(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • या मार्गाने थकवा दूर करा

    सततचे काम, शरीराला विश्रांती न दिल्याने खूप थकवा आणि अशक्तपणा येतो. अशावेळी काम करायचे ठरवले तरी शरीर मात्र साथ देत नाही. या थकव्याला दूर करण्याचे उपाय हे आपल्याच हातात आहेत हे आपण काय लक्षात ठेवले पाहिजे.

      May 31, 2019


  • ट्रम्पची चीन भेट व भारताची तिहेरी घेराबंदी (Triple Encirclement)

    बंगाल ते हिंदी महासागर… विणला जातोय नवा सापळा! ज्यात ईशान्येला ‘ख्रिश्चन-मुस्लिम स्टेट’साठीची डीप स्टेटची उघड झालेली योजना, उत्तरेला चीन आणि पश्चिमेला पाकिस्तान—असा हा मोठा सापळा रचला जात आहे. म्हणूनच भारत बंगालचा उपसागर- विशाखापट्टणम-निकोबार असा एक अलिखित कॉरिडॉर निर्माण करत आहे. जेणेकरून, उत्तर, वायव्य आणि इशान्येकडून होऊ घातलेली ही तिहेरी घेराबंदी समुद्राच्या बाजूने ओपन राहील. पण त्याबाजूने चीनच्या आरमाराला कोणताही वाव राहणार नाही. त्याचप्रमाणे चीनला या पट्ट्यात नाविक व गुप्तहेर हालचालीना फार मोठी स्पर्धा असेल.

      May 28, 2026


  • तुमचे कौटुंबिक, सामाजिक संबंध कसे सुधाराल

    आज समाज, संस्कृती यात अमुलाग्र बदल झाला आहे. असे असले तरी समाजातील लोकांच्या मानसिक, भावनिक गरजा या जशाच्या तशाच आहेत. त्या समजून घेतल्या तरी आपले नाते संबंध सुधरायला मदत होते. प्रत्येक पदोनपदी आपला लोकांशी संबंध येतोच. कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायच झालं तरी कुटुंबीयांच्या, नातेवाईकांच्या, समाजातील लोकांच्या मदतीची गरज लागतेच

      April 22, 2022


  • “वन औषधी अग्निशिखा”

    आपल्या बागेतील फुल पाहताच कोणाचेही लक्ष वेधून घेणारी वनस्पती म्हणजे ‘अग्निशिखा’ होय.अग्निशिखा ही वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.जंगलात शोध घेतला तर ही वनस्पती खूपच विरळ प्रमाणात आढळून येत आहे. जंगलांना वारंवार लागणाऱ्या आगींमुळे ह्या वनस्पतीचे जमिनीतील कंद नष्ट होतात.पर्यायाने ही प्रजाती दुर्लभ झाली आहे.नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या ह्या वनस्पतीला आपल्या परसबागेत स्थान देण्याची आज निकड निर्माण झाली आहे.

      April 14, 2011


  • रक्तरंजित आघातातून उभे राहिलेले पवित्र स्थान – सोरटी सोमनाथ

    सोरटी सोमनाथच्या मंदिराचा रक्तरन्जीत इतिहास आणि आता उभे असलेले मंदीर भारताचे गौरव स्थान आहे. प्रत्येक भारतीयांनी अवश्य भेट द्यावी असे पर्यटन स्थळ आहे. एखादे धार्मिक स्थान हजारो वर्षे अनेक स्वाऱ्यामध्ये नेस्तनाबूत होते, परंतु त्यानंतर प्रत्येक वेळा फिनिक्स पक्षासारखे राखेतून उभे राहते असे एकमेव स्थान आहे सोरटी सोमनाथ. सौराष्ट्राच्या पश्चिम किनारयावर वेरावळ पासून २० किमी वर वसलेल्या, बारा ज्योतिर्लिंगांमधील प्रथम क्रमांकावर असलेल्या या स्थानाचा इतिहास रक्तरंजित आहे.

      December 22, 2018


  • पक्षीपरिचय २२

      October 10, 2015


  • लिलाव !

    ‘तुला पाच पैश्याची किंमत नाही ‘ हे वाक्य आयुष्यात कितीदा ऐकले असेल याची नोंद नाही. घरी, बाहेर ,लहान.,थोर सर्वांची या बाबतीत एकवाक्यता मला आश्चर्यचकित करून जाते. जगणे कठीण झाले .म्हणून मग मी काय केले ?......
    जगण्यासाठी एकदा मी माझाच लिलाव माडला,
    सर्व अवयव विक्रीस ठेवले ,
    रास्त किंमत ,भव्य डिस्कांउट,
    एकावर एक फ्रीचे बॅनर लावले
    आमची कोठेही शाखा नाही आवर्जून लिहिले
    हात ,पाय ,कान,नाक,पाठ ,पोट
    आकर्षक पॅकिंगमध्ये मांडून ठेवले,
    “घ्या हो घ्या ,हवे ते घ्या ,
    ज्यास्ती ज्यास्त बोली लावा “
    लिलावाचा हॉल गच्च भरला,
    लहान- थोर , गरीब-श्रीमंत ,
    स्वकीय, ओळखीचे, अन अनोळखीही
    माझ्या साठी आले,मन माझे भरून आले,
    लिलाव सुरु झाला ,हाता-पायांचा ,
    लाख,,,, दोन लाख,... बोली चढत होती ,
    माझी किंमत मलाच काळात होती,
    कमाल बोली स्वकीयांनीच लावली,
    आश्चर्य वाटले. ............का?,
    ‘कष्टाला बरे आहेत म्हणाले!
    शिवाय पाठ आणि खांदे डिस्कांउट मध्ये!’
    नाक लांब, कान हलके, म्हणत सर्व अवयव खपले,
    पण ,..........................
    पोट अन हृदय तसेच राहिले ,
    फुकट पण कोणी घेईनात!
    वेळ संपत आली ,हॉल रिकामा होत आला,
    आता काय करू ? माझी तगमग सुरु झाली,
    शेवटी .......................
    पोटातली भूक, अन हृदययातल मन उपसून काढले,
    दोन्ही रिकामे अवयव भिरकावून दिले!,
    भूक आणि मन स्वतःच मारून टाकले!,
    मग मात्र जगायचं कस ते समजू लागले!.

      August 13, 2018


  • कोपराचा सांधा

    या सांध्यास एक नव्हे तर दोन सांध्यांचा अंतर्भाव होतो. दंडाचे हाड कोपराच्या बाजूला बाहुतील अलना आणि रेडियस या दोन हाडांशी मैत्री करीत कोपराचा सांधा तयार करते. यासाठी हाडाचे टोक भूमीतीतील निरनिराळ्या आकृत्यांसारखे बनविले आहे. अलना या हाडाशी महत्त्वपूर्ण सांधा बनविताना ते मोठ्या ढोलक्यासारखे दोन्ही बाजूंना रुंद व मध्ये आकुंचित पावल्यासारखे बनविले आहे.

      May 10, 2023


  • निसर्गाची किमया

    एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.

    तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....वाघ जोरात झेप घेतो... आणि तितक्यात वीज चमकते...त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो...

    आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते... माणसाचं आयुष्य हे असंच असतं... त्याच्या हातात काहीच नसतं... आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची... कर्ता करविता असतो तो ईश्वर...एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही...

    मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच...कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं...'Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!'

    आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं... दोन्ही एकाच रथाची चाकं... कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच...'समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला'...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल? 'चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'...

    त्याला त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं? 'नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.'तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल? एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...

    ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल? त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली? कोण सांगेल? कोण सांगेल कोण?? कुणीच नाही... हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं ... प्रेमाने सावरलेलं... आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं...
    ईश्वराने लिहीलेलं ... आपलं आयुष्यं...!

    मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो....

    दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.

    किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते...!!
    नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका..... कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.....- तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
    पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....-कोणी कितीही महान झाला असेल,पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही..स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस..देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं...

    -स्वामी विवेकानंद

      June 7, 2017


  • मलेरियाचा इतिहास – भाग ५

    अलेक्झांडर द ग्रेट, मंगोल राजा चेंगिजखान, सुलतान महमद तुघलक वगैरे मलेरियाला बळी पडलेल्या काही प्रमुख व्यक्ती.

      November 5, 2018