व्यक्ती-परिचय

डॉ. विद्याधर गोपाळ ओक

Category:

 

सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक व संगीत संशोधक. संगीतातील २२ श्रुतींवर आधारित जागतिक दर्जाचे संशोधन.

व्यक्ती-परिचय

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

Category:

 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन पणाला लावलं असे थोर तत्वज्ञ आणि राजकीय नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान निर्विवाद आहे.

व्यक्ती-परिचय

डॉ. युसुफखान महम्मदखान पठाण (यु. म पठाण)

Category:

 

लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक. पुणे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु.

व्यक्ती-परिचय

डॉ. वीणा देव

Category:

 

डॉ. वीणा देव ठाणे जिल्हा आणि विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. साहित्य आणि कला क्षेत्रात विविध विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत. मुलाखती घेणे, सूत्रसंचालन याद्वारे त्यांचा आकाशवाणी, दूरदर्शनवर सहभाग राहिला आहे.

व्यक्ती-परिचय

डॉ. मधुसुदन जोशी

Category:

 

डॉक्टर मधुसुदन जोशी हे पनवेलमधील नावाजलेले वैद्यकिय तज्ञ असुन गेली दहा वर्षे त्यांनी, त्यांच्या क्लिनीकची पायरी चढणार्‍या कुठल्याच रूग्णाला निराश होवून पाठवले नाहीये. इतकी वर्षे या व्यवसायात असल्यामुळे समृध अनुभवांची व विवीध वैद्यकिय कौशल्यांची पोतडीच त्यांच्याजवळ जमा झाली आहे.

व्यक्ती-परिचय

डॉ. रमेश सीताराम सुर्यवंशी

Category:

 

डॉक्टर रमेश सीताराम सुर्यवंशी हे संशोधक वृत्तीचे शिक्षक, व आदिवासी बोली भाषांमधले तज्ञ मानले जाणारे एक बहुरंगी व बहुढंगी व्यक्तिमत्व आहे. शिक्षण, भाषाशास्त्र, व लोकसाहित्याचे गाढे आभ्यासक, तसेच प्रतिभावंत लेखक म्हणून त्यांनी समाजात त्यांच्या नावाचा आदरयुक्त दबदबा निर्माण केला आहे. आजवरच्या त्यांच्या शैक्षणीक प्रवासावरूनच, डॉक्टरांच्या असामान्य बौध्दिक क्षमतांची व आभ्यासु व्रुत्तीची झेप आपल्या त्वरीत लक्षात येईल, अशा कौतुकास्पद तर्‍हेने त्यांनी ही कारकिर्द घडवली आहे.

व्यक्ती-परिचय

डॉ. विट्ठल नागेश शिरोडकर

Category:

 

डॉक्टर विट्ठल नागेश शिरोडकर यांचे महिलांसाठी असलेले अतुल्य योगदान पाहिले की मन भरून येते. मातृत्व हा प्रत्येक मातेसाठी व तिच्या कुटुंबियांसाठी सर्वात आनंदाचा, समाधानाचा, व आयुष्यभर जतन करून ठेवण्यासारखा क्षण असतो. शेवंतीच्या फुलांसारखी सुगंधी दरवळ आणणारा, व आनंदाच्या व हास्याच्या कारंज्यांनी घर भारून टाकणार्‍या या क्षणाला कोणाची नजर लागू नये यासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य व कारकीर्द पणाला लावली होती. सतत होणारे गर्भपात या विषयावरील त्यांचे यशस्वी संशोधन, म्हणजे प्रत्येक गृहिणीसाठी तिच्या आईपणाची शाश्वती देणारे अमृतच ठरले. त्याकाळी शारिरीक गुंतागंतींमुळे गर्भपात होण्याचे प्रमाण फार मोठे व सामान्य होते.