मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
एक होता धोबी. गावाचे कपडे धुवायचा. मजेत रहायचा. धोब्याकडे एक
गाढव होतं. गाढव मात्र मरतुकडं आणि म्हातारं होतं. सकाळ झाली की मालक
मळलेल्या कपड्यांचा गठ्ठा गाढवाच्या पाठीवर टाकायचा. नदीवर जायचा.
सकाळी धुतलेले कपडे घेऊन घरी यायचा. रात्र होण्यापूर्वी मालक गाढवाची
सुट्टी करायचा. एके दिवशी संध्याकाळी गाढव फिरायला निघालं. काम संपलं होतं. पाठीवर कपड्यांचं ओझं नव्हतं, आणि मालकाची किटकिटही नव्हती.
(रशियन लोककथा)
एका गावात एक पादरी (धर्मगुरू) राहत होता. त्याने एक नोकर ठेवला होता. अनेक वर्षांपर्यंत चांगल्या रीतीने काम करण्याबद्दल नोकराने त्याच्याशी करार केला होता.
एक जंगल होते. त्याचे नाव होते चंपकवन. तेथे खूप झाडे, ओढे, डोंगर होते. जंगल म्हटल्यावर प्राणी होतेच. माकड, चित्ते, हरीण, वाघ, सिंह, हत्ती, लांडगे, कोल्हे इत्यादी. ते चंपकवनात अतिशय आनंदात राहत. माकडे तर खूपच धडपडी होती. नेहमीच काहीतरी करण्यात दंग असत. त्यातच सर्कशीतून पळून आलेल्या एका माकडाची भर पडली. त्याचे नाव होते ‘विचित्र ‘नावाप्रमाणेच त्याच्याअंगीसुद्धा तसेच गुण होते.
(नायजेरियन लोककथा)
कोणे एके काळी सूर्य आणि पाणी खूप चांगले मित्र होते. पृथ्वीवर सूर्य आणि पाणी गुण्या गोविंदाने रहात होते. पाण्याला भेटायला सूर्य नित्यनेमाने येत होता. परंतु पाणी कधीच सूर्याला भेटायला जात नव्हते. एके दिवशी गप्पांच्या ओघात सूर्याने पाण्याला विचारले, ‘मित्रा मी नेहमी तुझ्याकडे येतो.
एकदा काय झालं! अग्नीदेव, वरुणदेव, वृषभदेव आणि करहणमाता
(अन्नदेवता) यांच्यात झगडा सुरू झाला. अग्नीदेव म्हणाले, ‘ते काही नाही,
मीच या धरतीवरील मोठा देव आहे.’ वृषभदेव आपली मान डोलवत- डोलवत
म्हणाले, ‘नाही नाही. मीच या धरतीवरील मोठा देव आहे.
राजा विश्वामित्र आपल्या सैन्यासह अरण्यात शिकारीला गेला होता. फिरत फिरत तो वसिष्ठ मुनींच्या आश्रमाजवळ आला. महर्षी वसिष्ठांनी कुटित राहूनसुद्धा राजा विश्वामित्र आणि त्याच्या सैन्याचा भोजन देऊन राजेशाही पद्धतीने आदरसत्कार केला याचे विश्वामित्राला आश्चर्य वाटले.
(जपानची लोककथा)
दोन भाऊ सख्खेच. पण दोघांच्या दोन तन्हा होत्या व्यवसायाच्या मोठा
“होना” पाण्यात गळ टाकून मासे पकडून विकत असे, तर धाकटा “होकी” हा
डोंगरदऱ्यात हिंडून धावून शिकार करणारा. पक्षी मारणारा फासेपारधी म्हणून
लोक त्याला ओळखीत असत.
सकाळ झाली. गोगलबाई उठल्या. आपल्या पाठीवरच्या घरातून बाहेर अंगणात आल्या. सकाळचे कोवळे ऊन खात बसून राहिल्या. तेवढ्यात त्यांची एक मैत्रीण चिऊताई समोरून येताना दिसली. तिला पाहून गोगलबाईनी विचारले, “काय चिऊताई, आज सकाळीच कसे येणे केले?” चिऊताई म्हणाली, “मी आले आहे, बोलावणे करायला. उद्या किनई माझ्या बाळाचे बारसे आहे. मुद्दाम तुम्हांला सांगायला आले आहे.
एक राजा होता. त्याची एक राणी होती. राणी अतिशय देखणी होती. राज्य
भले मोठे होते. प्रजा अतिशय सुखी व गुण्यागोविंदाने नांदत होती. पण राजा
निपुत्रिक होता. त्यामुळे राजा-राणी दुःखी होते. त्यामुळे प्रजाही चिंतीत होती.
राजानंतर राजगादीवर कोण बसणार? राजा राणी आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम
करीत. त्यामुळे राज्यात भांडण-तंटा, चोऱ्या-माय होत नव्हत्या.
(स्वित्झर्लंडची लोककथा)
एक होता राजा. त्याला एकुलती एक मुलगीच होती. त्या मुलीला त्यानं खूप
कोडकौतुक करून वाढविलं होतं. एकदा राजा राजकुमारीला बरोबर घेऊन
फिरायला बाहेर पडला. फिरता फिरता एके ठिकाणी त्यांना लोकांची गर्दी
जमलेली दिसली. राजा आणि राजकुमारी दोघेही त्या गर्दीत घुसले. बघतात तर
एक गारुडीण नागाला खेळवीत होती. एकदा नागाची बांगडी करून ती हातात
घाली, तर एकदा कंठीसारखी त्याच्या गळ्यात घाली
Copyright © 2025 | Marathisrushti