(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • फुलपुडी

    “बाबाss मस्त मस्त !! तुम्हाला सेकंड इनिंग साठी शुभेच्छा मग ! हाहाहा ..!!”
    बापलेकीच्या मनसोक्त गप्पा झाल्या आणि आई-बाबा ठरल्याप्रमाणे निवृत्तीनंतरचं निवांत आयुष्य जगू लागले. फिरणं, नाटक-सिनेमा, वाचन, मनात आलं की बाहेर जेवण, देवदर्शन, सण, नातेवाईक, समारंभ आणि बरंच काही .. या ना त्या निमित्ताने बाबा कायम आई सोबत असायचे. पण हा मनमुराद जगण्याचा आनंद फार काळ काही त्यांना घेता आला नाही. तीन-चार वर्षातच आईला काहीशा ‘अकाली वार्धक्याने’ ग्रासलं. हातपाय दुखायचे. अशक्तपणा आला होता. बाहेर पडणं तर पूर्णच बंद. जेमतेम घरच्याघरी कशीबशी फिरायची. भरीला बारीकसारीक इतर त्रास होतेच. पुढे रोजचं घरकाम करणं सुद्धा कठीण झालं. लेकीने येऊन घरकाम आणि स्वयंपाकासाठी एका मावशींची व्यवस्था केली. शिवाय ती स्वतः दोनेक महिन्यातून एकदा तरी येऊन जायची. हळूहळू आईची दृष्टी कमी झाली. सहाजिकच लिखाण, वाचन, टीव्ही बघणं यावर बंधनं आली. देवादिकांचं करणं, जपमाळ, देवपूजा यात आता जास्त वेळ घालवायला लागली. या सगळ्यामुळे आधीच मितभाषी असलेल्या आईचं बोलणं सुद्धा आधीपेक्षा कमी झालं. उतारवयातल्या या बऱ्यावाईट दिवसांत बाबांची मात्र आपल्या अर्धांगिनीला पूर्ण साथ होती.
  • श्रावणबाळ

    “बाळ श्रावणा", आईने हाक मारली. “कोठे आहेस तू?"

    “हा काय तुझ्या जवळच आहे", श्रावण म्हणाला.

    “असा जवळ ये बरं", आई म्हणाली.

    “हा आलो, काय पाहिजे आई तुला?" श्रावणाने विचारले.

    आई म्हणाली, “हे बघ, मी आणि तुझे वडील आता अगदी पिकली पाने झालो आहोत. केव्हा गळून पडू, ते कळायचेही नाही. तेव्हा, त्यापूर्वी....' “त्यापूर्वी काय? आई मी तुझी कोणतीही इच्छा अपुरी ठेवणार नाही.' श्रावण म्हणाला.

    आई म्हणाली, “ते आम्हाला ठाउक का नाही? आम्ही उभयता म्हातारी माणसं, त्यात आंधळी. आमचं सर्व काही तू प्रेमाने करतोस. आम्हाला क्षणभरही विसरत नाहीस. सर्व प्रकारची सेवा करतोस. तुझ्यासारखा मातृभक्त आणि पितृभक्त मुलगा आम्हांस मिळाला आहे, ही देवाची कृपा. पण ..

    “पण काय आई?, मी तुमचा मुलगा आहे. मुलाने मातापितरांची सेवा केलीच पाहिजे. ते त्याचे कर्तव्यच आहे. पण आई, तुला काय हवे ते संकोच न करता सांग. बघ मी तुझी इच्छा पूर्ण करतो की नाही." - श्रावण म्हणाला.

    “तू करशील रे, म्हणूनच संकोच वाटतो. तुला किती त्रास द्यायचा!” “बाबा, तुम्ही तरी सांगा हो. माझं काही चुकलं आहे का? सेवेत काही कमी तर पडलो नाही?” “नाही रे बाळा, तुझ्या आईच्या मनांत काशी यात्रेला जावयाचे आहे. तुला कष्ट द्यायला तिचं मन तयार होत नाही.” श्रावणाचे बाबा म्हणाले.

    “त्यात कसले कष्ट? बाबा, आई, आपण उद्याच निघायचे.

    “अरे, पण आम्हांला चालणे कसे होणार? बैलगाडीचे हादरे आम्हांस सहन होणार नाहीत.' “त्याची व्यवस्था मी करतो. तुम्ही काही काळजी करू नका.” श्रावण म्हणाला. दुसऱ्या दिवशी आपल्या वृद्ध व अंध मातापितरांना घेऊन श्रावणाने काशीचा मार्ग धरला. त्याने एक कावड केली. तिच्यामध्ये त्याने त्यांना बसवले.

    ती खांद्यावर घेऊन तो मार्ग आक्रमू लागला. बरेच दिवसानंतर तो एका घनदाट अरण्यात आला. माता पितरे थकल्यामुळे त्याने अरण्यातच मुक्काम करावयाचे ठरविले. त्यांना तहान लागली म्हणून तो लोटा घेऊन पाणी आणण्यासाठी नदीवर गेला.

    याच वेळी आयोध्येचा राजा दशरथ त्याच अरण्यात आलेला होता. नदीवर पाणी पिण्यासाठी हिंस्त्र प्राणी आले की त्यांची शिकार करावयाची म्हणून नदीच्या तीरावरील एका झाडावर धनुष्यास बाण लावून बसला होता.

    श्रावण नदीवर आला. त्याने लोटा धुतला आणि तो पाण्यात बुडविला.

    लोट्यात पाणी भरताना त्याचा आवाज झाला. दशरथ राजाने तो आवाज ऐकला. त्याला वाटले, हत्तीच पाणी पिऊ लागला आहे. आवाजाच्या दिशेने त्याने बाण सोडला आणि "आई ग!" अशी आर्त किंकाळी त्याच्या कानावर पडली. घात झाला असे वाटून तो घाईघाईने नदीवर आला. श्रावणाच्या बरगडीत बाण घुसल्याचे त्याला दिसले. रक्त भळाभळा वहात होते. धावत जाऊन त्याने श्रावणाचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले.

    “कोण तू? अशा रात्री या अरण्यात काय करीत होतास?” - दशरथाने विचारले.

    “मी श्रावण. माझ्या वृद्ध आणि अंध मातापितरांसाठी पाणी न्यायला आलो होतो. पण आपण कोण?” श्रावणाने क्षीण आवाजात विचारले.

    “मी आयोध्येचा राजा दशरथ. शब्दवेधाची विद्या मला येत नसती, तर किती बरं झालं असतं! हा प्रसंग टळला असता.”- राजा म्हणाला.

    “झालं ते झालं. होणारं कधीच टळत नाही. आता असं करा महाराज, हा कुशीत घुसलेला बाण काढा. फार वेदना होताहेत हो. अन् मग हे पाणी घेऊन माझ्या आईवडिलांना द्या. मात्र काही बोलू नका. तुम्ही श्रावण नाही, हे त्यांना कळणार नाही.” राजाने सांगितले की, बाण बाहेर काढल्याबरोबर तू मरण पावशील. तुला मी आयोध्येस नेतो व राजवैद्याकडून उत्तम औषधे देऊन बरा करतो. पण श्रावणाने ते ऐकले नाही. या वेदनेपेक्षा मृत्यू बरा, असे तो म्हणाला. नाइलाजाने राजाने बाण बाहेर काढला. विव्हळत विव्हळत मातृपितृभक्त श्रावणाने "आई! बाबा!” करीत प्राण सोडला.

    दशरथ पाणी घेऊन श्रावणाच्या मातापितरांकडे आला. त्याची चाहूल लागताच आई म्हणाली, "बाळा, किती रे वेळ झाला तुला! किती कष्टतोस तू आमच्यासाठी! बाळा पाणी मिळेना का? फार दूर जावे लागले का रे?” दशरथाने तोंडातून चकार शब्द न काढता लोटा आईच्या हाती दिला. पण ती माऊली पाणी न पिताच म्हणाली, “बाळ, बोल ना रे. रागावलास आमच्यावर? तुला फार त्रास देत आहोत आम्ही. पण काय करू? रागावलास म्हणून बोलत नाहीस, होय ना? तू बोलल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाहीत."

    तहानलेल्या त्या वृद्धांनी पाणी प्यावे म्हणून दशरथास बोलावे लागले.

    त्याचा आवाज ऐकताच दोघेही एकदम म्हणाले, "कोण तू? आमचा बाळ कोठे आहे? सांग काय केलंस तू त्याला?” दशरथाला सर्व हकिगत सांगावीच लागली.

    ती ऐकताच त्या दोघांनी एकच आकांत मांडला. “बाळ, आम्हाला सोडून कसा रे गेलास? आम्हा आंधळ्यांची काठी गेली! बाळ किती कष्ट पडले रे तुला आमच्याकरता! आणि आमच्यासाठी प्राणही दिलास रे! तुझ्याशिवाय आम्ही जिवंत तरी कसे राहू? बाळ श्रावणा, श्रावणा...' दशरथाने त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे ती दोघे त्याच्यावरच उसळली आणि संतापाने म्हणाली, “आमचा एकुलता एक मुलगा तू मारलास. आम्ही तर आता जगत नाहीच; पण लक्षात ठेव, आमच्यासारखाच तू पुत्रशोकाने मरशील. आमचा शाप आहे तुला.” आणि थोड्याच वेळात त्यांनी पुत्रशोकाने प्राण सोडला. धन्य मातृपितृभक्त श्रावण आणि धन्य ती मातापितरे!

    [ 'बालसुधा', पुस्तक ३ रे, कर्नाटक सरकार, १९७७, पृ. १२०-१२४]

  • बॅड हॅबिट (कथा)

    तशी ती सॉलिड आहे ,
    सगळ्यांना माहित आहे हे ,
    तसे तिलाही माहीत आहे.
    पण मला ती फार उशीरा खरी कळली .

  • कालियामर्दन

    एके दिवशी कृष्ण वृंदावनात गाई चारीत असता दुसरे गोपाल फार तहान लागली, म्हणून त्याची वाट न पाहता पाणी पिण्यासाठी यमुनेवर गेले. तेथे एक मोठा डोह होता व त्यात कालिया नावाचा एक भयंकर विषारी सर्प राहत होता. त्या सर्पाच्या विषामुळे ते पाणी जहरी झाले होते

  • अजब न्याय नियतीचा – भाग १०

    नील आणि आरू दीचे निरीक्षण करत होते…. तिचा चेहेरा थोडा ओढल्यासारखा दिसत होता. कालचा विषय कसा काढावा याचा ते विचार करत होते. शेवटी काल रात्री नक्की काय झालं ते दीनं सांगितल्याशिवाय त्यांना कळणारच नव्हते. दी शांतपणे पेपर वाचत चहा पीत होती. जरा वेळाने दीचे दोघांकडे लक्ष गेले…. दी हसून म्हणाली, “अरे, तुम्ही दोघे असे काय बघताय माझ्याकडे? माझ्या तोंडाला काही लागले आहे का?”

  • आज ती भेटणार होती

    आज ती भेटणार होती दोन अडीच महिन्यानंतर मध्येच बरेच काही घडून गेले होते, त्या कोरोनाने तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते,

  • सुगंधाचे पुजारी (कथा)

    मुंबईत राहणाऱ्या माणसाला काही वास येत असेल यावर माझा विश्वास नाही. चोवीस तास फॅक्टरीतलं प्रदुषण, चमत्कारिक वासाचे विषारी वायू, टनानं साठणारा कचरा, प्रचंड आकाराच्या दाट लोकवस्त्या, दलदल, चिखल, अपुऱ्या सोई यामुळे सकाळी उठल्यापासून झोपी जाईपर्यंत दुर्गंधीचं सदोदित आक्रमण होतच असतं.

  • नवरात्र …. माळ नववी

    माझा जन्माच्या वेळी …आपल्या मुलाला दुसरी पण मुलगीच झाली म्हणून रुसलेल्या यमुना आजीचा राग ,रुसवा .. तिच्या जवळ राहिल्यानंतर हळूहळू विरघळत गेला … आणि नंतर तिचं खूप प्रेम वाटयाला आलं …मी तिच्याबरोबर राहिले अन्‌ तिला माझा लळाच लागला …
    बुरहानपूरच्या मोठया घरात आजीबरोबर घालवलेला काळ माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ …आम्हा नातवंडांचं बालपण अतिशय सुंदर सांभाळलं ,जपलं यमू आजीनं !

  • प्राणीमित्र

    मैत्री फक्त माणसा-माणसांमध्येच असते असे नाही तर मनुष्य आणि प्राणी यांचीही मैत्री असू शकते. ही मैत्री इतकी जीवापाड होऊ शकते प्रसंगी तो प्राणी किंवा तो माणूस आपल्या मैत्रीसाठी काय करतील याचा नेम नसतो. एका अरबाला घोडेस्वारीचे अतिशय वेड होते. मात्र तो खूपच गरीब ०८००० घोडा विकत घेण्याची त्याच इच्छा तशीच राहिली होती. शेवटी १-१ जमा करून त्याला अखेर मनासारखा घोडा मिळाला. त्याच्यावर तो अगदी मित्रासारखे प्रेम करू लागला. त्याचा रोज खरारा करी, चांगले चुंगले खायला देई आणि मग रपेट मारून येई. घोड्यालाही तो अरब म्हणजे मालक थोडा जरी दूर राहिला तरी करमत नसे. काही दिवसांनी त्या अरबाची आर्थिक स्थिती खूपच हलाखीची झाली. घोड्याला पहिल्यासारखे आपण चांगले खायला देऊ शकत नाही याची खंत त्याला टोचत होती. तशातच तो अरब घोड्यावर बसून एकदा बाजारात गेला असता तेथील एका सौदागराला त्याचा घोडा आवडला. त्यामुळे त्याने घोड्याची किंमत विचारली. अरबाने प्रारंभी घोडा विकणार नाही असे सांगितले. त्यावेळी त्या सौदागराने तू मागशील ती किंमत देईन असे त्याला सांगितले. अरबाला वाटले नाही तरी आपण या घोड्यास चांगला दाणापाणी घालत नाही. त्या बिचार्‍या घोड्याला या सौदागराकडे चांगले खायला तरी मिळेल. घोड्यावरील मैत्रीपोटीच त्याने त्याला विकण्याचा निर्णय घेतला होता. अखेर सौदा झाला. घोड्याची किंमत म्हणून त्याने मागितलेल्या मोहरा सौदागराने अरबाला दिल्या. निरोप घेण्यासाठी म्हणून अरब मोहरांची थैली घेऊन आपल्या घोड्याजवळ आला. पाहतो तो घोड्याच्या डोळ्यांतून असू ओघळत होते. ते असू पाहून अरबाला खूप वाईट वाटले. त्याचक्षणी तो त्या सौदागराकडे परत गेला व मोहरांची थैली त्याला परत करून त्याने सौदा रद्द केला. माझा जीव गेला तरी चालेल पण हा घोडा मी विकणार नाही, असा निर्धार करून तो घोड्याजवळ परत आला. त्याला पाहताच घोडाही आनंदाने फुरफुरला. दृढ मैत्रीमुळे ते पुन्हा एकत्र आले होते. त्या आनंदातच अरबाने घोड्यावर मांड ठोकली व तो निघून गेला.

  • तोतयाचे कांड

    मुंबईत डावऱ्यादादा नांवाचा एक गुंड कांही वर्षांपूर्वी खूप गाजला होता. शेवटी पोलिसांनी त्याला एनकाऊंटरमध्ये मारला होता.