शुध्द आणि बेशुध्द !
Category:
लेखसंग्रह
Category:
लेखसंग्रह
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रह
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
Category:
लेखसंग्रहअवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाच्या गाथेत अनेक घराणी कामी आल्याचा उल्लेख आहे. छत्रपतींची इमानेइतबारे एकनिष्ठेने सेवा करण्यात ज्या दोन जाती इतिहास प्रसिद्ध आहेत त्यामध्ये महार समाज, ज्यांचा शिवाजी महाराज आदराने “नाईक” म्हणून उल्लेख करीत आणि दुसरा समाज कायस्थ प्रभूंचा होता. राजापूरचे बाळाजी आवजी चिटणीस, हिरडस मावळातील बाजी प्रभू देशपांडे आणि रोहीड खोरेकर देशपांडे नरस प्रभू गुप्ते या घराण्यातील पुरुषांनी स्वराज्याची सेवा हाच कुळधर्म मानला. मुत्सद्देगिरी, शौर्य आणि त्यागाची कमाल केली.
Category:
लेखसंग्रहशैक्षणिक क्षेत्राचा आधारस्तंभ म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध. हे नातेसंबंध कसे निर्माण होतात, किती बहरतात, वाढतात, का खुरटेच राहतात, यावर त्या दोघांचे आणि शाळेचेही भवितव्य अवलंबून असते. हे नातेसंबंध रुजतात शिक्षक व विद्यार्थी यांच्या पहिल्या भेटीतच. म्हणूनच शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्गावर जाताना प्रत्येक शिक्षकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज ते जे बोलतील, जसे वागतील त्याचेच पडसाद वर्गात वर्षभर उमटणार आहेत. यामुळे पहिल्याच भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांची मने जाणून घेण्याचा, जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यास हा प्रयत्न नक्की यशस्वी होऊ शकतो.
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआज देशाची अशी परिस्थिती आहे की कुणाला कीतीही वाटलं तरी मराठी माणूस देशाच्या पंतप्रधान होणार नाही, नव्हे त्याला होऊच दिले जाणार नाही. अपघातानी झाला तर फारकाळ टिकून राहू शकणार नाही. महाराष्ट्राला केवळ शिवजयंती, सत्यनारायणाची महापूजा, गणेशोत्सव आणि परंपरागत यात्रा उत्सव भरवणे इतकेच स्वातंत्र्य अपेक्षित नाही. मराठी माणूस आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीने स्वंतत्र होण्याची गरज आहे. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाच्या विकासाची कास धरायची तर “संपूर्ण मराठी राज्याचे आरक्षण” हवे.
Copyright © 2025 | Marathisrushti