वेगवेगळ्या विषयांवरील इ-पुस्तके आपण येथे वाचूया….
महाराष्ट्राच्या घराघरात साजरे होणारे सण, विविध व्रतवैकल्ये आणि महाराष्ट्राची विविधरंगी संस्कृती यांची ओळख करुन देणारे हे पुस्तक…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या ६५ पैकी सुमारे ३६ वर्षे पत्रकारिता केली. ते उच्च दर्जाचे पत्रकार होते. त्यांची पत्रकारिता मूकनायकच्या माध्यमातून आवाजहीनांचा आवाज बनून सुरू झाली आणि प्रबुध्द भारताच्या माध्यमातून प्रबुध्द भारत घडवण्याचे स्वप्न घेऊन संपली. मूकनायक ते प्रबुध्द भारत हा त्यांचा प्रवास विचार आणि संघर्ष या दोन्हींचा होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वर्तमानपत्रे आसपासच्या घटनांची माहिती देणारे व्यासपीठ नव्हते. वसाहती काळातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक जीवनाशी वाटाघाटी करणाऱ्या त्या चळवळी होत्या, वंचितांचे आवाज होते.
या आवाजांचा परिणाम राजकीय सक्रियता आणि विविध संघटनांच्या विचारांमध्ये दिसून आला, ज्यामुळे विचारांचे स्फटिकीकरण झाले.


मराठीसृष्टीचे लेखक श्री सुमंत परचुरे यांची ही खिळवून ठेवणारी कादंबरी.

मी कोण आहे ‘ ह्याचा शोध घेताना माझ्यातला मी, माझ्याशी किती एकाग्र आहे हे पण बघणे आवश्यक आहे. एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे.
तुमच्या मेंदू मधील कचरा जो तुम्हला सतत त्रास देत असतो तो डिलीट करता आला पाहिजे. पण तुम्ही हा कचरा साफ करताना आपण काय डिलीट करत आहोत याचेही भान हवे. कारण हे पण बघितले पाहिजे. आपण एखाद्या मानसिक आजारास निमंत्रण देत आहात का, ह्याबद्दलही विचार करणे आवश्यक आहे


विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेले गणपतीच्या स्तोत्रांचे हे विशेष ई-पुस्तक…


दैनिक लोकसत्ता, दैनिक केसरी या वृत्तपत्रांचे माजी संपादक श्री. अरविंद व्यं. गोखले यांनी तीन वेळा पाकिस्तानला भेट देऊन लिहिलेल्या थरारक आठवणींचा हा संग्रह. पाकिस्तानच्या सर्व प्रमुख शहरांना भेट देऊन तेथील राजकीय / सामाजिक परिस्थितीचे मार्मिक चित्रण श्री. गोखले यांनी केलेले आहे.
तत्कालीन पंतप्रधान श्रीमती बेनझीर भुट्टो यांची परखड मुलाखत हेही या संग्रहाचे एक प्रमुख वैशिष्ट्य.
पाकिस्तानविषयी कुतुहल असणाऱ्या वाचकांना आणि अभ्यासकांनाही हा संग्रह उपयुक्त वाटेल.
Copyright © 2025 | Marathisrushti