अलेक्झांडर मेलविले आणि एलिझा सायमंड्स बेल हे त्यांचे आई वडील. त्यांचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी स्कॉटलंडच्या एडीनबर्गमध्ये येथे झाला. अगदी लहान असल्यापासूनच ग्रॅहम बेलनी विविध प्रकारचे शोध लावायला सुरुवात केली होती. त्यांच्या सुरुवातीच्या पहिल्या प्रकल्पांपैकी एक प्रकल्प हा गव्हापासून त्याचा भुसा वेगळा करण्यासंदर्भातील होता. पण त्यांना आवाजाबाबत विशेष प्रेम होते. तोंडातून बाहेर पडणारा आणि कानाला ऐकू येणारा आवाज याबाबत बेल यांना प्रचंड आकर्षण होते. वडीलांनी दिलेल्या प्रेरणेतून त्यांनी भाऊ मेलविले याच्यासह टॉकिंग मशीन तयार करण्याचा प्रयत्नही केला होता. यात त्यांना यश आले आणि नाही आले असेही म्हणता येईल. कारण हा प्रोजेक्ट मागे पडला. पण त्यानंतर बेल यांनी जो शोध लावला त्या जोरावर आज संपूर्ण जगाने कुठल्या कुठे मजल मारली आहे. हा शोध म्हणजे टेलिफोनचा. हेही एक टॉकिंग मशीनच म्हणायला हवे ना.
वयाच्या ११ व्या वर्षी अलेक्झांडर बेल यांनी ग्रॅहम हे नाव धारण केले. तेव्हा ते बनले अलेक्झांडर ग्रॅहम बेल.
त्यांचे वडील आणि आजोबा या दोघांचीही पहिली नावे अलेक्झांडर अशीच होती. त्यामुळे या नावाचा कंटाळा आल्याने त्यांनी हे नाव निवडले होते. त्यांच्या वडिलांच्या एका विद्यार्थ्याचे नाव अलेक्झांडर ग्रॅहम असे होते. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या नावात ग्रॅहम अॅड केले. बेल हे रिंगशी संबंधित असल्याने त्यांनी ते तसेच ठेवले असेल. पण काहीही असले तरी त्यांच्या कुटुंबासाठी मात्र कायम अॅलेस किंवा अॅलेक हेच त्यांचे नाव होते.
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ग्रॅहम बेल यांनी एका मुलांच्या निवासी शाळेत शिकवण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या वडिलांनी व्हिजिबल स्पीच ही पद्धत तयार केली होती.
एखादा शब्द तयार होण्यासाठी आवाज कसे तयार होतात त्यासाठी ओठांच्या हालचाली कशा होतात, याचा त्यात समावेश होता. हीच पद्धत बेल यांनी कर्णबधीर मुलांना बोलायला शिकवण्यासाठी आणि त्यांचे उच्चार अधिक स्पष्ट करण्यासाठी वापरली. त्यांनी स्वतःच्या काही पद्धतीही तयार केल्या. त्यांच्या आईला कमी ऐकू येत होते. त्यामुळे ते लहानपणीपासूनच आईशी वेगळ्या प्रकारे बोलायचे. कर्णबधीर मुलांना शिकवण्यात त्यांनी अगदी प्रावीण्य मिळवले होते.
ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनच्या शोधासाठी अनेक वर्षे संशोधन केले. त्या जोरावर त्यांनी १४ फेब्रुवारी १८७६ रोजी पेटंटसाठी अर्ज दिला. त्याच दिवशी एलिशा ग्रे यांच्यासाठी काम करणाऱ्या एका वकिलानेही अशाच संशोधनासाठी अर्ज सादर केला. बेल यांनी वडिलांना लिहिलेल्या पत्रानुसार कोणीतरी आपल्या सारखाच शोध लावत असल्याचा अंदाज त्यांना आला होता. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर अर्ज केला होता. त्यामुळे काही तासांच्या फरकामुळे बेल यांना या शोधाचे क्रेडीट मिळू शकले. मार्च १८७६ मध्ये बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले. त्यांनी सासरे गार्डीनर ग्रीन हबर्ड यांच्या मदतीने बेल टेलिफोन कंपनीची सुरुवात केली. त्यात गुंतवणूकदारांमध्ये बेल यांचे स्पर्धक एलिशा ग्रे यांचाही समावेश होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये वादही झाला होता.
बेल यांनी फोटोफोनचा शोधही लावला. त्यात प्रकाशाला आवाजामध्ये परावर्तीत करण्यात येत होते.
बेल यांच्यामते त्यांच्या महत्त्वाच्या शोधापैकी हा एक होता. त्यांना मिळालेल्या गिफ्टचा वापरही ते शोध लावण्यासाठी करायचे. आपल्या समस्या सोडवताना ते नवीन शोधाची निर्मिती करायचे. स्वतःच्या नवजात बाळाच्या मृत्यूनंतर त्यांनी मेटल व्हॅक्क्यूम जॅकेट तयार केले. त्यामुळे श्वासोछ्च्वासाला मदत होत होती. याच कल्पनेतून पुढे पोलिओच्या रुग्णांच्या उपचारात कामी येणारे उपकरण तयार केले गेले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफिल्ड यांच्यावर १८८१ मध्ये हल्ला झाला त्यावेळी ग्रॅहम बेल यांची मदत घेण्यात आली होती. शरिरात गोळी कुठे आहे हे शोधण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेट मशिन वापरले होते. गारफिल्ड यांना वाचवण्यात यश आले नाही. मात्र याच मशीनमध्ये सुधारणा करून सध्याच्या मेटल डिटेक्टरचा शोध लावण्यात आला होता.
ग्रॅहम बेल यांनी १८९० मध्ये पंतंगांच्या मदतीने काही प्रयोग सुरू केले होते. त्यासाठी त्यांनी काही खास इमारती खरेदी केल्या होत्या. अनेक प्रयोग केल्यानतंर बऱ्याच संशोधनानंतर बेल यांनी टेट्राहेड्रोन तंत्रावर आधारित एक खास पतंगाचे डिझाइन तयार केले होते.
१९०७ मध्ये त्यांनी एरियल एक्सप्रिमेंट असोसीएशनची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी काही फ्लाइंग मशीन तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यातील सर्वात यशस्वी ठरले ते सिल्व्हर डार्ट. हेच सिल्व्हर डार्ट पुढे कॅनडामध्ये पॉवर्ड फ्लाइटमध्ये वापरले गेले.
अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचे २ ऑगस्ट १९२२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आज पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे बालगंधर्व रंगमंदिर सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. पुण्यातील रसिकांची दाद प्रत्येक कलाकारासाठी एक अलंकार असतो. त्यात पुन्हा बालगंधर्व रंगमंदिरातील दाद म्हणजे कलाकारांच्या कलेचे सार्थक झाल्यासारखे असते. पुण्यात दाद मिळाली की जगात कुठेही दाद मिळवता येते, असे अनेक कलाकार आवर्जून सांगत असतात, हीच खरी पुण्याची व पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराची खासीयत आहे.
बालगंधर्व रंगमंदिराचा आदर्श राज्यातील विविध शहरांमध्ये नाटय़गृहांची उभारणी करण्यात जपला गेला आहे. स्वातंत्र्या नंतर स्वतंत्र रंगमंदिराच्या उभारणीला प्राधान्य देणारी पुणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली होती. संगीत रंगभूमीसाठी आपले जीवन वेचणारे नटसम्राट नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी साकारण्यात आलेल्या या रंगमंदिराचे भूमिपूजन ८ सप्टेंबर १९६२ रोजी बालगंधर्व यांनीच केले होते. बालगंधर्व रंगमंदिराचे बांधकाम १९६६ मध्ये सुरू झाले. १५ जुलै १९६७ रोजी बालगंधर्व यांची प्राणज्योत मालवली. पु. ल. देशपांडे यांनी या रंगमंदिराची रचना सर्वोत्तम असावी यासाठी कष्ट घेतले होते. ज्येष्ठ चित्रकार गोपाळराव देऊस्कर यांच्याकडून पुलंनी ‘स्वयंवर’मधील रुक्मिणीच्या वेशातील आणि पुरुष वेशातील अशी बालगंधर्व यांची दोन मोठय़ा आकारातील तैलचित्रे करून घेतली. विशेष म्हणजे बालगंधर्वाच्या नाटकात वापरण्यात आलेला ऑर्गनही रंगमंदिरात तैलचित्रांखाली ठेवण्यात आला आहे. कलाकार, रसिक प्रेक्षक, तंत्रज्ञ यांच्या सोयीचा विचार करून ऐसपैस, सर्वोत्तम ध्वनिव्यवस्था आणि प्रशस्त रंगमंचासह नेपथ्य सामानाची गाडी रंगमंचावर उतरविण्याची सोय करण्यापासून ते कुरकुरणाऱ्या मुलांचा व्यत्यय येणार नाही यासाठी ‘ग्लासबॉक्स’ची सोय करण्यापर्यंतचा विचार मा.पुलंनी केला आणि त्या काळी एक उत्कृष्ट रंगमंदिर साकारले गेले. मा.बी. जी. शिर्के यांनी या रंगमंदिराच्या बांधकामाची जबाबदारी घेऊन अवघ्या पंधरा लाखात बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी केली.
बालगंधर्व यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २६ जून १९६८ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले होते. तेव्हाचे महापौर मा.ना. ग. गोरे व मा.पु. ल. देशपांडे यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम नेटका होईल याकडे लक्ष दिले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आचार्य अत्रे उपस्थित राहू शकले नाहीत. पण, ‘मराठा’तील अत्रे यांच्या अग्रलेखाचे वाचन ना. ग. गोरे यांनी केले होते. पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, जयमाला शिलेदार आणि जयराम शिलेदार या दिग्गज कलाकारांनी नांदी सादर केली होती.
तर, दुसऱ्या दिवशी ‘एकच प्याला’ नाटकाचा प्रयोग सादर झाला होता. तेव्हापासून हे रंगमंदिर पुणेकरांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. या रंगमंदिरामध्ये नाटकाचा प्रयोग करण्याचा आनंद आणि रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविण्यासाठी रंगभूमीवरचा प्रत्येक कलाकार आसुसलेला असतो. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये प्रयोग करणे ही जणू कलाकाराच्या जीवनातील भाग्याची गोष्ट असते.
बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी या परिसराचे वर्णन करीत नेमके निरीक्षण आपल्या ओघवत्या शैलीत मांडणाऱ्या पु.ल. देशपांडे यांचे भाषण गाजले होते. पुलं म्हणाले होते, इथं बाहेरच्या बाजूला पुरुषाच्या वेशातील स्त्री म्हणजे झाशीची राणी आहे आणि आतल्या बाजूला देऊस्करांनी चितारलेला स्त्री वेशातील पुरुष म्हणजे गंधर्व आहेत. अर्धनारी नटेश्वराची दोन रूपं जिथं आहेत तिथं हे नटेश्वराचे मंदिर उभारलं जातंय, ही आनंदाची गोष्ट आहे. अलीकडे ‘नटेश्वर’ आहे, पलीकडे ‘ओंकारेश्वर’ आहे; मधून जीवनाची सरिता वाहतीये. आमचे महापौर त्याच्यावर पूल टाकणार आहेत. माझी विनंती आहे, की हा पूल एकतर्फी असू द्या.. ओंकारेश्वराकडून नटेश्वराकडे येणारा!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
भारतकुमार राऊत हे पत्रकार आणि ललित लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच वृत्तपत्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे मुंबई सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, दी इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल, दी इंडियन पोस्ट, दी इंडिपेंडंट, दी मेट्रोपोलिस ऑन सॅटर्डे, दी पायोनियर अशा मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या.
चितामण गणेश कर्वे यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल पुणे मध्ये तर उच्चशिक्षण फर्ग्युसन कॉलेजात झाले. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १८९४ रोजी झाला. गणित विषय घेऊन मुंबई विद्यापीठात त्यांनी बी. ए. पदवी मिळविली. १९१९ साली डॉ. केतकर यांच्या ज्ञानकोश प्रकल्पात ते काम करू लागले. डॉ. केतकरांसारख्या चतुरस्र, विद्वान, बुद्धिवंतांच्या सहवासात कोश संपादनाचे पहिले धडे कर्वे यांनी गिरविले आणि त्यांनी ज्ञानकोशाच्या कार्याला स्वतःला वाहून घेतले. सर्व समावेशक दृष्टी ठेवून अनाग्रही विचाराने तसेच काळाप्रमाणे वृद्धिगत होत जाणाऱ्या ज्ञानाच्या कक्षांचा विचार करून कोशकार्य करायचे असते ह्या डॉ. केतकरांच्या विचारातले मर्म लक्षात घेऊन कर्वे यांनी ज्ञानकोशाच्या कामाचा भार उचलला.
ज्ञानकोश पूर्ण झाल्यावर आपल्या काही सहकार्यांसह त्यांनी महाराष्ट्र शब्दकोश १ ते ७ खंड याचीही निर्मिती केली. तसेच महाराष्ट्र वाकसंप्रदाय कोश भाग १ व २ आणि शास्त्रीय परिभाषा कोश इ. महत्त्वाचे कोशग्रंथ प्रसिद्ध केले. यातील ‘शब्दकोश’ हा मराठी भाषेत तयार केलेला पहिला सर्वसमावेशक, व्यापक स्वरूपाचा कोश आहे. या कोशासाठी त्यांनी मराठी भाषा ज्या ज्या प्रांतात बोलली जाते म्हणजेच वर्हाडी, बागलाणी, खानदेशी, कोकणी त्या त्या बोलीभाषेतील शब्दसंग्रह आवर्जून गोळा केले. या शब्दकोशाच्या रूपानी भाषाभिवृद्धींचे संस्मरणीय आणि चिरस्थायी स्वरूपाचे मोठे काम करून ठेवले आहे. कर्वे यांनी काही कोश स्वतंत्रपणे संपादित केले. त्यात सुलभ विश्वकोश भाग १ ते ६, संयुत्त* महाराष्ट* ज्ञानकोश खंड १ आणि २, महाराष्ट्र परिचय इ. कोशनिर्मिती, समाजजीवन, उद्योगधंदे, देवदेवता-पंथ, व्यापार, स्थलदर्शन, शिल्पकला इ. विस्तृत माहिती दिली आहे. कोशवाङ्मयाखेरीज ‘पाश्चात्त्य नीतिशास्त्र’, ‘सुबोधन आणि धर्मचितन’, ‘मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी’ आणि ‘कोशकार केतकर’ इ. ग्रंथलेखनाचा समावश होतो.
लोकसाहित्य हा देखील त्यांचा अतिशय आवडीचा विषय होता. त्यामुळे लोकसाहित्याचाही त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होता. १९५६ साली महाराष्ट्र शासनाने लोकसाहित्य समितीची स्थापना केली. त्याच्या अध्यक्षपदी शासनाने कर्वे यांची सन्माननीय नियुक्ती केली होती. ज्ञानोपासक, ज्ञानसंग्राहक असलेल्या कर्व्यनी आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य त्यांनी केले. चितामण गणेश कर्वे यांचे १६ डिसेंबर १९६० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सहायक दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू करणा-या बासू चटर्जी यांनी दिग्दर्शक म्हणून रजनीगंधा, चितचोर, छोटीसी बात, खट्टामीठा, बातों-बातों में सारखे सुंदर चित्रपट दिले. त्यांचा जन्म १० जानेवारी १९३० रोजी झाला. स्वच्छ मनोरंजक चित्रपटात विविधता देणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटाची गती वाढवली. त्यांचे एकाच वर्षात दोन चित्रपट येणे सुरू झाले. बासूदा आपल्या चित्रपटांतून मध्यमवर्गाची छोटीसी बात सांगत. मुंबईतील बसस्टॉपपासून चाळीपर्यंत त्यांचे ‘पिया का घर’ अगदी ‘खट्टा मिठ्ठा’ खुले. म्हणजे पुन्हा चित्रीकरणाचे दिवस ते किती? फार-फार तर पस्तीस-चाळीस. तेदेखील बातो बातो में कधी निघून जात, हे समजतही नसेल. पन्नासहून अधिक हिंदी व बंगाली चित्रपटांसह त्यांनी रजनी, व्योमकेश बक्षी या मालिकांचे दिग्दर्शन केले. मा.हृषिकेश मुखर्जी आणि मा.बासु चॅटर्जी यांची त्या काळी असलेल्या निकोप स्पर्धेमुळे खरोखर मनाला विरंगुळा देणारे चित्रपट निर्माण झाले. बी. आर. चोप्रा यांनी ‘छोटीसी बात’च्या वेळी बासू चटर्जींना तसेच स्वातंत्र्य दिल्याने निखळ मनोरंजन करणार्याज मध्यमवर्गीय चित्रपटाचा प्रवाह सुरू झाला. मा.राजेंद्र यादव यांच्या सारा आकाश कादंबरीवर बासु चटर्जी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हा मृणाल सेन यांच्या भुवनशोमच्या बरोबरीने समांतर धारेतला पहिला चित्रपट ठरला.मा.बासु चॅटर्जी यांची कन्या रूपाली गुहा यांनी आपल्या वडीलांची परंपरा पुढे सुरू ठेवत मराठी सिनेनिर्मितीत पाऊल टाकले आहे. त्यांचे पती कल्याण गुहा हे हिंदीतील मानवंत निर्माते दुलार गुहा यांचे पुत्र असून गुहा दाम्पत्याच्या निर्मितीखाली `नारबाची वाडी’ हा पहिला वहिला मराठी सिनेमा तयार झाला आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निमित्ताने हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांची सेकंड जनरेशन मराठी सिनेमाकडे वळली आहे असं म्हणता येईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
संगीतकार रोशन यांचा पुत्र, अभिनेता-दिग्दर्शक राकेश रोशन यांची ही ओळख. घरात संगीताचे वातावरण. त्यामुळे लहानपणीच त्यांना संगीताचे बाळकडू मिळाले. पुढे विनोदवीर मेहमूद यांनी राजेश यांना ‘कुंवारा बाप’ मध्ये संधी दिली. त्यांचा जन्म २४ मे १९५५ रोजी झाला. स्वतंत्र संगीतकार म्हणून राजेश यांचा हा पहिलाच चित्रपट. यातील गाणी चांगलीच गाजली. यातले ‘आ री निंदिया आ’ हे गीत आजही रसिकप्रिय आहे. त्यानंतर आलेल्या ‘ज्युली ’मध्ये मात्र राजेश रोशन यांनी कमाल केली. यातले ‘भूल गया सब कुछ, याद नहीं अब कु छ ’ हे किशोर-लताचे गाणे आजही भान हरवायला लावते, तर ‘माय हार्ट इज बीटिंग’ ऐेकल्यानंतर मन प्रसन्न होते. रसिकांचा ‘मूड’ एकदम फ्रेश करणारे संगीत हा राजेश रोशन यांचा विशेष पैलू. एक रास्ता है जिंदगी (काला पत्थर ), परदेसिया (मि. नटवरलाल ), अंग्रेजी में कहते हैं कि (खुद्दार), सारा जमाना (याराना ), बाहें तेरी खुशबू के (काला पत्थर), तुज संग प्रीत लगाई (कामचोर), दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है (आखिर क्यों ), घर से निकलते ही (पापा कहते हैं ), जाती हूं मैं (करन अर्जुन ), हंसते हंसते (खून भरी मांग ), कहो ना प्यार है ही त्यांच्या प्रसन्न शैलीतील गाण्यांची काही उदाहरणे.
गायकाच्या प्रतिभेचा समर्पक वापर करण्यात राजेश रोशन नेहमीच यशस्वी ठरले आहेत. ‘दो और दो पांच’ मध्ये किशोरकुमार यांच्या आवाजातील ‘तूने अभी देखा नहीं’ हे गाणे राजेश रोशन यांच्या संगीतप्रतिभेची चुणूक दाखवणारे आहे. ‘खेल’मध्ये आशा भोसले यांच्याकडून ‘इडली डू’ हे कॅब्रे साँग आणि तेच गाणे भजन स्वरूपात गाऊन घेण्याचा अफलातून प्रयोग केवळ राजेश रोशनच करू जाणे. ‘इन्कार’ मधले त्यांचे ‘मुंगडा मुंगडा’ हे कॅब्रे साँगही असेच आपल्याला रिफ्रेश करणारे, ठेका धरायला लावणारे. ‘लूटमार’ मधले आशातार्इंच्या आवाजातले ‘जब छाये मेरा जादू’ हे गाणेही असेच. ‘कामचोर’ मधल्या त्यांच्या संगीताने नटलेल्या ‘तुमसे बढकर दुनिया में’ या गाण्यातला गोडवा तर मधाहून मधुर. ‘दूसरा आदमी’ मधल्या ‘चल कहीं दूर’ या साडेसहा मिनिटांच्या गाण्यात लता- किशोर- रफीच्या आवाजाचा वापर एकदम कर्णमधुर. ‘याराना’ मधल्या ‘भोले ओ भोले’ मधला निरागसपणा त्यांच्या संगीताने अधिकच खुलतो, तर ‘छूकर मेरे मन को’ मधला भाव मनाला चांगलाच भावतो. ‘खट्टा मीठा’ मधले ‘थोडा है थोडे की जरूरत है’ असेच काळजाला भिडणारे. ‘जुर्म’ मधले ‘जब कोई बात’ हे गाणेही मनाला वेगळा आधार देणारे. ‘खेल’ मधल्या ‘खत लिखना है’ गाण्यातून तिची आणि त्याची अगतिकता राजेश रोशनच्या संगीतामुळे आपल्यालाही अगतिक करते. बासरी, तबला, दिलरुबा, सारंगी, बोंगो, कोंगो, ट्रम्पेट, सॅक्सोफोन आदी वाद्यांचा उत्कृष्ट मेळ, त्यातून निर्माण होणारी उत्तम सुरावट, सहज ओठावर येतील अशा चाली, पार्श्वगायकांच्या आवाजाचा योग्य वापर ही राजेश रोशन यांच्या संगीताची वैशिष्ट्ये. अलीकडच्या काळात कहो ना प्यार है, कोई मिल गया, क्रिश आणि काइट्स या चित्रपटांतील संगीताने तरुणाईची मने जिंकणारा राजेश रोशन हा एक विरळाच संगीतकार. काळानुरूप परंतु अभिरुचिपूर्ण, सातत्याने फ्रेश करणारे संगीत देण्यात राजेश रोशन यांचा हात कोणीही धरू शकणार नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
राजेश रोशन यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=rU0PCK5mFbU
रायबा यांची जुन्या मुबईचे चित्रण असलेली चित्रमालिका खूप लोकप्रिय झाली. त्यांनी कॅनवासच्या ऐवजी ज्यूट म्हणजे पोत्याचा वापर केला. त्यांनी काहीसे भडक रंग वापरून ती चित्रे रंगवली होती. त्यातून मुबईचे बहुरंगी स्वरूप प्रकट होत असे. ज्यूट आणि कॅनव्हासवर चित्रे काढता काढता त्यांनी म्युरल्स म्हणजे काचेवरील चित्रे काढायला सुरवात केली. त्यांची अनेक म्युरल्स एअर इंडिया , सिडनी विमातळावर , अशा अनेक ठिकाणी आहेत . इजिप्तच्या म्युझियममध्ये रायबांची चित्रे जशी पाहायला मिळतात तशी ती नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आधुनिक संग्रहालयात आणि महाराष्ट्रात नागपूर येथेही आहेत.
फॉर्मूला वन'चा माजी विश्वविजेता मायकेल शुमाकरचा जन्म ३ जानेवारी १९६९ रोजी हुर्थ, पश्चिम जर्मनीत झाला.
मायकेल शुमाकरने १९९१ साली बेल्जियम ग्रँड प्रिक्सजमध्येद पर्दापण केले होते. त्या ने २००० ते २००४ असे सलग पाच वर्षे एफ वनचे विजेतेपद पटकावले होते. फॉर्म्युला वन स्पर्धा जिंकणारा तो पहिला जर्मन नागरीक होता त्याच्या यशामुळे फॉर्म्युला वन स्पर्धा जर्मनी मध्ये फार लोकप्रिय झाली. २००६ सालाच्या फॉर्म्युला वन चहात्यांच्या सर्वेक्षणानुसार तो सर्वात लोकप्रिय चालक होता. सर्वात पहिल्यां६दा त्याॉने २००६ साली निवृत्ती घेतली होती. मात्र २०१० साली मर्सिडिज संघातून त्या ने पुनरागमन केले होते.
शुमाकरला १९९७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदासाठी अपात्र घोषित करण्यात आले होते.त्याने युनेस्कोचा ब्रँड अॅफम्बेसीडर म्हणूनही काम केले आहे. २०१२ साली त्याचे २० अब्ज् रूपये वार्षिक उत्पशन होते. मायकेल शुमाकर हा फॉर्म्युला वन शर्यती नंतर तो घोडेस्वारी करून आपले मन रमवत असे. जर्मन शेफर्ड आदी कुत्रे पाळण्याची त्याला आवड होती. मायकेल शुमाकर हा फॉर्म्युला वन रेसिंग व समाजसेवा या दोन्हींमध्ये सर्वात पुढे राहिला. अपघात ग्रस्त होण्याआधी मुलांचा सर्वांगीण विकास, गरीब व भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी सढळ हाताने मदत करत असे. सात वेळा फॉर्मूला वन चॅम्पियनशिप पटकावणारा शूमाकर १९९९ ते २०१० च्या दरम्यान अनेकदा दुखापतग्रस्त झाला. २९ डिसेंबर २०१३ रोजी आल्प्सवर स्कीइंग करताना शूमाकर पडला होता.
शूमाकरच्या डोके दगडावर आपटले गेल्याने त्याच्या गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून तो कोमातच होता. त्यााला वॉड युनिर्व्हहसिटीच्याक रुग्णागलयात ठेवण्यायत आले होते. मृत्युशी झुंज देवून आता तो घरी परतला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
१९६० नंतरच्या काळात, आपल्या मोजक्या पण प्रभावी लेखनाने ज्या मराठी कथालेखकांनी कथालेखनाकडे लक्ष वेधून घेतले त्यात श्रीकृष्ण दामोदर पानवलकर यांची प्रामुख्याने गणना होते.
१९३८ मध्ये त्यांचा पहिला लघुकथा संग्रह ‘ मंजिल ‘ हा प्रकाशित झाला.
Copyright © 2025 | Marathisrushti