(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • लंकादहन

    रावणाने कपटाने सीतेला पळवून नेल्यानंतर रामाला फार दु:ख झाले. त्याने सगळीकडे सीतेचा शोध सुरू केला. परंतु सीतेचा शोध लागेना. शोध करीत करीत राम-लक्ष्मण किश्किंधा नगरीपर्यंत येऊन पोहोचले. तेथे ‘वाली’ या नावाचा वानर राज्य करीत होता. त्याने आपला धाकटा भाऊ ‘सुग्रीव’ याच्यावर फार अन्याय केला होता. रामाने सुग्रीवावरील अन्याय दूर करण्याकरिता वालीला ठार मारले आणि सुग्रीवाला राज्यावर बसविले. या उपकाराची फेड म्हणून सुग्रीवाने रामाला मदत करण्याचे कबूल केले. त्याने आपले आणि इतर वानर राजांचे सारे सैन्य गोळा केले. लाखो वानर वीर गोळा झाले.

  • मरीआईची कहाणी (स्वच्छता संदेश देणारी गोष्ट )

    एक आटपाट नगर होते. तेथे एक राजा होता. राजा मोठा पुण्याचा, मोठा भाग्याचा. त्याचे राज्य म्हणजे सुखाचे. त्रास नाही, चिंता नाही, रोग नाही, राई नाही. सारे लोक सुखी होते. पण होता होता काय झाले, एकदा आषाढचा महिना आला. झिम झिम पाऊस पडू लागला. शेते हिरवीगार दिसू लागली. गाई गुरांना चारा झाला. दूध दुभत्याची चंगळ झाली. शेतातली कामे संपली. मुली माहेरी आल्या.

  • इमाम आणि देवदूत

    शेकडो वर्षांमागची गोष्ट. इराण देशातील एका पहाडाजवळ एका विस्तीर्ण तलावाच्या काठी एक लहान झोपडी होती. त्या झोपडीत एक गरीब धनगर, त्याची बायको, व इमाम नावाचा त्यांचा आठ-दहा वर्षांचा एक लहान मुलगा, ही रहात असत. या तिघांनाही पोटाकरता संबंध दिवस राबावे लागे. धनगर व त्याची बायको पहाडावर जाऊन सरपण गोळा करीत व त्याच्या मोळ्या बांधून त्या जवळच्या शहरात नेऊन विकीत.

  • आर्यावर्तातील प्राणत्यागी विहंग 

    अजन्मा पहाडावर बसला होता . सोबतीला बालमित्र सुदामा होता .पण तो काहीसा अंतर ठेवून बसला होता . केवढा तरी पहाड वर चढून येणं त्याला भयंकर वाटत होतं . पण अजन्म्याच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता .

  • मनाची श्रीमंती

    उत्तर प्रदेशातला एका नदीच्या खोऱ्यातला एक कुविख्यात दरोडेखोर. त्याचं सगळं आयुष्य दरोडेखोरीतच गेलं. त्याचा मुलगा पंधरा वर्षांचा झाल्यावर तो त्याला दरोडेखोरीचे प्रशिक्षण देऊ लागला. तसेच त्या व्यवसायाचे काही गुपित त्याने आपल्या मुलाला शिकवायला सुरुवात केली. शिकवताना तो आपल्या मुलास सांगत असे, “अरे, तुझ्या चोरीची सुरुवात चांगली व्हायला हवी. कुठेतरी जाऊन दरोडा घालशील आणि नवीन असल्यामुळे पोलिसांच्या हाती सापडून खडी फोडायला जाशील. असं होऊ नये म्हणून मी सांगतो त्याच ठिकाणी तू आयुष्यातली पहिली चोरी कर." असे म्हणून त्य दरोडेखोराने आपल्या मुलास एका जंगलात नेते व समोरच असलेली एका साधूची झोपडी त्याला दाखविली आणि म्हणाला, "हे तुझ्या पहल्या चोरीचं ठिकाण.” ती झोपडी पाहू मुलाने आश्चर्याने विचारले, "या झोपडीत गरी करून काय मिळणार?" त्यावर दरोडेखोर म्हणाला, "अरे, त्या झोपडीत चोरी केलीस तर तिथे पोलीस येत नाहीत. आणि दुसरं म्हणजे त्या साधूला लोकं सोनं, चांदी, फळं, पैसे इ. भरपूर भेटवस्तू देतात आणि तो साधू त्या वस्तू लोकांना वाटत असतो. जर तो सगळं लोकांना वाटणारच आहे तर त्या आपण का चोरून आणू नये? गेली पस्तीस वर्षे मी तिथे चोरी करतो आहे तरीही त्या साधूने कधीही पोलिसात तक्रार केली नाही.” हे ऐकून मुलाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, "म्हणजे तुम्ही पस्तीस वर्षे चोरी करूनही त्या साधूला काहीही कमी पडलेले नाही. आणि तुम्हाला मात्र इतकी वर्षे झाली तरी अजूनही चोरी करावी लागते. याचा अर्थ असाच होतो की, सज्जनपणाने जगल्यानेच श्रीमंती प्राप्त होते. मग हा चोरीचा व्यवसाय करण्यापेक्षा मी त्या सांधूकडेच जाऊन राहतो.” असे म्हणत तो मुलगा साधूच्या झोपडीकडे चालायला लागला.

    तात्पर्य: कोणत्याही संकटात सज्जनांचे समाधान, श्रीमंती कधीच कमी होत नाही कारण ते मनाने श्रीमंत असतात.

  • निंदकाचे घर असावे शेजारी

    सोळाव्या शतकात रने देकार्त नावाचा एक थोर तत्त्वज्ञ फ्रान्समध्ये होऊन गेला. अतिशय बुद्धिमान असलेला देकार्त आपले तात्त्विक विचार त्याकाळी कोणालाही न भिता मांडत त्यामुळे काळातील असे. त्या कथासार धर्ममार्तंड व परंपरावादी मंडळी त्याच्यावर नेहमीच टीका करीत असत. कारण त्याचे आधुनिक विचार त्यांना पसंत नव्हते. देकॉर्नचे विचार जर लोकांना पटू लागले तर आपल्याला कोण विचारणार अशी भीती त्या मंडळींना सारखी वाटायची. त्यामुळे देकार्तवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नसत. पुढे पुढे तर त्यांच्या टीकेची जागा निंदेने घेतली. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ते देकार्तची निंदा करू लागले. मात्र त्यांची ही निंदा ऐकूनही देकार्त शांत असे; त्याने त्याबाबत कधीही कोणाकडेही तक्रार केली नाही. एके दिवशी मात्र देकार्तच्या हितचिंतकाला त्यांची निंदा सहन झाली नाही म्हणून त्याने देकार्तलाच विचारले की, तुम्ही तुमच्या टीकाकारांना (निंदकांना) खरमरीत उत्तर का देत नाही? त्यावर देकार्त शांतपणे आपल्या त्या हितचिंतकाला म्हणाला, ' निंदकांनी माझी सतत निंदा केल्यामुळे माझ्यामध्ये आपोआपच सहनशीलता व क्षमाशीलता हे गुण निर्माण झाले आहेत. त्यामुळे माझी मानसिक व बौद्धिक पातळी आणखी उंचावली आहे. ती एवढी उंचावली आहे की मला त्यांची निंदा आता ऐकूही येईनासी झाली आहे. त्यांची निंदा ऐकून त्यांना उत्तर देण्याचे मी ठरविले तर मला खालच्या पातळीवर यावे लागेल आणि तसे केल्यास मी माझेच नुकसान केल्यासारखे नाही का होणार?' देकार्त यांचे ते उदात्त विचार ऐकून तो हितचिंतक भारावला व त्यांच्यापुढे नतमस्तक झाला.

    -श्रीकांत नारायण

  • बिसुर (सांगली) ते मुंबई व्हाया ठाणे – भाग – ३

    आयुष्यात काहीतरी करायचं, या उद्देशाने जीवनाचं सार्थक करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करीत होतो. पण त्याच वेळी गावाकडला आप्तस्वकीयांची, आई- वडिलांची आठवण आली की, एक एक क्षण युगासारखा वाटायचा.

  • विमर्श कथा : १

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक , बुलडोझर लावून उखडून टाकील , असा माणूस जन्माला यायचाय . हिंमत असेल तर हात लावून दाखवा त्यांच्या स्मारकाला

  • काव्यमय व्यक्तिचित्रण

    `घरीदारी' या इंद्रजित भालेरावांच्या व्यक्तिचित्रांच्या संग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. ही व्यक्तिचित्रे म्हणजे साहित्य क्षेत्रातल्या व्यक्तींचा वेगळा परिचय देणारी आहेत. त्यांच्या गुणांनी व स्वभाववैशिष्ट्यांनी नटलेली ही माणसे जात्याच प्रसिद्ध आहेत.

    `घरीदारी' :

    लेखक : इंद्रजित भालेराव

  • हिंदू परिवार म्हणून आम्ही जगतो का?

    आपला भारतदेश अडीच हजार वर्षांपासून परकीय आक्रमणाच्या अमलाखाली राहिला आहे. सिंकदरापासून शक, हुण, मोगल, फे्रंच, इंग्रज, डच पोर्तुगीज आदींनी भारतावर अव्याहतपणे आक्रमण केली. या सतत होणार्‍या आक्रमणांनी भारत देश जर्जर झाला असला तरी वाकला नाही, नैतिक बळाच्या जोरावर तो आजही ठामपणे उभा आहे. याचे मुख्य कारण आपली हिंदू संस्कृती.हिंदू परिवार म्हणून आम्ही जगतो का? अर्थात ऋषिनिर्मित हिंदू परिवार अवस्था पाने : 68, किंमत : 80 रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130 अनिल सांबरे नचिकेत प्रकाशन, नागपूर 9225210130