वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते. या व्रता दरम्यान, सूर्य, सूर्यपुत्र यम व त्याची बहिण षष्टी हिचे पूजन केले जाते.
November 10, 2021
प्रातःकाले भावविशुद्धः प्रणिधाना-
द्भक्त्या नित्यं जल्पति गौरिदशकं यः ।
वाचां सिद्धिं सम्पदमग्र्यां शिवभक्तिं
तस्यावश्यं पर्वतपुत्री विदधाति ॥ ११॥
या गौरीदशकम् नामक स्तोत्राचे समापन करतांना या स्तोत्राच्या पठनाचा विधी आणि स्तोत्र पठनाचे लाभ सांगणाऱ्या फलश्रुती स्वरूप असणाऱ्या या श्लोकात आचार्यश्री म्हणतात,
प्रातःकाले - या स्तोत्राचे पठन प्रात:काळी अर्थात मंगलमय वातावरणात, प्राधान्यक्रमाने करावे.
भावविशुद्धः- मनात अत्यंत शुद्ध भाव ठेवून पठन करावे. तो शुद्ध भाव आपण उठल्या उठल्या अधिक प्रबल असतो.
त्यामुळेच सर्व व्रतवैकल्ये, प्रार्थना प्रभातकाली करण्यास सांगितलेल्या आहेत.
प्रणिधानाद्- परिपूर्ण तन्मय होऊन. अर्थात मनामध्ये आई जगदंबेच्या व्यतिरिक्त कशाचाही विचार नसतांना.
भक्त्या- परिपूर्ण भक्तीने युक्त अशा अवस्थेत.
नित्यं जल्पति गौरिदशकं यः - जो या गौरी दशकं स्तोत्राचे नित्य पठण करतो,
त्याला काय काय प्राप्त होते हे सांगताना उत्तरार्धामध्ये आचार्यश्री म्हणतात,
वाचां सिद्धिं- मनात येणारा प्रत्येक संकल्प मनातल्या मनात बोलल्याबरोबर देखील परिपूर्ण करणारी दिव्यशक्ती.
व्यवहारात देखील जे बोलेल ते पूर्ण होण्याची शक्ती.
सम्पदमग्र्यां- अग्र म्हणजे सर्वश्रेष्ठ संपत्ती. अध्यात्मशास्त्रामध्ये शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान या सहा गोष्टींना षट्संपत्ती असे म्हणतात. आई जगदंबेच्या कृपेने ही संपत्ती साधकाला प्राप्त होते.
शिवभक्तिं- भगवंताची परमभक्ती. शुद्ध मंगल भक्ती.
तस्यावश्यं पर्वतपुत्री विदधाति- पर्वतपुत्री अर्थात आई जगदंबा गौरी त्याला अवश्य प्रदान करते.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 9, 2020
वृद्धापकाळात होणारे मुख्य आजार आणि संक्षिप्त उपचार
२) हाडे ठिसूळ होणे (Osteoporosis) - उतार वयात हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडे ठिसूळ होऊ लागतात. सुरुवातीला त्याची फारशी काही लक्षणे दिसत नाहीत पण लहानशा आघातमुळे पटकन हाड मोडण्याची (fracture) शक्यता वाढते. अशा वयात अस्थिसंधान (हाडे जुळून येणे) होणे कठीण असते, लवकर झीज भरून निघत नाही शिवाय वयोपरत्वे हालचाली कमी असल्यामुळे स्नायू पण दुर्बल होऊ लागतात आणि परिस्थिति कठीण होऊन बसते. झीज भरून येण्यासाठी आहारतून मिळणारे कॅल्शियम पुरत नाही. अधिक कॅल्शियमची गरज भरून काढण्यासाठी महागड्या गोळ्या घेण्यापेक्षा साधी चुन्याची निवळी रोज फक्त २ चमचे घ्यावी. त्यामुळे पुरेसे कॅल्शियम मिळून हाडे बळकट होऊन मोडण्याची शक्यता कमी होते. निवळी कीती आणि कशी घ्यावी - सकाळी चहा किंवा दुधामध्ये २ चमचे टाकून घेणे. कॅल्शियमचे शोषण योग्य होण्यासाठी व्हिटॅमिन डी (ड जीवनसत्व) मिळण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात किमान अर्धा तास रोज बसावे. विना खर्चाचा आणि हमखास लाभदायक असा हा उपाय आहे.
३) संधिवात (Osteoarthritis) - या आजाराला संधिवात अर्थात degenerative arthritis किंवा osteoarthritis म्हणतात. वेदनाशामक औषधांचा उपयोग तात्पुरता होतो. उतारवयात अशा औषधांचा उपयोग टाळणे योग्य. वेदानाशमक औषधांचा वापर टाळून संतुलित आहारावर भर द्यावा, दिनचर्येत बदल करावेत, योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम करावेत आणि गरज लागली तर वनस्पतीजन्य सौम्य औषधांचा वापर करावा.
आहार: भाजलेल्या धान्याचा आहारात वापर करावा, पोळ्यांच्या पिठात सुंठ पाव चमचा आणि एरंडेल २ चमचे टाकणे, मोड आलेल्या मेथी २ चमचे सकाळी रिकाम्या पोटी खाण्यास द्याव्या.
४) निद्रानाश (Insomnia) - मूल जन्माला आल्यावर दिवासतले १५ ते २० तास झोपते. वय वाढू लागल्यावर झोप कमी होत जाते. वृद्धावस्थेत तर झोप खूपच कमी होते. शरीराला आणि मनाला पूर्ण विश्रांती मिळण्यासाठी किमान ७ तास झोप घेणे आवश्यक आहे. कोणत्याही वयात झोपेच्या गोळ्या घेतल्या तर मेंदूच्या पेशींवर घातक परिणाम होतो हे आपण जाणतोच. मग उतार वयात तर याचे दुष्परिणाम झेलण्याची ताकद शरीराकडे कशी असेल? त्यासाठी काही अगदी सोपे उपचार आपल्याला करता येतील ज्याने काहीही दुष्परिणाम न होता झोपही छान लागेल.
उपचार: १) तळपायला तूप चोळून मोजे घालून झोपावे. २) कुंकुम घृत (नस्य) २ - २ थेंब झोपण्यापूर्वी १५ मिनिटे कोमट करून नाकात टाकावेत. ३) अर्धा कप दुधात २ - ३ चिमूट जायफळ टाकून झोपताना प्यावे.
५) विस्मरण (Dementia / Alzheimer’s disease) - मेंदू आणि एकंदर सर्वच मज्जायंत्रणेची निर्मिती होण्यात स्निग्ध पदार्थांचा सर्वात जास्त सहभाग असतो. हाडांसाठी जसे कॅल्शियम किंवा स्नायूंसाठी जशी प्रोटीनन्स तसे मेंदूसाठी स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थांमध्ये सर्वात उत्तम आहे गाईचे तूप आणि त्याच्या खालोखाल नारळाच्या दुधापासून निर्मित तेल (याला व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणतात). या मिश्रणात विशिष्ट वनस्पतींचे तैलार्क मिश्र करून “कुंकुम घृत” मी स्वतः तयार करतो. हे औषध नित्यनेमाने नाकात टाकावे. खरंतर वृद्धांनाच नव्हे तर शाळकरी विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती सुधारण्यासाठी हे उत्तम पोषण आहे. वार्धक्यात विस्मरण हे लक्षण अतिशय हळूहळू दिसू लागते. सुरुवातीला एखाद्या माणसाचं नाव आठवत नाही. त्यावेळी असं वाटतं की बरेच दिवसात भेट झाली नाही म्हणून आठवत नसेल. पण ही एका रोगाची सुरुवात आहे हे समजत नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पुढे विसरण्याचं प्रमाण वाढायला लागतं आणि घरात हा एक थट्टा मस्करीचा विषय होतो. मात्र पुढे काही वर्षांनी डिमेन्शिया किंवा अल्झायमर्सचे निदान झाल्यावर “आता यावर काही इलाज नाही” अशी परिस्थिति होते. म्हणून सर्वांना आवर्जून सांगावेसे वाटते की पन्नाशी दरम्यान हे औषध नाकात टाकायला सुरुवात करा, एकदा लक्षणे दिसू लागली की कोणत्याही औषधाचा काहीही उपयोग होत नाही.
मात्रा: २ - २ थेंब सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी, किंचित कोमट करून नाकात टाकावेत. मान कलती करून दोन मिनिटे तसेच पडून राहावे. हे कुंकुम नस्य कोमट केल्याने नाकाच्या श्लेष्मल त्वचेच्या माध्यमातून मेंदूच्या पेशींपर्यन्त हे सहज शोषले जाते.
६) कंपवात (Parkinson’s disease) - या विकारात शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करणारा मेंदूतील चेतापेशींचा विशिष्ट भाग हळूहळू नाश पावतो. हातांना कंप, स्नायू ताठर होणे, हालचालींमध्ये शिथिलता येणे आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे अशी या विकाराची मुख्य लक्षणे आहेत. मज्जा यंत्रणेतील डोपामाइनचे प्रमाण कमी झाल्यामुळे हा विकार संभवतो. या आजारपासून सुटका होण्यासाठी वरील कुंकुम नस्याचा वापर नियमितपणे करावा.
७) ऐकू कमी येणे (Hearing disorder) - वयानुसार कानाने कमी ऐकू येणे हे नॉर्मल आहे असे बऱ्याच लोकांना वाटते. वास्तविक हा दोष आहे आणि बिना औषधाने पण कधीकधी बरा होऊ शकतो. विशेषतः वारंवार सर्दीमुळे कानात दडे बसतात आणि त्यामुळे बहिरेपणा आला असेल तर एक सोपा इलाज म्हणजे लसूण आणि हिंगाचा खडा कापसात गुंडाळून रात्री कानात ठेवावा. लसूण आणि हिंग अतिशय उष्ण असतात. याने कानात आग झाल्यासारखी संवेदना होते. रात्री झोपताना पाणी पिण्याची सवय असणाऱ्यांना कानात दडे बसण्याची शक्यता जास्त असते. काहीही इलाज न करता एवढेच पथ्य केल्याने कित्येक जणांना फायदा झाला आहे. उपाय अगदी सोपा आहे, करून पाहायला काहीच हरकत नाही. कानाच्या शिरेला (नर्व्हला) दुखापत झाली असेल तर मात्र या उपायचा फायदा होणार नाही.
८) अंथरूणात लघवी होणे (Lack of bladder control) - वयानुसार मूत्राशयावर नियंत्रण करणाऱ्या चेतापेशी दुर्बल होतात आणि त्यावरचे नियंत्रण बिघडते. हा त्रास टाळण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक तास पाणी किंवा कोणताही द्रव आहार (सरबत/ चहा/ कॉफी/ शीतपेय) घेऊ नये. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी ‘संध्या’ नावाची पूजा करण्यामागे आरोग्याचा हाच दृष्टिकोन असावा. आहारतून गोड पदार्थ कमी करावेत, रात्रीच्या जेवणात तर गोड मुळीच खाऊ नये, केळी वर्ज्य करावीत. एवढे करूनही बरे नाही वाटले तर उंबरसाल चूर्ण अर्धा चमचा थोड्या गुळाबरोबर मिश्र करून गोळी संध्याकाळी घ्यावी.
९) अपचन (Indigestion/ Constipation) - वृद्धापकाळात शरीराची हालचाल कमी असते त्यामुळे पचनक्रिया मंदावते, पोटाला जडपणा जाणवतो, त्यामुळे कधीकधी श्वास घ्यायलाही त्रास होतो. यावर सोपा उपाय म्हणजे धान्य (गहू/ तांदूळ/ ज्वारी/ बाजरी वगैरे) भाजून आहारात वापर करावा. पोट साफ होत नसेल तर पोळ्यांच्या पिठात योग्य मात्रेत एरंडेल तेल टाकावे. एरंडेल टाकल्यामुळे पोळ्या अतिशय नरम होतात, त्याच्या गिळगिळीतपणाचा त्रास अजिबात जाणवत नाही. मालवरोध होत असल्यास सर्रास पालेभाज्या खण्यावर जोर दिल जातो. पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे आतड्यांमधला स्निग्धांश शोषला जातो आणि तो स्तर अधिकच कोरडा होत जातो. काहीतरी रेचक औषध घेतल्याशिवाय पोट साफ होत नाही अशी परिस्थिति पालेभाज्या जास्त खण्यामुळे निर्माण होते हे लक्षात ठेवावे. कोठा साफ राहण्यासाठी आणखीन काही उपाय म्हणजे जेवणाच्या सुरुवातीला १ चमचा तिळाचे तेल आणि त्यात सैंधव मीठ पाव चमचा घालून गिळून टाकावे. तेलामुळे अन्नमार्गात स्नेहन होते आणि सैंधव मिठाने मळाचे खडे ठिसूळ होतात. दुसरा प्रयोग म्हणजे अर्धा कप गरम दूध, तेवढेच पाणी आणि चमचाभर तूप सकाळी रिकाम्यापोटी घ्यावे. यानेही पोट चांगले साफ होते.
१०) मधुमेह (Diabetes) - भारताला मधुमेहाची राजधानी म्हणतात कारण जगात सर्वात जास्त माधुमेही रुग्ण भारतात आहेत. मधुमेहात दोन मुख्य प्रकार आढळतात. ज्यांना इन्सुलीनचे इंजेक्शन घ्यावे लागते आणि दुसऱ्या प्रकारात केवळ औषधाने उपयोग होतो. औषधे घेत असताना सोबत मोड आलेल्या मेथीचे २ चमचे सकाळी रिकाम्यापोटी चावून खाण्यामुळे वाढती रक्तशर्करा चांगलीच नियंत्रणात राहते.
इतर फायदे - याने पचन सुधारते, सांधेदुखी कमी होते, हृदयाचे रक्ताभिसरण सुधारते, रोग प्रतिकरक्षमता सुधारते, अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन कमी करण्यासाठी हा प्रयोग उपयोगी आहे.
-डॉ. संतोष जळूकर
वैयक्तिक सल्ल्याकरिता फोन +91 7208777773
July 5, 2022
मोठी माणसे पत्ररुपाने आपल्यात मृत्यूनंतरही असतात. अब्राहम लिकन आज असते तर आपले पत्र शैक्षणिक संस्था विसरल्या की काय? अशी शंका त्यांना आली असती. पत्राला ‘शोपीस केलेलं त्यांनाही आवडलं नसतं. काही पत्र काळाशी इमान ठेवून लिहिलेली असतात. काळ बदलतो, काळ सोकावतो, परिस्थितीचे संदर्भ बदलल्यावरही पत्रातील विचारांची उंची कमी होत नाही. समाज थिटा पडतो. तेव्हा विचारांची उंचीच कामाला येते.
October 9, 2018
१६ डिसेंबर १८५४ रोजी “अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे” या महाराष्ट्रातील पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना झाली
December 16, 2017
काल सुप्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांचे ‘कार्डियक अरेस्ट’ च्या कारणाने निधन झाले, हे ऐकून सगळ्यांना शॉक बसला. संपूर्ण देशात पुन्हा चर्चा सुरु झाली की, गेल्या काही काळापासून या कारणाने मृत्यु होणाऱ्याच्या संख्येत वाढ होत आहे.
कार्डियक अरेस्ट म्हणजे काय?
कार्डियक अरेस्ट म्हणजे अचानक ह्रदयाचे काम करणे बंद होणे होय. विशेष म्हणजे हा आजार दिर्घ काळाचा नसतो, यासाठी ह्रदयाशी संबंधीत असलेल्या आजारांपेक्षा याला खूपच धोकादायक मानले जाते.
लोक याला ह्रदय विकाराचा झटकाच समजतात, मात्र कार्डियक अरेस्ट ह्रदय विकाराच्या झटक्यापेक्षा वेगळा असतो. तज्ज्ञांच्या मते, कार्डियक अरेस्ट तेव्हा होतो, जेव्हा ह्रदय शरीराच्या चारही बाजूंनी रक्तसंचार करणे बंद करते. मेडिकल नियमांनी म्हटले तर ह्रदय विकार सर्कु लेटरी समस्या आहे आणि कार्डियक अटॅक इलेक्ट्रिक कंडक्शनमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे होतो.
आपल्या छातीत दुखायला लागले की, ह्रदय विकाराच्या झटक्यादरम्यानच याप्रकारचे दुखते असे आपण समजतो, मात्र तज्ज्ञांच्या मते, असे दुखणे हार्ट बर्न किंवा कार्डियक अटॅकच्या कारणानेही होऊ शकते.
कार्डियक अरेस्टमध्ये ह्रदयाचे ब्लड सर्कुलेशन पुर्णत: बंद होते. ह्रदयाच्या आत वेंट्रीकुलर फाइब्रिलेशन निर्माण झाल्याने याचा परिणाम ह्रदयाच्या ठोक्यांवर होतो. यामुळे कार्डियक अरेस्टमध्ये काही मिनिटातच मृत्यु होतो.
कार्डियक अरेस्ट अचानकच होतो. विशेष म्हणजे ज्यांना ह्रदयासंबंधी आजारपण आहे, त्यांना कार्डियक अरेस्ट होण्याची शक्यता जास्त असते.
कधी-कधी कार्डियक अरेस्ट अगोदर छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, पल्पीटेशन, चक्कर येणे, शुद्ध हरपणे, थकवा किंवा ब्लॅकआउट होऊ शकते.
याच्या उपचारासाठी रुग्णास कार्डियोपल्मोनरी रेसस्टिसेशन (सीपीआर) दिले जाते, ज्यामध्ये ह्रदयाच्या गतीला नियमित केले जाऊ शकते. शिवाय या रुग्णांना ‘डिफाइब्रिलेटर’ने विद्युत शॉक देऊन हार्ट बीटला नियमित करण्याचा प्रयत्न केला जातो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 20, 2017
यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की,”टाइम्सने मराठी वृत्तपत्र काढावे अशी सूचना मी केली होती, हे खरे आहे. कारण मराठी वृत्तपत्राद्वारे टाइम्सला मराठी मन समजून घ्यावे लागेल.मराठी वृत्तपत्राच्या सततच्या सान्निध्यामुळे महाराष्ट्रातील नव्या पुरोगामी विचारांची त्यांना ओळख होईल आणि टाइम्स व इतर पत्रांच्या द्वारे हा विचार महाराष्ट्राबाहेर असलेल्यांना कळेल, असा यात दोघांचा फायदा होणार आहे.” ही माहिती ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली.
June 18, 2022
हिवाळा हा ऋतू आता सुरू झाला आहे. हिवाळ्यामध्ये रामफळ आपल्याला बाजारात दिसते. थंडी मध्ये येणारी सर्व फळे सेवन केली पाहिजे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच रामफळ हे बहूतेक लोकांना आवडत नाही. आवडत जरी नसले तरी याचे एकदा सेवन करून तुम्ही बघा, कारण रामफळ हे आरोग्यासाठी खूप उतम फळ आहे. हल्ली पूर्वी प्रमाणे भरपूर रामफळे बाजारात येत नाहीत कारण त्याची मुद्दामहून लागवड कोणी करत नाही व जुनी झाडे नष्ट होताहेत.
January 7, 2025
“कसला विचार करतेयस संयोया? ” संयोगिता कागदपत्रे बघत विचार करण्यात गुंग झाली होती ते बघून विक्रमजीत थट्टेत म्हणाला.
“मागच्यावेळी बघितलं, ३५ वर्षाच्या व्यक्तीला २५ वर्षे मुदतीच्या ४० लाख सम अॅशुअर्डच्या एन्डावमेंट प्लॅनसाठी एका कंपनीचा वार्षिक प्रिमियम होतो १,५१,२४० रुपये आणि त्याच कंपनीच्या त्याच मुदतीच्या, ४० लाखाच्याच टर्म प्लॅनसाठी वार्षिक हप्ता होतो ९,८८४ रुपये. एन्डावमेंट प्लॅनमधून मॅचुअरिटी बेनेफिट म्हणून साधारण ७५ लाख ते अगदी १ कोटी मिळतील धरु. टर्म प्लॅनला मॅचुअरिटी बेनेफिट नसतो, पण एन्डावमेंट प्लॅनऐवजी टर्म प्लॅन घेतला आणि बाकीची १,४१,३५६ रुपये ही रक्कम इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवली आणि त्यावर फक्त १२ टक्केने रिटर्न मिळाले तरी एन्डावमेंटपेक्षा १ कोटी जास्त मिळतात. प्रत्यक्षात मागील सोळा वर्षात काही म्युचुअल फंडांनी सरासरी २० टक्के वार्षिक या हिशेबाने रिटर्न दिलेले आहे. त्यानुसार तर चक्क ५ कोटी जास्त मिळू शकतात.”
“बापरे, खूपच जास्त तफावत आहे. पण म्युचुअल फंडाचा वैधानिक इशारा असतो, मागील कामगिरीप्रमाणेच पुढेही कामगिरी राहील याची हमी नाही आणि या गुंतवणूकीत जोखीम असते. हे समजून गुंतवणूक करत असाल तरच चांगलं, ” विक्रमजीतने सावध पवित्रा घेतला.
“जोखीम असते खरं, म्हणून १,४१,३५६ पैकी काही पीपीएफ या सुरक्षित साधनामध्ये आणि काही इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवावे. प्रमाण किती असावं ते प्रत्येकाने आपल्या जोखीम घेण्याच्या प्रवृत्तीनुसार ठरवावं, तरीही जास्तच लाभ मिळेल. ”
“तू बराच अभ्यास केलेला दिसतोय. आधी इक्विटी म्युचुअल फंड म्हणजे काय याची उजळणी करु आणि सरासरी २० टक्के वार्षिक रिटर्न म्हणजे कम्पाऊंडेड ॲन्युअलाईज्ड ग्रोथ रिटर्न अर्थात सीएजीआर म्हणजे काय याचाही खुलासा करुन घेऊ. ”
“ठीक, इक्विटी म्युचुअल फंड हा गुंतवणूकदारांचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवतो, म्हणजे या रकमेतून अनेक कंपन्यांचे अनेक शेअर्स विकत घेतो. या शेअर्सचे भाव जसे कमी-जास्त होतात तसे त्या फंडाच्या गुंतवणूकीचे मूल्यही रोजच्या रोज कमी-जास्त होते. फंडाच्या गुंतवणूकीचे हे मूल्य भागिले त्या फंडाने इश्यू केलेले युनिट म्हणजे त्याचे प्रति युनिट नक्त मालमत्ता मूल्य म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यू किंवा संक्षेपाने एनएव्ही. म्युचुअल फंडाची नवी योजना लॉंच होते तेव्हा युनिटचे मूल्य १० रुपये असते, नंतर फंडाच्या कामगिरीनुसार या युनिटचे मूल्य म्हणजेच एनएव्ही किती ते ठरते. समजा फंडाच्या लॉंचनंतर त्याच्या एकूण गुंतवणूकीचे मूल्य काही वर्षांनी बरोबर दुप्पट झाले तर त्याचा एनएव्ही १० रुपयावरुन २० रुपये होईल. आपण जेव्हा म्युचुअल फंडात गुंतवणूक करतो, तेव्हा त्या बदल्यात आपल्याला त्या फंडाचे युनिट ह्या एनएव्हीप्रमाणे मिळतात. समजा एका फंडाचा एनएव्ही २० रुपये आहे आणि आपण त्यात ४०,००० रुपये गुंतवले तर आपल्याला त्या फंडाचे ४००००/२० बरोबर २००० युनिट मिळतील. हे युनिट आपण त्या म्युचुअल फंडाकडून विकत घेतो आणि विमोचन म्हणजे रिडम्पशन करतानाही युनिट म्युचुअल फंडाला परत करतो आणि त्यावेळेस जो एनएव्ही असेल त्यानुसार पैसे मिळतात. म्युचुअल फंडातून दोन प्रकारे लाभ मिळतात. एक लाभांश किंवा डिव्हिडंड पर्याय, यात वेळोवेळी लाभांश मिळतो, मात्र लाभांश मिळेलच याची हमी नसते. दुसरा पर्याय म्हणजे वृध्दी किंवा ग्रोथ ऑप्शन. यात फंडाच्या एनएव्हीत वाढ होते आणि युनिट्सचे विमोचन करताना या वाढलेल्या भावामुळे फायदा मिळतो. अर्थात शेअरमार्केट कोसळले तर एनएव्ही कमीसुध्दा होतो. एक उदाहरण म्हणून एचडिएफसीसी इक्विटी फंड ही म्युचुअल फंड योजना बघू. जानेवारी १९९५मध्ये हा फंड लॉंच करण्यात आला. त्यावेळेस १ लाख रुपये याच्या ग्रोथ ऑप्शनमध्ये गुंतवले असते तर १० रुपये प्रति युनिट या किमतीने फंडाचे १०,००० युनिट्स मिळाले असते. २ जूलै २०१५ला या फंडाचा एनएव्ही होता ४७० रुपये म्हणजे त्याच १०,००० युनिटचे जर त्या दिवशी विमोचन केले असते तर १०,००० युनिट्स गुणिले ४७० बरोबर ४७ लाख रुपये मिळाले असते. १९९५ साली फक्त एकदाच केलेल्या १ लाख रुपयाच्या गुंतवणूकीतून ही ४७ लाख इतकी रक्कम मिळाली असती. ”
“बरोबर, १ लाखावर ४६ लाखांचा फायदा दिसतो, पण तो सुमारे २० वर्षात मिळाला आहे लक्षात घेतले तर वार्षिक साधारण २० टक्के सीएजीआर हा दर होतो. म्युचुअल फंडाच्या एनएव्हीमध्ये एखाद्या वर्षी १० टक्के वाढ होते, कधी २० टक्के तर कधी उणे २०, ३० टक्के म्हणजे घटसुध्दा. संपूर्ण कालावधीसाठी सरासरीने वाढीचा एकच दर काय होता ते सीएजीआरने कळते. मूळ भांडवल, विमोचन करताना मिळालेली रक्कम आणि गुंतवणूकीचा कालावधी यांचा हिशेब करुन हा सीएजीआर काढला जातो. ”
“काही महत्वाच्या बाबी. २० टक्के इतका सीएजीआर देणारा एचडिएफसीसी इक्विटी हा एकच फंड नाही तर इतरही काही फंडांनी चांगले लाभ दिलेले आहेत. बिर्ला सनलाईफ इक्विटी फंड, आयसीआयसीआय टॅक्स प्लॅन, फ्रॅन्कलीन इंडिया ब्ल्यूचीप आणि इतरही काही फंडांच्या वृध्दी पर्यायामध्ये दीर्घ कालावधीत उत्तम लाभ मिळालेला आहे. सर्व फंड एकसमान रिटर्न देत नाहीत. त्यांची तुलनात्मक कामगिरी, ते किती जोखीम घेतात इत्यादी काही निकषांनुसार कोणत्या म्युचुअल फंडात गुंतवणूक करायची ते ठरवता येते. तेव्हा गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने फंडाची निवड करावी. शेवटी पुन्हा म्युचुअल फंडातील गुंतवणूकतून पुढेही असा लाभ मिळेल याची हमी नाही आणि त्यात जोखीम असते.”
(सर्व आकडे ढोबळमानाने व केवळ माहितीसाठी)
मी मराठी Live मध्ये दि. ४ ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख.
उदय कुलकर्णी
August 11, 2015
मी ठाण्यात जन्मले हे माझं अहोभाग्य. कारण मला कलाकार न होण्याला एकही कारण ठाण्याकडे नव्हतं, उलट ही कलावंत कशी होत नाही हे पाहणारेच अवतीभवती होते. कथ्थक नृत्यगुरू डॉ. राजकुमार केतकर. अगदी हाकेच्या अंतरावर यांचे नृत्यवर्ग. गडकरी रंगायतनसारखी वास्तू दोन मिनिटांच्या अंतरावर आणि कलासरगम, मित्रसहयोग यांसारख्या नाट्यसंस्था संधी द्यायला उत्सुक.
September 30, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti