(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्मरणशक्तीचे सर्वोत्तम उदाहरण : माझी आजी

    माझी आजी आनंदी रामकृष्ण जोशी निरक्षर होती तथापि, श्रीसत्यवान-सावित्रीचे वटपौर्णिमेचे महत्व सांगणाऱ्या साडेतीनशे ओव्या तिला मुखोद्गत होत्या ! आजीने मौखिक पद्धतीने शिक्षण घेतले होते ! तिच्या अफाट स्मरणशक्तीचं मला नेहेमीच कौतुक वाटत आलंय !

    माझी आजी म्हणजे माहेरची "द्वारका" ही जुन्नरच्या रुख्मिणी पंढरीनाथ हरकरे ह्यांची सुकन्या ! विवाहानंतर तिचे नाव सौ. आनंदी रामकृष्ण जोशी असे झाले, तरी "द्वारकाकाकू, द्वारकामावाशी" ह्याच नावाने सर्वत्र सुपरिचित होती. एकोणीसशे दहा सालचा तिचा जन्म ! त्या काळामध्ये लवकर विवाह व्हायचे. लाक्षणिक शालेय शिक्षण जरी नसले, तरी ती आदर्श गृहपत्नी होती.

    शिवनेरी, लेण्याद्री जिथे आहे ते जुन्नर हे माझे आजोळ ! तेथील वरल्या आळीमधील श्री मुरलीधराचे मंदिरात ज्येष्ठी पौर्णिमेला तीन दिवसांचा हा उत्सव असायचा . माझी आजी तीन दिवस उपवास करायची. त्यावेळी वट सावित्रीच्या ह्या ३५० ओव्या, तीन भागामध्ये अर्थात तीन दिवसात, ती म्हणायची आणि ते ऐकण्यासाठी खूप गर्दी व्हायची. आजीचा आवाज गोड होता, श्लाघ्य होता, आजही तिचा तो मधाळ स्वर कानामध्ये घुमतोय !

    नंतर काही वर्षे, पुण्यातील सदाशिव पेठेतील श्री खुन्यामुरलीधर मंदिरात तिने वटसावित्रीच्या ओव्या म्हणल्या होत्या. दिनांक १०, ११, १२ जून १९६८ ह्या तीन दिवसामध्ये माझ्या आजीने, तीन भागातील ह्या वट सावित्रीच्या ओव्या, पुण्यातील शनिवार पेठेतील गोळे राम मंदिरामध्ये सादर केल्या होत्या. त्याचे वार्तांकन आणि छायाचित्र, पुण्याच्या सकाळच्या सि. पु. थत्ते ह्यांनी केले होते, १३ जून १९६८ रोजी "सकाळ"मध्ये ते प्रसिद्ध झाले होते ! फोटोमध्ये आजीच्या डावीकडे, ओव्या लिहिलेली वही उघडून बसलीय ती माझी आई, उषा पंडित चिंचोरे !

    जुन्नरच्या सराई पेठेमध्ये राहणाऱ्या चंद्रभागा घाटपांडे पारुंडेकर मावशी ह्या तिच्या नातेवाईक, त्यांनी त्यांच्या पूर्वजांकडून मौखिक पद्धतीने "वटसावित्री"च्या ओव्या शिकल्या होत्या. त्या पारुंडेकर मावशींनी माझ्या आजीची जिद्द हेरून, तिला ह्या ओव्या शिकविल्या. माझी "आनंदीआजी घरातील सगळी कामे झाल्यावर, दररोज दुपारच्यावेळी पारुंडेकर मावशींच्या घरी जायची. त्या माझ्या आनंदी आजीला रोज एकेक ओवी म्हणून दाखवायच्या. ते ऐकून, माझी आजी ती ओवी घोकून घोकून पाठ करायची. विशेष म्हणजे, ओव्या शिकवत असतांना, पारुंडेकर मावशी माझ्या आनंदी आजीच्या पुढ्यात, त्यांचे निवडणं-टिपणं ठेवायच्या. आजी एकीकडे ते काम करता-करता, "परळी-आडणी या विस्तारली ताटं" अश्या ओव्या पाठ करायची. ओवी पाठ झाल्यावर, माझी आजी आपल्या स्वतःच्या घरी यायची की संध्याकाळची कामं - तेलवात, कंदील तयार ठेवणे, अशी कामे करायची. दुसया दिवशी दुपारचेवेळी, आजी मावशींच्या घरी गेल्यावर, आधल्या दिवसाची ओवी आधी म्हणून दाखवायची मग पुढची ओवी शिकायची, अश्या मौखिक पद्धतीने "वट सावित्रीच्या साडे तीनशे ओव्या" तोंडपाठ व्हायला तिला सहा महिने लागले !

    आनंदी आजीची अफाट स्मरणशक्ती शेवटपर्यत तल्लख होती. आज मनात विचार येतो, आजकाल साक्षर मुलांना सर्व सुख-सुविधा उपलभ्द असूनसुद्धा साधी तीन कडव्यांची शाळेच्या पुस्तकातील कविता पाठ नसते.

    "आनंदी"आजी नाव सार्थक करणारी होती, माझे आजोळ जणू "द्वारका" नगरी होती ! माझ्या आजीची गणपतीवर भारी श्रद्धा होती. गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय तिच्या मुखाखाली कधीही घास उतरला नव्हता. "मोरया मोरया" असा अविरत जप करणा-या माझ्या आजीला देवाज्ञा झाली, ती सुद्धा भाद्रपद चतुर्थीला १५ सप्टेंबर १९७२ रोजी आणि तेही अहेवपणी, जणू तिने घेतलेल्या, सत्यवान सावित्रीच्या वश्याची सांगता झाली !

    -- उपेंद्र चिंचोरे
    19 june 16

      June 19, 2016


  • हौस – Part 1

    संध्याकाळची वेळ, बाहेर अंधारून आलेले. जोरात पाऊस पडेल अशी हवा. अशावेळी मला काम करायला खूप आवडते. उद्या कॉलेजमध्ये द्यायच्या लेक्चरची तयार करत होतो.

      March 19, 2022


  • कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – ३

    पुण्यातील एकेकाळच्या प्रसिद्ध “अमृततुल्य ची जागा जशी ” सायबा,येवले “अशा चेन्सने घेतली तसे आमच्या शिकवणी वर्गांच्या जागी कोचिंग क्लासेस आले. महाराष्ट्रात “चाटे ” निघाले सर्वप्रथम या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर पाऊल टाकणारे आणि त्यानंतर आता गल्लीबोळात त्यांच्या आवृत्त्या आहेत.

      October 15, 2021


  • मी पाहिलेला होक्काइदो – दाइसेत्सुझान (जपान वारी)

    होक्काइदो मधील पर्वतांची दुनिया ! जपानमधील सर्वात मोठे नॅशनल पार्क म्हणून प्रसिद्ध असणारे हे दाइसेत्सुझान. साधारण २ हजार मीटर (६६०० फूट) पेक्षा जास्त उंच भव्य बर्फाच्छादित पर्वत (Great Snowy Mountains) येथे पाहायला मिळतात.

      June 25, 2020


  • जोशीबुवा मासिकवाले

    २००० सालापासून डिजीटल तंत्रज्ञान आले. इंटरनेटमुळे पाहिजे तो संदर्भ सेकंदात मिळू लागला. जगातील कोणत्याही चित्रकाराची माहिती, चित्रं सहज उपलब्ध होऊ लागली, डाऊनलोड करता येऊ लागली. परिणामी जोशी बुवांचा व्यवसाय कालबाह्य झाला.

      November 7, 2021


  • आडदांड, धटिंग पण- “आपला माणूस !”

    विजया मेहेतांच्या विद्यापीठातील हा आज्ञाधारक विद्यार्थी ! त्यांच्याबरोबर तो “हमीदाबाईची कोठी ” मध्ये दिसला. नंतर पाहिलं बालगंधर्वच्या “पुरुष ” मध्ये- रीमा बरोबर ! याच्या यशाची कमान सतत चढती. सिनेमातही अमिताभ (कोहराम), राजकुमार (तिरंगा) वगैरे तोडीसतोड दिसला. अगदी अलीकडच्या “काला” मध्ये दक्षिण दैवत -रजनीकांत बरोबर कोठेही कमी नाही. स्वतःची अटीट्युड, स्वतःच्या अटी ! मोकळाढाकळा, मध्यंतरी VJTI मध्ये तरुण पिढीशी निवांत गप्पा मारणारा, at ease – पायजमा /झब्बा या मराठी पोषाखाची लाज न बाळगणारा.

      April 2, 2022


  • संघर्ष यात्रा

    डॉ. अनुराधा यांना आज जिवन सार्थकी झाल्याचे समाधान वाटत होते. त्यांच्या दोन्ही मुलांचे विवाह होऊन ती आता त्यांच्या जिवनात रमणार होती. मोठा मुलगा अमीत एम. डी. झाला होता व त्याने स्वताचे स्वतंत्र हॉस्पिटल सुरू केले होते. त्याने स्वतः मुलगी निवडली होती. तिही डॉक्टर होती. डॉ. अनुराधानी मागच्या वर्षी मोठ्या ऊत्साहात मुलगा अमीत व अनुपमा यांचा विवाह केला होता. दोघांचा संसार सुखात सुरु होता. अमीत व अनुपमाचे हॉस्पिटल सुध्दा आता हळूहळू प्रसिद्ध होत होते. धाकटी मुलगी अर्पिताने आपले ईंजीनिअरींगची मास्टर्स डिग्री पुर्ण करुन एका मोठ्या कंपनी मधे नोकरी सुरू केली होती. डॉ. अनुराधा यांना आता कधी एकदा अर्पीताचे लग्न करुन लवकरात लवकर जबाबदारीतुन मुक्त होऊ असे झाले होते. त्यामुळे त्यांनी अर्पीताच्या पसंतीने मुलगा पसंत केला होता. आकाश एक हुशार व कष्टाळू मुलगा होता. अत्यंत कठीण परिस्थितीत त्याने आपले शिक्षण पुर्ण केले होते. दोघेहि एकमेकांना अगदी अनुरूप होते. डॉ. अनुराधांनी अत्यंत आनंदाने दोघांच्या विवाहास अनुमती दिली होती.

    आज अखेर तो दिवस ऊजाडला होता. डॉ. अनुराधांची अनेक वर्षाची तपश्र्चर्या पुर्ण होत होती. घरात सर्व पाहुणे मंडळी आल्यामुळे ऊत्साहाचे वातावरण होते. मुलगा अमीत व अनुपमा सर्व पाहुण्यांची आस्थेने चौकशी करून त्यांना काय हवं नको ते बघत होते. सकाळी ११:१५ चा मुहूर्तहोता. त्यामुळे सर्वजण आवरून लग्नहॉल कडे निघाले होते. सर्वांनाच सोईस्कर म्हणून दोन मोठ्या गाड्यांची व्यवस्था केली होती. घरातील सर्व नातेवाईक व ईतर स्नेही गाड्यांमधून हॉलकडे रवाना झाले. त्यांच्या सोबत स्वतः सुनबाई अनुपमा हॉलवर गेली. आता घरी फक्त स्वतः डॉ. अनुराधा मुलगा अमीत व नवरी मुलगी अर्पीता राहिले होते. शेवटची आवराआवर करून अनुराधाबाईंनी देवासमोर समई लावली व त्या दोन मिनीटे हात जोडून शांतपणे ऊभ्या होत्या. त्यांनी आज आवर्जून त्यांच्या लग्नातली पैठणी नेसली होती. तेवढ्यात अमीत त्यांना हाक मारत आत आला. शेवटी आता त्यालाही रहावले नाही व तो म्हणाला आई अग आजतरी बाबा येतील का ग? तु अशी किती दिवस वाट पहाणार आहेस? अनुराधाबाई म्हणाल्या आजतरी त्यांनी यावे अशी देवाकडे मागणी केली आहे. मला खात्री आहे जरी त्यांना आज यायला जमले नाही तरी ते एकनाएक दिवस निश्चित येतील. यावर अमीतने काहीही प्रतिसाद न देता आईकडे फक्त शांतपणे बघीतले व चल आता लवकर ऊशीर होतोय असे म्हणून तो बाहेर आला. त्याच्या पाठोपाठ अनुराधाबाई बाहेर आल्या व मुलीसह कारमध्ये बसुन लग्न हॉलकडे रवाना झाल्या.

    लन हॉल नातेवाईक व मित्र मंडळींनी गच्च भरला होता. जो तो डॉ. अनुराधा यांचे कौतुक करीत होता. पण प्रत्येक जण म्हणत होता की आजच्या दिवशी तरी डॉ. अनिरुद्ध येतील असे वाटत होते पण अजून तरी तो योग आलेला नाही. अजून किती वर्षे परमेश्वर डॉ.अनुराधांची परीक्षा पहाणार आहे कोणास ठाऊक. पण अनुराधा बाईंच्या धेय्यनिश्र्ठेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पतीची एकनिश्र्ठेने वाट पहात त्यांनी आपले सासू सासरे यांची शेवटपर्यंत चांगली सेवा केली. लहान मुलांना स्वतःच्या हिमतीवर मोठे केले. चांगले ऊच्च शिक्षण देउन सुसंस्कारित केले. त्याच बरोबर त्यांनी डॉक्टर झाल्यावर मनाशी जे गरीबांची सेवा करण्याचे धेय्य ठेवले होते त्यात कोणत्याही कारणास्तव बदल केला नाही.आजची लग्नसमारंभातील लहान थोर तसेच त्यांच्या सामाजिक कार्याचे प्रतीक असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आमलपूर या छोट्याशा गावातील घरटी माणूस लग्नासाठी ऊपस्थीत होता. एवढ्यात हॉलबाहेर एक भारतीय लष्कराची जीप ऊभी राहीली व एक लष्करी वेशातील अधिकारी बाहेर आले. डॉ. अनुराधांनी पुढे येऊन त्यांचे स्वागत केले व त्यांची मुलगा अमीत व सुनबाई अनुपमाची ओळख करून दिली. अनुप हे कर्नल दिपक मिश्रा, तुझ्या बाबांचे जिवश्र्च कंठश्र्च मित्र. दोघांनी एकाच वेळी लष्करी सेवा सुरु केली होती. एवढे बोलून त्या ईतर पाहुण्यांकडे वळल्या. डॉ. अमीतला चैन पडत नव्हते तो कर्नल मिश्रा याचेशी बोलत होता. शेवटी न रहावून त्याने विचारले अंकल क्या आपको लगता है की पापा वापस आ पायेंगे? यावर कर्नल मिश्रा डोळे मिटून म्हणाले भगवानपर भरोसा रखो सब ठिक होगा. एवढ्यात कोणीतरी हाक मारल्याने अमीत तिकडे गेला. पण कर्नल मिश्रा यांना चष्म्यातून सुध्दा आपल्या डोळ्यातील पाणी लपवताआले नाही.तिकडे लग्नाचे विधी पुर्ण होत आले होते. बरोबर ११:१५ वाजता गुरुजींनी मंगलाक्षता सुरु केल्या. नवरा नवरीनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातले व विवाह विधी संपन्न झाला. अनुप व अनुपमा सर्व पाहुणमंडळीना भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी आग्रह करत होते. ईकडे कर्नल दिपक अनुराधा बाईंची भेट घेण्यासाठी त्यांना हुडकत होते. आसपास कोणी नाही याची खात्री करून त्यांनी अनुराधा बाईंना हाक मारली भाभीजी शादी बहूत बढीया हो गयी. क्या अब हम कुछ देर बातचीत कर बैठ सकते है. एवढ्यात गुरुजीनी अनुराधा बाईंना हाक मारली. त्यामुळे त्या कर्नल दिपक यांची क्षमा मागून ऊठल्या व जाता जाता त्यांनी कर्नल दिपक यांना भाईसाब अगर हो सके तो कल सुबह घर आ जाना कल हम बच्चोंके साथ बैठकर बातचीत करेंगे. यावर कर्नल दिपकनी ठिक है मै सुबह घर आत हूँ असे म्हणून ते हॉलमधून बाहेर पडले. सर्व लोकांनी भोजन घेतल्या नंतरनवर नवरी व आई वडील अशी खाशी पंगत बसली. सर्व एकमेकांना आग्रह करत हसत खेळत भोजन करीत होते. भोजन ऊरकल्यावर सर्वांनी एकमेकांना आहेर केला. शेवटी जड अंतकरणाने साश्रू नयनांनी अनुराधा बाईंनी लेकीला निरोप दिला. सर्व पाहुणे गेल्यावर अनुराधा बाई मुलगा व सुन याचेसह घरी आल्या. सर्वच जणांची दमणूक झाल्याने सर्वांना कधी अंथरुणावर पाठ टेकू असे झाले होते. अनुराधा बाईंनी मुलगा व सुनेस सर्व नातेवाईकांची व्यवस्था बघण्यास सांगीतले व त्या त्यांच्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेल्या.

    अनुराधाबाई आत येऊन बेडवर जाऊन शांतपणे पडल्या. लेकीच्या लग्नाच्या जबाबदारीतून मोकळे झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. नेहमी प्रमाणे त्यांनी डायरी लिहायला घेतली. आज त्यांना अनिरुद्धची आठवण दाटून आली. डायरीची पाने वाऱ्याने ऊडत होती. डायरीची पाने वाचता वाचता अनीरुध्दच्या आठवणीने डोळ्यातून अश्रुधारा वहात होत्या. न राहवून त्या ऊठल्या वकपाटातून अनिरुद्ध बरोबरचा लग्नाचा अल्बम पाहू लागल्या त्याच वेळी अल्बम मधून एक पत्र व एक टेलीग्रामचा कागद खाली पडला. ते पाहताक्षणी अनुराधा बाईंच्या डोळ्यासमोर सर्व भूतकाळ ऊभा राहिला व एक एक प्रसंग त्यांच्या मनात रुंजी घालू लागला.

    आज अनुराधा एकदम जाम खुष झाली होती. इंटर सायन्सचा रिझल्ट लागलाहोता व ती विशेष प्राविण्यासह ऊत्तीर्णझाली होती. त्याच बरोबर ती आवडीच्या पीसीबी ग्रुपमधे ती कॉलेजमधे प्रथम आली होती. तिला आता तिच्या आवडीच्या बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये निश्र्चीत प्रवेश मिळणार होता. दुसरे दिवशी सकाळी लवकर ऊठून तिने पटकन स्वतःचे सर्व आवरुन पुणे स्टेशन बस पकडली. केव्हा एकदा कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेऊ असे तिला झाले होते. बसमधुन ऊतरुन ती जवळजवळ धावतच कॉलेजमध्ये आली. सकाळची ११ ची वेळ व प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होती. रांगेत दोन तास थांबल्यावर तिचा नंबर आला तिने प्रवेश अर्ज व माहिती पत्रक घेतले व फॉर्म भरणेसाठी ती एका मोकळ्या टेबलपाशी जाऊन बसली. कॉलेजमधील गर्दी मुळे तिला थोडे भांबावल्या सारखे झाले होते. फॉर्म कसा भरावा कायकाय माहिती लिहायची हा सर्व ती परत परत वाचत होती. व तिचा हा थोडासा गोंधळ तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. एवढ्यात पाठीमागून, एक्सूज मी एनी प्रॉब्लेम असा आवाज आला. अनुराधाने वळुन बघितले तर एक रुबाबदार तरुण तिला विचारणा करीत होता. आपण, एवढे बोलून पुढे बोलणार एवढ्यात त्या तरुणाने आपली ओळख करून दिली. मी अनिरुद्ध जोशी मी येथे एम. बी. बी. एस. च्या तिसऱ्या वर्षांत आहे. मी आपणास काही मदत करु शकतो का? अनुराधाला कोणी तरी मदतीला आहे म्हणल्यावर थोडासा धीर आला. अनिरध्दने तिला फॉर्म भरण्यासाठी व्यवस्थित माहिती दिली. त्याप्रमाणे तिने फॉर्म भरून दिला.तिला मिळालेले गुण विचारात घेता तिला प्रवेश मिळण्याची खात्री होतीच. त्यानंतर अनिरुद्धचे आभार मानून ती घरी आली. अपेक्षेप्रमाणे तिला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला व तिचे कॉलेज रुटीन सुरु झाले. मुळातच हुशार व प्रत्येक गोष्ट मन लाऊन करण्याच्या सवयी मुळे कॉलेजमध्ये ती सर्व प्राध्यापकांची आवडती विद्यार्थीनी बनली होती. कॉलेजचे दिवस झपाट्याने पुढे जात होते व तिची अनिरुद्ध बरोबरची मैत्रीही तशीच दिवसेंदिवस बहरत चालली होती. त्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपांतर व्हायला लागले होते. तिच्या मनाने तर केंव्हाच कौल दिला होता पण अनीरुध्द बरोबर स्पष्टपणे बोलणे न झाल्याने तीला थोडी धास्ती वाटत होती. अनीरुध्दचे हे शेवटचे वर्ष होते व पुढील वर्षी तो कॉलेज सोडून जाणार होता त्यामुळे लवकरात लवकर त्याच्याशी बोलून आपले मन मोकळे करण्याची तीला घाई झाली होती. पण तो समोर आला की तिचे अवसान गळायचे व त्याला काही विचारायचे तिचे धाडस व्हायचे नाही. आज सकाळी कॉलेजमध्ये आल्यानंतर बरीच मुले, मुली नोटीसबोर्ड पशी जमा झाली होती व सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता. अनुराधा ऊत्सुकतेने नोटीसबोर्डकडे वळली. या वर्षी शैक्षणिक सहल बंगलोर येथे जाणार होती व त्यासाठी नावनोंदणी करण्यासाठी नोटीस लावण्यात आली होती. सहलीसाठी टिम लिडर म्हणून सर्वांचा आवडता विद्यार्थी अनिरुद्ध सहभागी होणार होता. अनुराधाने हि संधी सोडायची नाही असे ठरवले व काही करून आपण या चार दिवसांत आपल्या मनातील भावना अनिरुद्ध पर्यंत पोहोचवायच्याच अशी खुणगाठ मनाशी बांधली. सहलीचा दिवस केव्हा ऊजाडतोय असे तिला झाले होते.

    शेवटी एकदाचा तो दिवस ऊजाडला व सर्वजण स्पेशल लक्झरी बसने बंगलोरला रवाना झाले. संपुर्ण रात्र प्रवास झाल्याने सर्वजण खुपच कंटाळले होते. त्यामुळे सर्वचण निवांत ऊठून आवरून जेवणासाठी १२ वाजता जमले. अनिरुद्धने सर्वांना आजचा दिवस कोणताही प्रोग्रॅम नसल्यामुळे आपण आपल्या आवडीनुसार भटकंती करून शॉपिंग करुन घ्या असे सांगितले व ऊद्या आपण येथील मेडिकल कॉलेजमध्ये भेट देऊन तेथील प्राध्यापक व विद्यार्थ्याशी संवाद करून आपले काही प्रश्न शंका याचे समाधान करणे व विचारांचे आदानप्रदान करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वांनी संध्याकाळ आपापल्या आवडी प्रमाणे फिरण्यात व शॉपिंगची धमाल करण्यात घालवला. दुसरे दिवशी सर्वजण सकाळी ९ वाजता आवरून कॉलेजला भेट देण्यासाठी तयार झाले होते. अनिरुद्ध यापूर्वी एकदा येथे येऊन गेल्याने त्याची तेथील काही विद्यार्थ्यांशी चांगली मैत्री होती. तसेच कॉलेजमधील बऱ्याच प्राध्यापकांची वैयक्तिक ओळख होती. त्यामुळे त्याने स्वत: पुढाकार घेऊन सर्वांची तेथील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांबरोबर ओळख करून दिली. संपुर्ण दिवस कसा व कुठे संपला हे कोणालाही कळले नाही. लॉजवर आल्या आल्या अनिरुद्धने ऊद्या आपण येथील स्थानिक प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार असून ऊद्याची संध्याकाळ आपण प्रसिद्ध लालबाग बोटॅनिकल गार्डन येथे घालवणार असल्याचे जाहीर केले.दुसरे दिवशी सर्वजण आवरून सकाळी ९ वाजता तयार होते. माहिती साठी एक लोकल गाईड बरोबर घेतला होता. दिवसभर त्याचे सुचनेनुसार शहरातील विविध प्रेक्षणिय ठिकाणी भेट देऊन सायंकाळी ठिक ५ वाजता सर्व जण लालबाग येथे पोहोचले. प्रत्येक जण आपल्याला ईच्छे नुसार बागेत फिरून आनंद घेत होता. थोडा वेळ फिरून अनुराधा एका झाडाखाली येऊन बसली थोड्या वेळाने अनिरुद्ध फिरत फिरत तेथे आला. काय कंटाळलात काय, अनिरुद्धने विचारले. नाही तसे नाही अशीच निवांत आकाशातील विविध रंग व पक्षांचे आवाज ऐकण्यात बसले. नंतर अनिरुद्ध हि तेथेच जवळ बसून गप्पा मारु लागला. शेवटी न राहवून तिने विचारले. अनिरुद्ध मला आपणास थोडे विचारायचे होते, विचारु का? यावर थोडावेळ शांतपणे तिच्याकडे पहात तो म्हणाला. अनुराधा तुला काय विचारयचे ते विचार मनात कोणताही आडपडता ठेऊ नकोस. अनिरुद्ध आपण मला खुप आवडता व माझे आपणावर खुप प्रेम आहे. हे बोलताना सुध्दा अनुराधाचे डोळे पाण्याने भरुन आले होते. हे ऐकुन तिच्याकडे पाहून एक स्मितहास्य देत अनिरुद्धने मी हे खुप दिवसां पासून ओळखून आहे, तसेच मलाही तुम्ही मनापासून आवडला आहात असे सांगितले. त्यानंतर दोघेही बराच वेळ गप्पा मारत बसले. शेवटी लग्नाचा विषयांवर अनिरुद्ध थोडा गंभीर झाला. अनुराधा मलाही तुझ्याबरोबर लग्न करण्यात खचितच आनंद झाला असता पण माझे आयुष्य मी वेगळेपणाने जगण्याचे ठरवले आहे आणी ते तितके सुखावह असणार नाही याची मला खात्री आहे त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करून तुझ्या आयुष्यात त्रास निर्माण करावा असे मला वाटत नाही. त्यावर तिने खोदून विचारल्यावर मी मेडिकल शिक्षण पुर्ण होताच भारतीय लष्करात भरती होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तु माझ्याशी लग्न करण्याचा विचार सोडून तुझे करीअर कर असे सांगितले. त्यावर माझा निर्णय पक्का आहे माझेही एक धेय्य आहे व ते साध्य करीत असताना मलाही व माझ्या जोडीदाराला थोडा त्रास होणारच आहे. त्यावर तिच्या भावी योजनांबद्दल विचारता मेडिकल शिक्षण पुर्ण झालेवर मी पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात मेडीकल व्यवसाय सुरु करणार नसून रत्नागिरी जिल्ह्यातील आमचे मुळ गावी सुरू करुन माझ्या गावातील लोकांची सेवा हेच माझे धेय्य आहे असे सांगितले. नंतर दोघेही बराच वेळ गप्पा मारत बसले. दोघांच्या आवडी निवडी तसेच विचार जुळत असल्याचे लक्षात आले. अनिरुद्ध तिला त्यांच्या लष्करी पेशातील धोका समजावून तिने आपल्या बरोबर लग्न करण्याचा विचार सोडून द्यावा हे समजाऊन सांगत होता. पण अनुराधा स्वतःच्या विचाराशी व निर्णयाशी ठाम होती. शेवटी ती म्हणाली एक तर तुझ्याशी लग्न करीन नाहीतर कोणाशीही नाही. माझे धेय्य ठरलेले आहेच. त्यातच मी माझे पुर्ण आयुष्य व्यतीत करीन. शेवटी अनिरुद्धला माघार घ्यावी लागली व तिचे शिक्षण पुर्ण होताच दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. ट्रिपवरुन घरी परत येताना अनुराधा एकदम खुषीत होती. बरेच दिवसतिने पाहिलेले स्वप्न साकार होणार होते. घरी आल्यावर तिने आई वडिलांना हि बातमी दिली. डॉक्टर जावई व तो सुध्धा स्वजातीतला त्यामुळे त्यांच्या साठीही ही आनंदाची बातमी होती. वडिलांनी त्याची आवश्यक माहिती म्हणजे आई वडील काय करतात गाव कोणते ईत्यादी जुजबी माहिती विचारली व आनंदाने लग्नाला संमती दिली. एम.बी.बी.एस.चा रिझल्ट लागला व अनिरुद्ध त्याने ठरविले प्रमाणे लष्करात रुजू झाला. ईकडे अनुराधाचे शिक्षणचालू होते. आता तिला पदवी मिळण्यास अजुन दोन वर्ष अवधी होता. अनिरुद्ध १५ दिवसातून फोन करत होता. बाकी अन्य संपर्काचे काही साधन नव्हते. त्यामुळे अनुराधा त्याच्या फोनची वाट बघत असायची. लष्करी शिस्तीमुळे अनुराधाला वारंवार फोन करणे शक्य होत नव्हते.अशीच दोन वर्ष संपली व अनुराधा तिची एम.बी.बी.एस. परिक्षा प्रथम श्रेणीत ऊत्तीर्ण झाली. घरातील सर्व आनंदात होते. आता लवकरच अनिरुद्ध बरोबर लग्न होणार म्हणून अनुराधाही एकदम खुष होती. ही बातमी केव्हा एकदा अनिरुद्धला सांगू असे तिला झाले होते. रात्री अनिरुद्धचा फोन आल्यावर तिने त्याला ही बातमी दिली. दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या व मी पुढच्या महिन्यात एक महीना रजा घेऊन येत असून आपण लग्न करु असे सांगितले. त्याप्रमाणे अनिरुद्ध एक महिन्याची रजा घेऊन आला. दोन्ही कुटुंबातील प्रमुख व्यक्ती एकत्र येऊन लग्नाची तारीख व ईतर सर्व गोष्टी ठरवल्या. एकच महिना असल्याने हॉल ठरवणे, निमंत्रण पत्रिका पाठवणे,कपडे खरेदी, या साठी सर्वांची खुप धावपळ झाली. पण दोन्ही कुटुंबानी एकत्र येऊन सर्व प्रकारची कामे मोठ्या ऊत्साहात पुर्ण केली व एक शुभ दिनी अनिरुद्ध व अनुराधा विवाहबध्द झाले.एक महिना अनुराधा बरोबर व्यतीत करुनअनिरुद्ध पुन्हा आपल्या लष्करी सेवेत रुजू झाला.

    दिवस भराभर जात होते. अनुराधाने पदवी नंतर स्त्रीरोग विषयासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता. दोघांचे वैवाहिक जीवन आनंदमय झाले होते. एम.डी. पुर्ण होईपर्यंत मुलांचा विचार करायचा नाही असे दोघांनी ठरवले होते. दोन वर्षांत अनुराधा एम.डी. पुर्ण करुन तिने तिच्या इच्छेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या गावी व्यवसायास सुरुवात केली. तिचा मनमिळाऊ स्वभाव, वैद्यकीय व्यवसायातील कौशल्य यामुळे तीची एक उत्तम स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आसपासच्या गावात प्रसिद्धी झाली होती. त्यानंतर वर्षभरात आमीतचा जन्म झाला. अनिरुद्ध त्याला फार रजा नसल्याने आठ दिवस येऊन भेटून गेला. हॉस्पिटलचा पसारा दिवसेंदिवस वाढत चालला होता त्यामुळे अनुराधाचा बराच वेळ हॉस्पीटल मध्ये जात होता. तिकडे सिमेवर युध्दाचे ढग जमू लागले होते. पूर्व बंगाल मधे पाकिस्तानी सैन्याचे अत्याचार वाढले होते. डॉ. अनिरुद्ध घरी आले होते पण कोणत्याही क्षणी त्यांना परत जावे लागणार होते. ईकडे अनुराधाचे दुसरे बाळंतपण जवळ आले होते. स्वतः डॉक्टर असला तरी अनिरुद्ध सुध्दा काळजीत होता. शेवटी त्याला जी शक्यता वाटत होती तसेच घडले पाकिस्तान बरोबर युध्दाची घोषणा झाली. सर्व सैनिकांच्या रजा रद्द करण्यात आल्या व अनिरुद्धला तातडीने हजर होण्याची तार आली. सर्व परिस्थिती समजावून सांगून त्याने अनुराधाचा निरोप घेऊन तो लगोलग पठाणकोटला रवाना झाला. अनुराधा बरोबर छोटा अमीत व डॉ. अनिरुद्धचे वडील एवढेच होते. त्यानंतर दोनच दिवसांत अनुराधाने एका गोड मुलीस जन्म दिला. अनिरुद्धला तारेनी बातमी कळवण्यात आली. युध्दामुळे त्याला केव्हा बातमी कळेल हे कुणालाही सांगता येत नव्हते. पण आठ दिवसांत अनिरुद्धचे पत्र आले. त्यात त्याने तिचे अभिनंदन करुन युध्द संपताच येत असल्याचे कळवले होते. तसेच युध्दात काही बरेवाईट घडल्यास धिराने परिस्थितीला तोंड देउन वडिलांची काळजी घेण्याची विनंती केली होती. पंधरा दिवसांनी युध्दबंदीची घोषणा झाली. त्यामुळे अनुराधाला कधी एकदा अनिरुद्धला डोळेभरुन पाहीन असे झाले होते. मुलगी दोन महिन्याची झाली होती त्यामुळे तिचे बारशाच्या कार्यक्रम ठरविला होता. बारशाला नातेवाईक व मित्रमंडळी हजर होती. जेवणाची पंगत सुरु होती व तेवढ्यात पोस्टमन तार घेऊन आला. अनुराधा लोकांना पंगतीत लोकांना वाढण्यात व्यस्त असल्याने अनिरुद्धच्या वडिलांनीच तार घेतली व वाचून खिशात ठेवली .अनुराधाने पोस्टमन येऊन गेल्याचे पाहिले होते पण पाहुण्यांच्या गडबडीत तिलाही सासऱ्यांबरोबर बोलायला वेळ नव्हता.संध्याकाळी घरीआल्यावर तिला आठवण आली व ती सासऱ्यांना विचारणार एवढ्यात अनिरुद्धचे वडील तिथे आले व म्हणाले तुला गडबडीत सांगायचे राहिले दुपारी पोस्टमन येऊन तार देऊन गेला.अनिरुद्धचा जरा प्रॉब्लेम्स झालाय युध्दात त्यांना घेऊन जाणारे विमान भरकटलेय व लष्कराकडून शोध चाललाय पण अजून काही तपास लागला नाही. बातमी ऐकून अनुराधाच्या डोळ्यासमोर एकदम अंधारी आली ती खाली कोसळणार पण अनिरुद्धच्या वडिलांनी तिला सावरले तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला सावध केले व म्हणाले सुनबाई अधी पाणी पी अग तस काळजीच कारण नाही लष्कराकडून शोध चाललाय व लवकरच अनिरुद्ध परत येईल. मीही त्याच्या मित्राला फोन करुन माहिती घेतो. त्यानंतर महिनाभर काहीच हालचाल नव्हती अनिरुद्ध बाबत काहीच माहिती कळत नव्हती. एक दिवस सकाळी लष्करी जीप दारासमोर येऊन थांबली. त्यातून एक लष्करी अधिकारी समोर येऊन ऊभे राहिले. अनिरुद्धच्या वडिलांनी त्यांचे स्वागत केले. मी दिपक मिश्रा त्यांनी आपली ओळख करुन दिली. अनुराधाने त्यांच्यासाठी चहा आणला व ती तेथेच ऊभी राहिली. एक गंभीर गोष्ट सांगण्यास मी येथे आलोय अनिरुद्ध पाकिस्तान लष्कराच्या तावडीत सापडलाय व त्याला युध्दकैदी म्हणून पाकिस्तान लष्कराने कैदेत ठेवले आहे. आता युध्द संपले आहे व त्यामुळें युध्दकैद्यांच्या अदलाबदली बाबत चर्चा सुरू होईल व अनिरुद्ध लवकरात लवकर घरी येईल. दिपक मिश्रा यांच्या बोलण्याने अनुराधाला थोडा धीर आला. अनिरुद्ध लवकरच घरी येईल अशी सर्वांना खात्री होती.

    दिवस भराभर जात होते पण अनिरुद्ध परत येण्याची काही चिन्हे नव्हती. हळूहळू मुले मोठी होत होती. एक दिवस अचानक अनिरुद्धच्या वडिलांना जोरात ह्रदय विकाराचा झटका आला व तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. तेथील तज्ञ डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. अनिरुद्धच्या वडिलांनी अनुराधाला दिपक मिश्रा यांना लगेच बोलवून घेण्याचा आग्रह
    धरला होता. अनुराधाला कळत नव्हते की त्यांनी दिपक मिश्रा यांना कशासाठी बोलावले असेल. दुसऱ्या दिवशीच दिपक मिश्रा हॉस्पीटलमधे भेटण्ण्याया साठी आले.अनिरुद्धच्या वडिलांची अवस्था पाहून त्यांचे डोळे भरुन आले होते. हॉटेलमधील रुममधे अनुराधा व दिपक मिश्रा यांचे शिवाय अन्य कोणी नव्हते. अनिरुद्धचे वडील अनुराधाला म्हणाले, सुनबाई येथे माझ्या जवळ बैस तुझ्याशी जरा महत्त्वाचे बोलायचे आहे. बोलताना त्यांचे डोळे भरुन आले होते व शब्दही फुटत नव्हता. अनुराधा आपला अनिरुद्ध आपल्याला सोडून गेलाय. त्याला भारत पाकिस्तान युध्दातच विरमरण आले होते. ईतकी वर्ष मी हे मुद्दामच तुझ्यापासून लपवले होते व त्याला काही कारण होते. एक तर तू वयाने लहान होतीस तसेच मुलेही लहान होती. तुला विधवा स्त्री च्या रुपात पाहण्याची मी कल्पनाही करु शकत नव्हतो. हे सर्व दिपक मिश्रा यांनाही माहित होते व माझ्या मुळेच त्यांनी ही बाब कोणालाही कळू दिली नाही. मुले अजून शिकत आहेत त्यामुळे तू मला वचन दे की तू सुध्दा मुलांना ही बातमी ती मोठी होऊन मार्गी लागेपर्यंत देऊ नकोस. हे बोलत असताना त्यांनी अनुराधाचा हात हातात घेतला व एक कागद हातात दिला. तो कागद म्हणजे अनिरुद्धच्या म्रुत्युची बातमी देणारी तार होती जी ईतकी वर्ष त्यांनी सांभाळून ठेवली होती. अनुराधाने एकदा तारेतील ती दुःखद बातमी साश्रू नयनांनी वाचली व नजर वर करून पाहिलं तर अनिरुद्धच्या वडिलांनी आपली ईहलोकीची यात्रा केव्हाच संपवली होती. तिने दिपक मिश्रा यांच्याकडे पाहिले व त्यांना ही बातमी अशीच तुमच्याजवळ गुप्त ठेवा अशी विनंती केली. त्यांनीही त्याप्रमाणे बातमी गुप्त ठेवण्याचे वचन दिले. दिलेले वचन त्यांनी पाळले. अनुराधाने नेहमी प्रमाणे रुटीन चालू ठेवले व मुलांना आपले वडील हयात नाहीत याची पुसटशी सुध्दा जाणीवहोऊ दिली नाही.आज लेकीची पाठवणी केल्यवर त्यांना आपले कर्तव्य आपण पुर्ण केल्याचे एक आत्मीक समाधान वाटत होते. नेहमी प्रमाणे त्यानी आपली डायरी काढली व लिहायला सुरुवात केली.

    लग्नाच्या दगदगीने अनुप व अनुपमा जरा ऊशीराने ऊठले. अजून अनुराधाही ऊठलेली नव्हती. त्यांनी अंघोळ व चहापाणी ऊरकले. आता ९ वाजून गेले होते त्या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये जायचे होते म्हणून आईला सांगून बाहेर पडावे असा अनुप विचार करत होता तेवढ्यात दारावरची बेल वाजली. अनुपने दार ऊघडले तर दारात कर्नल दिपक मिश्रा आले होते. अनुपने हसून त्यांचे स्वागत केले. पाच मिनीटे त्यांची चौकशी करून त्यांना बसण्यास सांगत अनुपमा आईला सांगण्यासाठी गेली. अनुप व कर्नल दिपक हॉलमधेच गप्पा मारत होते तेवढ्यात अनुपमाची आई अशी जोरात किंकाळी ऐकू आली. अनुप व कर्नल दिपक धावतच बेडरूममध्ये गेले अनुपमा बेडवर बसली होती. अनुराधा डोळे मिटून शांत पडून होती. एका हातात अर्धवट ऊघडलेली डायरी होती. अनुपने पुढे होऊन नाडी बघीतली व शांतपणे डोक्यावर हात ठेवून तिथेच शेजारी बसला. डायरीची पाने वाऱ्याने फडफडत होती. अनुपने डायरी घेतली व वाचायला सुरुवात केली व एकदम शेवटच्या पानावर त्याची नजर गेली. त्यातील अनुराधाचे शब्द वाचून त्याचा ऊर अभिमानाने भरून आला व डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. अनुराधाने डायरीत लिहिले होते.

    प्रिय अनिरुद्ध तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे मी तुमच्या वडिलांची शेवटपर्यंत काळजी घेतली. बाबांनी तुमच्या मृत्यूची बातमी मला त्रास होऊ नये म्हणून शेवटपर्यंत मला कळू दिली नव्हती व मृत्यूसमयी मी हे मुलांनाही सांगू नये असे माझ्याकडून वचन घेतले होते व त्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे मी ही बाब दोन्ही मुलांपासून लपवून ठेवली.आज आता मी माझ्या सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त झाले आहे व त्यामुळेच मी ऊद्या मुलांना सर्व सत्य सांगणार आहेच. त्यासाठीच मी तुमचे मित्र कर्नल दिपक मिश्रा यांनाही सकाळी बोलवले आहे. काय दैवगती आहे बघा तुमच्या मृत्यूची बातमी मला त्रास होऊ नये व मुलांना पोरके वाटू नये म्हणून बाबांनी व तुमच्या मित्रानी लपवून ठेवली होती व बाबांनी त्यांच्या मृत्युसमयी मला सांगीतली ती खरेतर मला आधीच समजली होती. एकदा चुकून त्यांचे कपाट उघडले राहिले होते. मी बंद करायला गेले त्यावेळी तारेचा कागद तसाच एका पुस्तकात होता.मला तार आली त्यावेळीच शंका आली होती ती खरी ठरली होती.मी आहे तिथेच तो तारेचा कागद ठेवून दिला.त्यानंतर सुध्दा त्यांना कधीच मला हे सर्व माहिती असल्याची जाणीव होऊन दिली नाही. कारण मला दुःख होऊ नये यासाठी त्यांची धडपड व माझ्यावरील त्यांचे प्रेम यांचा त्यांना मिळणारा आनंद व समाधान मला हिरावून घ्यायचे नव्हते. आता सर्व जबाबदाऱ्यातून मी मुक्त झालेय. ऊद्या मुलांना सर्व गोष्टी उघड करुन तुमच्या भेटीला मी मोकळी असेन.
    सदैव तुमचीच
    अनुराधा.

    ***समाप्त***

    -- सुरेश काळे
    सातारा
    मो.९८६०३०७७५२

      August 31, 2018


  • नात्यांचा गेट – टू – गेदर

    आपल्या समाजव्यवस्थेत कुटुंब एक संस्था आहे. बहुतांश कुटुंबांचा प्रवास हा एकत्र कुटुंब पद्धतीपासून एकेरी कुटुंब पद्धतीकडे झालेला दिसून येतो. परंतु याचा अर्थ असा नाही कि वेगवेगळ्या नात्यांचे महत्व व त्यांचा आपल्या जीवनावरील प्रभाव नाहीसा झाला, नक्कीच त्यामध्ये कमी-अधिक बदल झाला असेल तरी त्याचे अस्तित्व अजूनही कायम आहे. आजच्या बदलत्या समाजव्यवस्थेत नात्यांच्या वेगवेगळ्या रंगांचा अनुभव घेयचाच असल्यास एखादा मोठा कौटुंबिक सोहळा किंवा कार्यक्रम सर्वात उत्तम जागा आहे. अश्या सोहळ्यांमध्ये आपण पूर्णपणे जागरूक अवस्थेत व विनोदबुद्धी दक्ष ठेवल्यास मानवी स्वभावाचे अनेक नाव-नवीन प्रकार अनुभवायास मिळतात.

    "तत्वज्ञानी नातेवाईक " या प्रकारातील लोक नेहमीच दुसर्यांना स्वतःचा कधी न मागितलेला सल्ला देण्यास तत्पर असतात . कोणत्याही गोष्टीत व कामात बारीक-बारीक चुका दाखवून आपले उच्च विचार मांडण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळ योग्यच वाटत असते, थोडक्यात सांगायचे म्हणजे या लोकांना वेळेचे भान नसते. यांची देहबोली देखील स्वभावाला पूरकच असते. विषय कोणताही असो राजकारण, अर्थकारण, देश, विदेश, विज्ञान इ.. प्रत्येक विषयात आपला सखोल अभ्यास असल्याचा गोड गैरसमज बाळगून आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीत उच्चतम शिखरावर ठेवणे हे यांचे वैशिष्ट्य, छंद म्हणाल तर युवकांना जबरदस्तीचे मार्गदर्शन करणे. अश्या लोकांना ऐकण्याची मज्जा वेगळीच असते परंतु एक ठराविक अंतर ठेवुनच.

    "जावई " नावाचा प्राणी, हा प्राणी दोन पायांचाच असतो, अगदी सर्वसाधारण माणसासारखाच दिसतो परंतु तरीही हा प्राणी पृथ्वी या ग्रहावरचा नसून बाहेरून आला आहे असा भास झाल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही. नातेवाईकांमध्ये हा प्रकार अतिशय मौल्यवान, नाजूक व जतन करून ठेवण्याचा असतो. कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात या प्राण्याच्या आजूबाजूला नेहमीच दोन-चार डोकी निव्वळ मनोरंजनासाठी व तोंडातून पडलेला शब्द झेलण्यासाठीच तत्पर असतात. यांचे झेलण्याचे अप्रतिम कौश्यल्य अर्थातच घरातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळेच लाभते. जावयाच्या प्रत्येक गोष्टीत होकार पुरवणे, उगाचच चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवणे, सतत आग्रह करणे अशी यांची काही ठराविक वैशिष्ठे यांमध्ये अढळतात. या प्राण्यासाठी एवढे करूनही नाराजी व्यक्त करणारी प्रजाती यात सापडते याचा खेद वाटतो.

    थोडंसं हटके बघितले तर पारिवारिक कार्यक्रमात आत अजून एक दुसरा कार्यक्रम शांतपणे सुरु असतो, तो म्हणजे "मुली-मुले दाखवण्याचा अघोषित कार्यक्रम" ज्या पालकांना आपल्या पाल्यांचा लवकरच बार उडवण्यानचा विचार असतो त्यांच्यासाठी तर हि सुवर्ण संधीच असते. यासाठी पद्धतशीरपणे पेहरावापासून ते चालण्या-बोलण्यापर्यंत नियोजन व रंगीत तालीम करून घेतली जाते, त्यासाठी पालकांकडून विशेष महत्वाच्या सूचना व मार्गदर्शन पुरवले जाते. बिचाऱ्या मुलं-मुलींची इच्छा नसली तरी जबरदस्तीने नटून-थटून, हसू येत नसेल तरी चेहऱ्यावर एक हलकासा हसरा भाव ठेवून बुजगावण्यासारखे मिरवावे लागते. काहींची तशी हौसदेखील असते, अशी मुले कार्यक्रमाचा आनंद लुटतात परंतु इच्छेविरुद्ध आलेल्यांची मनाची घुसमट समजण्याची पालकांनी तसदी घेणे थोडेसे मला तरी गरजेचे वाटते.

    एक खास वर्ग आपल्याला कोपऱ्या-कोपऱ्याने मिरवतांना, कुठेतरी लोकांपासून लांब शांत बसलेला आणि कधी येथून पाय काढता येईल याची संधी शोधणारा पाहावयास मिळतो. हा असतो "स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा वर्ग" डोक्यात एका बाजूला अभ्यास व परीक्षेचा सतत घोळणारा विचार व दुसऱ्या बाजूला नातेवाईकांचे येणारे तीक्ष्ण बाणासारखे प्रश्न यामध्ये हा पिसलेला असतो. लोकांची नजर चुकवून त्यांच्यापासून लांब राहणे हा या मुलांचा स्वभाव नसतो तर मजबुरी असते कारण यश-अपयश हा जरी शेवटच्या दिवसाचा निर्णय असला तरी तितपर्यंतचा प्रवास मोठा आणि कठीण असतो, तरी याचा काहीही विचार न करता काही लोक कळत-नकळत मुलांचा आत्मविश्वास कमी होईल असे बोलून त्यांचा हा प्रवास अजून कठीण बनवतात.

    आपण कधी-कधी सहजपणे म्हणतो कि काही लोक साखरेपेक्षाही गोड असतात, याचा संबंध त्यांच्या स्वभावाशी असतो. परंतु काही लोक फक्त तोंडावर बोलण्यापुरतेच गोड असतात ते नेहमीच तोंडात साखर ठेऊन बोलतात कि काय असे वाटते. असले नातेवाईक कार्यक्रमात फक्त स्वतःचे चाहते वाढवण्याच्या हेतूने मिरवत असतात. काहीही असो समोरून आपला गोडपण सोडायचा नाही असा पक्का निश्चय असतो. परंतु पाठीमागे दुसयांच्या नावाचे खडे फोडण्यात देखी यांचाच अव्वल क्रमांक असतो.

    एकीकडे रुसलेले चेहरे तर दुसरीकडे प्रफुल्लित हास्य, कुणीकडे नव्या नात्यांची सुरवात तर कुणीकडे जुन्या नात्यांची सावरासावर, एकीकडे भावनाशून्य मन तर दुसरीकडे भावनिक झालेले मन, एकीकडे नवीन वादांची सुरवात तर दुसरीकडे जुन्या वादांवर पांघरून असा हा नात्यांचा गेट-टु -गेदर रंगीबेरंगी व्यक्तिरेखांनी रेखलेला व असंख्य भावनांनी बहरलेला.

    -- विवेक विजय रणदिवे

      September 1, 2019


  • छोटा पेग

    मारुतराव चिकटे, वय अंदाजे चाळीस वर्षे, कोल्हापुरातल्या ‘चिकटे रेस्टॉरंट आणि बार’चे उंच पण तुंदिलतनु मालक. चिकटेमालक त्यांच्या ओळखीच्या मंडळीत सरनोबतवाडीतले मोठे ‘जबराट बिझनेसमॅन’ होते. बॉक-बॉक-बॉक-बॉक आवाज काढणाऱ्या बुलेट मोटरसायकलवरून ते रोज सकाळी आपल्या शेताकडे फेरफटका मारायला येत असत. त्यांच्या शेताला लागूनच एक छोटासा जमिनीचा तुकडा रखमाबाई सरनोबत ह्या सत्तरी गाठलेल्या, अंगाची धनुकली झालेल्या म्हातारीच्या मालकीचा होता. म्हातारीचं घरही त्या जमिनीवरच होतं. चिकटे मालकांचा डोळा होता त्या जमिनीवर. आजवर कितीदा तरी त्यांनी म्हातारीला पटवून जमीन विकत घ्यायचा प्रयत्न केला होता. पण म्हातारी बधत नव्हती. म्हणायची, “आरे बाबा, मी हितं, ह्या जमिनीवरच जलमले आणि ह्या जमिनीवरच राम म्हणणार आहे.” आज पुन्हा परत जाताना चिकटेमालकांनी त्यांची मोटरसायकल रखमा ‘आज्जी’ च्या घरासमोर थांबवली आणि उतरून घरात शिरले.

    रखमाआज्जी चाकूनं बटाट्याची सालं काढत बसल्या होत्या. चिकटेमालकांनी आज्जीच्या खांद्यावर थोपटलं आणि “काय आज्जी? कसं काय?” म्हणत तिथंच तिच्या शेजारी बसले.

    “चांगल आहे की बाबा.”

    “आज्जी, तू चांगलीच असतेस ग नेहमी. बरं वाटतं बघ तुला असं बघून.”

    “हय रे माज्या बाबा. आता तू कसं हाईस ते सांग.”

    “मी मस्त धडधाकट आहे बघ. नाही म्हणायला जरा गुढग्यात आखडल्यासारखं वाटतंय मधनं मधनं, तेवढंच.”

    “बरं हाये बाबा. असाच धडधाकट ऱ्हा.”

    आज्जी यापेक्षा जास्त काही बोलली नाही. तिच्या जवळच बटाटयांचा ढीग होता. ती एका हातानं खेकड्याच्या वाकड्या नांगीसारख्या बोटात बटाटा पकडून दुसऱ्या हातात धरलेल्या चाकूनं त्याची सालं सराईतपणे काढत राहिली. दोन कोंबड्या तिच्या अवतीभवती फिरत होत्या. आज्जीनं टाकलेल्या सालांपैकी एखादं साल टप् कन् चोचीत पकडून उगाचच कुणीतरी पाठी लागल्यासारख्या पंख फडफडवत पळत होत्या.

    चिकटेमालक थोडा वेळ चुळबुळ करत बसले आणि मग म्हणाले, “आज्जी, ऐक. एक बोलू का?”

    “काय रं बाबा? बोल की.”

    “मग काय? तू नाही विकणार तुझी ही जमीन मला? नक्की?”

    “तुला कितींदा सांगू रं माज्या पुता? न्हाई विकायची मी माजी ही जमीन. पुन्ना विचारू नकोस बग.”

    “बरं बरं. विकू नको. पण माझ्यापाशी एक नवीन आयडिया आहे. बघ तुला कशी वाटते ती. दोघांच्याही फायद्याची आहे. ऐक तर खरी!”

    “काय म्हन्तोस?”

    “तू जमीन मला विकायची, पण ती तुझ्यापाशीच राहील....... तू मरेपर्यंत. कळतय का? नाही? ऐक नीट. असं बघ. तू इथंच राहशील आत्ता राहतीस तश्शी. मी तुला दर महिन्याला तीनशे रुपये आणून देत जाईन. इथं, तुझा हातात. तू मस्त धडधाकट आहेस. आणखी वीस वर्षं तरी काय गचकत नाहीस. खरं का नाही? तोपर्यंत दर महिन्याला ३०० रुपये न चुकता तुला मिळत राहतील. काय? कळतंय का?”

    म्हातारीनं हातातला चाकू खाली ठेवला, डोक्यावरचा पदर सरकवून नीट केला आणि डोळे आणखीनच बारीक करून चिकटेमालकाकडं बघत राहिली. जरा वेळानं म्हणाली, “कळलं मला. पन् येक लक्ष्यात ठ्येव, माजी ही जमीन, नि ह्ये घर, मी तुला शाप्प विकनार न्हाई आनि मी हितनं कुटं जानार न्हाई.”

    “ऱ्हायलं की. मी कुठं तुला इथनं उठवायला लागलोय? आज्जे, तुझा नवरा मरून आज पंधरा वर्षं झाली. तुला ना मूल ना बाळ. भावाची दोन वाया गेलेली पोर आहेत पण ना ती तुला विचारत ना तू त्याना जवळ करत. मग तू मेल्यावर तुला ह्या जमिनीचा काय उपयोग? त्यापेक्षा आता मी तुला पैसे देतो ते तुझ्या कामाला तरी येतील. तू फक्त वकिलासमोर करारनाम्यावर सही करायची की तू मेल्यानंतर हा सगळं बारदाना चिकटेमालकांचा म्हणून. बस्स. मग तू जगशील तोपर्यंत तूच खा ह्या जमिनीतनं पीक काढून. मी नाही येणार मागायला. येणार तो फक्त तुला ३०० रुपये द्यायला, महिन्याच्या महिन्याला. कळतय का?”

    रखमाबाईचा विश्वास बसत नव्हता. पण तिच्या मनात थोडी चलबिचल व्हायला लागली होती हे खरं. ‘सौदा फायद्याचा वाटतो खरा. म्हणावं का हो?’ जरा वेळानं ते म्हणाली, “तू म्हंतोस त्ये बरूबर हाय, पन् मी ईचार करतो. टाईम दे थोडा. येक आटवडयानं ये परत. तवा सांगतो.”

    चिकटेमालक खूष होऊन उठले आणि जायला निघाले.

    रखमा आज्जीची झोपच उडाली होती. रात्रभर विचार करत राहिली. पुढचे चार दिवस सुध्दा ‘काय करावं? चिकट्याला हो म्हणावं का? की नको?’ ह्या उलाघालीतच गेले. पाचव्या दिवशी ती गावातल्या पाचपुते वकिलाकडं गेली सल्ला घ्यायला. पाचपुतेवकिलांनी ऐकून घेतलं आणि सल्ला दिला, “रखमाबाई, हो म्हणून टाका. अनमान करू नका. तुमचा फायदाच आहे यात. फक्त चिकट्याला म्हणाव तीनशे नाही, पाचशे दे दरमहा. तुमच्या जमिनीची किंमत आजच्या भावानं नव्वद हजारांच्या खाली नाही. पाचशे दरमहा दिले त्यानं आणि तुम्ही आणखी दहा बारा वर्षं जगलात तरी चिकट्याला ती पंच्याहत्तर हजाराच्या आतच मिळणार आहे. तो पण खूष होईल आणि तुमचा तर काय फायदाच फायदा.”

    आज्जी खूष झाली पाचपुते वकिलांचा सल्ला ऐकून. तरीही तिच्या मनात शंका येतच राहिल्या की ‘यात काही काळंबेरं नसेल ना? चिकटे तयार होईल का पाचशे रुपये द्यायला?’ अखेर बराच विचार करून तिनं वकिलांना सांगितलं करारनामा तयार करायला आणि मग घरी परतली. दुसऱ्या दिवशी जेव्हा चिकटे आले तेव्हा म्हातारीनं बराच वेळ मला विकायची नाही जमीन असं ताणून धरलं. पण मग जेव्हा सौदा हातचा जातोय की काय असं वाटायला लागलं तेव्हा मेहरबानी करत असल्याचा आव आणून म्हणाली, “तू काय माजा पिच्छा सोडीत न्हाईस. बssर, देतो तुला जमीन आणि ह्ये घर पन्. मातुर म्हैना पाचशे रूप्पय पायजेत. देतोस?”

    “आज्जे, का ओढून धरते आहेस? किती हाव करशील? चल्, साडेतीनशे देतो. बास?”

    “न्हाई रं माज्या सोन्या, आरं, ह्या जमिनीचीच किंमत येक लाखाच्या खाली न्हाई, आनि वर ह्ये घर! आरंss, मी कटाकटी पाच, न्हाई तर सा वरसं जगन. माजी तब्येत बगतूयास तू. म तुला किती सस्त्यात पडतोय वेव्हार बग की.”

    “तुला काय धाड भरलीय? चांगली शंभरी गाठशील तू. तुझ्या आधी मीच जाईन कदाचित.” चिकटेमालक म्हणाले.

    “नको रं माज्या पुता आसं वंगाळ बोलूस. औक्षवंत हो बाबा.” असं म्हणून आज्जीनं दोन्ही हातांची बोटं मोडून चिकटेच्या गालावरून ‘अला बला’ केली. चिकटे गहीवरले आणि त्यांनी पाचशे दरमहा द्यायचं कबूल केलं.

    “आनि वकिलाची फीसुद्दीक तूच भरायचीस बरं का! आदीच सांगतो. मागनं न्हाई म्हनू नकोस.” म्हातारीनं आणखी एक पाचर ठोकून खुंटा हलवून बळकट केला.

    करारनाम्यावर सह्या झाल्या आणि पहिले पाचशे रुपये म्हातारीच्या हातात पडले.


    तीन वर्षं झाली. पण म्हाताऱ्या रखमाबाईचं वय अगदी एका दिवसानंसुध्दा वाढलं असं दिसेना. रोजन् रोज तुकतुकीतच दिसायला लागलीय असं चिकटेमालकांचं मत व्हायला लागलं. त्यांचा धीर सुटायला लागला. त्यांच्या मनात आलं, ही तरणी म्हातारी अशीच पंधरा वर्षं जगली तर सौदा आपल्यासाठी आतबट्टयाचा होईल हे नक्की. पण काय करणार? बांधले गेलो आहोत ना करारानं! ते आता नेमानं रोजच म्हातारीच्या घराकडं जाऊन बघत. पहिला पाऊस कधी पडतोय ते बघायला शेतकरी जून महिन्यात रोज आभाळाकडं नजर लावतात की नाही? तसंच झालं त्यांचं. म्हातारी झोपडीच्या दारातून तिच्या लुकलुकत्या डोळ्यातलया धूर्त नजरेनं चिकटेमालकांकडं बघायची. तिला समजायचं की चिकटेमालकाच्या मनात आत्ता आपल्यासाठी ‘कधी मरणार ग तू थेरडे?’ हाच प्रश्न असणार.

    मग एक दिवस चिकटे त्यांची बॉक-बॉक फटफटी – बुलेट म्हातारीच्या दारात थांबवून आत शिरले. म्हातारीची चौकशी करून इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि खिशातून शंभर शंभराच्या पाच नोटा काढून तिच्या हातात देत म्हणाले. “आज्जे, अगं इतकी वर्षं झाली मी हॉटेल आणि बार उघडून पण तू एकदा सुध्दा आली नाहीस तिकडं. असं का? ये की एकदा. आपली मैत्री झाली आहे न आता? म माझ्याकडची मटणाची थाळी. खाऊन बघ एकदा. एकदम स्पेशल असते. घाबरू नको, मी काय पैसे घेणार नाही तुझ्याकडून. आज्जी आहेस तू माझी. पैसे कसे घईन? कधी येतेस? सांग मी येतो तुला न्यायला माझ्या बुलेटवरून.”

    “आरं लेकरा, ही रखमा कुणी बलिवल्याबिगर जाईत न्हाई कुटंबी. आता तू आज बलिवलंस, मं येतो की. परवाच्याला आईतवार हाय न्हवं? ते दिवशी येतो. यीऊ?”

    “ये. ये. रविवारी मी जरा बिझी असतो. पण माझ्या माणसाला पाठवतो मी संध्याकाळी तुला न्यायला.”

    रविवारी संध्याकाळी चिकटेमालकांनी हॉटेलातल्या गणपतला सरनोबातवाडीत रखमाबाईला आणायला पाठवलं. तोंडावर पदर घेऊन, बुलेटच्या मागच्या सीटवर दोन पाय दोन बाजूला टाकून बसलेल्या रखमा आज्जीला बघून चिकटेना खूप आनंद झाला. गल्ल्यावरून उठून त्यांनी दारात जाऊन प्रेमानं आज्जीला हाताला धरून आत आणलं. हॉटेल फिरून दाखवलं आणि मग स्पेशल रूम मध्ये नेऊन बसवलं. स्वत:ही तिच्यासमोर बसले. वेटरला बोलवून आज्जीसाठी स्पेशल मटन थाळी आणायला सांगितली. आग्रह करून तिला जेवायला लावलं. म्हातारी तशी रात्री कमी जेवणारी होती पण चिकटेमालकांचा आग्रह मोडायचा नाही म्हणून जरा जेवली.

    जेवण झाल्यावर चिकटेमालक म्हणाले, “आज्जी, बाहेर थंडी फार आहे न? आणि त्यात जेवण झाल्यावर तर जास्तच थंडी वाजते. काही गरम पिशील का?”

    आज्जी म्हणाली, “च्या? न्हाई र् बाबा. जेवल्यावर कुनी च्या पितंय व्हय रं?”

    “अगं चहा नाही. दारू म्हणतोय मी. आमच्याकडं देशी, फॉरेनची अशी सगळ्या प्रकारची दारू मिळते. बघ तर घेऊन.”

    “नको रं बाबा. माजा न्हवरा हुता तवा त्यानं एकडाव मंबईस्न येताना आणलाता येक खंबा. तवा प्येलेलो दोगबी. लई घुमलीती. त्यावर पुन्यांदा न्हाई प्येलो.”

    “अगं तेव्हा गावठी प्यालीस. आता जरा चांगली घेऊन बघ. काय घुमणार नाही. स्पेशल आहे.” असं म्हणून मालकांनी गणपतला हाक मारून डी एसपी ची बाटली आणि दोन ग्लास मागवले.

    गणपतनं सारं काही आणल्यावर मालकांनी दोन ग्लासात ती व्हिस्की ओतली. म्हणाले, “घे आज्जी. इतकीशीच तर दिलेय. ‘छोटा पेग’ म्हणतात याला. तुला आवडेल ही नक्की.”

    म्हातारीनं एक घोट सावकाश घेतला. मग जरा वेळानं दुसरा घेतला. चव आवडल्याचं दिसलं तिच्या तोंडावर. म्हणाली, “व्हय की रं बाबा. चांगली लागती. घुमत न्हाई. वत बरं आनि येक, छोटा पेग का काय म्हन्तुस त्ये.”

    “मग? मी म्हटलंच होतं तसं.” असं म्हणत त्यांनी ती नको म्हणत असताना दोघांच्याही ग्लासात फुल पेग व्हिस्की ओतली. आज्जीनं यावेळीपण चवीनं घुटके घेत घेत सावकाश ग्लास रिकामा केला.

    “बघ आज्जे. असं मजेत जगायला पाहिजे” म्हणत चिकटेमालकांनी तिसरा पेग ओतला. म्हातारी जेमतेम अर्धाच प्याली आणि तिनं ग्लास बाजूला सारला. आतापर्यंत चिकटे मालकांचीही जीभ जरा जड झाली होती आणि औदार्य वाढलं होतं. “हे बघ रखमा आज्जी. तुला ही दारू आवडली. आवडली की नाही? आं? होय नं? खरं बोल, मनापासून! मग मला पण समाधान झालं बघ. आगदी मनापासून. पण आता रात्र फार झालीय. तुला घरी जायला पाहिजे. कोंबड्या वाट बघत असतील तुझ्या. होय की नाही? बssर. नीघ आता. गणपत, आज्जीला नीट सांभाळून तिच्या घरी सोडून ये. आज्जे, तू माझी प्रेमाची आज्जी आहेस. उद्या तुला माझ्याकडून स्पेशल भेट घेऊन येतो मी बरं का. जा आता.” आज्जी गणपतबरोबर बुलेटवर बसून गेली.

    दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चिकटे रखमाबाईच्या घरी गेले तेव्हा त्यांनी बरोबर डी एस पीच्या दोन फुल बाटल्या नेल्या आज्जीला स्पेशल भेट म्हणून. म्हणाले, “आज्जी, बघ एक घोट घेऊन, तुला आवडली होती तीच, कालचीच, आहे का नाही ते.”

    आज्जी म्हणाली, “आरं उघड की बाबा. मला काय येतीय व्हय आसली बाटली उघडायला?”

    चिकट्यांनी एक बाटली उघडली, म्हातारीनं वास घेतला आणि म्हणाली, ‘व्हय की, कालच्यासारकीच हाय. पिनार का तू बी?” आणि तिनं दोन कप आणले आतनं. मग तिनं आणि चिकटेमालकांनी एक एक करत तीन तीन पेग रिचवले. त्यानंतर “आज्जे मला बास झाली. जायला पाहिजे मला आता. पण हे बघ, ह्या बाटलीत अजून उरली आहे थोडी. आणि दुसरी फुल्ल आहे. कधी वाटलं तर घेत जा. आणि संपली तर सांग. भीड बाळगू नको. आणखीन देतो तुला. आणि हे बघ, कुणाला सांगू नकोस ही दारू मी तुला देतो म्हणून. काय आहे, लोकं लागतील माझ्या मागं आम्हाला पण द्या म्हणत.” म्हणत चिकटेमालकानी निरोप घेतला.

    त्यानंतर चार दिवस चिकटे म्हातारीच्या घराकडं फिरकले नाहीत. पाचव्या दिवशी गेले तेव्हा म्हातारी भाकरी थापत होती. चिकट्यांनी विचारलं, “आज्जी, काय भाकरी करतेस होय?”

    “दिसत न्हाई व्हय रं तुला? आंदळा झालाईस?” आज्जी गुरकावली. चिकटे जरा जवळ गेले. म्हातारीच्या तोंडातनं भपकारा येत होता - व्हिस्कीचा.

    “आज्जी अगं चार दिवस झाले तुझ्या बरोबर प्यायला बसून. म्हटलं आज बसावं. आहे का शिल्लक घोटभर? नाहीनाही, नसेल तर काळजी करू नकोस. माझ्याकडं आहे बुलेटच्या डिक्कीत. आणतो मी.” चिकटेनी डिक्कीतून आणलेल्या दोन फुल बाटल्या म्हातारीला दिल्या. दोघांनी मग परत दोन दोन पेग चढवले आणि चिकटेमालकांनी निरोप घेतला आज्जीचा.

    हळू हळू आख्ख्या सरनोबतवाडीच्या लक्षात येत गेलं की म्हातारी दारू प्यायला लागली आहे म्हणून. कधी तिच्या चुलीपुढं तर कधी शेतात आणि नंतर नंतर रस्त्यावरसुध्दा नशेत पडलेली दिसायची म्हातारी. उचलून आणून ठेवायचे लोक तिला तिच्या घरात. चिकटेमालकानी तिच्या घरी वरचेवर जायचं सोडलं. महिन्यातून एकदा पैसे आणि ‘स्पेशल भेट’ देण्यापुरते जायचे. लोक म्हातारीतल्या बदलाविषयी सांगायचे तेव्हा म्हणायचे, ‘वाईट वाटतंय. या वयात तिनं असं दारूच्या आहारी जायला नको होतं. पण कुणी सांगायचं नि काय सांगायचं! एकटीच राहाते, विरंगुळा म्हणून ही वाट धरली असेल तिनं. कसंही असलं तरी एकंदरीत वाईटच. मरायची अशानं एक दिवस.”

    आणि एक दिवस खरंच रखमाआज्जी मेली. सहा महिने काढले असतील जेमतेम. पावसाळा सुरू झाला आणि एक दिवस तिच्या घराच्या पायरीवरच पडली. पडली ती एकदम निपचितच!. ज्यानं बघितलं तो उठवायला गेला तर तोवर कारभार संपलेला होता.

    मर्तिकाला चिकटेमालक गेले तेव्हा खिशातला कारारनाम्याचा कागद चाचपून बघत म्हणाले, “गेलेल्याबद्दल वाईट बोलू नये, पण म्हातारीला दारूच्या आहारी जायची अवदसा सुचली नसती तर कदाचित अजून दहा वर्षं जगली असती.”

    -- मुकुंद कर्णिक.

    दुबई

    karnik.mukund@gmail.com

    Whatsapp : +971505973810

      September 23, 2022


  • विश्वास

    सुनीताच्या चेहऱ्यावर मनातली खुशी तरळून गेली. विश्वास आत आला. पाठीवरची सॅक हातात घेतली. कुठे बसावे हे न कळल्यामुळे तो तसाच उभा राहिला. सुनीता त्याचे निरीक्षण करीत होती. सहा फूट उंची, कुरळे केस, पिंपल्सनी भरलेला उभट चेहरा, गोरा वर्ण, सडपातळ बांधा, निळी पँट व इन केलेला पांढरा शर्ट. डोळे थोडे मोठे असते तर आपल्या अजयसारखा बराचसा दिसला असता. तिला परदेशात असलेल्या तिच्या मुलाची तीव्रतेने आठवण आली. ती म्हणाली, ‘अरे, बस ना खूर्चीवर, सामान आणलं नाहीस का तुझं? इथं राहायला आलास ना तू?’

      June 22, 2026