अवर्गिकृत

माझी मराठी

Category:

 

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन राज्यभरात “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो.
यानिमत्ताने महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स यांनी एक लेख स्पर्धा आयोजित केली होती. लेखाचा विषय होता माझी मराठी. यासाठी मी लेख पाठवला होता लेख स्वीकारला गेला परंतु बक्षीस मिळाले नाही. ठीक आहे, तरी माझा हा लेख वाचून कसा वाटला याचा अभिप्राय द्या.

अवर्गिकृत

संस्कार, विचार आणि विवेक

Category:

 

सामाजिक बदलांचा आणि आर्थिक विकासाचा वेग जसजसा वाढत चालला, तसतसं माणसाचं राहणीमान झपाट्यानं उंचावत चाललं. विज्ञानानं असंख्य सुखसुविधा निर्माण केल्या. शिक्षणाचा प्रसार वाढला. ज्या समाजात ‘व्ह. फा. ‘पर्यंत शिकणाऱ्या मुला-मुलींकडे लोक आदरानं बघत होते, त्याच समाजात घरोघरी पदवीधर दिसू लागले. जास्तीतजास्त उच्च शिक्षण घेतलेला, नोकऱ्यांमध्ये मानाच्या जागा मिळवणारा आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न असा एक नवा वर्ग, उच्च मध्यमवर्ग निर्माण होऊ लागला.

अवर्गिकृत

मुक्ती

Category:

 

आयुष्याच्या प्रवासात बर्‍याच घटना घडत असतात.कधी त्या आनंददायक असतात,कधी क्लेशदायक कधी मजेशीर,कधी खट्याळ,कधी खट्टया-मिठ्या तर कधी… विलक्षण…आणि अविश्वणीय…असाच एक अनुभव आपल्याशी शेअर करतोय…

अवर्गिकृत

महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी

Category:

 

महाराजा सयाजीराव यांचे बडोदा राज्य आणि महात्मा गांधीजी यांचे जन्मगाव एकाच म्हणजे गुजरात राज्यात येते. महात्मा गांधीजी आणि महाराजा सयाजीराव यांचा स्नेह दृढ होता.

अवर्गिकृत

संस्कृती रक्षण

Category:

 

संस्कृती ही माणसाच्या वर्तनात असते. सदाचरणात असते. माणूस अतिलोभी, मत्सरी असेल तर तो सदाचारी असू शकत नाही. त्याच्यातले हे दोष घालवण्याचं काम धार्मिक स्तोत्रं मग ती कोणत्याही धर्माची असू देत करत असतात. म्हणून लहानपणापासून संस्कारक्षम, पापभीरु वयापासून त्यांची शिकवण द्यायची.

अवर्गिकृत

लेबल

Category:

 

लेबल, उपाधी,बिरुद,पदनाम एकदा चिकटले की अविभाज्य भाग होऊन जाते, काही केल्या ते सूटत नाही, नोकरीतून निवृत्त झाले तरी त्याचा ससेमीरा साथ सोडत नाही. लेबलमध्ये एकदा मनुष्य अडकला की तो त्यातून बाहेर पडणे शक्य नसते.चोविस तास लेबल घेऊन जगणारी माणसे आपले जीवन हरवून बसतात.

अवर्गिकृत

संस्कारित जीवन

Category:

 

भारतीय संस्कृतीनं जीवनाच्या सर्व अंगांचा विचार केला आहे. हा विचार करताना या संस्कृतीचे पाय सदैव जमिनीवर राहिले आणि म्हणूनच ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ । असा संपूर्ण विरक्तीचा विचार या संस्कृतीनं दिला असला तरी त्या परब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी जीवनाचा, जीवनातल्या सुख-सुविधांचा तिरस्कार तिनं शिकवला नाही. माणसाच्या ऐहिक गरजा, त्या पूर्ण करण्यासाठी लागणारं वैभव या साऱ्यांची तिला जाण आहे व म्हणूनच ‘अभ्युदय’ आणि ‘निःश्रेयस ‘ असे जीवनाचे दोन्ही भाग तिनं गौरवले आहेत.

अवर्गिकृत

उत्सव की औपचारिकता?

Category:

 

आपल्यातील सगळेजणच Wish you best of luck, Happy Journy वगैरे म्हणत असतात. फुलांचे गुच्छ हातात देत असतात. एकटी आई मात्र एकच वाक्य उच्चारते, ‘गेल्यावर पत्र टाक रे बाबा! ” कसल्याही शुभेच्छा व्यक्त न केलेल्या त्या वाक्यामध्ये सगळ्या शुभेच्छांचा वर्षाव जाणवतो. औपचारिकतेची सगळी फुलं तेव्हा मलूल वाटायला लागतात.