंच्या अवताराचे भाकीत बरेच दिवस आधी वर्तवले होते. श्रीमाणिकप्रभूंचे सारेच चरित्र अतर्क्य व अद्भुत घटनांनी भरलेले आहे. त्यांची अलोट संपत्ती, अतुल ऐश्वर्य, त्यांनी केलेले अमाप अन्नसंतर्पण इत्यादी लोकोत्तर गोष्टी वाचून वाचक खरोखरच स्तिमित होतो!

लेखसंग्रह

अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ महाराज

Category:

 

अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि मुमुक्षूंचे आश्रयस्थान आहे. श्रीस्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वांत मोठी लीला आहे. अशी लीला आणि असा चमत्कार प्रत्यक्ष भगवंतालाही पुन्हा कधी जमेल असे वाटत नाही! स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन आज शंभराहून अधिक वर्षे उलटून गेली. परंतु त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच आहे.

लेखसंग्रह

आंजर्ले गावचे कड्यावरील गणपतीचे मंदिर

Category:

 

आंजर्ले हे गाव दापोली तालुक्यात (जि. रत्नागिरी) समुद्रकिनारी वसले आहे. गावाला जोडणारी वाहतूक व्यवस्था परिपूर्ण असून आंजर्ले – वेसवी – मंडणगड-मुंबई त्याचप्रमाणे आंजर्ले – दापोली व तेथून मुंबई- पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी असे रस्ते आहेत.

लेखसंग्रह

श्री ब्रम्हदेव मंदिर

Category:

 

पुराणांनुसार ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांपैकी ब्रह्मा ही पहिली देवता आहे. तो ब्रह्मांडाचा निर्माता मानला जातो. पुराणकथांनुसार विश्वनिर्मात्याने सर्वप्रथम ब्रह्मांडिय जल निर्माण केले व त्यात एक बीज टाकले. त्यापासून सोनेरी ब्रह्मांडिय अंडे तयार झाले. त्या अंड्यातून एक हजार वर्षांनी सृष्टीकर्त्याने स्वतः ब्रह्माच्या रूपात जन्म घेतला.

लेखसंग्रह

श्री हरिहरेश्वर मंदिर

Category:

 

हिरवीगार वनराई, निळाशार समुद्र आणि रुपेरी वाळूच्या किनाऱ्यावर असलेले श्रीवर्धन तालुक्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथे महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. पेशव्यांचे कुलदैवत असलेले हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या या स्थानाची ‘दक्षिण काशी’ म्हणून ख्याती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सरखेल कान्होजी आंग्रे आणि पेशवे घराण्यातील अनेकांनी येथे दर्शन घेतल्याच्या नोंदी आहेत.