लेखसंग्रह

श्रमाची प्रतिष्ठा!………………

Category:

 

‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, किती साध्या, सरळ, सोप्या भाषेत किती मोठे तत्त्वज्ञान आपल्या संतांनी सांगून ठेवले आहे; परंतु आपल्याला साधी भाषा कळतच नसावी. एकतर आपल्या संतांचे साहित्य इंठाजीत नाही. ते ‘वेल पॉलिश्ड’ नाही.

लेखसंग्रह

सोपे उपाय

Category:

 

आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजेच देशाचा कोणताही अधिकृत धर्म नाही. धर्मच नाही म्हटल्यावर ईश्वर किंवा ईश्वरी अवतार या कल्पनाही आपोआपच बाद होतात; परंतु देशाचा एकूण कारभार पाहिला की ईश्वराला नाकारणे खूप कठीण जाते.

लेखसंग्रह

आता उरलो गोंधळापुरता !

Category:

 

मैं तेरा साल से अंदर हूं। इस दौरान मेरे मां – बाप चल बसे। मैं अंदर आया तब मेरा बच्चा केवल दो महिने का था। बहूत भुगत चुका, अब सीधी साधी जिंदगी बिताना चाहता हूं जजसाब, अल्लाह के बाद सिर्फ आप पर ही भरोसा है। आशा करता हूं आप नाउम्मीद नही करेंगे!’ मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील एका आरोपीने गुन्हा सिद्ध झाल्यावर आपली कैफियत न्यायाधीशांसमोर मांडली. गुन्हा सिद्ध झाल्यामुळे जन्मठेप किंवा फाशी होणार हे निश्चित झालेल्या आरोपीचे ते वत्त*व्य होते.

लेखसंग्रह

आखाडा, तमाशा की धिंगाणा

Category:

 

3 सप्टेंबर 2006

*गुरुवार, 24 ऑगस्ट, 2006 हा दिवस संसदीय इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवावा लागेल. या दिवशी लोकशाहीचे मंदिर म्हटल्या जाणाऱ्या संसदेत, लोकसभेत जे काही घडलं, त्यामुळे साऱ्या देशालाच नव्हे तर, लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला शरमेनं मान खाली घालावी लागली असेल. या सर्वोच्च संसदीय सभागृहात आपण आपल्या पवित्र मताधिकार उपयोग करून ज्यांना निवडून पाठवतो, देशाच्या विकासाची धोरणे ठरविण्याचा, त्यावर गंभीरतेने विचार करण्याचा अधिकार ज्यांना देतो, ते आपले खासदार या सभागृहात कसे वागतात, त्यांचे वर्तन कसे असते, त्यांचं बोलणं कसं असते, खासदार म्हणून ते काय करतात या साऱ्यांचा खरंतर आपण कधी विचार करत नाही.

लेखसंग्रह

नवी ओळख पुसून टाका!

Category:

 

जगात अब्जावधी लोक आहेत, परंतु तरीसुद्धा एका व्यक्तीसारखी हुबेहूब दुसरी व्यक्ती असणे शक्य नाही. अगदी जुळ्या मुलांमध्ये देखील सूक्ष्मसा फरक असतोच. सांगायचे तात्पर्य, प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र ओळख असते.

लेखसंग्रह

धोरण बदलण्याची गरज!

Category:

 

स्वातंत्र्याचे साठावे वर्ष सगळ्याच नेत्यांनी ‘चिंता वर्ष’ म्हणून साजरे करायचे ठरविलेले दिसते. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या विषयावर चिंता व्यत्त* करताना दिसत आहे. ज्याला कोणताच विषय सुचत नाही त्याच्यासाठी ‘शेतकऱ्यांची दयनीय अवस्था’ हा विषय ठेवलेलाच आहे.

लेखसंग्रह

स्वतंत्र झालो, स्वातंत्र्य कुठे?

Category:

 

भारत इंठाजांच्या गुलामगिरीतून मुत्त* झाला; स्वतंत्र झाला. बघताबघता या घटनेला 59 वर्षे उलटली. या 59 वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.

लेखसंग्रह

“ते” खातात तुपाशी…!

Category:

 

पाचव्या वेतन आयोगाने सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या भरपेट भोजनाची ढेकर अजून विरत नाही तोच केंद्र सरकारने सहाव्या वेतन आयोगाचे गठन करून आपल्या लाडक्या लेकरावरचे प्रेम जगजाहीर केले आहे. सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताची जितकी काळजी घेते त्या तुलनेत इतर 95 टक्के जनतेची केवळ एक टक्काही काळजी सरकारने घेतली असती तर कुणाची काहीच तक्रार राहिली नसती; परंतु दुर्दैवाने परिस्थिती तशी नाही. आपल्या कर्मचाऱ्यांचा विचार करताना सरकार जीवनमानाच्या ज्या कल्पना निर्धारित करते इतरांच्या संदर्भात मात्र सरकार त्या कल्पनांच्या जवळपासही फिरकत नाही ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे.

लेखसंग्रह

“इंडिया दॅट इज भारत”

Category:

 

आम्हा भारतीयांना दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिण्याची जणू सवयच लागली आहे. कुणीतरी दुसऱ्याने कान टोचल्याशिवाय आम्हांला शहाणपण येत नाही. विविधता ही खरे तर आपल्या देशाची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणता येईल.

लेखसंग्रह

करंट्यांचा देश

Category:

 

भारताची वाढती लोकसंख्या शाप आहे की वरदान हा वादाचा विषय होऊ शकतो. सध्या प्रचलित असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त मतप्रवाहानुसार वाढती लोकसंख्या शाप ठरत असली तरी थोड्या वेगळ्या अंगाने विचार केल्यास ही वाढती लोकसंख्या भारतासाठी वरदान ठरू शकते. लोकसंख्या वाढत आहे म्हणजे खाणारी तोंडे वाढत आहेत, असाच विचार केला जातो; परंतु त्याचवेळी काम करणारे दोन हातदेखील वाढत आहेत, याकडे दुर्लक्ष केले जाते.