(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इ‌थे

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मदर इंडिया’ हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेला चित्रपट

    १९२७ साली एक अमेरिकन लेखकाने याच नावाचे एक वादग्रस्त पुस्तक लिहून भारतीय स्त्री यांच्या पुराणातील विधानांचा आधार घेऊन, स्त्री प्रतिमेला बदनाम करण्याची उठाठेव केली होती. त्यावर उत्तर देण्यासाठी, भारतीय स्त्री जशी सोशिक तशीच कशी धाडसी व कणखर असू शकते याचा प्रत्यय आणून देण्यासाठी त्याने आपल्या औरतच्या पुनरावृत्तीला ‘मदर इंडिया’ असे शीर्षक दिले.

  • महाकवी कालिदास दिवस

    कालिदास काय नव्हता ! त्याच्या साहित्याचं दर्शन घेतलं तर आपल्याला जाणवतं की कालिदास कवी तर होताच… पण तो चित्रकारही होता…एक वैज्ञानिकही होता, एक समाजशास्त्रज्ञही होता. एवढचं नव्हे तर एक मानसशास्त्रज्ञही होता….

  • वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याची वीस वर्षे

    शीतयुद्धाच्या काळात खतपाणी घातलेला, अफगाणिस्तानच्या भूमीत रुजवलेला दहशतवाद नावाचा भस्मासुर या महासत्तेवरच उलटला. अमेरिकेचे फासे अमेरिकेवरच उलटले.

  • भारतीय रेल्वेचा वाढदिवस

    जुलै १९८६ मध्ये भारतीय रेल्वे मंत्रालयाने पहिल्यांदा रेल्वेला आधुनिकतेचा टच दिला. आणि रेल्वेची सर्व माहिती ही सीआरआयएस आणि आयसीआरएस व्दारे करण्यात आली. या संगणकीय जोडीमुळे भारतीय रेल्वेचे पुर्णपणे रुपडेच बदलून गेले. त्यानंतर भारतीय रेल्वेच्या प्रगतिचा आलेख चढतच गेला. भारतीय रेल्वेचा शुभंकर म्हणून भोलू हत्तीला ओळखले जाते. हे एक कार्टून असून ज्याच्या हातात हिरवा कंदील देण्यात आला आहे. या हत्तीच्या प्रतिकास भारतीय रेल्वेच्या १५० वर्षाची पुर्तता झाल्याच्या पार्श्व भूमीवर १६ एप्रिल २००२ मध्ये बंगळूरूमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. त्याच्या बरोबर एका वर्षानंतर अर्थात २००३ मध्ये सरकारकडून या भोलू हत्तीला अधिकृतपणे प्रतिक असल्याचे घोषित करण्यात आले.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा वर्धापन दिन

    मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले व २० जून १८८७ रोजी वापरण्यास सुरुवात झाली.

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे.
    सीएसएमटी हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे.

    १८७८ मध्ये या स्थानकाच्या बांधकामाची सुरुवात झाली. या स्थानकाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दहा वर्ष लागले. त्या काळात कोणतीही इमारत बांधण्यासाठी लागलेला सर्वाधिक वेळ आहे.

    छत्रपती शिवाजी महाराज हे स्थानक मुंबईतील सर्वात मोठे रेल्वेस्थानक असून त्याची उभारणी आणि त्याच्यावरील नक्षीकाम हे पाहण्याजोगे आहे.सीएसएमटी स्थानकात प्रत्येक दिवशी हजारो नागरिकांची वर्दळ दिसून येते. या स्थानकाची रचना ही लंडनमधील सेंट पॅकार्स रेल्वे स्थानकाशी मिळतीजुळती आहे.

    सीएसटीएमटी स्थानकाची रचना ही व्हिक्टोरियन इटालियन गॉथिक रिव्हायवल प्रकारची आहे. त्याचसोबत युनेस्कोचे जागतिक वारसा लाभलेले असे हे रेल्वेस्थानक आहे. सीएसएमटीच्या परिसरात अनेक पर्यटक सुद्धा तेथील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी जगभरातून येत असतात.

    या स्थानकाची रचना फेड्रीक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटीश स्थापत्यकाराने केली आहे. या कामासाठी फेड्रीक यांना त्याकाळी १६ लाख १४ हजार रुपयांचे मानधन देण्यात आले होते.

    स्थानकाच्या मुख्यभागी असलेल्या घड्याळाखाली क्विन एलिझाबेटचा पुतळा होता. मात्र १९५० साली भारत सरकारच्या आदेशानुसार सर्व इमारतींवरील ब्रिटिशांचे पुतळे हटवण्यास सरुवात करण्यात आली. त्यामध्येच हा पुतळाही काढून टाकण्यात आला. हा पुतळानंतर १९८० पर्यंत राणीच्या बागेत उघड्यावर पडून होता. नंतर त्याचे काय झाले यासंदर्भात माहिती अधिकारा अंतर्गत दिलेल्या अर्जात या पुतळ्यासंदर्भात सरकारकडे कोणतीची माहिती नसल्याचे समोर आले. हा पुतळा तस्करीच्या माध्यामातून भारताबाहेर नेऊन विकण्यात आला किंवा नष्ट करण्यात आला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मार्च १९९६ पर्यंत या स्थानकाचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) असे होते. मात्र या स्थानकाचे नामकरण करुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) असे ठेवण्यात आले.

    मार्च १९९६ ते जून २०१७ दरम्यान हे स्थानक छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) नावाने ओळखले जायचे. २०१७ साली जून महिन्यामध्ये स्थानकाच्या नावात महाराज हा शब्द लावण्यात आला आणि तेव्हा पासून हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) म्हणून ओळखले जाते.

    सीएसएमटी स्थानकामध्ये १८ फलाट असून फलाट क्र. १ ते ७ हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकाचे आहेत.
    फलाट क्र. ८ ते १८ हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर / जलद गाड्या मार्गस्थ होतात.

    महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे. या स्थानकामध्येच रेल्वेचे एक संग्रहालय असून त्यामध्ये या स्थानकाचा इतिहास चित्ररुपात मांडण्यात आला आहे.

    महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. २००८ साली झालेल्या मुंबई हल्ल्यांमध्ये या स्थानकालाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. रात्री साडेनऊच्या सुमारास अजमल कसाब आणि त्याचा साथीदार ए के ४७ बंदूका घेऊन अंदाधुंद गोळीबार करत स्थानकामध्ये शिरले. या हल्ल्यात सीएसटी स्थानकावरील ५८ जणांचा मृत्यू झाला तर १०४ जण जखमी झाले.

    स्लमडॉग मिलेनियर या सिनेमातील जय हो हे गाणे या स्थानकात चित्रित करण्यात आले आहे. तसेच २०११ साली आलेल्या रा वन चित्रपटामध्येही हे स्थानक दाखवण्यात आले आहे. मुंबईतील सर्वात गजबजलेले स्थानक असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील प्रवाशांची संख्या घटली आहे. या स्थानकामधून दर चार ते पाच मिनिटांनी एक लोकल ट्रेन सुटते.

    २०२१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे सीएसएमटी स्टेशनला महाराष्ट्रातील पहिले ग्रीन स्टेशन म्हणून सन्मानीत करण्यात आले आहे. ग्रीन स्टेशनचे हे सर्टिफिकेट भारतीय उद्योग संघाच्या आयजीबीसी म्हणजे इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून देण्यात आले आहे. ग्रीन स्टेशनसह सीएसएमटी स्टेशन गोल्ड अवॉर्डने सन्मानित होणारे पहिले स्टेशन आहे. या स्टेशनला हे अवॉर्ड हरित क्षेत्र बनवणे, सौर पॅनल लावणे, एलईडी बल्ब, अपंग आणि वरिष्ठ नागरिकांसाठी कम्प्युटर फ्रेंडली बनवण्यासारख्या अनेक वैशिष्ट्यांसाठी मिळाले आहे. सीएसएमटी स्टेशनवर स्मार्ट प्रवाशी सुविधा जसे की, वायफाय, स्वयंचालित तिकिट वेंडिंग मशीन्स, पर्यटन माहिती आणि बुकिंग केंद्र, खाद्य स्टॉल, फार्मसी आणि वैद्यकीय सुविधा इत्यादी उपलब्ध आहे. प्लास्टिक प्रतिबंधसंबंधी उपाय करण्यात आले आहेत. स्टेशनमध्ये प्लास्टिक बॅगचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्लास्टिक बॅगचे पर्यावरणावरील प्रतिकूल परिणामांची माहिती देणारे डिजिटल डिस्प्ले बोर्ड आहेत.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • रामदास बोट बुडली

    १७ जुलै १९४७ चा तो दिवस. मुंबईहून सकाळी आठ वाजता रेवसकडे जाण्यास निघालेली ‘रामदास’ बोट मुंबई बंदरापासून अवघ्या ९ मैलांवर असलेल्या ‘काश्या’च्या खडकाजवळ प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे कलती होऊन समुद्रात बुडाली. तिच्याबरोबर त्या बोटीने प्रवास करणा-या सुमारे हजारभर प्रवाशांपैकी सुमारे ६२५ जण समुद्रात बुडून मरण पावले. या भीषण दुर्घटनेतून २३२ उतारूंचा सुदैवाने जीव बचावला. त्यात रामदास बोटीचा कप्तान शेख सुलेमान हा होता.

  • कार्टून ‘मिकी माऊस’ चा वाढदिवस

    कार्टून ‘मिकी माऊस’ चा वाढदिवस

    ९३ वर्षांचे मिकी माऊस जगातील सर्वात वयस्कर कार्टून कॅरेक्टर. फेलिक्स-द कॅट हे पहिले तर बोन्जो-द डॉग हे दुसरे कार्टून कॅरेक्टर आहे.

  • जागतिक क्षयरोग दिन

    ट्युबरक्युलोसिस म्हणजे (क्षयरोग) हा संसर्गजन्य आजार असून , तो ‘मायकोबॅक्टेरिया ट्युबरक्युलोसिस’ या जंतूमुळे होतो. वाढत्या शहरीकरणामुळे अस्वच्छ परिसर , दाटीवाटीने वाढणार्या झोपड्या व जास्त घनतेच्या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये क्षयरोग होण्याची शक्यता अधिक असते.

  • जागतिक पियानो दिवस

    दी चित्रपटांतील सुमधुर संगीतातून ठसा उमटविलेल्या शंकर-जयकिशन या संगीतकार जोडगोळीतील शंकर यांचा पियानो पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ठेवला आहे. जर्मनीतील स्टुटगार्ट शहरात तयार करण्यात आलेला हा पियानो सुमारे ९० वर्षांपूर्वीचा आहे. स्कीडमायर कंपनीच्या या अप्राइट पियानोमध्ये साडेसात सप्तकातील ८८ पट्ट्या आहेत. संगीतकार नौशाद हे स्वत: उत्तम पियानोवादक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या अनेक गाण्यांत पियानोचा वापर केला आहे. ‘अनमोल घडी’ या चित्रपटात ‘जवाँ है मुहब्बत हसीं है जमाना..’ या नूरजहाँने गायलेल्या गाण्यात पियानोचे दर्शन घडते.

  • जागतिक कडधान्य दिन

    ‘जागतिक कडधान्य दिन’ पहिल्यांदा २०१६ मध्ये साजरा करण्यात आला, नंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १० फेब्रुवारी हा जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. तेव्हापासून हा दिवस ‘जागतिक कडधान्य दिन’ म्हणून साजरा केला जातो.