लोकप्रिय गीतकार प्रा. भालचंद्र गजानन खांडेकर यांचा जन्म २८ जून १९२२ रोजी झाला.
“चंद्रप्रकाश”, “गंधसमीर” हे त्यांचे कवितासंग्रह. प्रेमातील विविध भावछटांचे उत्कट प्रकटीकरण त्यांच्या कवितांतून दिसतेच, परंतु दांभिकता, अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याची प्रवृत्तीही दिसते. “श्लोक केकावली”, “संजीवनी” या काव्याची तसेच “सं. एकच प्याला”, “सं. शारदा” या नाटकांची संहितासंपादने त्यांनी केली.
जन्मदिनाच्याच तारखेस, २८ जून १९९० रोजी त्यांचे निधन झाले.
#Bhalchandra Gajanan Khandekar
लोकप्रिय गीतकार प्रा. भालचंद्र गजानन खांडेकर यांचा जन्म २८ जून १९२२ रोजी झाला.
“चंद्रप्रकाश”, “गंधसमीर” हे त्यांचे कवितासंग्रह. प्रेमातील विविध भावछटांचे उत्कट प्रकटीकरण त्यांच्या कवितांतून दिसतेच, परंतु दांभिकता, अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याची प्रवृत्तीही दिसते. “श्लोक केकावली”, “संजीवनी” या काव्याची तसेच “सं. एकच प्याला”, “सं. शारदा” या नाटकांची संहितासंपादने त्यांनी केली.
जन्मदिनाच्याच तारखेस, २८ जून १९९० रोजी त्यांचे निधन झाले.