साहित्य - ललित

जाणती मुलं माझी

Category:

 

माझे विद्यार्थी खूपच समजूतदार होती म्हणून मला अजिबात त्रास झाला नाही. कुणी आलं की ऑफिसात जावे लागले तरी मुलं शांत बसून अभ्यास करायची. कधीच रागवाव लागलं नाही. जाणती होती ती. त्यांना शिवरायांचे चरित्र म्हणून एक विषय होता. आणि आवडीने मनापासून ऐकायची शिवाजी महाराजांचे चरित्र. आणि एकदा एक पालक बाई म्हणाल्या की बाई माझा मुलगा अबोल लाजाळू आहे पण त्याला तुमच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नुसते उभे केले तरी चालेल पण मला एकदा डोळे भरून त्याला रंगपचावर पहायच आहे. दरम्यान मी मा. बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणता राजा हे पाहिले होते आणि विचार चक्र सुरु झाले. ठरविले माझी मुले पण जाणतीच आहेत याच्यातूनच जाणता राजा सादर करायचा.

साहित्य - ललित

हिमशिखरांच्या सहवासात – मनोगत

Category:

 

हिमालयाच्या निसर्गाला पावित्र्याची, आध्यात्माची, संस्कृतीची जोड आहे. हिमालयातील पर्वतशिखरे, नद्या, सरोवरे, मंदिरे, निरनिराळी स्थाने यांच्याशी जोडलेल्या कथा, मिथकं ऐकताना मन मंत्रमुग्ध होते. प्रत्येक भागातील चालीरिती, रिवाज, सण, उत्सव, श्रद्धास्थाने, देव-देवतासुद्धा वेगळ्या आणि त्यांना जोडले आहेत पुराणकथांचे, निरनिराळ्या घटनांचे संदर्भ! हे सर्व अनुभवायचे असेल तर अनवट वाटांवर केलेल्या पदभ्रमंतीसारखा दुसरा पर्याय नाही.

साहित्य - ललित

स्वाभिमान

Category:

 

स्वाभिमान हा माणसाचा एक जन्मजात गुण आहे. प्रत्येकात असतोच. आणि असावाही. पण अतिरेक झाला की ते फारच असह्य होते. आणि जेव्हा स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा खूप खूप वाईट वाटते अशावेळी सयंम ठेवावा लागतो नाही तर भयंकर वाईट प्रसंग येतात. तर कधी कधी आपल्यालाच मनाला मुरड घालून गप्प बसावे लागते.

साहित्य - ललित

आवड तुमची अंदाज आमचा

Category:

 

न्याहरीची तऱ्हा या नावाने कविता पाठवली होती. आणि अनेकांच्या प्रतिसादांतून आम्ही काही स्वभावाचा अंदाज बांधला आहे. आर्थात अंदाज म्हणजे अगदी खरा किंवा चूक असा नसतो म्हणून फार मनावर घेऊ नये आणि तसेही मी फार मोठी मानसशास्त्रज्ञ नाही. त्यामुळे विनंती आहे की वाचा आणि सोडून द्या. आहे काय नाही काय. पण अंदाज यासाठी गाढा अभ्यास करावा लागतो? म्हणून आता मी जे अंदाज बांधले आहेत ते पडताळून पाहण्याची गरज नाही.

साहित्य - ललित

आमचंही – ‘खमंग आणि खुशखुशीत’

Category:

 

कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन कसा मारला गेला, बटला हाऊस एनकाउंटर का घडू शकले, उत्तर प्रदेशातील गुंड श्रीप्रकाश शुक्ला याला मारण्यात यश कसे मिळाले या तीनही प्रश्नांचे उत्तर एकच आहे ते म्हणजे फोन टॅपिंगमुळे हे शक्य झाले. दिल्लीत किमान सहा हजार लोकांचे फोन टॅप होतात, तर महानगरांमध्ये १० ते २० फोन गुप्तचरांच्या किंवा पोलिसांच्या नजरेखाली असतात असे आता स्पष्ट झाले आहे.