साहित्य - ललित

पुरूषांना नको का माहेर?

Category:

 

असेल तर ‘माहेर’ या शब्दासाठी नवा काही पर्याय शोधून काढावा. आणि त्या माहेरी चार दिवस सुखानं राहावं. भिरकावून द्यावं जबाबदारीचं जड ओझं, तोडून टाकावं मौनाचं कुलूप आणि गाव्या मुत्त* चारोळ्या. आई, वडील, बहीण, भाऊ सर्वांचे हात हाती घेऊन द्यावा घ्यावा उबदार दिलासा.

साहित्य - ललित

आम्ही सार्‍याच गांधारी

Category:

 

किती युगं लोटली गांधारी होऊन गेल्याला. गांधारी! नव्हे, नव्हे- पतिपरायण गांधारी. सती-साध्वी गांधारी. किती शतकं उलटली

पतिपरायण गांधारी होऊन गेल्याला. काळाची उलथापालथ झाली. कलियुग अवतरलं. वर्णसंकर झाला. वर्णसंकराचा बाऊ वाटेनासा

झाला. माणसांचीही उलथापालथ झाली. पोशाख बदलले. आचार-विचार बदलले. पाश्चात्त्य-पौर्वात्य भेदाभेदातलं अंतर फारसं उरलं

नाही. स्त्री- पुरुषांच्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्यांची सरमिसळ झाली. आर्थिक सहभागाची तिला मुभा मिळाली. शिक्षणाची दारं तिच्यासाठी खुली झाली. बदलली नाही ती स्त्रीविषयक धारणा. पुरुषांची तर नाहीच नाही. सुखासुखी हाती आलेले सर्वाधिकार

फारच थोडे सोडू शकतात. बव्हंशी (मूठभर 20 टक्के सोडून) स्त्रीचीही स्वत:विषयीची धारणा बदलली नाही. पतिपरायणतेचं बिरुद मिरविण्याची स्त्रीची हौस फिटली नाही आणि पतिपरायण स्त्री ही पुरुषाची हावही सुटली नाही. कारण आम्हाला हव्या आहेत फक्त गांधारी.

लेखसंग्रह

हम दो – हमारे दो

Category:

 

११ जुलै हा गेली २३ वर्षें ‘विश्व लोकसंख्या दिन‘ म्हणून जगभर पाळला जात आहे. ११ जुलै १९८७ रोजी पृथ्वीवर पाच अब्जावे मूल जन्मले. तेव्हापासून हा दिवस ‘विश्व लोकसंख्या दिन‘ म्हणून मानला गेला आहे. १२ ऑक्टोबर १९९९ रोजी विश्व लोकसंख्या सहा अब्ज झाली. आणि २००१ च्या जनगणनेनुसार, आपला भारत देश एक अब्ज लोकसंख्येचा झाला. स्वातंत्र्यानंतर ५४ वर्षांच्या काळात भारताची लोकसंख्या तिप्पट झाली. भारतात मृत्युदर आहे- दर हजारी ९ व जन्मदर आहे- दर हजारी २४.