(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • इमानी सेवक

    प्राचीन काळतील एका राजाच्या पदरी असलेल्या एका इमानी सेवकाची ही कथा आहेएका रुजाच्या राजवाड्यात एकसेवक होता. त्याचे वडीलही राजाच्या वडिलांच्या चाकरीत होते. मात्र सेवकाच्या वडिलांनी त्या सेवकाला बजावून ठेवले होते की, राजवाड्यात नोकरी करीत असताना अनेक प्रलोभने येतात, मात्र तू कोणत्याही मोहाला बीपडू नकोस. कोणतेही काम इमानदारीने कर, त्यातच तुझे हित आहे. त्याप्रमाणे तो सेवक आपले काम अतिशय प्रामाणिकपणे करीत असे. रत्नाकडे रोज एक साधू यायचा व प्रसाद म्हणून त्याला एक द्यायचा, परंतु ते फळ सजा स्वतः न खाता त्या सेवकाला द्यायचा.सेवकही ते फळ राजाला दिले अहे त्यावर आपला अधिकार नाही. म्हणून स्वत: न खाता राजवाड्यातल्याच एका रिकाम्या खोलीत ठेवून द्यायचा. हा दिनक्रम बरेच दिवस चालू होता. एके दिवशी त्या साधूने राजाला असेच फळ दिले व आशीर्वाद देऊन तो निघून गेला. राजा रोजच्याप्रमाणे ते फळही त्या सेवकाला देणार तेवढ्यात तेथे एक माकडाचे पिलू आले. राजाने कुतूहल म्हणून आपल्याजवळील फळ मग त्या सेवकाला न देता त्या माकडाच्या पिलाला दिले. माकडाने लगेच ते फळ खायला सुरुवात केली. राजाही गमतीने त्याचे खाणे पहात होता. फळ अर्धवट खाक्यानंतर त्यातून एक रत्न बाहेर पडले. ते पाहून राजाला फार आश्चर्य वाटले. त्याने त्या सेवकाला लगेच विचारले, की रोज तुला मी देणारे फळ तू काय करीत होतास? त्यावर त्या सेवकाने राजाला ती खोली उघडून दाखविली. ती खोली फळाने अर्धी भरली होती व त्यातील फळे सडल्यामुळे त्यातून रत्ने बाहेर आली होती. तो रत्नांचा खजिना पाहून राजा फारच आश्चर्यचकित झाला. त्या इमानी सेवकाचे त्याला कौतुक वाटले व त्याने ती सारी रत्ने त्या सेवकाला देऊ केली. मात्र त्या इमानी सेवकाने त्या रत्नावर तुमचाच अधिकार आहे, असे राजाला सांगून ती सर्व रत्ने नम्रपणे नाकारली व राजाची चाकरी करण्यातच आपल्याला खरा आनंद असल्याचे त्याने सांगितले. त्या सेवकाचा तो इमानीपणा व राजनिष्ठा पाहून राजाही भारावून गेला होता.

      February 13, 2017


  • मला समजलेले कर्मफळ

    प्रत्येक व्यक्तीला जीवनाच्या चक्रामध्ये सतत कोणते ना कोणते काम करावेच लागते. त्याची प्रत्येक हालचाल हे छोटेसे कर्म बनत जाते. प्रत्येक क्षण हा कर्माने बांधलेला असतो. कर्माववर सभोवताल, परिस्थिती आणि व्यक्तीच्या चेतना ह्याचा परिणाम होत असतो. व्यक्तीचे अंतरंग व बाह्यांग प्रत्येक कर्माचे परिणाम ठरवतात. ते चांगले वा वाईट, सुख वा दुःख निर्माण करणारे ठरतात. व्यक्तीच्या आवडी निवडीवर ते अघात करतात. ह्यातून दोन गोष्टी निश्चीत स्वरुपाच्या कळतात. कर्म ही सतत घडणारी क्रिया व त्याप्रमाणे त्याचे होणारे परिणाम. जीवन म्हणजेच एक हलचाल. हलचाल म्हणजेच कर्म. कर्म म्हणजेच सुख दुःखाचे चक्र. जीवनभर चालणारे. हे टाळता येत नसले तरी ते सहज आणि सुकर करता येवू शकते. निसर्ग हा त्याच्या ठरलेल्या नियमानुसार चालत असतो. त्यात कधीही बदल केला जात नाही. व्यक्ती आणि त्याचे कर्म ह्याच्याशी निसर्गाचा प्रत्यक्ष संबंध नसतो. व्यक्ती आपल्या प्रत्येक हालचालीसाठी, म्हणजे कर्म करण्यासाठी स्वतंत्र असतो. ज्यामुळे ज्याचे कर्म त्याचे त्यालाच फळ. सुख वा दुःख ह्या भावनीक समस्या त्यानेच केलेल्या कर्माचे परिणाम असतात. व्यक्तीमध्ये कांही नैसर्गिक उपजत गुणधर्म असतात. अहंकार ( Ego) आणि वासना ( Desire ) . ह्यामुळेच निसर्गाने तुम्हास दिलेल्या जीवनाबद्दल आपूलकी (अस्था) (Attachment ) वाटते. जीवन जगण्या विषयी प्रेम वाटते. कर्माचे होणारे नैसर्गिक परिणाम ही व्यक्तीची चिंताजनक समस्या नसते. परिणाम कसे होईल हा त्यात खरा भाग असतो. व्यक्तीची समस्या असते ती त्याच्या अपेक्षित कर्मफळामुळे. कोणत्याही गोष्टीचे परिणाम कसे होतील, ह्यापेक्षा ते कसे व्हावे ह्या त्याच्या मनांत दडून बसलेल्या विचारामुळे. विद्यार्थी अभ्यास करताना पास होण्याची अपेक्षा करतो. प्रथम येण्याची इच्छा बाळगतो. हे केंव्हाही चांगले व प्रेरणादायी. परंतु हे सारे त्याच्या योग्य प्रयत्न्यावर अवलंबून असते. याची त्याला जाणीव असावी. म्हणजे यश वा अपयश ह्याचे तो विश्लेषन करु शकेल. वासना (Desire) ह्या सुख दुःख निर्माण करीत नसतात. त्या फक्त जीवनचक्र चालविण्यास देहाला मदत करतात. Desire creates attachments for the life. परंतु जीवन कसे असावे, कसे चालावे, कर्माचा कोणता परिणाम व्हावा, ह्या विचारांमध्ये व्यक्ती गुंतला जातो, त्याचवेळी त्याला सुख दुःखाशी सामना करावा लागतो. दुःखाचे कारण इच्छीत अपेक्षाभंग. निसर्गचक्र व निसर्ग नियम ह्यावरच जगातील घडामोडी घडत असतात. त्यामध्ये परिस्थिती, सभोवताल, व व्यक्ती ह्या सर्वांचेच समीकरण लक्षांत घेतले जाऊन घटनेचा सांघीक परिणाम होतो. परंतु व्यक्ती त्या घटनेमध्ये केवळ स्वतःला गुंतवून स्वतःच्या विचारानुसार त्या गोष्टीचा परीणाम कसा व्हावा ही अपेक्षा करतो. हेच कदाचित् निराशेचे कारण बनू शकते. कोणत्याही गोष्टीचा परीणाम प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षेप्रमाणे केंव्हाही होऊ शकणार नाही. हे सत्य आहे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी योग्य आणि खुप प्रयत्न करणे गरजेचे असते. यश संपादन करण्याचा तो मार्ग आहे. त्याचमुळे तुमच्या विचारांच्या झेपेला मर्यादा असतात.

    सभोवताल, काळ, वेळ, परिस्थिती इत्यादी अनेक पैलू प्रत्येक घटनामध्ये गुंतलेल्या असतात.त्या घटनेच्या गुंत्यामधले अनेक दोर त्या घटनेला बांधलेले असतात. ही व्यक्तीच्या अकलनाबाहेरची गोष्ट असते. निसर्गच त्यांच्या पद्धतीने तो गुंता सोडवू शकतो. व्यक्ती स्वतःच्या विचाराने त्या गुंत्याचा एखादा दोर खेचून निरनिराळ्या गाठी मात्र निर्माण करेल. म्हणूनच म्हटले जाते की घटनेची उकल निसर्गालाच करुं द्या. त्याने दिलेल्या निर्णयास अर्थात परिणामास मान्यता द्या. कर्माच्या फळाची अपेक्षा न करता फक्त योग्य प्रयत्न व्यक्तीने करावे. हाच जीवनाचा महान संदेश असेल. ईश्वरानी प्रत्येक व्यक्तीमध्ये तीन उपजत चेतना शक्ती दिलेल्या असतात.

    १ ज्ञान शक्ती. (Power of Knowledge)

    २ इच्छा शक्ती. (Power of Desire)

    ३ क्रिया शक्ती.(Power of Action)

    ह्या सर्व उर्जा शक्ती आहेत. कोणतेही काम करण्यासाठी ह्या उत्तेजनात्मक गोष्टी असतात. ह्याच मुलभूत गोष्टीमुळे व्यक्ती कोणतेही कर्म करण्यास उद्युक्त होतो. एक महत्वाचे म्हणजे काम करण्यासाठी चेतना मिळणे ही बाब निराळी.ती निसर्ग देतो. परंतु कोणते काम करावे त्याची दिशा व योजना आखण्याचे कार्य मात्र निसर्ग केव्हांच करीत नसतो. माणसाला दिलेल्या मेंदू–बुद्धी–मन ह्या इंद्रियामार्फत ते होत असते. कार्य करणे ही चेतना वेगळी, कोणते कार्य करणे हा भाग सर्वस्वी निराळा असतो. ते व्यक्तीच्या संस्कारीत विचारावर अवलंबून असते. याचा अर्थ कर्म प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छेने, आवडी निवडी नुसार, परिस्थितीनुसार, गरजेनुसार करीत असतो. त्याला निसर्ग फक्त शक्ती देतो. त्यामुळे कर्माचे स्वरुप व त्याचा परिणाम ह्याला फक्त व्यक्तीच जबाबदार असते. कर्मफळ हे त्यालाच भोगावे अथवा उपभोगावे लागते.

    येथेच एक गैरसमज निर्माण होत असतो. प्रत्येक कर्मामध्ये व्यक्ती स्वतःला

    " कर्म करता ( The Roll of DOER ) " याच्या भुमिकेत समजतो. हे अर्धसत्य आहे. कारण विचार, योजना, दिशा, कल्पकता, इत्यादी त्याच्या असतात. तो उर्जा शक्तीला (निसर्गाला ) दुय्यम स्थान देतो. किंवा दुर्लक्ष करतो. स्वताःकडे संपूर्ण घेतलेल्या कर्त्याच्या भूमिकेमुळे जेव्हां इच्छीत कर्मफळ न मिळाल्यास त्याला दुःखी व्हावे लागते. जर हाच कर्मफळाचा भाग प्रत्येक कर्म करताना ही "ईश्वरी ईच्छा वा योजना " समजून अंगीकारल्या, तर त्याचे तेच दुःख शिथील होईल. कर्माचा जो परिणाम होणार असतो, तो तर होणारच. परंतु " मी हे केले " हा अहंकार मीपणा कमी होण्यास मदत होईल समाधानी वृत्ती निर्माण होईल. ते कर्मफळ स्विकारण्याची मनाची तयारी असेल. असे म्हणतात की प्रत्येक काम ईश्वराला साक्षी ठेऊन, त्याची आठवण करीत करावे. आणि शेवटी ते कृष्णार्पण वा ईश्वरार्पण करावे. त्यांतच समाधान व शांतता लाभते.

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

      December 17, 2014


  • ब्रँडेड स्कुल

    सगळ्या शाळांमध्ये असलेल्या सोयी सुविधा एका पेक्षा एक, थ्री स्टार, फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या. चकाचक रिसेप्शन, चकाचक एअर कंडिशन असलेले वर्ग, चकाचक गार्डन, चकाचक मैदान, चकाचक बसेस, चकाचक शिक्षक आणि स्टाफ आणि त्याहून चकाचक त्या शाळेत शिकणारे लहान लहान निरागस विद्यार्थी. पण सगळ्यात जास्त खटकत होत ते म्हणजे अशा या सगळ्या ब्रँडेड शाळा आपापले मार्केटिंग करत होत्या.

      July 9, 2021


  • समाधान

    माझ्या मनातलं

      March 16, 2006


  • …आणि बिरबल परतला

    अकबर आणि बिरबल यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. अकबर बादशहा असूनही बिरबलची आणि त्याची खूप चांगली मैत्री होती. अनेकदा बिरबलबरोबरच्या सहवासात आपण बादशहा आहोत हे अकबर विसरून जात असे.

      September 10, 2016


  • घे कुठार !

    घे कुठार ! कर उगार
    घाव आता घाली । धृ. ।।

    धरणीने पोशियले
    रविकिरणे वाढविले
    राहियला सतत मरुत
    आजवरी वाली ।।१ ।।

    किती विहगा खांद्यावरी
    खेळविले बाळांपरि
    शांत गुरे छायेमधि
    आजवरी झाली ।॥२॥।

    प्रेमामृत तरुण तरुणि
    गेल्या ओतून इथुनि
    संकेतस्थळ होणे
    आजवरी भाळी ।।३।।

    काळाचा कठिण घात
    वस्तूचा होत पात
    आनंदे पाहत मी
    प्रकृतीच्या चाली ।।४॥।

    होऊ देत देह छिन्न
    शकलांवर शिजवी अन्न
    मन निवेल ऐकुनिया
    तृप्ती तुला आली ! ।॥५॥

      June 11, 2026


  • घरौंदा

    समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर लहान मुलं आपल्या पावलावर ओलसर वाळूचा मोठा थर थापतात. मग हळूच पाऊल काढून घेतल्यावर पावलाच्या पोकळीचं छान घरटं तयार होतं व एक ‘घर’ तयार केल्याचा त्यांना अवर्णनीय आनंद मिळतो.

      June 18, 2021


  • न कळे जोवर (सुमंत उवाच – १)

    सुमंत जयंत परचुरे. 

    एखादी गोष्ट चुकीची आहे हे ती घडून गेल्यावर समजते पण तेव्हा उशीर झालेला असतो.

      August 24, 2021


  • उगाच काहीतरी – ८ (एंट्रन्स एक्साम्स , क्लासेस आणि पालक)

    सूचना - इथे कोणावरही टीका करण्याचा किंवा सल्ला देण्याचा काहीही हेतू नाहीये. त्यावरून प्लिज कोणताही निर्णय घेऊ नये.


    मीना ची दहावी अर्ध्यात पोहोचली म्हणजे सप्टेंबर/ऑक्टोबर उजाडला आणि तिच्या पालकांच्या मोबाईलवर अचानक क्लासेसचे फोन यायला लागले. आमच्या क्लास ची स्कॉलरशिपची परीक्षा तुमच्या मुलीला द्यायला लावा म्हणजे तिचा आता पर्यंतचा अभ्यास कसा चाललंय तेही कळेल आणि त्या मार्क्सवर आमच्या क्लासच्या फी वर आम्ही तुम्हाला सवलत ही देऊ.

    मग इतर होतकरू पालकांसारखं त्यांनी पण एका रविवारी एका क्लासची ५०० रुपये फी देऊन तिला परीक्षा द्यायला लावली. जवळ जवळ २००-२५० मुलं केंद्रावर आलेली होती. दोन दिवसानंतर त्यांना फोन आला की त्यांच्या मुलीला मिळालेल्या मार्क्स वर ते मीनाला फी वर १५ टक्के डिस्काउंट देणार होते. जर त्यांना जास्त सवलत पाहिजे असेल तर ते पुन्हा परीक्षा द्यायचा प्रयत्न करू शकतात. तिच्या पालकांनी दुर्लक्ष केलं आणि त्यांच्या कामाला लागले .

    त्यानंतर मग एका पाठोपाठ एक क्लासेसचे फोन यायला लागले. प्रत्येकाचे म्हणणे तेच होते की स्कॉलरशिपची परीक्षा देऊन बघा. प्रत्येकाची फी ३००ते ५०० च्या दरम्यान असायची. या परीक्षा ते सप्टेंबर ते फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक रविवारी आयोजित करायचे.

    मुलांचा अभ्यास सुरु होता. आणि पालकांचा त्यांना कोणत्या ब्रँडेड क्लास ला टाकायचं याचा अभ्यास सुरु होता. आमच्या मुलाला आम्ही इथे ऍडमिशन घेतली, आम्हाला या क्लासने इतका डिस्काउंट दिला या चर्चा सुरु होत्या. हा क्लास नीट च्या परीक्षेसाठी चांगला आहे. तो जे इ इ साठी उत्तम, हा दिल्लीचा आहे. तो कोटा चा बेस्ट क्लास आहे. असं सगळं सुरु होतं.
    मग मीनाच्या वडिलांनी पण अभ्यास सुरु केला. काही क्लासेसला व्हिजिट केलं. त्यांचे आलिशान वर्ग, सुटबुटवाले कॉऊंसेलर्स आणि २. ५० ते ३. ५० लाखांमध्ये फिया.

    एंट्रन्स एक्साम्स , क्लासेस आणि पालक. असो ...

    मग तिच्या वडिलांनी त्यांना काही साधे प्रश्न विचाराले जसे तुमच्या एकूण किती शाखा आहेत? एका ब्रांच मध्ये किती मुलं असतात ?

    तेव्हा समजलं की प्रत्येकाच्या भारतभर १५० ते २०० ब्रॅंचेस आहेत आणि प्रत्येक ब्रांच मध्ये सरासरी १०० ते १५० मुलं असतात. प्रत्येकाची फी सरासरी २ लाख. करा हिशोब. आणि हो हे स्कॉलरशिप टेस्ट चा आग्रह धरायचे त्याचं अर्थकारण जर पाहिलं तर जवळ जवळ २० रविवार प्रत्येक ब्रांच ला सरासरी १०० मुलं ३०० ते ५०० रुपये भरून स्कॉलरशिप टेस्ट द्यायचे. आता हा पण करा हिशोब. कमावो बापडे आपल्याला काय.

    आय आय टी किंवा मेडिकल ला ऍडमिशन मिळालेल्या मुलांची संख्या विचारली असता ते देशभरातून निवड झालेल्या मुलांची संख्या सांगायचे पण मीनाच्या शहरातील ब्रांचमधून निवड झालेल्या मुलांची संख्या विचारल्यावर उत्तर तसे निराशाजनक असायचे.

    अशी काही प्रश्नावली विचारल्यावर काही क्लासेस चे सेल्स एजेंट तिच्या पालकांवर थोडे नाराज ही झाले आणि त्यांच्या क्लासला ऍडमिशन घ्यायची जरी ठरवलं तरी ते आता कुठलाही डिस्काउंट देणार नव्हते असं स्पष्ट शब्दात सांगायला लागले. मीनाचे वडील म्हणाले ते पुढचं पुढे बघू.

    जसजशी दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ यायला लागली तसतशी अकरावी बारावीच्या क्लास बद्दल पालकांची पण चर्चांना उधाण येऊ लागलं . ज्या क्लास ची फी जास्त तो उत्तम असं पालक भासवु लागले. जणू काही ते क्लासवाले ह्यांच्या मुलांच्या सीट्स आय आय टी आणि मेडिकल ला बुकच करून ठेवणार होते. जाऊ द्या आपल्याला काय आपण आपल्यापुरता बघू असं मीनाच्या पालकांनी ठरवलं.

    त्यांच्या -दोन असं लक्षात आलं की या क्लासेसच्या पूर्ण विद्यार्थी संख्येतून अवघी अर्धा किंवा एक टक्के मुलांची निवड होत होती पण यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी एकदम पॉवरफुल होती. त्यात अजून एक इंटिग्रेटेड कॉलेज ची भानगड होती. म्हणजे ते क्लासवाले कुठल्यातरी गल्लीबोळातील टुकार कॉलेज बरोबर टाय अप करायचे ( अर्थात त्याचे चार्जेस वेगळे होते ) जेणेकरून तुमची मुलं ६- ७ तास क्लास मध्ये असणार पण त्यांची हजेरी मात्र त्या कॉलेज ला लागणार. बरं या ६-७ तासात ते फक्त गणित आणि सायन्सचं शिकणार. बाकीचे विषय तुमचे तुम्ही मॅनेज करायचे.आणि हो जर तुमची निवड नाही झाली तर पुन्हा परीक्षा देण्यासाठी अर्ध्या फी मध्ये रिपीटर्स बॅचला ऍडमिशन देण्याची कृपा ही ते करणार होते.
    त्या नामांकित क्लासेसच्या वेबसाईटवर गेल्यावर मीनाच्या वडिलांना वेगळाच प्रकार लक्षात आला. त्यांच्या जाहिरातींमधील त्यावर्षी टॉपर्स म्हणून निवड झालेली तीच मुलं असायची. म्हणजे तोच विद्यार्थी ३- ४ क्लासच्या जाहिरातीत असायचा. खाली फक्त बारीक अक्षरात क्लासरूम बॅच, डिस्टन्स लर्निंग बॅच, टेस्ट सिरीज, स्कॉलरशिप टेस्ट, असं काहीबाही लिहिलेलं असायचं . हे ही लक्षात आलं की ज्या उत्कृष्ट नोट्स देण्यासाठी हे लोक एवढी फी क्लासच्या मुलांना लावतात, काही क्लासेसच्या त्याच नोट्स ऑनलाईन शॉपिंग साईट्स वर अवघ्या ५ - १० हजारात उपलब्ध होत्या.

    मीनाच्या पालकांना तसाही ऑफिसनंतर मोकळा वेळ भरपूर होता त्यामुळे मग ते काही क्लासेस च्या काही विद्यार्थ्यांना भेटले . पालकांनी भरपूर फी भरली असल्याकारणाने त्यांनी लावलेल्या क्लासेसचं कौतुकच केलं. पण विद्यार्थ्यांना विचारल्यावर त्यांनी बिचार्यांनी खरं काय ते सांगून टाकलं. दर आठवड्याला प्रत्येक धड्यावर टेस्ट्स ठेऊन मुलांची घोकंपट्टी करवली जात होती. काय आणि किती समजलं यापेक्षा दिलेल्या नोट्स लक्षात ठेवण्यावर जास्त भर दिला जात होता. संपूर्ण दिवस गणित आणि विज्ञान करून करून मुलांना इतर विषयांसाठी वेळच मिळत नव्हता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या क्लासेसने दिल्ली वा कोटा वरून आयात केलेल्या शिक्षकांची शिकवायची पद्धत आपल्या मुलांना समजत नव्हती ( हे मात्र त्यांना जवळ जवळ ६० टक्के मुलांनी सांगितलं). बाकी वर्ग प्रशस्त आणि वातानुकूलित होते. लायब्ररीज अद्यावत आणि त्या विषयांवरच्या पुस्तकांनी भरलेल्या असायच्या, तसेच प्रश्न सोडवायचे काही शॉर्टकट्स त्यांना शिकवायचे हे पण तितकच खरं होतं.

    मीनाने पालकांना स्पष्ट सांगितले की ती मेडिकल नाही मिळालं तर इंजिनियरिंग अशा दोघं दगडांवर पाय ठेवणार नव्हती ती फक्त नीट ची परीक्षा देणार होती. त्यामुळे ती अकरावीला तेच विषय घेणार आणि त्यावरच लक्ष केंद्रित करणार होती. डेन्टल करून स्वतःचा व्यवसाय सुरु करून तिला पुढे त्याच विषयात पुढे जायचं होतं.

    एवढा क्लियर व्हिजन असल्यावर तिच्या पालकांना तिच्या यशाबद्दल कुठलीही शंका नव्हती. मग त्या दिशेने अभ्यास सुरु केल्यावर लक्षात आलं की नीट च्या परीक्षेसाठी बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री चे काही ठराविक टॉपिकस ठरवले गेलेले होते आणि त्या टॉपिक्स वरच त्यांचा पेपर निघत होता. त्यांची माहिती परीक्षा मंडळाच्या वेबसाईट वर उपलब्ध होती. ते वेगळे असे काही नव्हते स्टेट बोर्ड, सीबीएसई , किंवा तत्सम बोर्डाच्या अकरावी बारावीच्या अभ्यासक्रमातीलच काही टॉपिक्स होते. ते जर समजून घेतले तर बाहेरून असं काही येणार नव्हतं. स्टेट बोर्डाच्या पुस्तकांमध्ये होते तरी NCERT च्या पुस्तकांमध्ये जरा विस्तृत दिलेले होते. एकूण मुलांचं जर बेसिक क्लियर असेल तर त्यांना नीट काय जे इ इ काय कुठलीच परीक्षा द्यायला त्रास होणार नाही हे स्पष्ट झालं.

    दहावीची परीक्षा संपली तोवर तिच्या बहुतेक मित्र मैत्रिणींचे कुठले ना कुठले क्लास लावून झाले होते. पालकांनी मीनाला सुट्ट्यांमध्ये थोडा ब्रेकचं घेऊ दिला कारण या नंतर तिच्या आयुष्यात खऱ्या रॅट रेस ला सुरुवात होणार होती. सुट्ट्यांच्या शेवटी मग त्यांनी तिला अकरावी बारावीचे पुस्तके आणि काही NCERT पुस्तके आणून दिली आणि तिने हळू हळू त्यांचे वाचन सुरु केलं.

    एकदाचा दहावीचा निकाल लागला आणि त्यात मीनाने रेकॉर्ड ब्रेकिंग यश मिळवले. इकडे शहरभर तिचे सत्कार सुरु झाले आणि पुन्हा तिच्या पालकांना वेगवेगळ्या क्लासेस चे फोन येऊ लागले. त्यांना कसेही करून मीनाला त्यांच्या क्लास मध्ये ऍडमिशन द्यायचं होतं. अगदी फुकट अगदी नावापुरती सुद्धा . कारण आता त्यांना या हुशार विद्यार्थ्यांनी पण त्यांच्याच क्लासची निवड केली याची जाहिरात करायची होती. यात तो क्लासवाला पण होता ज्याने प्रश्न विचारल्यावर एक पैसाही सवलत मिळणार नाही म्हणून सांगितलं होत.

    तिच्या पालकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. घरी आता कुठला ब्रँडेड क्लास लावावा यावर गांभीर्याने चर्चा सुरु झाली. तिच्या वडिलांनी त्यांच्यासमोर सगळी वस्तुस्थिती ठेवली. शेवटी त्यांनी स्थानिक क्लास लावला. ज्यात वातानुकूलित वर्ग किंवा सूटबूट वाले शिक्षक नव्हते पण वेगवेगळ्या कॉलेज मध्ये शिकवून रिटायर झालेले शिक्षक होते. मुलांना काय आणि कसे समजवायचे हे त्यांना पक्के ज्ञात होते.

    शहरातील एका प्रतिष्ठित कॉलेज मध्ये तिचं ऍडमिशन घेतलं. एवढे चांगले मार्क्स मिळून देखील फक्त कॉलेजला न जाता हजेरी लागावी म्हणून गल्लीबोळातील कॉलेज मध्ये ऍडमिशन घेणं तिच्या पालकांना मान्य नव्हतं . आयुष्यात एकदाच तिला मिळणारी ही तारुण्य अनुभवायची संधी ते कुठल्याही महत्वाकांक्षेसाठी दवडू देणार नव्हते .

    मीना स्टेट बोर्डाची विद्यार्थिनी होती त्यामुळे तिला अकरावी बारावीच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकांसोबत नीट च्या तयारी साठी NCERT ची पुस्तके, जास्तीत जास्त MCQ's असतील अशी पुस्तके आणि परीक्षेचा सराव व्हावा म्हणून काही टेस्ट सिरीज ची पुस्तके आणि ऑनलाईन साईट्स पुरवल्या. हे सगळं मार्केट मध्ये अगदी स्वस्तात आणि सरळ उप्लब्ध होतं.
    एकूण तिच्या अभ्यासाच्या साधनांची उपलब्धता तिचे वडील करून देत होते तर तिचा अभ्यास, कॉलेज ,क्लास आणि आराम यांचे वेळापत्रक तिच्या आईने तिला मॅनेज करून दिलं.

    कुठलाही दबाव न येत तिचा अभ्यास सुरु झाला. त्याचबरोबर इतर मनोरंजनासाठी पण वेळ तिला मिळत होता.
    एवढे चांगले मार्क्स मिळवूनही तिला "चांगला " क्लास ना लावून मीनाचे पालक तिच्या शिक्षणाच्या बाबतीत कॉम्प्रोमाईस करता आहेत अशी कुजबुज आणि टीकाही त्यांच्यावर झाली. पण त्यांना कुठल्याही दबावाखाली अभ्यास करून अथवा घोकंपट्टी करून यश मिळवायचा दबाव तिच्यावर टाकायचा नव्हता. आणि इतरांना काय वाटतं ती पर्वा त्यांनी तरी का करायची. त्यांच्या मुलीच्या यशापयशाची जबाबदारी सर्वस्वी त्यांच्या कुटुंबाची होती. ती दबावमुक्त राहणं हे ही तितकच महत्वाच होतं.

    एके दिवशी तिच्या एका मैत्रिणीच्या वडिलांचा मीनाच्या वडिलांना फोन आला. म्हणाले "मला तुमचे सर्व विचार पटताहेत आणि मी पण माझ्या मुलीला एका क्लास पेक्षा एक शिक्षण देणारी शिकवणी लावणार होतो पण दोघी मायलेकींनी तो एक प्रेस्टिज इश्यू करून टाकला शेवटी तिला अबक क्लास च्या इंटिग्रेटेड कोर्स ला ऍडमिशन घेणं भाग पडलं."

    पुन्हा यथावकाश बारावीचा निकाल लागला. नंतर मग नीटचा ही निकाल लागला. दोघांमध्ये मीनाला अतिशय चांगले मार्क्स मिळाले आणि तिला त्यांच्या पसंतीच्या डेंटल कॉलेज ला पहिल्याच लिस्ट मध्ये नंबर लागला.

    तिच्या इच्छे प्रमाणे तिचं भवितव्य घडवण्याच्या कामाला ती लागली आणि तिचे पालक पण क्लासेस नावाच्या प्रेस्टिज इश्यू च्या तावडीतून सुटले.

    आणि अशा रीतीने मीनाच्या एंट्रन्स एक्साम ची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.

    -- अमोल पाटील.

      August 20, 2022


  • बंड्या आणि शिक्षणमंत्री

    “शाळेचा शोध कुणी लावला?” हा प्रश्न माझ्या सहावीत जाणार्‍या बंड्याला सिनीयर केजीत गेल्यापासून भेडसावतो आहे. खेळणी, कार्टुन आणि छोट्या भीमच्या जगात सुखी असता असता इवल्याशा लहान जीवाच्या मागे हा शाळा नावाचा प्रकार कशासाठी असतो हा त्याचा रास्त प्रश्न आहे.

      December 2, 2018