लेखसंग्रह

शहिद अफझल गुरूचे मित्र आणि राष्ट्रीय सुरक्षा

Category:

 

पाकिस्तानच्या तालावर नाचणार्‍या हुर्रियत परिषदेच्या नेत्यांना अफजलच्या फाशीचे हत्यार, राज्यात पुन्हा असंतोषाचा वणवा पेटवायला उपयोगी पडेल, असे वाटते. अफजल काही राष्ट्रभक्त नव्हता. तो देशद्रोही होता. पाकिस्तानातल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो सदस्य होता. संसदेवर हल्ला चढवून मोठ्या नेत्यांचे मुडदे पाडायचा कट त्याने रचलेला होता. पण हुर्रियतवाल्यांना मात्र तो नायक वाटत होता.

लेखसंग्रह

चीनचे पंतप्रधान ली कचियांग भारतभेट

Category:

 

भारत भेटी नंतर चिनी पंतप्रधान आता पाकिस्तान भेटीवर आहेत.चीनच्या दक्षिण आशियातील परराष्ट्र धोरणात पाकिस्तानची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. चीन-पाकिस्तानसोबतची अतूट मैत्री भारताने मान्य करावी. केवळ नवी दिल्लीची मर्जी राखण्यासाठी पाकिस्तानसोबतच्या संबंधात बाधा येणार नाही, असा इशारा चीनने दिला आहे. 

लेखसंग्रह

मतपेटीचे राजकारण; आसामचे बांगलादेशीकरण

Category:

 

आसाममध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात 31 जणांचा बळी गेला आहे. जातीय दंगलीचा वणवा 500 गावांत पसरला असून कोक्राझार जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 23 जुलैपासून आसाममध्ये जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. कोक्राझार जिल्ह्याला या दंगलीचा सर्वाधिक फटका बसला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोक्राझारमध्ये समाजकंटकांना पाहताक्षणी गोळया घालण्याचे आदेश तसेच अनिश्‍चितकालीन संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

लेखसंग्रह

फ्रान्सचे अध्यक्ष ओलांदे यांची भारतभेट

Category:

 

मालदीव, श्रीलंकेतील अलीकडच्या घडामोडींच्या निमित्ताने शेजारी राष्ट्रांबाबतच्या भारताच्या अनाकलनीय धोरणाचा पुन्हा प्रत्यय आला. पाकिस्तान, चीनबरोबरची डोकेदुखी कायम असताना बांगला देश, नेपाळ आदी शेजार्‍यांशीदेखील आपण सुरळीत संबंध राखू शकत नाही याला कारणीभूत ठरतात आपली चुकीची गृहितके. फ्रान्सच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर फ्रान्स्वा ओलॉद यांनी युरोपबाहेरील पहिल्या परदेश दौर्‍यासाठी भारताची निवड करावी, यावरून भारताबरोबरच्या संबंधांना तो देश किती महत्त्व देत आहे, ते कळते.

लेखसंग्रह

नक्षलविरोधी लढय़ामध्ये राजकीय बेजबाबदारी, विविध पातळ्यांवरील धोरणात्मक विसंवाद दूर करणे जरुरी

Category:

 

देशाच्या सुरक्षिततेला सर्वाधिक धोका नक्षलवाद्यांकडून असल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी म्हणूनच म्हटले आहे. मात्र, नक्षलवादाचा हा प्रश्न सोडविण्याचा मुद्दा त्यांनी बहुधा, निवडणुकीनंतर येणार्‍या पुढील सरकारवर सोडला असावा.छत्तीसगडमध्ये नक्षलवादाचा पुरता बीमोड करण्यासाठी तेथे ऑपरेशन ‘ग्रीन हंट’ पुन्हा नव्या जोमाने राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

लेखसंग्रह

पर्यटकांसाठी काश्‍मीर खोरे खुले

Category:

 

काश्‍मीरसह भारताच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करून धुमाकूळ घालण्याचा कट ‘लष्कर ए तोयबा’ ने आखला आहे. शेकडो प्रशिक्षित सशस्त्र दहशतवादी पाकव्याप्त काश्‍मीरमधून भारतात घुसणार असल्याची माहिती अबू जुंदाल याने दिल्ली पोलिसांना चौकशीत दिली आहे. मुंबईवरील हल्ल्यातील प्रमुख आरोपी असलेला अबू जुंदाल सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. लष्कर ए तोयबाच्या विशेष संपर्कात राहिलेल्या जुंदालच्या चौकशीतून अनेक गुपिते उघड होत आहेत. काश्‍मीरमधील शांतता दहशतवाद्यांना खुपत आहे.

लेखसंग्रह

बांगलादेशातील पाकिस्तानवाद्यांना निष्प्रभ करणे महत्वाचे

Category:

 

बांगलादेश आणि भारत या देशांत अस्वस्थता कशी नांदेल हे पाहणे हे पाकिस्तानी नेतृत्वाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे बांगलादेशातील विद्यमान घडामोडींबाबत आपण अधिक सजग असणे गरजेचे आहे. गेले काही आठवडे त्या देशात साचलेल्या खदखदीचे रूपांतर धर्माध आणि निधर्मी शक्ती यांच्यातील संघर्षांत झाले असून या संघर्षांची झळ आपल्याला लागणार आहे.

लेखसंग्रह

अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून माघारी

Category:

 

अफगाणिस्तानात अमेरिकेने हस्तक्षेप केला त्याला अकरा वर्षे झाली. अलीकडच्या काळात अमेरिकेला सर्वाधिक काळापर्यंत गुंतवून ठेवणारे हे युद्ध ठरले. अगदी व्हिएतनामचे युद्धदेखील यापेक्षा कमी काळ चालले होते आणि त्यात झालेला खर्चदेखील अफगाणिस्तानच्या युद्धापेक्षा कमी होता.

लेखसंग्रह

रमजान ईदच्या दिवशी किश्तवाडमध्ये झालेली दंगल

Category:

 

जम्मू-कश्मीर पुन्हा एकदा पेटले आहे. किंबहुना जम्मू-कश्मीरातील पाकिस्तान समर्थक आणि फ़ुटीरवादीनी ही आग लावली आहे. फरक इतकाच की, एरव्ही कश्मीर खोरे हिंसाचाराने धुमसत असते. यावेळी जम्मू आणि आसपासच्या हिंदूबहुल जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. सर्वप्रथम किश्तवाड हे शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

लेखसंग्रह

आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीला जलसमाधी

Category:

 

आपल्या देशात काय चालले आहे? काश्मीरमधील पूंछ या सीमावर्ती भागात पाकिस्तानी लष्कराचा गोळीबार चालु आहे. भारताने शस्त्रसंधी तोडल्याचा आव आणून त्याचा निषेध करणारा ठराव पाकिस्तानी संसदेमध्ये संमत झाला. १६ ऑगस्टला तब्बल १० वर्षांनंतर पाकिस्तानी सैन्याकडून कारगिल व द्रास भागामध्ये शस्त्रसंधीचा भंग केला.