लेखसंग्रह

बळीराजाच्या नावानं चांगभलं!

Category:

 

ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांना विचारले तर ते हेच सांगतील की एखाद्या व्यत्त*ीच्या जीवनातील सर्वाधिक खडतर काळाची लांबी साडेसात वर्षापेक्षा अधिक असू शकत नाही आणि अशा दोन कालखंडातील अंतर किमान बावीस वर्षे असते. शनि या सर्वाधिक पिडादायक ठाहाच्या भ्रमंतीचा आणि मुक्कामाचा हा कालखंड आहे. एका राशीला शनि एका कालखंडात अधिकाधिक साडेसात वर्षे त्रास देऊ शकतो आणि त्या राशीची शनिशी पुन्हा भेट नंतर साडे बाविस वर्षांनीच होते.

लेखसंग्रह

नक्षलवादाचे पितृत्व सरकारकडेच!

Category:

 

1857 च्या उठावाला ब्रिटिशांनी ‘बंड’ संबोधून चिरडले. भारतीयांसाठी ती क्रांती होती. सरकारच्या जुलमी कारभाराविरुद्ध पुकारलेला तो एल्गार होता.

लेखसंग्रह

पंतप्रधान आले अन् गेले!

Category:

 

हा लेख तुमच्या हातात पडेपर्यंत पंतप्रधानांचा विदर्भ दौरा आटोपला असेल, या दौऱ्याची फलश्रुती तुमच्या समोर असेल; परंतु हा लेख लिहीत असताना पंतप्रधानांचा दौरा सुरू झालेला नव्हता. त्यामुळे पंतप्रधानांच्या या दौऱ्याने विदर्भाला काय मिळेल, ते कितपत परिणामकारक ठरेल याचा इथे केवळ अंदाज करणे शक्य आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या पंतप्रधानांना कुठेतरी अस्वस्थ करून गेल्या आणि म्हणूनच त्यांनी इथल्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा, इथल्या लोकांच्या समस्या थेट त्यांच्याकडूनच समजून घेण्याचा निर्णय घेतला यात शंका नाही.

लेखसंग्रह

“मोले घातले रडाया….”

Category:

 

एखाद्या व्यत्त*ीचे निधन झाल्यावर त्याच्या आप्तस्वकीयांना दु:ख होणे स्वाभाविक असते. डोळ््यांतील अश्रूंची वाट मोकळी करून हे दु:ख व्यत्त* केले जाते. दु:खाचा तो स्वाभाविक उद्रेक असतो परंतु बरेचदा असेही आढळून येते की, मृत व्यत्त*ीशी कुठलेही भावनिक संबंध नसलेली माणसेही आपल्या न झालेल्या दु:खाचे अतिरेकी प्रदर्शन करीत असतात.

लेखसंग्रह

कुणी न राहिला वाली!

Category:

 

यादेशाचे सर्वस्व कशात असेल तर ते शेतीत आहे आपल्या घामाने ही शेती कसणाऱ्या शेतकऱ्यात आहे. त्यामुळे शेती आणि शेतकरी हा विषय टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न देशाच्या दृष्टीने आत्मघाताचाच ठरणार आहे. दुर्दैवाने या देशाचे धोरण ठरविणाऱ्या संसदेला, त्या संसदेचे नेतृत्व करणाऱ्या सरकारला याची जाणीव राहिलेली दिसत नाही.

लेखसंग्रह

आत्महत्या ते नक्षलवाद!

Category:

 

एक भुकेलेला मुलगा काहीतरी खायला दे असे म्हणत आईकडे जातो. खरेतर कोणत्याही मातेसाठी लेकराच्या भुकेपेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नसते. ते नसायलाही नको असे समाज समजतो.

लेखसंग्रह

लाखमोलाचा प्रश्न!

Category:

 

सरकारने दाखविलेल्या ‘कापूस ते कापड’ या सोनेरी स्वप्नात हरवून गेलेला विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी जेव्हा वास्तवात परतला तेव्हा फार उशीर झाला होता. त्या स्वप्नाच्या धुंदीत त्याने खूप काही गमावले होते आणि नंतर गमाविण्यासाठी काही शिल्लक राहिले नाही तेव्हा तो आपला जीव गमावू लागला. रोजच्या आत्महत्या सुरू आहेत.

लेखसंग्रह

आरक्षणाचे राजकारण!

Category:

 

इतर मागासवर्गीयांना उच्च शिक्षणसंस्थांमध्ये घटनेतील तरतुदीनुसार 27 टक्के आरक्षण देण्याची घोषणा मानव संसाधन विकासमंत्री अर्जुनसिंग यांनी केली आणि संपूर्ण देशातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले. अर्जुनसिंगांच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी आरक्षण विरोधकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यात प्रामुख्याने वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

लेखसंग्रह

रोग बळावतोय, उपचार बदला!

Category:

 

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांना रोखण्यासाठी सरकारने विशेष पॅकेजची घोषणा केली. सरकार म्हणते त्याप्रमाणे पॅकेजची प्रभावी अंमलबजावणीदेखील सुरू झाली. परिणाम काय झाला तर शेतकरी आत्महत्येच्या बातम्या पूर्वी आठवड्यातून तीनचार दिवस उमटायच्या त्या आता दररोज उमटू लागल्या.