मूळ हिंदी कविता ‘ जानती हूँ प्रेम कम-कम हो रहा है ‘ ; कवियत्री- शार्दूला झा नोगजा,सिडनी,ऑस्ट्रेलिया ; मराठी अनुवाद- विजय नगरकर
November 5, 2021
January 12, 2023
मनाचिया, शांत डोही
पर्जन्यबिंदू, भावनांचे...
स्वाती, नक्षत्रांत पड़ता
मोती होती शब्दफुलांचे...
गीतात मधुर प्रीतचांदणे
निष्पाप स्पर्श भावनांचे...
हितगुज अव्यक्त अबोल
सहजी उमलते अंतरीचे...
शब्दात गंधाळ भावनांचा
जीवनी श्वास सारे सुखाचे...
सभोवार तृप्तीचे कारंजे
दृष्टांत, विवेकी चिंतनाचे...
मनाचियाच, शांत डोही
परिस्पर्ष सारेच धन्यतेचे...
–वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. २१९
२९/८/२०२२
September 25, 2022
खिशांत माझ्या पडली होती, सुटी नाणी काही
वस्तूंची ती खरेदी करण्या, सर्व बाजार पाही....१,
सराफ्याच्या दुकानी दिसला, एक हिऱ्याचा हार
डोळे माझे चमकूनी गेले, फिरती गरगर...२,
दाम विक्रीचे जाणूनी घेता, हताश मी झालो
हातातील धनाचे मोजमाप, करू मी न शकलो...३
दोन वेळची पूजा करूनी, जप माळ जपती
खूप साचले पुण्य आपले, हे कांहीं समजती....४,
कसा मिळेल ईश्वर त्यांना, तपोबलाच्या अभावी
जन्मोजन्मीचे पुण्य साचता, दर्शन मिळे प्रभावी....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 22, 2019
आर्त तन हे, आर्त मन हे,
करुणानिधे,तुला साद रे,
शांती, प्रेम, आस्था,
गेल्या भावना कुठे रे,--!!!
उगा काळीज उलते,
मन किती धास्तावते,
का मम अंतरातुनी,
अस्वस्थपण छळते रे,--!!!
सांग तुझ्याविना माझा,
असेल कोण त्राता रे,
कोलाहल दाटे मनी,
ही जीवनाचीच करणी,
घायाळ हृदया, न वाली,
जावे कुठे,विधात्या रे,--!!!
सुखाची कशी वानवा असे,
दुःख, अमोज अगणित रे
जीवनाचेच गणित चुके,
ही भल्याभल्यांचीच कथा रे,--!!!
जे हवे ते मिळत नाही,
नको तेच वाट्यास येई,
जे मिळे,ते पुरत नाही,
समाधान मानावे कशात रे,--!!
प्रेम कुणालाच कळत नाही,
नात्यात विफलता येई,
ताणतणावां माप नाही,
जीव सदैव बेचैनी राही,
आधारच नच कोणी,
सांगू कोणा व्यथा रे,-!!
भोवताली माणसांचे रान,
वाटा वाकड्या, सुनसान,
जिवाची फक्त उलघाल, अंतरात्मा किती रडे रे,--!!!
शोधिते मी पहा तुला,
इकडून तिकडे, सगळीकडे,
कुठे असशी तू ,
कुठे का न दिसशी तू ,
आत,जीव कसानुसा रे,--!
हिमगौरी कर्वे ©
June 20, 2019
कशासाठी जगतो आपण, विचार तुम्हीं करतां कां ?
मृत्यू येई तो जगावयाचे, हेच धोरण समजतां कां ?
खाणे – पिणें वंश वाढविणे, हेच जीवन असते कां ?
ऐष आरामी राहूनी तुम्ही, देहासाठी सारे, हे मानता का ?
पाठीं लागूनी धनाच्या त्या, बरोबर संपत्ती न्याल कां ?
पैसा मुलांसाठी ठेवून ही, शिव्या त्यांच्या चुकवाल कां ?
सारे कळूनी वळत नसते, तत्व हे जाणून घ्याल कां ?
उपयोग करूनी ज्ञानाचा, जीवन चांगले कराल कां ?
सारे आहे प्रभूचे समजून, शांत चित्ताने जगाल कां ?
दया क्षमा शांती हे गुण, अंगी आपुल्या बाणाल कां ?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 21, 2019
भटकत जातो वाटसरू ,
जंगलामधील अज्ञात स्थळी,
आंस लागते जाण्याकरिता,
दूरवरच्या दिव्या जवळी ।।१।।
मार्ग जाण्याचे अज्ञात असूनी,
निराशेने वेळ दवडितो,
ध्येय दिसत असून देखील,
मार्गामुळे अडून पडतो ।।२।।
अज्ञानाच्या अंधारात ,
शोधत असतो असेच त्याला
मार्गदर्शन सद्गुरुचे,
न लाभता ध्येय मिळे कुणाला ।।३।।
वाट दाखवी सद्गुरु ,
प्रभूचरणी जाण्याचा,
दुवा साधतो आमच्यामध्ये,
त्यात एकरूप होण्याचा ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 9, 2017
पाऊस आला की हापूसच्या आंब्याचा हंगाम संपतो.. जसा गणपतीबाप्पाला निरोप देतात तसाच आंब्यालाही निरोप दिलाय कवीने…
June 19, 2015
मनमे एक आरजू थी के प्रभु मिल जायेगा
दिलकी धडकन कहती के उसे अपनेमेंही पायेगा
आंख सबतरफ ढूंडती है हर एक कण में
फिरभी दृष्टी असमर्थ हैं उसे पहचाननेमें
ध्वनी की लहरे हर तरफ गुंज उठती
कानोंके सहारे आवाज उसकी ना सुनी जाती
महक उठती हवा खुशबूदार गंधोंसे
पहचाने उसे कहां बगीचेके फूलोंसे
बीती कितनी जींदगीयां उसकी खोज करनेमें
कमजोर पडती है इंद्रिया उसे जान जानेमें
आ तू इन्सानका रुप लेकर के तुझको मै देख पाऊं
या मुझको दिव्य शक्ति देकर के तुझमें मैं समा जाऊं
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 20, 2015
कविता
November 19, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti