(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

Sort By:

  • अजिंठ्याची लेणी लोकांच्या दृष्टिपथात आणली गेल्याची 203 वर्षे

    १८२२ मध्ये सर विल्यम एर्स्किन यांनी आपल्या लेखनात जॉन स्मिथ दैनंदिनी ईस्ट इंडिया कंपनीचे निर्देशनासह अजिंठा लेणी स्थापत्य, शिल्प व चित्रांची चर्चा केली आहे. इसवी सन पूर्व २०० च्या सुमाराला लेणी खोदण्यास सुरुवात झाली होती. पैठणच्या सातवाहन घराण्यातील सम्राटानी याची सुरुवात केली. सातवाहन काळात ८, ९, १०,१२, १३ आणि १५ या लेण्यांचे खोदकाम पूर्ण झाले. पुढे जवळपास ५०० वर्षे खोदकाम बंद होते त्यानंतर पुन्हा पाचव्या शतकात गुप्त , वाकाटक आणि बदामीच्या चालुक्यांनी येथील लेण्यांचे खोदकाम सुरु केले.

  • दुबईमधील बुर्ज खलिफा

    बुर्ज खलिफाच्या बांधकामासाठी ९७ अब्ज रुपये खर्च आला. याचे प्रायमरी स्ट्रक्चर मजबूत सिमेंटपासून तयार केले आहे. बुर्ज खलिफा साठी ३३०००० क्युबिक मीटर सिमेंट आणि ५५००० टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

  • व्हॉट्सअपचा वाढदिवस

    सुरुवातीच्या दिवसात व्हॉट्सअप चा इन्कम महिन्याला फक्त ५००० डॉलर्स इतकाच होता. परंतु २०११ जेव्हा त्यांनी अँड्रॉइड मोबाईल साठी आपले व्हॉट्सअप लाँच केले तेव्हा त्यांचा इन्कम २ वर्षात २० पटीने वाढला आणि त्यांचे अँप Play Store मध्ये २० व्या क्रमांकाचे अँप बनले. २०१४ मध्ये व्हॉट्सअप चा प्रभाव एवढा वाढला कि फेसबुक चे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना फेसबुक मेसेंजर ची लोकप्रियता कमी होते की काय याची भीती वाटू लागली.

  • रेडिओ सिलोन’ च्या हिंदी सेवेची ७१ वर्षे

    १९४९ ते ६०च्या कालखंडात ऑल इंडिया रेडिओवर हिंदी सिनेमागीतांना बंदी असताना रेडिओ सिलोनने ती सारी गाणी घराघरात पोहोचवली. आशिया खंडातल्या विविध भाषांमधल्या ३५ हजार ओरिजनल रेकॉर्डस सिलोनच्या संग्रही असून, विविध भारतीकडे नसलेल्या अनेक रेकॉर्ड्सचा त्यात समावेश आहे.

  • शिवसेना स्थापना दिवस

    शिवसेना या संघटनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी झाली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने स्थापन झालेल्या संघटनेचे मा. प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेना असे नामकरण केले.

    मा.प्रबोधनकार ठाकरे यांच्या खोलीत अवघ्या १८ जणांच्या साक्षीने ‘शिवसेने’ची स्थापना झाली होती. मराठी माणसासाठी लढणारी आक्रमक संघटना यापुरतीच शिवसेनेची कार्यकक्षा सीमित होती. स्थापनेनंतर एक महिन्याने झालेल्या बैठकीत उपस्थितांनी शपथ घेतली होती. या शपथेचा मसुदा होता आपली मालमत्ता परप्रांतीयांना विकू नये, मराठी ग्राहकांशी विनयाने वागावे, मराठी नोकर नेमावे, मराठी शाळा, संस्थांना मदत करावी, मराठी बांधवांची गृहरचना संस्था काढावी, मराठी सण-समारंभांत भाग घ्यावा, मराठी बांधवांच्या मदतीला धावा याबरोबरच इंग्रजी टायपिंग शिकावे, आळस झटका, उडपी हॉटेलवर बहिष्कार टाकावा, मराठी व्यावसायिकाची उमेद वाढवा, त्याला नामोहरम करू नका, राज्यात कोठेही काम करण्याची मानसिकता जोपासा. शिवसेनेची स्थापना झाल्यावर २६ जून १९६६च्या ‘मार्मिक’मध्ये शिवसेनेचे बोधचिन्ह म्हणून डरकाळ्या फोडणारा ‘वाघ’ छापण्यात आला. सोबत शिवराय होतेच. पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे चित्र आणि ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे वचन लिहिले होते आणि मोठ्या अक्षरात मराठी माणसाच्या या संघटनेचे नाव छापले होते ‘शिवसेना’!

    शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला तब्बल चार लाख लोक जमले होते. ‘मार्मिक’ वगळता इतर कोणत्याही वर्तमानपत्रात शिवसेनेच्या शुभारंभाच्या मेळाव्याची घोषणा अथवा जाहिरात नव्हती. तरीही मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अन्य भागांतून मेळाव्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. शिवाजी पार्क खच्चून भरले होते. विशेष म्हणजे, दादर रेल्वे स्थानकावरून शिवाजी पार्ककडे जाणारे रस्ते फुलून गेले होते. शाहीर साबळे यांच्या गाण्याने मेळाव्याची सुरुवात झाली. मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रबोधनकार म्हणाले, ठाकरे कुटुंबाचा असलेला हा बाळ मी तुम्हाला, या महाराष्ट्राला आज अर्पण करत आहे!

    शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्याची मार्मिकमधील जाहिरात.

    मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेचा भव्य मेळावा.

    मार्मिक कचेरी :
    ७७- ए रानडे रोड, शिवाजी पार्क,
    मुंबई-२८, डीडी
    फोन ‌: ४५२८९२
    दि. २७ आक्टोबर १९६६
    जय महाराष्ट्र वि. वि.
    महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तिदायक चरणांवर प्रतीक्षेचा माथा ठेवून महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी सिद्ध झालेल्या शिवसेना सैनिकांचा मेळावा रविवार दि. ३० आक्टोबर १९६६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, शिवाजी पार्क, दादर येथे.
    भरणार आहे. आपण महाराष्ट्राचे निष्ठावंत अभिमानी. आपण या मेळाव्याला जातीने हजर राहावे, अशी शिवसैनिकांच्या वतीने मी आपणास विनंती करत आहे.
    आपला नम्र, महाराष्ट्रसेवक
    - बाळ ठाकरे

    शिवसेनेचा इतिहास अनेक प्रकारे लिहिला जाईल. पण त्यातील दोन गोष्टी इतिहासाला ठामपणे लिहाव्याच लागतील. त्या दोन गोष्टी म्हणजे शेवट पर्यत एका पक्षाचा एकच नेता आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणात राहून जात न माणणारा आणि मित्रता कायम जपणारा नेता. असा माणूस राजकारणात आता होणे नाही. दिलेला शब्द न मोडणारा, ‘तुझी जात कोणती’ असे न विचारता निवडणुकीत तिकीट देणारा आणि १९९५चे मंत्रिमंडळ महाराष्ट्रातील सर्व छोटय़ा-मोठय़ा जातींचे तयार करून सामाजिक समतेच संदेश देणारा देशातील एकमेव नेता म्हणजे मा.बाळासाहेब ठाकरे.

    शिवसेनेचे सामर्थ्य वाढले ते सामान्य माणसाला बाळासाहेबांनी ताकद देऊन मोठे केले आणि ते स्वत: सत्तेपासून दूर राहिले म्हणून. आपल्याभोवती जमलेल्या सवंगड्यांवर त्यांनी विश्वास टाकला. त्यांना मोठे केले. आज महाराष्ट्रात बाळासाहेबांमुळे राजकारणात मोठी झालेली जी माणसे आपण पाहतो आहोत, ती माणसे मनमोकळेपणाने आपल्या यशाचे सर्व श्रेय बाळासाहेबांना देतात, त्यात संकोच करीत नाहीत.

    संकलन: संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • जागतिक अस्थमा दिवस

    जगभरात असणाऱ्या दमा किंवा अस्थमाच्या रुग्णांमध्ये आणि या विषयी संभ्रम मनात असणाऱ्यांमध्ये याबाबतची जनजागृती निर्माण करण्यासाठी म्हणून मे महिन्याचा पहिला मंगळवार जागतिक अस्थमा दिवस म्हणून साजरा केला जातो. 

  • पुण्यातील भारत सेवक समाजाचा वर्धापन दिन – १२ जून

    गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेली ही संस्था संख्यात्मक अंगाने विचार केला तर कधीच खूप मोठी झाली नाही आणि तरीही ती दखलपात्र ठरली. कारण तिच्या सदस्यांनी केलेल्या कार्याची गुणवत्ता. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने याच नावाची दुसरी संस्था पुरस्कृत केल्यामुळे संस्थेने आपले नाव बदलले आणि‘हिंद सेवक समाज’ असे नवे नाव सरकार दरबारी नोंदवले.

  • जोसेफ सिरिल बमफोर्ड (जेसींबी)हे जगातलं पहिलं यंत्र बाजारात लाॅंच झालं

    १९५७ साली या यंत्राच्या एका बाजूला डिगर अन् दुसऱ्या बाजूला क्रेनसदृश्य रचना अशी टू इन वन अशी योजना केली जी खूपच यशस्वी झाली. या यंत्रानं कृषी व्यतिरिक्त बांधकाम विभागातही दमदार एंट्री मारली आणि जोसेफच्या कंपनीनं कृषी सोबत बांधकाम विभागातही धुमाकूळ केला.

  • प्रभात फिल्म कंपनीचा खूनी खंजीर चित्रपट

    द्धिमत्ता, पवित्रता, शालीनता, सौंदर्यता, कलात्मकतेचे बळ घेऊन नवे स्वप्न साकारण्यासाठी उगवत्या सूर्याकडे पाहून तुतारी फुंकणारी महिला असे कंपनीचे बोधचिन्ह अजरामर झाले. याच तुतारीच्या निनादाचे बळ घेऊन येथे अयोध्येचा राजा, गोपालकृष्ण, खुनी खंजीर, राणीसाहेब व बजरबट्ट उदयकाल, चंद्रसेना, जुलूम अशा मूकपटाची निर्मिती येथे झाली.

  • जागतिक दहशतवादविरोधी दिन

    जागतिक दहशतवादाचा सगळ्यात मोठा हादरा भारताला बसलेला आहे, यामुळे भारतीय युवकांची भूमिका दहशतवादाला समूळ नष्ट करण्याची असली पाहिजे. आमच्या देशात येऊन घातपाती कृत्य करणाऱ्या अतिरेकींना धडा शिकविण्यास सज्ज असले पाहिजे.