ज्या गोष्टीमुळे आपला भारत देश जगाला भुरळ घालत असेल तर ती बाब म्हणजे लोकशाही. या लोकशाहीला बळकट करणारी प्रणाली म्हणजे मतदान. प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारीच्या पूर्व संध्येला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो.
१८२२ मध्ये सर विल्यम एर्स्किन यांनी आपल्या लेखनात जॉन स्मिथ दैनंदिनी ईस्ट इंडिया कंपनीचे निर्देशनासह अजिंठा लेणी स्थापत्य, शिल्प व चित्रांची चर्चा केली आहे. इसवी सन पूर्व २०० च्या सुमाराला लेणी खोदण्यास सुरुवात झाली होती. पैठणच्या सातवाहन घराण्यातील सम्राटानी याची सुरुवात केली. सातवाहन काळात ८, ९, १०,१२, १३ आणि १५ या लेण्यांचे खोदकाम पूर्ण झाले. पुढे जवळपास ५०० वर्षे खोदकाम बंद होते त्यानंतर पुन्हा पाचव्या शतकात गुप्त , वाकाटक आणि बदामीच्या चालुक्यांनी येथील लेण्यांचे खोदकाम सुरु केले.
हृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते.
अजय – अतुलचे संगीत, गुरू ठाकूर यांचे संवाद व गीतलेखन, झी मराठीची सहनिर्मिती आणि रवी जाधव यांचं दिग्दर्शकीय पदार्पण व रवी जाधव, अतुल कुलकर्णी, किशोर कदम, सोनाली कुलकर्णी (ज्युनियर) यांचा अभिनय या सगळ्याचा सहभाग असल्याने हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला.
अंकशास्त्रानुसार, तुम्ही ज्या जन्मतारखेला जन्म घेता त्या जन्मतारखेचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो. अंकशास्त्रात १ ते ९ अंक आहेत आणि या प्रत्येक अंकाचा स्वामी एक विशिष्ट ग्रह आहे. अंकशास्त्रात (Numerology) ५ हा अंक खूप खास मानला जातो.
फनिश्वरनाथ रेणु यांनी एक लघुकथा लिहली, “मारे गये गुलफाम.” प्रसिद्ध गीतकार ‘शैलेंद्र’ त्या कथेच्या प्रेमातच पडले, आणि या त्यांच्या पहील्या आणि शेवटच्या चित्रपटसाठी हा शब्दांचे बादशहा, चक्क निर्माता बनले, आणि आयुष्याची सगळी कमाई पणाला लावुन त्याने हा चित्रपट बनवला.
कोणत्याही वस्तूवर जेव्हा प्रकाशकिरण पडतात तेव्हा ते त्या वस्तूच्या आरपार निघून जाऊ शकतात. अशी वस्तू पारदर्शक असते. साहजिकच तिचा वापर आरशासाठी होणं शक्य नसतं. इतर काही वस्तू अशा असतात की त्यांच्यावर पडणारे प्रकाशकिरण त्यांच्याकडून संपूर्णतया शोषले जातात. अशा वस्तू संपूर्ण अपारदर्शक असतात. त्यांच्या पाठी त्या वस्तूंची छाया पडते. आपलं शरीर अशा वस्तूंमध्ये मोडतं. म्हणून तर सूर्यप्रकाशात किंवा रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशात आपली छाया ठळकपणे पडते.
मैत्रीच्या नात्यामध्ये असणारी व्यक्ती ही आपल्या निवडीवर अवलंबून असलेल्या काही व्यक्तींपैकी एक असते. त्यामुळे मैत्री, जिव्हाळा जपण्यासाठी वर्षातले काही दिवस खास असतात. दरम्यान जगभरात दरवर्षी ३० जुलै हा दिवस जागतिक मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो. दक्षिण अमेरिकेत विशेषत: पॅराग्वेमध्ये अनेक वर्षांपासून फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. दक्षिण आफ्रिकेत १९५८ मध्ये आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानंतर सर्वांनी मित्र मैत्रिणींना ग्रिटिंग कार्ड देत हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. भारतासह अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. अमेरिकेतील ओहायोमध्ये असलेल्या ओर्बलिनमध्ये ८ एप्रिलला फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.
जागतिक पातळीवरील विविध देशांत वेगवेगळ्या दिवशी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. २७ एप्रिल २०११ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत ३० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या मान्य करण्यात आला. फ्रेंडशिप डेचा एकंदरीत इतिहास पाहता व्हॅलेंटाईन डे, फादर्स डे, मदर्स डे, चॉकलेट डे यांसारख्या दिवसांप्रमाणे फ्रेंडशिप डेचा पायांडा पाश्चिमात्य देशांमध्ये रुजवण्यात आला. भारतात दरवर्षी ऑगस्टच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो. यंदा १ ऑगस्ट २०२१ रोजी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार आहे. सोशल मीडियाच्या युगात फ्रेंडशिप डेचे महत्त्व फारच वाढल्याचे पाहायला मिळते.
आज तुमच्या आयुष्यातील खास मित्रमंडळींचा दिवस स्पेशल करण्यासाठी त्यांना फेसबूक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॅपच्या माध्यमातून मैत्री दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश, एसएमएस, मेसेजेस, GIFs, HD Images, Wallpapers यांच्या माध्यमातून शुभेच्छापत्रं शेअर करून तुमच्या मैत्रीमधील बॉन्डिग अधिक दृढ करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून बाहुली-बाहुला खेळला जातोय. त्याचे दाखले आपल्या पाणिनी, ज्ञानेश्वरी आणि दासबोधात वाचायला मिळतात.
ठिबक सिंचन ही अत्याधुनिक सिंचनप्रणाली आहे. झाडाच्या मुळाशी थेंब थेंब पाणी देऊन अगदी कमी पाण्यात पीक पोषण करण्याच्या पद्धतील ठिबक पद्धत म्हणतात. पारंपरिक पद्धतीपेक्षा ठिबक सिंचन पद्धतीमुळे अडीच ते तीनपट जास्त क्षेत्रावर सिंचन होते म्हणून शेती शास्त्रातला हा एक चमत्कार समजला जातो.
Copyright © 2025 | Marathisrushti