नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
फार पूर्वी रशियात घडलेली ही एक गोष्ट आहे. त्या वेळी रशियावर निकोलस नावाचा राजा राज्य करीत होता. आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी त्याने ठिकठिकाणी सैनिक तैनात केले होते. अशाच एका अतिशय दुर्गम भागातील एका छावणीत एक सैनिक पहारा देत बसला होता. परंतु तो केवळ नावालाच पहारा द्यायला बसला होता. असे म्हणावे लागेल कारण त्याचे अजिबात लक्ष नव्हते. त्याच्या डोक्याला एक फार मोठी चिंता भेडसावत होती. त्या सैनिकाला एक आई व चार बहिणी होत्या. आपल्या बहिणी सुखात राहाव्यात म्हणून कर्ज काढून त्याने त्यांची लग्रे लावून दिली होती. आता हे एवढे मोठे कर्जकसे फेडायचे याचीच त्याला चिंता लागून राहिली होती. शिवाय आपल्या मूळ गावापासून तो बराच लांब होता. त्यामुळे कर्जदार आपल्या आईला सतावतील याही भीतीने तो खूपच अस्वस्थ होता. आपल्याला कोणाकोणाचेकिती किती कर्ज आहे याची त्याने यादीच तयार केली. ती यादी त्याने पुन्हा एकदा वाचूनपाहिली व त्याखाली ' आता हे कर्ज कोण आणि कधी फेडणार ?' असे त्याने लिहून ठेवले. थोड्या वेळाने पहारा देत असतानाच त्याला गाढ झोप लागली. नेमक्या त्याच वेळेला निकोलस राजा सीमावर्ती प्रदेशात आला होता. तो त्या मार्गावरून जात असताना त्याला आपल्या या सैनिकाची छावणी दिसली म्हणून तो तेथे आला. त्याने पाहिले आपला एक सैनिक गाढ झोपी गेला आहे व शेजारी एक कागद पडला. उत्सुकता म्हणून त्याने तो कागद पाहिला. सैनिकाने लिहिलेली ती कर्जाची यादी व त्याच्या खाली 'हे कर्ज कोण आणि कधी फेडणार' हे त्याने वाचले व त्याच्याखाली 'निकोलस' असे लिहून व आपली स्वाक्षरी करून तो .आला तसाच निघून गेला. थोड्या वेळाने त्या सैनिकाला जाग आली. जवळच पडलेला कागद उचलून त्याने आपल्या कर्जाची यादी पुन्हा वाचायला सुरुवात केली व खाली जेव्हा 'निकोलस' चे नाव व स्वाक्षरी त्याने पाहिली, त्या वेळी त्याचा विश्वासच बसला नाही. काही दिवसांनी त्याला कर्ज फेडीसाठी सरकारी खजिन्यातून रक्कम मिळाली व तो कर्जमुक्त झाला. एका कर्तव्यदक्ष राजामुळे त्याच्या मनातील मोठी चिंता दूर झाली होती.
February 14, 2017

अनामिकेसाठी आपण इतकी वर्षे वाया घालवली याचा आता विजयला पश्चाताप होऊ लागला होता. त्याच्या आयुष्यात आलेल्या इतक्या जणी त्याच्या आयुष्यातून ह्या ना त्या कारणाने दूर गेल्या त्याचे त्याला इतके दुःख झाले नाही जितके अनामिकेच्या जाण्याने होईल… कारण अनामिकेच्या बाबतीत त्याला असे वाटत होते कि त्याचे आणि तिचे जन्मजन्मांतरीचा नाते आहे . त्यामुळे काहीही झाले तरी त्यांचे मिलन हे होणारच ! मग अख्खं जग आडवं आलं तरी ! पण हे तोपर्यतरच वाटत होत जोपर्यत तिच्याही मनात त्याच्याबद्दल ओलावा आहे असे विजयला वाटत होते.
August 29, 2022
नग’ म्हणजे ‘पोचलेला’ इसम किंवा ‘कॅरेक्टर’ किंवा ‘पात्र’ आणि कोकणची माणसं कितीही साधीभोळी असली आणि काळजात त्यांच्या भरली शहाळी वगैरे असली तरी एकेक जण म्हणजे ‘नग’ असतो.
December 25, 2023
सदनात आता आम्ही रूळू लागलो. इथूनच स्वारींनी हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून आपल्या ध्येयाच्या प्रचारार्थ हिंदुस्थानभर झंझावती दौरे काढले. प्रचार दौऱ्यासाठी जेव्हा भारतभर गरुडभरारी संचार व्हायचा तेव्हा, परत आल्यावर त्या दौऱ्यातील गोड अनुभव, लोकांशी बोलणं होत असताना मला ऐकायला मिळत. अगदी क्वचित मलाही सांगणं होत असे प्रत्येक गोष्ट मला कळावी अशी अपेक्षा मात्र मी कधीच केली नाही. आताही स्वातंत्र्यासाठी चाललेले स्वारींचे ते कष्ट पाहिले की मला अगदी गुदमरायला व्हायचं.
May 11, 2023
असतिल तेथे जिकडे तिकडे
विखरुनि पडली फुले
असतिल पक्षी झाडावरती
गोड गात बेसले
असेल तेथे वहात सुंदर
दुधासारखी नदी
असतिल डोलत हिरवी पिवळी
कमळे पाण्यामधी
घरे तेथली सुरेख असतिल
चमकत सोन्यापरी
आत लाविल्या असतिल
रंगी बेरंगी तसबिरी
झगमग झगमग करीत असतिल
तिथले सुंदर दिवे
विझतहि नसतिल ते वाऱ्याने,
जणु दुसरे काजवे
रोजच जत्रा भरत असावी
तिथे नदीच्या तटी
असतिल खाऊ देत घेऊनि
पैसे दाटुमुटी
पंख लावुनि हिंडत असतिल
वरती तिथली मुले
असतिल चालत ढगावरुनहि
टाकित हळु पावले
असतिल भारी रंगित कपडे
बाळांचे तेथल्या
शिवले असतिल शेवंतीच्या
गुंफुनिया पाकळ्या
खूप दागिने असतिल त्यांनी
अंगावर घातले
पुन्हा काढुनि नसतिल कधीही
पेटीमधि ठेवले
मनास माने तितुके भटकत
असतिल मेघांवर
स्वर्ग असा हा बघावयाला
मिळेल का लोकर
June 11, 2026
जगण्याचा ‘ पासवर्ड ‘ दोघानांही अज्ञात का तर स्पेंस ,जपणे , प्रायव्हसी जपणे . एकमेकांचे लग्न होऊन चार वर्षे झाले.. मुलबाळ होऊ दिले नाही ? कोण सांभाळणार ? आता तर सतत एकत्र घरात .. एकमेकांची ताकद…मर्यादा .. सगळ्या एकमेकांना समजल्या .. अर्थात नको तेवढ्या ..
August 17, 2021
गर्दीचा महासागर उसळला होता. लाटांवर लाटा येऊन आदळत होत्या. गर्दी बेभान होती. गर्दी दिशाहीन होत होती. गर्दी पुढं सरकण्याचा प्रयत्न करीत होती. पण कुणाचंही पाऊल पुढं पडत नव्हतं.
May 23, 2023

ती दोन बाकडी पार केली आणि तिची नजर रस्त्याच्या कडेला गेली…… चंद्राच्या प्रकाशात काहीतरी चकाकत होतं….. ती आणखी थोडी पुढे गेली आणि तिला तिथं एक मोटार सायकल पडलेली दिसली…. रोहन अजून मागेच रेंगाळत चालत होता. तिने मागे वळून रोहनला आवाज दिला …
April 10, 2020
नातवाच्या खेळणीमधील एक खेळणी हाती लागली. एक गोल पुंगळी दोन्हीकडे पारदर्शक काचा.एका बाजूने बघीतले तर दुसऱ्या बाजूला अनेक लहान लहान रंगीत काचांचे तुकडे. त्यामधून अनेक कलापूर्ण डिझाईन दिसायचे. अतीशय मनोहर व मनास आनंदीत करणारे प्रक्षेपण असे. मात्र गमतीचा भाग असा की आतील रंगीत तुकड्याची हालचाल झाली की दिसणाऱ्या डीझाईनमध्ये त्वरीत बदल होत असे. प्रत्येक डिझाईन तसेच मनोहर व आकर्षक. फक्त एक गोष्ट प्रखरतेने लक्षांत आली की "दृष्य " सतत बदलत, मनोहर असे परंतु एकदा बघीतलेले दृष्य पून्हा तेच व तसेच म्हणून केव्हांच दिसले नाही. दिसू शकणार नव्हते. रंग संगतीची सतत उधळण होत असे. विविधते मधला तो आनंद टिपला जाई. ज्यांत केव्हांच नव्हती स्थिरता. तोच तोपणा. अस म्हणतात की "आनंद " हेच फक्त ईश्वरी सत्य आहे. आनंद म्हणजेच ईश्वरी दर्शन. आनंद हा भावनेचा सर्वात उच्य असा अविष्कार असतो. त्यांत इतर भावने प्रमाणे कोणताही विरोधाभास नसतो. आनंद हा चेतना स्वरुपांत व्यक्त होतो. कोणत्याही सभोवतालच्या दृष्य अदृष्य वस्तूमधून जाणीव देणाऱ्या, मन उल्हासीत करणाऱ्या चेतनेमध्ये आनंद असतो. कोलीडोस्कोप मधून क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या परंतु प्रत्येक प्रक्षेपित दृष्यामध्ये आनंद समावलेला आहे. बदलते स्वरुप ही चिंतेची बाब वाटते. कारण ज्याच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित होते. आनंदाचा ठेवा हाती लागतो. ज्याच्यात आनंद अर्थात ईश्वरी रुप बघीतले जाते. तो ढगांच्या हालचालीप्रमाणे स्वरुप बदलत जातो. मग स्थिरता समोर नसेल तर एकग्रता कशी होणार. ह्यातच त्याला समजले पाहीजे. कारण "आनंद " याचे स्वरुप लहरी, लाटा, छटा ह्यानी अनुभवण्याचा, जाणण्याचा प्रकार आहे. ज्यांत बदलणारी संकल्पना आहे. परमेश्वरला जेव्हां निर्गुण रुपांत समजले जाते. त्याच वेळी कोणतेही रुप, कोणताही आकार, कोणते ही मोजमाप, कोणतेही वर्णन त्याला लागु पडत नाही. ज्या ठीकाणी असा प्रयत्न होतो तो निर्णय केलेला विचार असतो. असत्यात तो जाऊन बसतो. म्हणूनच असे मान्य झालेले आहे की परमेश्वर अनुभव येणे, जाणीव होणे हे शक्य आहे. परंतु प्रत्यक्ष बघणे कदापीही, केव्हांही सत्य असून शकत नाही. कारण तो फक्त आनंदमय आहे. सतत बदलणाऱ्या छटांत, गुणधर्मांत, एक उर्जा शक्तीच्या रुपांत
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 8, 2017
माझ्या हतबलतेला जर तुला षंढपणा म्हणायचा असेल तर होय आहे मी षंढ, षंढ आहे मी. पण एकेकाळी मी सुद्धा पहाड फोडीत जाणार्या जलप्रवाहाचा वारसदार होतो. पण आता जलाशय होऊन स्तब्ध झालोय. अरे माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते जेव्हा माझ्या देशभगीनींची अब्रू लूटली जाते. माझ्याही मुठी आवळल्या जातात जेव्हा माझ्या देशबांधवांची पशूप्रमाणे हत्या होते.
August 23, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti