एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
तेजाब’ मधून एन. चंद्रा यांनी बेरोजगारी, बेकारी, गुन्हेगारी व भ्रष्टाचार यातून निर्माण होणारे नैराश्य व तरूणांपुढे निर्माण झालेला अस्तित्वाचा प्रश्न याची मांडणी केली.
अरे किती रंग बदलशील? एखादा सरडा पण तुझ्यापेक्षा कमी रंग बदलत असेल , असं बोलून आपण सरड्याला बदनाम करतो. वास्तविक पाहता सरडा आपला रंग वेगवेगळ्या कारणांसाठी बदलतो. त्याला अनेक नैसर्गिक व विज्ञानातील कारणं आहेत.
पुण्याचे भूषण असलेली संगीत क्षेत्रातील एक पूज्य वास्तू " पुणे भारत गायन समाज " आज १०७ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. देवगंधर्व पंडित भास्करबुवा बखले यांनी १ सप्टेंबर १९११ साली स्थापन केलेली हि वास्तू पुढे अनेक दिग्गज कलावंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आणि आजही होत आहे. या संस्थेमार्फत संगीत प्रचार आणि प्रसाराचे काम गेली १०७ वर्ष अविरत पणे चालू आहे.
याच संस्थेच्या भास्कर संगीत विद्यालयामध्ये गायन,तबला,सतार,हार्मोनियम,व्हीयोलीन,कथ्थक, भरतनाट्यम इत्यादी कलाप्रकारांचे शात्रोक्त पद्धतीनी शिक्षण दिले जाते . यामध्ये मध्यमा,विशारद,पारंगत अशा १० वर्षाचा लिखित अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जाते.
संस्थेच्या अभ्यासक्रमाला १९६२ मध्ये राज्यसरकारने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक संगीत विद्यालये भास्कर संगीत विद्यालयाशी संलग्न आहेत.सौ.शैला दातार या पुणे भारत गायन समाजच्या अध्यक्षा आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ.इंटरनेट
संग्रह म्हटलं की छंद, सामान्य व्यक्ती एखाद्या गोष्टीकडे सीमित दृष्टीकोनातून पाहते पण त्याच गोष्टीकडे छंदवेडी व्यक्ती कल्पकतेने पाहते. छंद आयुष्यात उर्जा निर्माण करतो,असे मानणाऱ्या आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात कोणतातरी छंद बाळगायला हवा असे म्हणणारे आमचे मित्र धनंजय बदामीकर यांचा विंटेज कार चा छंद.
‘विंटेज कार’ बाळगणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. याचा अर्थ ही हौस केवळ श्रीमंत माणसांचीच आहे, असेही नाही. मुख्य म्हणजे त्यासाठी गाडीवर प्रेम असावे लागते. ही गाडीसुद्धा इतर गाडय़ांसारखी धातूपासूनच तयार झालेली असते. असे असले तरी हिचा सांभाळ करताना धसमुसळेपणा करून चालत नाही. तिला तळहातावरील फोडाप्रमाणे जपावे लागते. ती आहे तशीच रहावी यासाठी हरप्रकारे प्रयत्न करावे लागतात. एकीकडे अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या कितीही गाडय़ा बाळगल्या तरी ही गाडी अनमोल असते. इतर गाडय़ांच्या बाबतीत आपण कितीही ‘रफ अॅंण्ड टफ’ वागत असलो तरी व्हिन्टेज गाडय़ांच्या बाबतीत मात्र ‘हँडल वुइथ केअर’ या धोरणाचा अवलंब करावा लागतो.
पुण्यातील आमचे मित्र धनंजय बदामीकर असाच विंटेज कारचा छंद बाळगून आहेत. धनंजय बदामीकर यांच्या कलेक्शन मध्ये अनेक विंटेज कार आहेत. त्यांच्या विंटेज कार्स अगदी कालच खरेदी केल्यासारख्या दिसतात. गेली सोळा वर्षे ते विंटेज कार छंद बाळगुन आहेत.
त्यांच्या कलेक्शन जर्मन कार मध्ये, व्हॉक्स वॅगन टेम्पो, ओपेल, बीटल, मायक्रो बस, जेट्टा, अमेरिकन कार मध्ये,फोर्ड, डीसेटो, ब्यूक, शेवरलेट फ्रेंच कार मध्ये सिट्रोन, एच व्हॅन, भारतीय कार मध्ये हिंदुस्थान, लॅडमास्टर, फियाट अशा मिळून जवळ जवळ ७० ते ७५ व्हिन्टेज कार आहेत.
धनंजय बदामीकर नेहमी म्हणतात, ‘व्हिन्टेज कार’ बाळगायची असेल तर गाडीवर जीव असावा लागतो. व्हिन्टेज कारची निगा कशी राखावी, यावर धनंजय बदामीकर म्हणतात मुळात म्हणजे ही नेहमीसारखी गाडी नाही. या गाडय़ांना पॉवर स्टेअरिंग नसते, ब्रेकसुद्धा मेकॅनिकल असतात. त्यामुळे चालवताना ती सांभाळून चालवावी लागते. त्याचप्रमाणे आठवडय़ातून किमान २० ते २५ किलोमीटर चालवली पाहिजे. तसे नाही केले तर ब्रेक ‘जाम’ होऊ शकतील, टायरची समस्या उभी राहू शकेल. सहा महिन्यांतून एकदा तरी या गाडीचा ‘चेक अप’ करायला हवा. अशा गाडय़ांचे सुटे भाग सहजासहजी मिळत नाहीत. मुंबईतील ऑपेरा हाउस किंवा चोर बाजार या ठिकाणी गाडय़ांचे सुटे भाग काही वेळा मिळतात. तसे नसेल तर मात्र ते तयार करावे लागतात. त्यासाठी तशी जाणकार व्यक्ती असली पाहिजे. म्हणूनच अनेक व्हिन्टेज कारमालक सुटे भाग जमवून ठेवतात. म्हणजे एखाद्या बाजारात जुन्या प्रकारचे गिअर्स दिसले, इंजिन दिसले तर गरज नसूनही ‘व्हिन्टेज कार’चा मालक ते भाग घेऊन ठेवतो. यांची मूळ किंमत शंभर रुपये असली तरी विकत घेताना अशा भागांसाठी कदाचित पंधराशे रुपयेही मोजावे लागू शकतात. आम्ही धनंजय बदामीकर यांच्या बरोबर मुंबईतील ऑपेरा हाउस, चोर बाजार या ठिकाणी गाडय़ांचे सुटे भाग खरेदी करण्यास कित्येक वेळा गेलो आहोत. धनंजय बदामीकर यांच्या गाड्या प्रदर्शनासाठी नेल्या जातात, तेव्हा त्यांना खूप काळजी घ्यावी लागते. तिच्या बाजूला सुरक्षारक्षक उभा करावा लागतो. कारण पाहणारा पटकन दार उघडतो किंवा कुठेही हात लावतो. तसे करताना चुकून हँडलला काही झाले, किंवा आरसा वाकला किंवा काहीही झाले तरी त्याची डागडुजी करण्याचा खर्च खूप असू शकतो किंवा तुटलेला सुटा भाग परत मिळेलच असे नाही.
साडे माडे तीन, दुनियादारी, बालगंधर्व, अक्षय कुमारचा रुस्तम, अशा अनेक चित्रपटात धनंजय बदामीकर यांच्या विंटेज कार आपण बघीतल्या असतीलच.
धनंजय बदामीकर यांच्या विंटेज कार रस्त्यावरून जाताना ‘वो गाडी देख’ अशा प्रकारचे संवाद कानी पडतात तेव्हा त्याला तोड नसते. केवळ बुजुर्गच नव्हे तर लहान मुलेही वळून वळून या गाडीकडे पाहतात. सिग्नलला थांबल्यावर कोणी गाडीची चौकशी करतो, कोणी नुसताच ‘थम्स अप’ करून दाखवतो, तेव्हा त्याने गाडी सांभाळण्यासाठी घेतलेली मेहेनत सार्थकी लागल्याचे त्यांना एक समाधान मिळते! धनंजय बदामीकर यांनी आपल्या गाड्या दुरुस्ती साठी स्वत:चे आद्यावत गॅरेज बनवले आहे. धनंजय बदामीकर यांना त्यांच्या विंटेज कारचे कायम स्वरूपी एक संग्रहालय करायचा विचार आहे. जागतिक संग्रहालय दिवसाच्या निमित्ताने धनंजय बदामीकर यांचा विंटेज कारच्या छंदाला सलाम.
धनंजय बदामीकर संपर्क.
९४२२००९८९५
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
६ मार्च १९७१ रोजी सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण करून आपली कसोटी कारकीर्द सुरू केली होती. त्या वेळी ते भारतीय संघात एक सर्वात लहान वयाचे खेळाडू होते. ज्याने आंतरशालेय, विद्यापीठ, रणजी अशा विविध स्तरांवरील क्रिकेट सामन्यांमध्ये धावांचे डोंगर रचले होते-त्या वेळी गावसकर विंडिजच्या तोफखान्यासारख्या भासणार्याा, अक्षरश: आग ओकणार्यार गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करत असताना या मालिकेतील त्या खेळाडूचा खेळ क्रिकेट रसिकांना थक्क करून सोडणारा होता. संपूर्ण मालिकेत १ द्विशतक आणि ३ शतके यांच्या साहाय्याने १५४.८० च्या सरासरीने एकूण ७७४ धावांचा पर्वत या खेळाडूने रचला.
आपल्या गुरूच्या आज्ञेवरून १ जुलै १९२५ रोजी ‘देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ या संगीत विद्यालयाची स्थापना केली. गिरगावातील प्रार्थना सभेच्या जागेमध्ये विद्यालय सुरू केले. विद्यालयाचे नामकरण श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केले .
दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेल्या जर्मनीचे चार तुकडे करून ते चार जेत्यांनी आपसात वाटून घेतले. त्याचप्रमाणे राजधानी बर्लिनचेही झालेले चार तुकडे जेत्यांमध्ये वाटले गेले. त्यापकी पश्चिमेचे तीन तुकडे अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सकडे आले, तर पूर्वेकडचा तुकडा रशियाच्या सोव्हिएत युनियनकडे आला.
पाच हजार वर्षापूर्वी मार्गशीर्ष शुध्द एकादशीला मंगल सुप्रभाती कुरूक्षेत्राच्या रणभूमीवर योगेश्वर श्रीकृष्णाने जीवनाचा दिव्य संदेश, महान विचार दिला.
जेष्ठांपासून युवा वर्गापर्यंत मौखिक आरोग्य स्वच्छतेची काळजी आणि त्याच्या फायद्यांसंबंधी जागरूकता वाढवणे हाच या आंतरराष्ट्रीय दिवसाचा उद्देश आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात ‘एक संपन्न प्रांत’म्हणून बिहारची ओळख होती. देशाच्या साखरेच्या उत्पादनाचा २५ टक्के वाटा, तांदूळ, गव्हाचे २९ टक्के उत्पादन होते. फळ-फळावळांचा ५० टक्के उत्पादनाचा वाटा बिहारचा ! ताग, कापड, तंबाखू उत्पादन करणारा गंगेच्या खोऱ्यातील प्रांत होता.
Copyright © 2025 | Marathisrushti