एक..
वाळली पाते
वावटळीशी नाते
बोडके झाड....
दोन
लाट येणार
नक्की विचारणार
घर कोणाचे ?
तिन
उदास पाने
भरकटत वारा
आनन्दी गाणे.....
-- श्रीकांत पेटकर
अक्षरांना अर्थ देणारे
शब्द
शब्दाला नि:शब्द करणारे
' पलिकडला ' अर्थ देणारे
शब्द
शब्दांनी शब्द वाढविणारे
अपशब्दांनी घायाळवणारे
शब्दच
कचऱ्याचा निचरा करणारे
होत्याचे नव्हते करणारे
शब्दच
भीतीने थिजविणारे
अंगाई-शब्दांनी निजविणारे
शब्द
श्रावण-शब्दांनी भिजविणारे
पेलविणारे, झुलविणारे आणि विझविणारे
शब्दच
सव्यसाचीस पूर्णोपदेशदाते
गीता-शब्द
कृतार्थ जीवनास पूर्णत्व,
मरणास शून्यत्व देणारे
बीजांडातून ब्रह्मांडाकडे नेणारे
ब्रम्ह-शब्द
शब्द हेच अर्थ, सार्थ वा निरर्थ,
शब्द क्षेम-कल्याण, शब्दच अकल्याण,
शब्द समाधान, कधी बनती निराकरण,
कधी शब्द स्वार्थ, कधी होती परमार्थ,
शब्दाचे बळ आगळे, शब्दातूनची मध पाघळे
वा अश्रुरूप ओघळे
शब्द हीच शक्ती, तेच देती मुक्ती,
शब्द-ब्रम्हासी जावे शरण,
न त्यागावे त्याचे चरण |
शब्द-सामर्थ्याची सार्थ जाण,
चित्ती असो द्यावी चिरंतन ||
------ शब्द सीमा ------
उन्हांत फडफडणारी
एकाकी
फांदी................
वर आभाळापर्यंत
हात पोहचत नाहीत
आणि खाली
कुठलाच समुद्र
स्वागताला उत्सुक नाही .................
तिचे अस्तित्वच
असे,
पणांला लावलेले
बदमाष ऋतुंनी
बहरांतच शापलेले ....................
-- सुषमा एडवण्णावर
दाटे विचारांत ओसंडून सैरभैर व्याकुळलेली वाट
वाटेवरी भग्न स्वप्ने उरी घेउनी जन्मली ही पहाट
पहाटे अखेरीस सर कालचा दिस, रेंगाळला सुन्न घाट
घाटावरी पाय ओढीत ही घट्ट धरली पुन्हा वहिवाट
धागे कसे जोडले हे असे सांधताना रुतोनी बसावे तिथे
तिथे वाटते सर्व संपून जावे फिरोनी पुन्हा नेमके आठवे
आठवांची ठेव गळकी जणु मनी मेघांचे काजळ दाट
दाटले प्रेम सर्वत्र आहे चालती आंधळे ना ही वाट
मनोरंजनी गुंतलो असे कि कुठे जायचे भान उरले कुठे
कुठे घ्यायची भरारी पंख विखरून हाती नुसती पिसे
पिसे राहिले ना कशाचे तरी कशी पायात येते वहिवाट
वहिवाट प्रसवते बीज मर्मबंधात प्रेम, पाउलेच होती वाट
-- सुहास तांबे
दुःख असे मानव निर्मित
जाणती हे सगळे
परि दुःखात शोक करिती
हे कुणा न कळे
आपण कर्म केलेले
आपणचि भोगतो
फळ कर्माचे आलेले
तेच आपण चाखतो
आहे तुजसी हे ज्ञान
माहीत सर्वाना
खंत द्यावी सोडून
नको दाखवूं भावना
इतरांसाठीं आहे
ती भावना उदरीं
सहानुभूती पाहे
इतर जनांचे पदरी
शोक भावना दाखवी
तुझ्या दुःखाची
नसतां तुज निर्दयी ठरवी
हीच भीति जनाची
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
कोजागिरीची पौर्णिमा परि, आकाश होते ढगाळलेले
शोधूं लागले नयन आमचे, चंद्र चांदणे कोठे लपले
गाणी गावून नाचत होती, गच्चीवरली मंडळी सारी
आनंदाची नशा चढून मग, तल्लीन झाली आपल्याच परी
मध्यरात्र ती होवून गेली, चंद्र न दिसे अजूनी कुणा,
वायु नव्हता फिरत नभी तो, मेघ राहती त्याच ठिकाणा
दूध आटवूनी प्रसाद घेण्या, उत्सुक होतो आम्ही सारे
ढगात लपल्या चंद्राला मग, क्षीरात शोधी आमची नजरे
स्वादिष्ट मधूर दुग्धांमृत ते, शशिधरांच्या चांदण्यापरि
मेघांमध्ये तो लपला नसूनी, उतरलां होता ह्याच क्षिरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
…बहिणाबाई चौधरी यांची एक सुंदर रचना
ह्या सप्त रंगातल्या
इंद्रधनुष्याच्या
कमानीखाली
मेघराजा
गालात
हसा
ना
-- सौ.माणिक शुरजोशी
का असा धांवतोस तूं ,
नशिबाच्या मागें मागें,
यत्न होता भगिरथी,
नशीब येईल संगे ।।१।।
प्रयत्न होतां जोमाने,
दिशा दिसताती तेथें,
यशाचे ध्येय सदैव,
योग्य मार्गानें मिळते ।।२।।
प्रयत्न करूनी बघा,
ईश्वर देखील मिळेल,
इच्छा शक्ती प्रभावानें,
नशीबही बदलेल ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मीच अजूनही जगतो
तुझ्याच हृद्य आठवात
तुझेच ते रूप लाघवी
पाझरते या लोचनात....
सांग कसे व्यक्त करू
भावनांना शब्दाशब्दात
तुही निष्पाप निरागसी
अव्यक्तता.! पापण्यात....
तीच अधीरता अंतरात
जाणवते तुझ्या विरहात
मीही अजूनही जगतो
तुझ्या हृदयस्थ आठवात....
रचना क्र. ६०
२७/६/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
Copyright © 2025 | Marathisrushti