गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !
मुंबईतील गिरणगावात सुरू झालेली आणि कालांतराने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणारी ‘चतुरंग प्रतिष्ठान’ ही संस्था. संगीत, नाटय़, शिक्षण, सांस्कृतिक, साहित्य या क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानची स्थापना अक्षय्य तृतीयेच्या सुमुहूर्तावर १९७४ रोजी झाली.
रेडिओवरच्या मध्यम लहरी ७९२ किलोहर्ट्झवर वर ऐकू येणारे आकाशवाणीचे पुणे केंद्र. या केंद्रात सुधा नरवणे, डॉ.प्रतिमा जगताप,भालचंद्र जोशी, सुधीर गाडगीळ, मंगेश वाघमारे, संजय भुजबळ, नीतीन केळकर अशा अनेकांची कारकीर्द बहरली.
आपल्या राजवटीखाली असलेल्या देशांना ‘स्वयंशिस्त’ लागावी, या हेतूने ब्रिटिशांनी सगळ्या देशांची एकत्रित स्पर्धा सुरू केली आणि त्यालाच कॉमनवेल्थ गेम्स अथवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असे नाव दिले.१९३० पासून या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि दर चार वर्षांनी ही स्पर्धा होते.१९४२ आणि १९४६ साली दुसऱ्या महायुद्धामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.१९३० ते १९५० या कालावधीत राष्ट्रकुलला ‘ब्रिटिश राजवट क्रीडा स्पर्धा’ म्हणूनही ओळखले जात.
दहावीपर्यंतच्या गणिताची ओळख असणा-या सर्वानाच ‘पाय्’ म्हणजे π ही संज्ञा नवीन नाही. वर्तुळाचा व्यास वा त्रिज्येवरून वर्तुळाचे परिघ व क्षेत्र काढण्यासाठी या संज्ञेचा वापर केला जातो.
या गीताची पाच कडवी असून ती म्हणण्यास वेळ लागतो, यामुळे केवळ पहिलेच कडवे संबंध भारतात म्हटले जाते. पाचही कडव्यांच्या राष्ट्रगीताचे संकलन भारतीय संस्कृतिकोश खंड-८ यामध्ये प्रामुख्याने आढळते.
ही पदयात्रा गांधीजींनी १२ मार्च १९३० ला सुरू करून २४ दिवसांनी म्हणजेच ६ एप्रिल १९३० या दिवशी संपविली व मिठाचा कायदा रद्द करविला.
आजचा दिवस हा सच्च्या भारतीयांच्या कधीही विस्मृतीत जाणार नाही. प्रत्येक भारतीयांसाठी हा दिवस अभिमानास्पद ठरला आहे. आज दिनांक २६ जुलै २०२०! २१ वर्षं पूर्ण झाली त्या विजयश्रीला मिळवून. म्हणा ती विजयश्री मिळवणं सोपं नव्हतं , त्यासाठी शेकडो वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली समर यज्ञात!
दोन रुळांमधील सरळ रेषेतील (म्हणजे कमीत कमी) अंतराला गेज म्हणतात. जगात निरनिराळया रेल्वेत वेगवेगळी गेजेस वापरली गेली आहेत.त्याचे सर्वसाधारण वर्गीकरण चार विभागात होते.
माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. माणूस निसर्गात केवळ एक ग्राहक आहे, उत्पादक नाही. अन्नासाठी, प्राणवायूसाठी तो निसर्गावर पूर्णपणे अवलंबून आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti