लेखसंग्रह

ठाणे शहराचे स्वातंत्र्योत्तर साहित्यिक योगदान

Category:

 

माध्यमाबरोबर जन्मलेली व व्यवसायाच्या निमित्ताने जगभर विखुरलेली एक पिढी आहे आणि माध्यमापूर्वीच्या काळात जन्मलेली एक पिढी आहे. या दोन पिढ्यांच्या साहित्याच्या संदर्भातील अनेक संकल्पनांमध्ये मूलभूत फरक आहे आपले कवितेच्या नाटकाच्या, कथेच्या, ललित लेखाच्या रूपांतील अभिव्यक्तीचे पुस्तक काढण्यापेक्षा इंटरनेटवरील आपल्या वा तंत्राने होणाऱ्या कविसंमेलनांमध्ये सहभाग घेतात. अशा साहित्यिकांत जन्म व शिक्षण ठाण्यात झालेले पण व्यवसायाच्या निमित्ताने ब्राझिलिया, कनेक्टिक्ट, टोकिओ येथे वास्तव्य असणारे साहित्यिक आहेत, त्यांच्या अनुभवांचे परीघ समृद्ध आहेत.

लेखसंग्रह

श्री क्षेत्र करवीर (कोल्हापूर)

Category:

 

देवी भागवतात उल्लेखिल्याप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ असून अत्यंत प्राचीन शक्तिपीठ आहे. याला १०८ कल्पे झाली असे पुराणाचे मत आहे. कोल्हापुरला दक्षिणकाशी असे गौरवाने म्हटले जाते. येथे सतीचे तिन्ही नेत्र पडले म्हणून या ठिकाणाला शक्तिपीठाचे महात्म्य प्राप्त झाले.

लेखसंग्रह

प्राण आणि श्वास

Category:

 

सर्व साधनांचा विचार करता योगाभ्यासामध्ये जीवनात आनंद उपभोग घेण्यात लयबद्ध श्वासोच्छ्वासाला सर्वात जास्त महत्त्व आहे. परंतु श्वासातील विघाडाने सूक्ष्म/स्थूल पातळीवर जीवनमान कमी होण्याची जाणीव होते.

लेखसंग्रह

ठाणे शहराचे स्वातंत्र्यपूर्व साहित्यिक योगदान 

Category:

 

जन्म स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९४७ पूर्वी झाला आहे आणि त्यांचे साहित्यही त्याच काळात प्रसिद्ध झालेले आहे असा एक गट आणि ज्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात झाला, परंतु त्यांचे साहित्य १९४७ नंतर म्हणजे स्वातंत्र्योत्तर प्रकाशित झाले, हा दुसरा गट. या दोघांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करताना बरीच साहित्यिक मंडळी दिवंगत झालेली आढळली. त्यामुळे त्यांच्याशी नाते जोडायचे, इतरत्र प्रकाशित असलेले साहित्यसंदर्भ धुंडाळणे अथवा त्यांच्याशी संबंधित असणारे बुजुर्ग शोधून त्यांच्याकडून आठवणींचे कवडसे हातात येतात का त्याचा प्रयत्न करणे, हाच मार्ग शिल्लक होता.

लेखसंग्रह

यशस्वी लोक हे नेहमीच यशस्वी का असतात

Category:

 

मायकल जॉर्डन, थॉमस एडीसन, एलनॉर रूझवेल्ट आणि हेन्री फोर्ड अशी आणि इतर यशस्वी लोक यांच्यात काय गोष्टी आहेत ज्या त्यांना जेहमीच यश मिळवून देतात. त्या गोष्टी जर आपल्याला देखील माहीत झाल्या तर आपणही त्यांच्या प्रमाणे खात्रीलायक यश मिळवू शकतो. खालील गोष्टी या त्यातलाच काही आहेत असे आपण म्हणू शकतो.

लेखसंग्रह

विज्ञानयुगातील अध्यात्म-वेदान्त

Category:

 

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी इत्यादी या सत्तेतच काम करतात. नियमबद्धतेमुळे व्यावहारिक जगतात नवीन निर्मिती शक्य होते वस्तुस्थिती हे व्यावहारिक सत्तेचे मुख्य लक्षण आहे. भौतिक वास्तवात आज आहे त्यावरून पुढे काय होईल ते आपण सांगू शकतो व जे इष्ट वाटेल ते घडवून आणू शकतो. भौतिकीचे सर्व नियम व संशोधन हे या व्यावहारिक स्तरावरच घडत असते. अगदी आईन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांतदेखील वास्तविक काय आहे ते सांगतो.

लेखसंग्रह

दुर्ग-मंदिर-तलावांचे शहर – ठाणे

Category:

 

शिलाहार व बिंब राजवटीत ठाण्यात साठ मंदिरे व साठ तलाव बांधण्यात आले होते. पण पोर्तुगीजांनी ही सर्व मंदिरे जमीनदोस्त केली. आज इमारतीचा पाया खोदताना या मंदिरांचे अवशेष, कोरीव स्तंभ, वा मूर्तीच्या स्वरूपात पहावयास मिळतात. तलाव साफ करतानाही काही अप्रतिम मूर्ती मिळाल्या आहेत.

साहित्य - ललित

मराठी वाड्मयातील आत्मचरित्रे

Category:

 

समाजातील एखाद्या महनीय थोर पुरुषाच्या जीवनकार्यासंबंधी दुसराच कुणीतरी जे लिहितो त्या लेखनास चरित्रे असे म्हणतात. आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने महत्पदास पोहोचलेली महान व्यक्ती स्वत:च्या संपूर्ण आयुष्याबद्दल स्वतःच सारे काही सांगते वा लिहिते तेव्हा ते बनते आत्मकथन म्हणजेच आत्मचरित्र.

गेल्या पन्नास वर्षांत वेळोवेळी प्रसिद्ध झालेली आत्मचरित्रे संख्येने जशी बिपुल तशीच त्यातली काही वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत.

अवर्गिकृत

ठाणे जिल्ह्यातील नियतकालिके

Category:

 

मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ पंडित बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित केले. ठाण्यात मात्र पहिले वृत्तपत्र २२ जुलै १८६६ रोजी निघाले. त्या वृत्तपत्राचे नाव होते ‘अरुणोदय.’ हे वृत्तपत्र काशिनाथ विष्णू फडके यांनी काढले. त्यांनी जांभळीनाक्यावरील पोलिस चौकीजवळ आपला छापखाना टाकला. फडके यांचे हे वर्तमानपत्र ठाणे जिल्ह्यातील पहिले साप्ताहिक होय.