व्यक्ती-परिचय

दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर

Category:

 

क्रिकेट, शिकार, वाचन, सुग्रास भोजन या गोष्टी त्यांना मनापासून प्रिय होत्या. रसिकतेचे राजस जीवन जगत असतानाही त्यांनी आपल्या खाणीतील मजुरांकडे किंवा मंत्रालयातील फाइलींकडे कधीच दुर्लक्ष केले नाही.

दिनविशेष

महाकवी कालिदास दिवस

Category:

 

कालिदास काय नव्हता ! त्याच्या साहित्याचं दर्शन घेतलं तर आपल्याला जाणवतं की कालिदास कवी तर होताच… पण तो चित्रकारही होता…एक वैज्ञानिकही होता, एक समाजशास्त्रज्ञही होता. एवढचं नव्हे तर एक मानसशास्त्रज्ञही होता….

व्यक्ती-परिचय

सूत्रसंचालक, अभिनेते, दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे

Category:

 

शिक्षण घेत असताना एकपात्री, मिमिक्रीच्या माध्यमातून स्वतःतील कलाकार कायम जिवंत ठेवला. ते स्वत: चांगले गातात, दिग्दर्शन करू शकतात, चित्रकार काढतात, अभिनया व्यतिरिक्तच्या या गोष्टी फारच कमी लोकांना माहीत आहेत. “महाराष्ट्राचा सुपरस्टार’, “फू बाई फू’, “होम मिनिस्टर’, “दुभंग’ (मराठी चित्रपट) आणि चला.. हवा येऊ द्या”असा त्यांचा प्रवास आहे.

व्यक्ती-परिचय

दिग्दर्शक दत्ता केशव कुलकर्णी उर्फ दत्ता केशव

Category:

 

दत्ता केशव यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘अति शहाणा त्याचा.’ (१९६७) त्या वेळेस हा चित्रपट मराठी आणि भोजपुरी भाषेत करण्यात आला होता. पुढे ‘बायांनो नवरे सांभाळा’ हा चित्रपट १९७४-७५ साली प्रदर्शित झाला. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दत्ता केशव यांचे होते. ‘पिंजरा’नंतरचा हा मराठी रंगीत चित्रपट होता.

व्यक्ती-परिचय

हास्य अभिनेता नूर मोहम्मद चार्ली

Category:

 

स्टूडियो सिस्टम जेव्हा बंद होऊ लागली तेव्हा नूर मोहम्मद चार्ली हे ४० च्या दशकात पृथ्वीराज कपूर व दुर्गा खोटे यांच्या सारखे फ्री लान्सीग करू लागले होते एवढी त्यांना मागणी होती. एक काळ असा होता की नूर मोहम्मद चार्ली यांच्या नावावर चित्रपट चालत असे.

व्यक्ती-परिचय

फिल्मकार सईद अख्तर मिर्जा

Category:

 

१९९५ साली त्यांनी आपला शेवटचा चित्रपट ‘नसीम’ बनवला. ‘नसीम’ हा चित्रपट बाबरी मशीद पाडल्या नंतरच्या सामाजिक वातावरण व राजनीतिक परिवर्तनावर होती.

लेखसंग्रह

सर्वांग परिपूर्ण सुखाची परिभाषा मेघदूतम् !

Category:

 

रसग्रहण हा तर मेघाच्या दृष्टीने एक वेगळाच विषय. मार्गात येणारी प्रत्येक नदी त्याची प्रेयसी आहे. त्याच्या विरहात ती रोडावली आहे. त्या प्रत्येकीचे पाणी (णि) ग्रहण करीत रसग्राही मेघ पुढे सरकत राहतो. पाथेय म्हणून कमलतंतु धारण करणारे राजहंस, कर्दळीच्या कळ्या खाणारे हरीण शावक, मकरंद ग्रहणाने धुंद झालेले भ्रमर या सगळ्या रसांच्या सोबत भगवान महाकालाच्या मंदिरात आणि हिमालयावर प्रत्यक्ष भगवान शंकरांच्या सानिध्यात ओसंडून वाहणारा भक्तिरस हा एक वेगळाच आनंदोत्सव आहे.

कथा

लोअर वरळी

Category:

 

गिरणगांव बचाव म्हणून बुध्दिवंतांची एक बैठक झाली, त्याला कवी-लेखक-शाहीर सगळे हजर होते. एक गाव लाटेखाली बुडायच्या मार्गावर आहे, त्याला वाचवायच म्हणजे काय करायच, हाच खरा प्रश्न आहे. तस हे गाव संपाच्या ओझ्याखाली केव्हाच मोडून गेलय.

व्यक्ती-परिचय

दत्तात्रय नारायण धर्माधिकारी

Category:

 

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही अथक परिश्रम घेऊन, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्वांगीण पुरु षार्थाची ओळख त्यांनी, स्वत:ची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली. बैठकांच्या मौखिक निरूपणाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्यसंपन्न समाजनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे.

साहित्य - ललित

निपटारा – भाग  1

Category:

 

सांगायचा मुद्दा ज्या ‘अरु’च्या मैत्रीखातर मी औरंगाबादला उच्च शिक्षणासाठी आले, ती माझी जिवाभावाची मैत्रीण इतकी अचानक आणि अशा भयानक पद्धतीने जावी आणि मला, तिच्या जिवलग मैत्रिणीला तिने विश्वासातही घेऊ नये याचे मला फार दुःख झाले. हा धक्का सहन होण्यासारखा नव्हता. निदान माझ्यासारख्या जिद्दी मुलीला तरी.

मी ताबडतोब तिच्या घरी गेले. तिचे आईवडील तर काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अरू त्यांची एकुलती एक अत्यंत लाडकी मुलगी. फार लाघवी. आत्महत्त्येच्या बातमीत तिच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवले होते. तिला दिवस गेले होते आणि त्याच भयाने म्हणे तिने हा अघोरी मार्ग पत्करला असावा!