(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव

    १० एप्रिल २०१७ रोजी जाधव यांना पाकिस्तानमधील फील्ड जनरल कोर्ट मार्शलने फाशीची शिक्षा सुनावली. १८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या खटल्यावरील अंतिम निर्णयासाठी अगोदर दिलेल्या फाशीला स्थगिती दिली. १७ जुलै २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या सुटकेसाठीचे भारताचे अपील फेटाळून लावले आणि पाकिस्तानला फाशी स्थगित करण्याचे आदेश दिले.

  • गायिका, कवयित्री, नाटककार व सुप्रसिद्ध लेखिका योगिनी जोगळेकर

    योगिनी जोगळेकर यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर १९४८ ते १९५३ या काळात त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी केली. त्यांचा जन्म ६ ऑगस्ट १९२५ रोजी पुणे येथे झाला. तसेच 'राष्ट्रसेविका समिती'च्या माध्यामातून त्यांनी अनेक वर्ष सामाजिक कार्यही केले. याच काळात त्यांनी विविध कथा, कादंबरीतून स्त्रीविषयक लेखन केले. त्यांचे काही काव्यसंग्रह व नाटकेही प्रसिद्ध झाली. पंडित भास्करबुवा बखले यांच्या जीवनावर "" या सम हा "" आणि राम मराठे यांच्या जीवनावर राम प्रहर"" या चरित्रांचे त्यांचे लेखन वेगळे ठरले.

    वयाच्या आठव्या वर्षापासून योगिनीबाई शंकरबुवा अष्टेकर यांचेकडे संगीत शिकत होत्या. त्यानंतर योगिनी जोगळेकर यांनी राम मराठे यांचे शिष्यत्व पत्करले. आकाशवाणी व खाजगी बैठकीबरोबरच योगिनी जोगळेकर यांनी "पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. आकाशवाणीवरील गीतरामायणाच्या प्रथम प्रसारणात विरूप झाली शूर्पणखा, ही दाशरथीची कृति सूड घे त्याचा लंकापति हे गाणे योगिनी जोगळेकर यांनी गायले होते. योगिनी जोगळेकर यांनी "राम प्रहर " हे राम मराठे यांच्या जीवनावर चरित्र लेखन केले होते. योगिनी जोगळेकर यांचे निधन १ नोव्हेंबर २००५ रोजी झाले.
    त्यांची गीतसंपदा
    मधुर स्वरलहरी या ------- सखे बाई सांगते मी -----हरीची ऐकताच मुरली -----हे सागरा नीलांबरा
    सखे बाई सांगते मी नवनवल गे
    गमते मना मृदु भावना
    हृदयींची शतजन्मींनची गे
    स्वप्नाीत तयाशी प्रहर प्रहर बोलते
    या मनोरथातुनी योजनभर विहरते
    गमते मना सुख साधना
    हृदयींची शतजन्मींाची गे
    नित्‌ प्रीत उमलतसे
    माला मी गुंफितसे
    भक्ति ज्योति तेवतसे
    मन हसे, तन हसे, मधुरसे"

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधराराजे शिंदे

    राजस्थान भाजपमध्ये एक नाव असं आहे, ज्याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनाही मानावाच लागतो. हे नाव आहे महाराणी वसुंधरा राजे. मराठ्यांच्या ग्वालियर घराण्याची कन्या असलेल्या वसुंधरा यांचा विवाह राजस्थानमधील ढोलपूरचे महाराजा राणा हेमंत सिंग यांच्यासोबत झाला. पण लग्नानंतर काही दिवसातच ते वेगळे राहू लागले. वसुंधरा राजेंचा मुलगा दुष्यत सिंग खासदार आहे. तर त्यांची बहिण यशोमती राजे शिंदे मध्य प्रदेशमध्ये मंत्री होत्या. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या त्या आत्या आहेत.

  • आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे

    महाराष्ट्रातील पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल आणि संपूर्ण देशाला ज्याचा अभिमान वाटेल अशी घटना घडली आहे .कप्तान अमोल यादव यांची कथा एखाद्या कादंबरीतल्या कथानका प्रमाणे आहे.

  • जगप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ

    अली अकबर खाँ यांच्या घराण्याचा सम्राट अकबराच्या दरबारातील तानसेनाच्या घराण्याशी थेट संबंध होता. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९२२ रोजी झाला. त्यांचे वडील पद्मविभूषण अल्लाउद्दीन खाँ हे त्या काळातील भारतीय संगीतातील एक अग्रणी व्यक्तित्व होते. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी त्यांचे वडील व काका फकीर अफताबुद्दीन यांच्याकडून संगीताचे धडे घेण्यास प्रारंभ केला. बारा वर्षांहून अधिक काळ दिवसाला १८ तासांहून अधिक काळ सराव करणाऱ्या अली अकबर खाँ यांना त्यांचे वडील वयाची शंभरी पार केली तरी संगीताचे धडे देत होते. १९७२ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर उस्तादांनी घराण्याची संगीताची परंपरा अखेरयत कायम ठेवली. वयाच्या १३ व्या वर्षी अलाहाबादला पहिला जाहीर कार्यक्रम करणाऱ्या खाँसाहेबांनी २० व्या वर्षी एचएमव्हीसाठी लखनौला ध्वनिमुद्रण केले. जोधपूर घराण्यात राजगायक म्हणून सात वर्षे काम करत असतानाच त्यांना उस्ताद हा पहिला सन्मान बहाल केला गेला. लॉर्ड येहुदी मेन्युहिन यांच्या विनंतीवरून १९५५ ला न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम केल्यापासून त्यांना व भारतीय शास्त्रीय संगीताला साऱ्या संगीत विश्वाचे दरवाजे खुले झाले. १९५६ मध्ये कोलकात्ता येथे त्यांनी अली अकबर संगीत महाविद्यालयाची स्थापना केली. पाश्चिमात्य जगाचा शास्त्रीय संगीताकडे असलेला ओढा पाहून १९६५ मध्ये अमेरिकेत संगीत केंद्र सुरू केले.

    कॅलिफोर्नियात अली अकबर संगीत महाविद्यालय स्थापन केल्यानंतर स्वित्झर्लण्डमध्येही त्यांनी त्याची शाखा उघडली. जगभर दौरे करणाऱ्या उस्तादांनी चेतन आनंद यांच्या आँधिया, आयव्हरी-र्मचट यांच्या हाऊस होल्डर, सत्यजित रे यांच्या देवी, बर्नाडो बटरेलुस्सी यांच्या लिटल बुद्धा इ. चित्रपटांनाही त्यांनी पाश्र्वसंगीत दिले. भारतीय अभिजात संगीताला जगभर मान्यता मिळवून देणाऱ्या उस्तादांचे पौर्वात्य व पाश्चिमात्य संगीतविश्वात असंख्य चाहते आहेत. जगविख्यात व्हायोलिन वादक लॉर्ड येहुदी मेन्युहिन यांनी तर त्यांचे ‘ग्रेटेस्ट म्युझिशियन इन द वर्ल्ड’ असे वर्णन केले होते. भारताच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त संयुक्त राष्ट्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना सरोदवादनाचा कार्यक्रम करण्याची विनंती भारतीय राजदूतवासाने केली होती. अमेरिकेत त्यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप बहाल केली होती. त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. खाँसाहेब पाश्चात्य आणि भारतीय शास्त्रीय संगीतातील अढळ ध्रुवतारा म्हणून गेली पाच दशके ओळखले जात होते. अली अकबर खाँ यांचे १८ जून २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • भारतीय राजकारणातील भीष्माचार्य दादाभाई नौरोजी

    दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक, जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते, भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते अशी त्यांची ओळख होती.

  • संतसाहित्याचे अभ्यासक युसुफखान महंमदखान पठाण उर्फ डॉ. यु. म. पठाण

    संत साहित्य, शिलालेख यांच्या अभ्यासाबरोबरच लघुकथा, ललित लेख, व्यक्तिचित्रे हे वाङ्मयप्रकार त्यांनी लीलया हाताळले आहेत. ‘मराठवाड्यातील मराठी शिलालेख’ या ग्रंथात त्यांनी १२० शिलालेखांचं संपादन केलं आहे. या व्यतिरिक्त साहित्य संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेला फारशी – मराठी अनुबंध, सुफी संतांचं मराठी साहित्य, राज्य मराठी भाषा विकास संस्थेनं प्रकाशित केलेला मराठीतील पहिला मराठी – फारशी व्युत्पत्ती कोश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं प्रकाशित केलेला ‘मराठी बखरीतील फारशीचं स्वरूप’ या ग्रंथांचा समावेश आहे.

  • सुप्रसिद्ध नाटककार, लेखक विजय तेंडुलकर

    तेंडुलकरांनी चित्रपट माध्यमही नाटकांच्याच ताकदीने हाताळले. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्‍न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्‍या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते.

  • अभिनेता सुशांत शेलार

    अभिनेता सुशांत शेलार यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९८० रोजी मुंबई येथे झाला. सुशांत शेलार हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव असून ते थिएटर, टीव्ही पण जोडलेले आहेत. मुंबईतून त्यांनी शालेय शिक्षण व महाविद्यालय केले. त्यांनी बालपणी अनेक नाटके व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता १९९१ साली बाल कलाकार म्हणून काम करणारी त्यांची कारकीर्द सुरू झाली.

    मयूरपंख मध्ये बाल कलाकार म्हणून काम केले होते. महाविद्यालयीन दिवसांपासून ते आपल्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय होते आणि आपल्या कारकीर्दीसाठी अनेक गोष्टी करीत आहेत. त्यांच्या काही नाटकांमध्ये मी नथुराम गोडसे बोलतोय, अयत्यावर कोयता, बहुरुपी पु. ल आणि आधी बसू मग बोलू यांचा समावेश आहे. सुशांत शेलार यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चित्रपट दिले आहेत. त्याचा दुनियादारी हा चित्रपट प्रचंड हीट झाला होता. या चित्रपटातील त्याची प्रीतमची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. त्याचबरोबर त्यांनी क्लासमेट, तू ही रे, धूम टू धमाल, मॅटर, ब्लाइड गेम, संघर्ष अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.

    सुशांत शेलार यांनी रूपेरी पडदयाबरोबरच आपल्या अभिनयाची चुणूक छोटया पडदयावरदेखील दाखविली आहे. त्यांनी या गोजिरवाण्या घरात, मयूरपंख, किमयागार, घे भरारी, काटा रूते कोणाला, इंद्रधनुष्य अशा अनेक मालिकादेखील केल्या आहेत. सुशांत शेलार हे एक चांगला कवी आहेत आणि त्यांनी कविता व इतर लेखन केले आहे. ते आपल्या वैयक्तिक जीवनात श्री स्वामी समर्थांचे भक्त आहेत. त्यांची समर्थ व्हिजन नावाची संस्था आहे.

    सुशांत शेलार यांची ‘कबड्डी’ खेळाशी लहानपणापासून एक नाळ जोडली गेली आहे. या खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांने या ‘कबड्डी’ सामन्यांचे आयोजन केले आहे. सुशांत शेलार यांचे वडील अरुण दत्तात्रय शेलार हे उत्तम कबड्डीपटू होते. त्यांच्या स्मरणार्थ ‘शेलार मामा फाऊंडेशन’च्या वतीने दर वर्षी सुशांत शेलार हे सामने भरवित असतात. सुशांत शेलार यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता सुशांतच्या चाहत्यांना तो एक नवीन जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे. सुशांत शेलार हे शिवसेनेच्या चित्रपट सेना कार्याध्यक्ष आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • ज्येष्ठ नाट्यनिर्माते आणि व्यवस्थापक सुरेंद्र दातार

    मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली नाट्यसंस्थेत त्यांनी व्यवस्थापक म्हणून काही काळ काम केले रातराणी, पांडगो इलो रे ब इलो, आई रिटायर होतेय अशा अनेक नाट्यप्रयोगांचे त्यांनी व्यवस्थापन केले नंतर १९९२ मध्ये चंद्रलेखा या मान्यवर संस्थेत त्यांना मोहन वाघांनी बोलावून घेतले आणि २०१० पर्यंत(चंद्रलेखा संस्था बंद होई पर्यंत) ते चंद्रलेखामध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.