६०वर्षांपूर्वी मायकल वुडरफ यांनी ब्रिटनच्या हॉस्पीटलमध्ये जिवंत व्यक्तिवर किडनी प्रत्यारोपण केलं होतं. याआधी १९५४ ला अमेरिकाचे डॉक्टर जोसेफ ई मरे यांनी पहिल्यांदा प्रत्यारोपण केलं होतं. पण ते मृत व्यक्तीवर केलं होतं.
संस्था प्रामुख्याने शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतींमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम ठेवण्याचे काम करते.
अमोल पालेकर, विद्या सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट अमोल पालेकर यांच्या चित्रपट कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला. चित्रपटाचा नायक हा लहानपणापासून आपल्या आई-वडिलांच्या छायेत वाढलेला असतो.
बेगम बर्वे (१९७९) हे अनेकार्थांनी मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय नाटक आहे. सामान्यतः एकत्र वा विभक्त कुटुंबातील व्यक्तींचे परस्परसंबंध व त्यातून उत्पन्न होणारे ताणतणाव मराठीतील अनेक नाटकांच्या केंद्रस्थानी असतात. या नाटकात योजून चार व्यक्तिरेखा आहेत. त्यांचे एकमेकांशी रक्ताचे नाते नाही. अनाम पण दृढ भावबंधांनी या व्यक्ती परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत असेही दिसत नाही. नाटकात रूढ अर्थाने नायक-नायिका नाहीत. चौघांपैकी जावडेकर, बावडेकर व शामराव हे तिघेजण मध्यमवयीन पुरुष आहेत. बर्वे बाह्यत: पुरुष आहे परंतु अंतर्यामी तो स्त्रीचे जीवन जगतो.
मधमाशीपालन हा पारंपारीक उद्योग असलेल्या स्लोवेनिया या देशात २० मे १७३४ रोजी एका मधमाशीपालकाच्या कुटूंबात ‘एन्टोन जान्सा’ या प्रसिध्द मधमाशी तज्ज्ञाचा जन्म झाला. त्यांच्या कार्याची दखल घेत स्लोवेनिया देशाच्या जागतिक मधमाशीपालक संघटना (एपिमोन्डीया), अन्न व कृषि संघटना (एफएओ) यांच्य मदतीने संयुक्त राष्ट्रसंघाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार २० मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला.
राष्ट्रीय खेळ दिवस हा सगळ्या देशांमध्ये खूप उत्साहात साजरा केला जातो. पण ह्याच दिवशी हा दिवस का साजरा केला जातो? ह्याच तारखेला हा दिवस साजरा करण्यामागे कारण आहे आणि ते कारण म्हणजे भारताचे सुप्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद ह्यांचा जन्म.
हा दिवस त्या प्रेमीयुगुलांसाठी आहे, ज्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, मात्र नकार मिळेल या भीतीने प्रेमाचे शब्द ओठापर्यंत पोहोचू शकले नाहीत.
फणस हा आरोग्यदायी आहे ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. त्यामुळे आपल्याकडे फणस हा फक्त चवीसाठी आणि भुकेसाठी खाल्ला जातो, मात्र खरंतर फणसात जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब-6 आणि जीवनसत्त्व क ची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. जीवनसत्त्व ‘अ’ हे आपल्या डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर असते. जीवनसत्त्व ब6 हे मेंदूच्या विकासासाठी पोषक असते आणि जीवनसत्त्व क हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
सुरुवातीला किर्लोस्करवाडीत फक्त पाण्याचे पंप बनत होते. किर्लोस्करांचे पंप इतके लोकप्रिय झाले की, पुढे पंप म्हणजे किर्लोस्करांचे, अशीच ख्याती झाली. किर्लोस्करांनी पुढे आपल्या उत्पादनांचा पसारा वाढवला आणि डिझेल व विजेवर चालणाऱ्या पंपांबरोबरच यांत्रिक नांगर, ट्रॅक्टर्स अशा शेती उत्पदनांसाठी लागणाऱ्या यंत्रांचीही निर्मिती तिथेच सुरू झाली.
द्धिमत्ता, पवित्रता, शालीनता, सौंदर्यता, कलात्मकतेचे बळ घेऊन नवे स्वप्न साकारण्यासाठी उगवत्या सूर्याकडे पाहून तुतारी फुंकणारी महिला असे कंपनीचे बोधचिन्ह अजरामर झाले. याच तुतारीच्या निनादाचे बळ घेऊन येथे अयोध्येचा राजा, गोपालकृष्ण, खुनी खंजीर, राणीसाहेब व बजरबट्ट उदयकाल, चंद्रसेना, जुलूम अशा मूकपटाची निर्मिती येथे झाली.
Copyright © 2025 | Marathisrushti