हवे तेच बोलता मी
जमाया लागले लोक
सत्य सांगू लागताचि
उठू लागे एक एक।
...मी मानसी
हिरव्या पानात लगडलो, पांढऱ्या शुभ्र मोगरी कळ्या, एकेकच हळूहळू जन्मतो,
स्वभाव धर्मानेफुलणाऱ्या,
गोऱ्या रंगावरी आमुच्या,
जनहो नका हो भाळू,
टपोरेआकार पाहुनी,
मोहून नका हो हाताळू,
कौमार्य फुलते आमचे,
दुरुन बघावे, हेच उचित, मुसमुसत्या तारुण्याला, ठेवा तुम्ही अलगद,
मगच उमलेल फूल हे सुंदर ,
येईल मोगऱ्याला बहर,
स्पर्श न करता नेत्रसुख घेता,
घ्या हो आमुचा आस्वाद,
किती थोडे आमचे जीवन,--
बघता बघता येते मरण,--!!
फुलून कोमेजणे केवळ,
एवढेच काम या धरतीवर,
अशा अल्प जीवनात,
भरून राहतो सुगंधात,
आमचा असून वाटतो,
येईल त्याला या जगात,
स्त्रीच्या लाडके आम्ही ,
नका पुरुष हो इतके जळू*,
आमच्या सुगंधेभारुन, त्याही प्रेम लागतील करू,--
फुले मोगऱ्याची देऊनी,
आपल्या प्रेमा पटवती,-!
असे मिलन घडवतो,
अहो,भाग्यवानकिती,?
हिमगौरी कर्वे.©
जीवन झेप कुठे घेईल,
याची मला हुरहूर आहे......
चार पैशाच्या कर्जापायी,
गाव रान्हं सोडलं आहे.....
गावात शेत छान माझ्या,
पण पैशाची कमी आहे.....
चार पैशाच्या कर्जानं ,
जीवन ओझं झालं आहे.....
स्वार्थाच्या मोही जगात,
सर्वच मला अनोळखी आहे.....
मी फक्त - स्तब्ध,
जग पुढं चाललं आहे.....
पैशाच्या आतुरतेचा,
माणूस गुलाम बनला आहे.....
गरीबाच्या शब्दांना - - जगात..,
मोल फार कमी आहे .....
म्हणूनच.. - - जीवन कुठे झेप घेईल,
याचीच मला हुरहूर आहे.... .
-- गजानन साताप्पा मोहिते
(मुक्तछंदात्मक)
थोडा वाकून पहा खाली,
काय चाललंय या पृथ्वीतली,
सत्ता, लत्ता, अधिकार, पैसा, यामधून एवढा माततो का कुणी,-? जनावरे बरी म्हणायची पाळी, संकेत, भाषा, सभ्यता, निष्ठा,
कशी पाळतात ती सारी,--!!!
समूहनियम, कर्तव्येही माहित,
अधिकाराचे बडगे दाखवत नाहीत,
नुसतीच माणुसकीचा आंव आणून,----
पैसा इतका प्रिय असावा की, म्हाताऱ्या आई-बापांनी जावे वृद्धाश्रमी,
खस्ता जराही आठवत नाहीत, त्यांनी भोगलेल्या; केवळ लेकरांसाठी,--!!!
स्त्रीचे स्त्रीत्व शालीनतेत,
कुठे उडली रे लाज,--?
किती किती असभ्य बनल्या आहेत त्या, ---
आज स्वतःच्या हाताने घेतलंय करून,----
समाजातली स्त्री फक्त भोगवस्तू स्त्री शक्तीचा आदर सन्मान,ते, करतो तरी कोण,--?
वासनांनी बरबटलेले डोळे,
बाकी काय बोलतील,--?
नीती प्रीती भक्ती कशाशी खातात,--?
जन्म-मृत्यूही इतके स्वस्त इथे,जीवनच महागडं झालंय,
अशा दुनियेत जगवतोस, ही, आम्हाला दिलेली शिक्षा का मोठी,--?
-- © हिमगौरी कर्वे.
राम नाम ओठी जपता
रामराया हॄदयी वसतो...
करावा रामनामाचा धावा
तो सदैव श्वासात नांदतो...
राम नाम सागर मोक्षानंदी
दुःख वेदनांतुनी सावरतो...
राम अवतार विश्वात्म्याचा
साऱ्या ब्रह्मांडाला रक्षितो..
तो देवगुणी , सदविचारी
सकलांच्या मना उजळीतो..
विध्वंसक तो षडरिपूंचा
शाश्वती ब्रह्मांडी नांदतो...
जीवन रामनामी सन्मार्गी
जाणता जीवा मोक्ष लाभतो..
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २२९
८/९/२०२२
दिवा होता छोटासा, एक मजकडे
इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे
तळांत होती योजना, तेल सांठवण्याची
शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची
छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन
मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी
देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे
प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे
केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं
व्यय टाळून प्रवाही करा, तीच प्रभूवरती
ऐहिक सुखाच्या जातां मार्गीं, गुरफटतो संसारीं
तीच उर्जा प्राणास मिळतां, चेतवी ज्योत ईश्वरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
नवा चित्रपट बघण्या गेलो,
कुटुंबासह चित्र मंदिरी
चित्रगृह ते भरले असतां,
प्रवेश मिळाला कसातरी....१,
चित्रपट तो बघत असतां,
आश्चर्य वाटले जल्लोशाचे
टाळ्या, शिट्या देवून प्रेक्षक,
कौतूक करी नटनट्यांचे....२
वास्तवतेला सोडूनी,
रटाळपणे वाहत होते,
वैताग येवूनी त्या चित्राचा,
सोडून आलो मधेच मी ते....३,
घरी येवूनी शांत जाहलो,
आठवू लागलो बालपण
अशीच होती छायाचित्रे,
ज्यांत आमचे रमले मन....४
जीवनामधल्या चक्रामध्ये,
बदल फारसा होत नसतो
वयातल्या पायरीप्रमाणे,
दृष्टीमध्ये फरक घढतो....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मुलांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी आणि बालरंगभूमीचा आशय परीकथेच्या पुढे नेऊन ती सशक्त करण्यासाठी जगभरात उदयास आलेली 'ग्रिप्स नाट्य चळवळ' सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. ग्रिप्स नाट्यचळवळीत योगदान दिलेले जगभरातील रंगकर्मी जर्मनीची राजधानी बर्लिन येथे एकत्र आले आहेत. ग्रिप्स नाट्यचळवळीचा पन्नास वर्षांचा आढावा, मुलांचे भावविश्व आणि नाटक यांवर विचारमंथन; तसेच विविध भाषांतील नाटकांचे सादरीकरण अशा उपक्रमातून ग्रिप्सचा सुवर्णमहोत्सव रंगत आहे. या महोत्सवात पुण्यातूनही काही कलावंत सहभागी झाले आहेत. भारतात ही चळवळ रुजवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे ग्रिप्सचे विशेष निमंत्रित आहेत.
भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात ही चळवळ आणली डॉ. मोहन आगाशे यांनी. त्यांनी १९८६ च्या सुमारास पुण्याच्या मॅक्सम्युलर भवनाच्या मदतीने नाटके बसवायला आणि सादर करायला सुरुवात केली. ही चळवळ पुण्यातून देशभर पसरली. साठच्या दशकात कम्युनिस्ट चळवळीच्या प्रभावातून विद्यार्थी चळवळीतून ग्रिप्स चळवळ उदयाला आली. खास मुलांसाठी आणि तरुणांसाठी लिहिलेली नाटके व्हायला लागली. फोकर लुडविंग यांनी त्याची सुरुवात केली. ही नाट्य चळवळ जगभर पसरली. ग्रिप्स चळवळीतील नाटके इतर बालनाटकांप्रमाणे परीकथांवर आधारलेली नसतात, तर खेळाच्या मैदानांची कमतरता, पर्यावरण, अभ्यासातल्या अडचणी या मुलांना भेडसावणाऱ्या विषयांवर ती बेतलेली असतात. मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांचे विविध प्रश्ना हाताळणे हे ग्रिप्सच्या नाटकांचे वैशिष्ट्य आहे. सध्या पुण्यातले श्रीरंग गोडबोले आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर सध्या बालनाट्यमहोत्सवाची ही चळवळ चालवत आहेत. महाराष्ट्रातले अमृता सुभाष, आनंद इंगळे, उपेंद्र लिमये, गौरी लागू, परेश मोकाशी, रसिका जोशी आणि विभावरी देशपांडे यांच्यासारखे कलावंत या चळवळीने घडविले. 'ग्रिप्स चळवळीला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने जगभरातील रंगकर्मी बर्लिन येथे एकत्र आले आहेत. १५ जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात २८ देशांतील रंगकर्मींचा सहभाग आहे. 'चिल्ड्रन्स राइट' हा महोत्सवाचा मध्यवर्ती विषय असून विविध उपक्रम होत आहेत. नाट्यमहोत्सवासाठी महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या 'जंबा बंबा बू!' या नाटकाची निवड झाली आहे. श्रीरंग गोडबोले आणि विभावरी देशपांडे लिखित आणि राधिका इंगळे दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग महोत्सवात होत आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
रंग गुलाबी शराबी,गाली तुझ्या फुलले,
मदनबाण नयनातुनी, पाहता-पाहता निसटले,--!!!
जाई जुई कोमलांगी,
नाजूक तन साचे,
अंगकाठी शेलाटी,
सोनचाफ्याचे फूल नाचे,--!!!
वर्ण तुझा केतकी,
मिठास शब्द बोले,
कुंदकळ्यां नाजूकही,
दंतपंक्ती जणू भासे,--!!!
वाटे चालते-बोलते,
फूल तू सायली,
गेंद टपोरे झेंडूचे,
केशरवर्खी उरोजही,--!!!
जाता तू जवळुनी,
मनमोगरा फुलतसे,
उमलत हरेक पाकळी,
जिवाचे कमळ बहरतसे,--!!!
मंजुळ स्वर ऐकुनी,
भोवती सडा प्राजक्ती,
फुलांचा सुगंध येई,
सुंदरी तुझ्या सहवासें,--!!!
हिरवा चाफा दडुनी,
लज्जेत तुझ्या बसे,
प्रीत फुले मात्र फुलती,
काळजांची पर्वा नसे ,--!!!
सौंदर्याचा मी पुजारी,
विनवतो तुला प्रेमे,
प्रसन्न हो ग देवी,
भक्तकल्याणा कारणें,--!!!!
© हिमगौरी कर्वे
दिवाळीच्या पदार्थात आधी गोडात हात जाणारे साधारण तुल ,धनु राशीचे .
चकलीवाले मेष,वृश्चिक,सिंह
आधी चहाचा घोट घेणारे कर्क राशीचे
वृषभ प्रत्येकाची थोडी थोडी चव घेतील
मिथुन वाले चिवड्यातील काजू ,शेंगदाणे हळूच फस्त करतील .
कन्यावाले आधी थोडा क्यालरीचा विचार करतील .
मकरवाले चिवडा घेतील पण नेमका पहिलाच दाणा यांना कुजका मिळतो !
कुंभवाले लाडू हवा असताना अनवधानाने कडबोळ चावायला सुरवात करतील .
मीनवाले कायम गोंधळात, यांचा नक्की काय घ्यायचं हे ठरेपर्यंत मेषेच्या चार चकल्या फस्त झालेल्या असतात !
Copyright © 2025 | Marathisrushti