(User Level: User is not logged in.)

बाल-साहित्य

मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • घारीचे बाळ

    एक कुंभार होता. त्याला तीन मुली होत्या. मुलगा नव्हता. त्याला आता पुन्हा चौथी मुलगी नको होती. कुंभार बायकोला म्हणाला, “आता तुला पुन्हा मुलगी झाली तर मी तुला घरात घेणार नाही.” कुंभाराची बायको माहेरी गेली. दुर्दैवाने तिला चौथी मुलगीच झाली. तिच्या अंगाचा थरकाप झाला. आता नवऱ्याला कसे तोंड दाखवायचे याची तिला काळजी लागली. तो आपल्याला घरात घेणार नाही, याची तिला खात्री होती. तिच्या आईने पुढे काय होईल याचा अंदाज घेऊन त्या बाळाला कपड्यात गुंडाळले, टोपलीत घातले आणि टोपली नदीत सोडून दिली. तरंगत तरंगत टोपली पाण्याच्या प्रवाहाबरोबर वहात गेली.

  • दानशूर बळीराजा

    बळीराजा आपल्या नगरीत सुखाचे राज्य करीत होता. धर्माचे, समृद्धीचे, दानाचे अधिष्ठान असा ह्या नगरीचा लौकिक होता. सर्व प्रजा आनंदाने नांदत होती. आपल्या राज्यात सर्वत्र आबादी आबाद असावे म्हणून नेहमीच राजा देशोदेशीच्या विद्वान दशग्रंथी ब्राह्मणांना व ऋषिजनांना बोलावून यथासांग यज्ञयाग करीत असे. अगणित दानधर्म करीत असे. विद्वानांचा आणि प्रजेचा दुवा घेत असे.

  • पारितोषिक

    राजाच्या मंत्र्याचा मुलगा अजय पण मूर्त्या बनवित असे पण तो काही उत्कृष्ट मूर्तिकार नव्हता. परंतु त्याची इच्छा हीच असे की कसेही करून प्रथम पारितोषिक पटकावे. मंत्री पण चतुर होता. तो काही तरी युक्ती करून मुलाला कसे बक्षीस मिळेल याचा तो विचार करू लागला.

    ठरलेल्या दिवशी सर्व मूर्तिकार मूर्त्या घेऊन आले. रामकिरण नावाच्या मूर्तिकारने राजाची अतिशय सुंदर मूर्ती तयार केली होती. ती पहाताच मंत्री समजून गेला की नक्कीच या मूर्तीला प्रथम पारितोषिक मिळेल. त्याने रामकिरणला एकीकडे नेऊन सांगितले, खरंच, तू सुंदर मूर्ती बनविली आहेस.

  • मुलास उपदेश

    बरे सत्य बोला यथातथ्य चाला ।
    बहू मानिती लोक येणे तुम्हाला ।।
    धरा बुद्धी पोटी विवेके मुले हो ।
    बरा गुण तो अंतरामाजी राहो ।1१।।

    सदा दात घासोनि तोंडा धुवावे ।
    कळाहीन घाणेरडे बा नसावे ।
    सदा सर्वदा यत्न सांडू नये रे ।
    बहुसाळ हा खेळ कामा नये रे ।।२॥।

    दिसामाजी काही तरी ते लिहावे ।
    प्रसंगी अखंडित वाचित जावे ।
    गुणम्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे ।
    बरे बोलणे सत्य जीवी धरावे ।।३ ।।

    बहु खेळ खोटा सदालस्य खोटा ।
    समस्तासि भांडेल तोचि करंटा ।
    बहुतां जनालागी जीवी भजावे ।
    भल्यासंगती न्याय तेथे रिझावे ।।४ ।।

    प्रचितीविणे बोलणे व्यर्थ वाया ।
    विवेकेविणे सर्वही दंभ झाला ।
    बहु सज्जला नेटका साज केला ।
    विचाराविणे सर्वही व्यर्थ गेला ।।५ ।।

    भला रे भला बोलती ते करावे ।
    बहुता जनांचे मुखे येश घ्यावे ।
    परी शेवटी सर्व सोडोनि द्यावे ।
    मरावे परी कीर्तिरुपे उसवे ।।६।।

  • महादेव पार्वतीची जन्मकथा

    फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. इथे फक्त पाणीच पाणी होते. त्या पाण्यातील एका कमलपत्रावर देवाचा जन्म झाला. देवाने एकदा आपला खांदा घासला तर त्यातून कावळ्याची अन् खेकड्याची निर्मिती झाली

  • पांढऱ्या अस्वलाची गोष्ट

    एक होता तरुण मुलगा. त्याचं नाव ओथुन. तो आइसलँड या बर्फानं भरलेल्या देशात राहत होता. त्याला आई होती. उन्हाळा आला की बर्फ वितळे आणि जहाजं इकडून तिकडं, तिकडून इकडं येऊ-जाऊ लागत. ही जहाजं जाताना येतांना बघून ओथुनला मोठं कुतूहल वाटे की, कुठं बरं ही जहाजं जात असतील, कुठून येत असतील ? आपणदेखील या जहाजातून जाऊन दूर दूर काय आहे, बघून यावं ! एकदा नॉर्वे देशाकडचं एक जहाज आईसलँडला पोचता-पोचता लवकर हिवाळा सुरू झाल्यामुळं बर्फात अडकलं.

  • अपण्णक जातक

    वाराणशीचे राज्य. राजाचे नाव ब्रह्मदत्त. या राज्यातल्या एका व्यापाऱ्याच्या
    कुळात बोधिसत्त्वाचा जन्म झाला. बोधिसत्त्व मोठा झाला. देशोदेशी हिंडून
    व्यापार करू लागला.

  • प्रभात

    प्रभात झाली रवि उदेला ऊठ उशिर झाला;
    प्रेमळ भावे सरळ मनाने वंदि जगत्पाला ।॥१।।

    दहिवर पडले मौक्तिकवृष्टी जणु भूवर झाली;
    प्रेमरंगरंगित ही स्मितमुखि पूर्व दिशा खुलली ।।२।।

    मंदमंद मधुगंधि समीरण येती भेटाया;
    आलिगुनि सांगती 'काळ हा दवडु नको वाया' ।।३।।

    हास्यवदन ही सुमनमंडळी उठुनि उष:काली;
    दहिवरतोये जणु का प्रात:स्नान करित बसली ।।४ ।।

    प्रसन्नवदना वनलक्ष्मी ही सूचिर्भूत दिसते;
    नानाविध नवपल्लव वाहुनि देवपुजा करिते ।।५।।

    तरुवर उठले, प्रफुल्ल झाले, आनंदे डुलती;
    तन्मय होउनि मानसपूजा जणु का हे करिती ।।६।।

    विहंग उठले गाउ लागले तरुवरि केव्हाचे;
    मंजुळ वाणी ऐक, जणू हे गायक स्वर्गीचे ।।७।।

    गगनविहारी खग वैतालिक वायूवरि बसुनी;
    प्रभुगुण गाती उंच अंबरी तल्लिन होउनी ।।८।।

    खळखळ वाहत लगबग येती तटिनी गिरिवरुनी;
    देवदर्शना जणू चालल्या भाविक या तरुणी ।।९।।

    तरुवसनावृत तुंग पुरातन पर्वत हे दिसती
    वबल्कलधारी, आद्यक्र्षी जणु
    ध्यान धरुनि बसती ।॥१०॥।

    जिकडे तिकडे मंगलमय हे भूमंडल दिसते;
    ऊठ मानवा ! आळवि प्रभुला
    जाइ शरण त्याते ।।११।।

  • करुणा

    (जैन लोककथा)

    एका कुटुंबात तीन भाऊ होते. त्यांच्या बायका आळीपाळीने स्वयंपाक करीत असत. एके दिवशी लहान सूनेला स्वयंपाक करावयाचा होता.

  • नचिकेताची गोष्ट

    प्राचीन काळी उद्दालक नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांना नचिकेता नावाचा एक पुत्र होता. नचिकेता फार चाणाक्ष हुषार व चौकस बुद्धीचा होता. अवतीभवती घडणा-या घटनांबद्दल नानाप्रश्न विचारून तो आपल्या पित्याला भंडावून सोडी. एकदा उद्दालक ऋषींनी ‘विश्वजित’ नावाचा फार मोठा यज्ञ आरंभिला.