शारीरिक अपंगत्व सहन करणे महाकठीण असले तरी त्याने हरायचे नसते... जिद्द आणि उमेदीच्या जोरावर देशविदेशातील क्रीडास्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची बाजी मारणारे नागपूरचे विजय मुनीश्वर यांनी हे दाखवून दिले. पॅरालिम्पिकमध्ये पॉवर लिफ्टिंग प्रकारात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावले. अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, टेबल टेनिस यांत त्यांनी अनेक खेळाडू घडविले. त्यांच्या कर्तृत्त्वाची दखल घेत सरकारने त्यांना “अर्जुन पुरस्कारा” ने व राज्य सरकारने “उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक” पुरस्काराने सन्मानित केले आहे. सध्या ते पॅरालिम्पिक कमिटीच्या उपाध्यक्षपदावर असून पॉवरलिफ्टिंगचे मुख्य कोच आहेत.
''पॉवर'' फुल प्रशिक्षक
अनंत हरी गद्रे यांच्याकडे विविध मराठी वाक्प्रचारांचे विलक्षण भांडार होते. ते त्यांनी आपल्या जाहिरात कौशल्यासाठी वापरले. गद्र्यांच्या ’कुमारी’ या नाटिकेचे एकामागून एक असे १०१ प्रयोग झाले होते.
ते मराठीतील एक संपादक, बाल वाड्गमयकार आणि कोशकामकार होते. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1871 रोजी जळगाव जिल्हयातील धरणगाव येथे. शिक्षण धुळे, इंदूर आणि नागपूर येथे. कलकत्ता विद्यापीठातून ते बी.ए.झाले (1893). बंगाली भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. अध्यापन आणि वृत्तपत्रव्यवसाय हया क्षेत्रांत त्यांनी आयुष्याचा बराचसा काळ व्यतीत केला. त्याशिवाय मुंबईच्या जुन्या सचिवालयात `रिपोर्टर ऑफ द नेटिव्ह प्रेस` म्हणूनही काम केले.
ज्ञानप्रकाश (पुणे), मल्हारी मातैड (इंदूर) यांसारख्या पत्रांचे ते संपादक होते. त्यांनीच साप्ताहिक ज्ञानप्रकाशाचे दैनिकात रुपांतर केले. उत्तम बालसाहित्यास प्रोत्साहन देण्यासाठी आनंद हे लोकप्रिय मासिक काढले (1906). लहान मुलांसाठी त्यांनी अनेक छोटी छोटी पुस्तके लिहिली. त्यांचा मृत्यू 2 फेब्रुवारी 1930 रोजी झाला.
विठ्ठल गंगाराम चापके हे भारत सरकारच्या खत कारखान्यात संशोधनात्मक काम पाहतात.
गंगाधर सरदार हे मराठी साहित्यिक आणि विचारवंत होते.
गणितशास्त्र या विषयातील केंब्रिज विद्यापिठातील रँग्लर ही सर्वोच्च पदवी मिळवलेले कुशाग्रबुध्दीचे अभ्यासक.
माती बरोबरच माणसांच्या मनांची मशागत करणारा नेता. राजकारणाच्या पुढे जाऊन कला, क्रीडा, शिक्षण, कृषी सहकार या क्षेत्रांची सखोल जाणीव.
१९५७ ते १९६२ या काळात डॉ. डी. वाय. पाटील हे काँग्रेसकडून कोल्हापूरचे महापौर होते. १९६७ आणि १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत आमदार म्हणूनही निवडून गेले होते.
नाट्यनिर्माता म्हणून सत्तर ते ऐंशीच्या दशकात जे रंगकर्मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उदयाला आले आणि आपला छोटासा का होईना पण गडद ठसा उमटवून गेले, त्यात जयसिंग चव्हाण यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
Copyright © 2025 | Marathisrushti