वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ज्या आईने मातृभाषा शिकवली तीच जर आपण विसरून गेलो की आपला परिवार,समाज, विद्या व देशाशी संबंध तुटतो. मातृभाषा विसरणे या सारखा दुसरा मोठा कोणताही शाप या देशात नाही.
त्या परमात्म्याला स्वतःच्या अंतरंगात आणि आपल्याला त्याच्या चैतन्याच्या अंशरुपात कशाप्रकारे समजून घ्यायचे? त्याचे निरूपण करताना आचार्य श्री पुढे म्हणतात,
ज्ञान प्राप्ति करीता पर्यटन व भारतीय संस्कृतिचे सखोल ज्ञान प्राप्त होण्यासाठी अनेक भाषा परिवारातील विद्वानांनाचे सान्निध्य आवश्यक असते हे महिपती महाराज यांनी जाणले होते. खरा सच्चा संत हा सर्व भाषेशी मैत्री ठेवतो. वर्तमान काळी सर्वांनी भाषा भेद, जातीभेद वर्ज्य केला तर ज्ञान, भक्ती,विकास होणार हे निश्चित आहे.
मी पहिले पाऊल जेव्हा ऑस्टिन एअरपोर्ट बाहेर जमिनीवर टाकले, तेव्हा आपले नगरपण असेच स्वच्छ असावे असे वाटून गेले. आणि तसे ते दिसेल हि. फक्त प्रत्येकाने ते मनावर घेतले तर. आपले महामार्गहि, इथल्या इतके रुंद नसले तरीही, चांगलेच आहेत. येथील रस्त्यावर आपल्या इतके जाहिरातीचे प्रस्त दिसले नाही. रस्त्यावर केवळ दिशादर्शक, गरजेचे फलक मात्र आहेत, आणि तेही वाहन चालकाच्या नजरेच्याटप्प्यात सहज येण्याच्या उंचीवर.
एकमेवाद्वितीय असणाऱ्या परमात्मतत्त्वाच्या जीव स्वरूपात अनेक रूपांत प्रगट होणार्या लीलेचे वर्णन करताना आचार्यश्री येथे त्यामागील रहस्य उलगडून दाखवत आहेत. ते म्हणतात,
Marley & Me मुव्ही पाहिलाय? २००८ साली रिलीज झालेला हा मुव्ही पाहिला नसाल तर जरूर पहा. ज्यांच्या घरी कुत्रा आहे किंवा ज्यांना तो घरी असावा असे वाटते अशा सर्वांनी तर हा चित्रपट नक्की पहिला पाहिजे.
महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक कांदबरी पहला गिरमिटिया सुप्रसिद हिंदी साहित्यकार श्री गिरिराज किशोर यांनी लिहिली आहे. ऐतिहासिक कांदबरी लिहिताना भूतकाळातील घटना, प्रसंग, वास्तु, शहर, देश व तत्कालीन सामाजिक स्थितीचा अभ्यास करावा लागतो. या साठी लेखकाने दक्षिण अफ्रिकेचा दौरा केला आहे. दक्षिण अफ्रिकेतील महात्मा गांधीच्या आठवणीवर आधारित ही एक सामाजिक राजकीय कांदबरी आहे.
काही वर्षा पूर्वी महाराष्ट्र सरकारने शालान्त परीक्षेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व पाठयपुस्तके मोफत वाटण्याची घोषणा केली. ती अमलात आणेपर्यंत आता फक्त आर्थिकदृष्टया कमकुवत वर्गासाठीही लागू करण्याची घोषणा नंतर केली . मोफत पाठ्य पुस्तक योजने वर त्या काळी बरीच चर्चा झाली. मला माझे शालेय जीवन आठवले.
भगवंताच्या प्राप्तीचा भगवंताने स्वतः दाखवलेला मार्ग म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. त्या भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाच्या आधारे परमतत्वाला प्राप्त करता येते, हे सांगताना आचार्य श्री म्हणतात,
एका दंतकथेनुसार, आचार्यांच्या कालडि गावातील एका निर्धन ब्राह्मणाला दारिद्र्यापासून मुक्त करण्यासाठी रचलेले हे ‘कनकधारा स्तोत्र’ लक्ष्मी स्तुतिपर एक अत्यंत श्रेष्ठ स्तोत्र आहे. या अत्यंत रसाळ व भक्तिपूर्ण स्तोत्रात मुख्यत्वे वसंततिलका, रथोद्धता व वैतालीय/सुंदरी या वृत्तांचा उपयोग केला आहे. खिल(श्री)सूक्तातील ‘सरसिजनिलये’ हा श्लोक औपच्छन्दसिक/पुष्पिताग्रा वृत्तात आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti