मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
एकदा समुद्रात होडी वल्हवत असताना रेव्हनला गनूक भेटला. त्यावेळी गनूकला त्याचे सामर्थ्य दाखवायची आणि रेव्हनवर त्याचे वर्चस्व सिद्ध करून दाखवायची इच्छा झाली. म्हणून त्याने त्याची जादूची टोपी काढून टाकली आणि सगळ्या समुद्रावर दाट धुके निर्माण केले.
सरकसवाला,
मी मोज दावितो सकला ! ।।धृ.।।
“पदके' मिळवियली गाठीची,
माझी कामे नवलाईची !
साधतील ती इतरा कैची ?
सरकसवाला,
मी मौज दावितो सकला ! ।।१।।
घेतो गादीवर कोलांटी,
दादाच्या मग खांद्यावरती,
चढुनि उडी मी घेतो उलटी
सरकसवाला,
मी मोज दावितो सकला ।।२।।
बाजा तोंडाचा बहु वाजे,
घोडा काठीचा हा साजे,
घाली रंगण त्या आवाजे,
सरकसवाला,
मी मौजे दावितो सकला ! ।।३।।
छातीवर मोटार चढे ही, .
सरकस बघुनी बोले आई !
की मी डोक्यावर घर घेई' !
सरकसवाला,
मी मौज दावितो सकला ! ।।४।।
हत्ती हा काळ्या मातीचा,
बंगाली वाघहि रबराचा,
साखरि छावा हा सिंहाचा !
सरकसवाला,
मी मौज दावितो सकला ! ।।५।।
ऐसे प्राणी जमवुनि नाना,
बसवुनि एका ताटी त्यांना
खातो मीही त्यासह खाना !
सरकसवाला,
मी मौज दावितो सकला |! ।।६।।
एका गावात एक वृद्ध शेतकरी राहत होता. तो आंधळा होता. त्याला दिसत नसे. एके दिवशी चालता चालता तो विहिरीत पडला. तेव्हा “देवा मला वाचव रे” असे तो ओरडू लागला.
कोल्हा इतर जनावरांशी लबाडीनं वागतो हे जगजाहीर होते. त्यामुळे त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नसे. पण तरीही कोल्हा सतत कुणा ना कुणाला फसवायचा आणि जनावरं फसायची. ‘हा बढाया मारणारा आहे’ म्हणून सगळे त्याला टाळायचे.
नाताळची सुटी लागली. सुटीत काय करायचे असा प्रश्न सागर, सीमा, परेश या मुलांपुढे पडला. सीमा म्हणाली, अभ्यासापेक्षा वेगळं काहीतरी करूया? परेश म्हणाला, संक्रांत येतेच आहे. आपणपतंग उडवू या. सागरने आकाशाकडे पाहिलं तर खरंच, काही मुलांनी पतंग उडवायला सुरुवातही केली होती. प्रत्येकाने पॉकेट मनीतले पैसे एकत्रित केले.
ससा आणि कासव यांच्या शर्यतीची गोष्ट तुम्हा आम्हाला सर्व परिचित आहे. राम गणेश गडकरी यांच्या ‘चिमुकल्या इसापनीती’त ही बीजकथा या संग्रहात दिलेली आहे. पहा (४.५९) नव्या संदर्भात नवी भर घालून अनेकांनी या बीजकथेचा आपापल्या पद्धतीने विस्तार केला आहे. शालेय विद्यार्थ्यांनीही या बीजकथेचा केलेला विस्तार यापुढील तीन कथांमध्ये दिला आहे. या विस्तार कथांमधून मुलांना शर्यतीपेक्षा किंवा स्पर्धेपेक्षाही मैत्रभाव महत्त्वाचा वाटतो आणि त्यामुळेच ह्या कथा पारंपरिक कथेपेक्षा कशा वेगळ्या आहेत ते पहा.
(जपानची पुराणकथा)
फार फार वर्षांपूर्वी आकाशाच्याही वर तोका आमाहारा येथे विश्व निर्मात्याचे
घर होते. त्याकाळी ‘अमेनो मिनाकानुसि’ नावाच्या देवाचा सर्वत्र संचार होता.
‘अमेनो मिनाकानुसि’ या देवाने अनेक देव-देवता निर्माण केल्या.
या बाई या
बकुळीच्या झाडाखाली
फुले वेचू या ।
ऊन पडले
पानफुल दिसे कसे
गोडगोडुले ।
गोडगोडुले
मोतियांचे दाणे कोणी
खाली पाडले? ।
रान हालले
पहाटेस शुक्रदेव
गाणे बोलले ।
अगस्ती मुनी यांना दक्षिण भारतातील प्रबळ राक्षसांचा नाश करण्यासाठी व ऋषीमुनींना आश्रय देण्यासाठी उत्तर भारतातून ब्रह्मा, विष्णू महेश यांना दक्षिण भारतात पाठवतात. तेव्हा महादेव म्हणतात की, “मी गोदाकाठच्या पंचक्रोशीत जनस्थान या ठिकाणी ‘कपालेश्वर’ या नावाने प्रकट होईन” आणि विष्णूने वचन दिले की, “मी रामअवतारी तुमच्या भेटीला येईन.
सर्वांचा विश्वास । सहजी बसेल
ऐसे शुद्ध शील । ठेवीन मी ।॥।१॥।
देव, देश, राजा । गुरु आप्त दृष्ट
यांशी एकनिष्ठ । राहीन मी ।॥।२॥।
अनाथांच्या साह्या । जाईन धावून
त्यासाठी झिजवीन । काया माझी ।॥॥३॥।
सानां कुरवाळीन । वंदीन थोरांना
बंधु सकलांना । मानीन मी ।॥४।।
सौजन्य दावीन । स्त्रिया-बालकांशी
वृद्ध-निर्बलांशी । निरपेक्ष ।।५॥।
मुकी जनावरें । गणूनिया मित्र
भूतदया व्रत । आचरीन ।।६॥।
गुरु, आईबाप । अधिकारी खरे
आज्ञा त्यांच्या त्वरे । पाळीन मी ।॥७॥।
कोसळो संकटे । कर्तव्य कठीण
मनाने प्रसन्न । राहीन मी ।॥८॥।
शरीराने शुद्ध । मनाने निर्मळ
कृतीने सरळ । राहीन मी ।।९।।
Copyright © 2025 | Marathisrushti